Sufi

ते काय आहे ना? किराणा मालाच्या दुकानात किराणा घेताना सामान्य माणूस गरजेची वस्तू म्हणून सहज पैसे पुढे करतो. पण भारतीय मानसिकता जेव्हा मेडिकल स्टोअर्स मध्ये जाऊन सॅनिटरी नॅपकिन्स घेताना हातातून पैसा सुटत नाही. त्यामुळे याचं मूळ नेमकं आहे कुठे? याचा आर्थिक व्यवहाराशी असलेला संबंध समजून घेणे गरजेचे होते. कारण 'न परवडणाऱ्या वर्गात ' अडकलेला हा विषय असतो. तो नेहमीच चर्चेत असतो. 
सॅनिटरी नॅपकीन वापराला १८८० नंतर सुरुवात झाल्याचा उल्लेख आढळतो. हे नॅपकिन्स अस्तित्वात येऊन सुमारे सव्वाशे वर्षे झाली असली तरी अजूनही भारतात ते सर्व स्तरांपर्यंत पोहोचू शकलेले नाहीत.
शक्य तिथे, शक्य त्या पद्धतीने सॅनिटरी नॅपकिन्स, सॅनिटरी वेअर, मासिक पाळी या विषयांसदर्भातील टॅबू दूर करण्याचा जोरदार प्रयत्न होत आहे. सामाजिक माध्यमांमधूनही खुलेपणाने मासिक पाळीबद्दल चर्चा होत आहे. हा विषय काळ्या प्लास्टिकच्या पिशवीतील सॅनिटरी नॅपकिनच्या पाकिटाप्रमाणेच लपवला गेला आहे.
परिणामी,
मासिक पाळीत वापरली जाणारी उत्पादने अजूनही मोठा नफा कमवून विकले जात आहे आणि त्यावरील करांमुळे ते अनेकांच्या आवाक्याबाहेर जात होते. एकीकडे जिमनॅस्टिक्स, स्वीमिंग याचा सराव मासिक पाळीच्या दिवसांमध्येही इतर दिवसांप्रमाणेच करा, असा संदेश दिला जात असताना दुसरीकडे या नॅपकिन्सच्या दराचे आणि कराचे ओझे लादून हा आनंद बाजूला ठेवण्याचेच सूचित केले जात होते. कापड त्वचेसाठी चांगले असले तरी नोकरी करणाऱ्यांसाठी किंवा शाळा-कॉलेजच्या निमित्ताने दिवसभर बाहेर राहणाऱ्यांसाठी सॅनिटरी नॅपकीन, टॅम्पोन्स, कप्स या गोष्टी सोयीस्कर ठरतात. रॅशेस, जंतूसंसर्ग या गोष्टी टाळण्यासाठी दिवसभरातून चार ते पाच वेळा सॅनिटरी नॅपकिन बदलावेत. मात्र पहिले दोन किंवा तीन दिवस वगळल्यास एवढ्या वेळा नॅपकिन बदलले जात नाहीत. याचे एक महत्त्वाचे कारण या नॅपकिन्सची किंमत.
अजूनही या किमतीमुळे महिला सॅनिटरी नॅपकिनकडे वळत नाहीत. ही किंमत कमी झाली असती तर उर्वरित महिलांनी लगेच सॅनिटरी नॅपकीन वापरायला सुरुवात केली नसती, मात्र याची संख्या मात्र वाढली असती.
एका सॅनिटरी पॅडचा खर्च
एका नॅपकिनची किंमत ७ ते ८ रुपयांपर्यंत आहे. दिवसभरात तीन ते चार नॅपकिन्स असा विचार केला तर एका दिवसात २८ ते ३० रुपयाचे नॅपकिन. असे चार ते पाच दिवस. म्हणजे मासिक पाळीत नॅपकिनसाठी १०० रुपयांहून अधिक खर्च होतो. 
एखाद्या घरात दोन किंवा तीन महिला असल्या की हा खर्च त्या पटीत वाढत जातो. मासिक पाळीवर एवढा खर्च... हे समीकरण दिवसाला शंभर रुपयेसुद्धा कमावू न शकणाऱ्यांकडून नाकारले जाणे स्वाभाविकच आहे. नवऱ्याच्या पगारात भागवायचे तर सॅनिटरी नॅपकिनची चैन कशी करता येईल...? असे मत जेव्हा महिला व्यक्त करतात तेव्हा सॅनिटरी नॅपकिन ही गरज नाही तर चैन आहे हे चित्र अजूनही महिलांच्या आरोग्याला दुय्यम लेखण्याची मानसिकता अधोरेखित करते.
देशातील ८८% भारतीय आदिवासी स्त्रिया घरगुती पर्याय म्हणून जुने कापड, रग, वाळू, राख, लाकूड शेव्हिंग, वृत्तपत्र, वाळलेली पाने, मक्याच्या कणसाचे आवरण, गवत आणि प्लास्टिक याचा वापर करतात. दुसरीकडे हातावर पोट असणाऱ्या महिलाही सर्वसाधारणपणे कापडच वापरतात. पाळीच्या दोन-तीन दिवसांमध्ये या महिला घरीच राहतात. नॅपकिन विकत घेणे त्यांना परवडत नाही. काम करताना कापड बदलणे शक्य होत नाही. कापड बदलले तरी आधी वापरलेले कापड ठेवायचे कुठे असा प्रश्न निर्माण होतो. कापडाचा वापर झाल्यास केवळ कपड्यांवर डाग पडण्याची भीती, अधिक रक्तस्राव या बाबींमुळे घरी थांबण्याची वेळ येते. त्यामुळे त्यांची रोजंदारीही बुडते. मासिक पाळी ही दैनंदिन आयुष्याचा भाग होण्यासाठी मदत न झाल्याने मुली शाळा सोडून घरी बसतात.

सॅनिटरी नॅपकिन्स अस्तित्वात येऊन सुमारे सव्वाशे वर्षे झाली असली तरी अजूनही भारतात ते सर्व स्तरांपर्यंत पोहोचू शकलेले नाहीत. एकीकडे पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून स्त्री उभी आहे वगैरे बोलले जात असताना दुसरीकडे दर महिन्याला तीन ते चार दिवसाचे आयुष्य केवळ सोयींच्या अभावामुळे अंधाऱ्या खोलीमध्ये, घरातच काढावे लागते हे कोणत्या समानतेचे चिन्ह आहे हा प्रश्न निर्माण होतो. तसेच मुलींच्या सोयीसाठी शाळांमध्ये सॅनिटरी नॅपकिनची सोय करून देण्यात आली आहे. शाळांमध्ये ही सोय सामाजिक संस्थांच्या माध्यमातून सुरू करण्यात आली आहे. मात्र महाविद्यालयांमध्ये गेल्यावर काय, हा प्रश्न उरतो. महाविद्यालयांमध्ये गेल्यावर पुन्हा ते आर्थिक अडचणीमुळे कापडाकडे वळतात.

उत्पादकांची धोरणे आणि बाजारपेठ
सॅनिटरी नॅपकिन हे एक पातळ पॅड असते ते अशा पदार्थांपासून तयार होते जे मासिक पाळीच्या दरम्यान रक्तप्रवाहाला शोषून घेण्यास मदत करते. महिलांची स्वच्छता आणि आरोग्य यासाठी हे नॅपकीन महत्त्वपूर्ण भूमिका निभावते. सॅनिटरी पॅड सध्या विविध प्रकारच्या शोषक पातळी आणि आकारांसह उपलब्ध आहेत.
काही लोकप्रिय पॅड म्हणजे नियमित (रेग्युलर), पातळ (थिन) आणि अति-पातळ (अल्ट्रा थिन) पॅड समाविष्ट आहेत. "इंडियन सेनेटरी नेपकिन मार्केट: इंडस्ट्री ट्रेंडस्, शेअर, साइज, ग्रोथ, ऑपॉर्च्युनिटी अँड फॉरकास्ट २०१८-२०२३"  या नवीनतम अहवालाच्या मते, भारतीय सॅनिटरी नॅपकिनने मार्केट २०१८ मध्ये जवळजवळ ४४१ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स इतके मूल्य गाठले.
बर्याच वर्षांपासून, सरकारी आणि एनजीओ संस्था वैयक्तिक स्वच्छतेच्या महत्त्वविषयी महिलांना शिक्षित करण्यासाठी विविध उपक्रम आणि कार्यशाळा घेत आहेत. त्यामुळे सॅनिटरी नॅपकिन्सने भारतात महत्त्व प्राप्त केले आहे.
अशा प्रकारे, भारतीय महिलांमधील वैयक्तिक स्वच्छता याबाबत जागरूकता वाढवणारे सॅनिटरी नॅपकिन हे मार्केटच्या वाढीस मदत करणारा एक प्रमुख घटक ठरत आहे. 
याच्या व्यतिरिक्त, उत्पन्न वाढविणे आणि स्वस्त किंमतीत सॅनिटरी नॅपकिन्सची उपलब्धता ही बाजारपेठ वाढवण्यासाठी आणखी एक घटक आहे. याशिवाय, 'इंडियन सेनेटरी नेपकिन मार्केट: इंडस्ट्री ट्रेंडस्, शेअर, साइज, ग्रोथ, ऑपॉर्च्युनिटी अँड फॉरकास्ट २०१८-२०२३" या अहवालानुसार २०१८-२०२३ दरम्यान, सीएजीआरमध्ये (सीएजिआर, कंपाउंड अनुअल ग्रोथ रेट) २०२३ पर्यंत हि सॅनिटरी पॅड्सच्या विक्री-खरेदीची बाजारपेठ सुमारे ६३१ दशलक्ष अमेरिकी डॉलरपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
महिलांच्या आरोग्याचा विचार करून उत्पादनातील नवीन प्रयोग हे मार्केटच्या वाढीसाठी फायद्याचे ठरत आहे.
सध्या, बाजारात गुंतवणूक करणार्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी, स्त्रियांच्या स्वच्छतेच्या उत्पादनांमध्ये विविध प्रकारच्या नवकल्पना येत आहेत. पाळीतील रक्तप्रवाहाच्या दरम्यान महिलांना अधिक सांत्वन (कम्फर्ट) प्रदान करण्यासाठी अनेक नवीन उत्पादनांचे प्रयोग होत आहे. उदाहरणार्थ, २०१८ मध्ये, कॅलली (स्त्रियांच्या उत्पादनाची कंपनी) ने नवीन डिझाइनमध्ये लीक-फ्री टॅम्पॉन सादर केले, जे योनीच्या काठांना अडकतात ते टॅम्पॉन्स सॉफ्ट-लाइनरला संलग्न केले जातात, जे सॅनिटरी पॅडशिवायही अतिरिक्त सुरक्षिततेचा स्तर आणि भावना देतो.
उत्पादक हे वयोमर्यादेवर लक्ष केंद्रित करीत आहे. उदाहरणार्थ, २०१८ मध्ये, बी + ईटी (एक सेनेटरी नैपकिन उत्पादन ब्रँड) ने किशोर व त्यांच्या वाढत्या शरीरास अनुकूल असलेल्या मुलींसाठी सॅनिटरी पॅडची निर्मिती केली. ते पॅड किशोरवयीन मुलींच्या (मुख्यतः ८-१६) वयोगटातील मुलींकरिता कॅम्फोर्ट देत असे.
महिला आरोग्य उत्पादनाच्या मार्केटमध्ये सॅनिटरी पॅड्सची लोकप्रियता
सॅनिटरी नॅपकिन हे सर्वात लोकप्रिय उत्पादन आहे. पूर्वीच्या काळात जुना कापड वापरल्यामुळे होणाऱ्या संसर्ग आणि आजारांना आणि अस्वच्छतेला लक्षात घेत हळूहळू सरकार आणि एनजीओच्या हातभारामुळे सॅनिटरी नॅपकिनबाबत महिलांना स्वतःच्या आरोग्याबाबत शिक्षित करण्याच्या उद्देशातून या उत्पादनाच्या विक्रीत लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा आहे. तथापि, या सकारात्मक बदलामुळे, शिक्षित महिला या सॅनिटरी नॅपकिन्स वापरल्यामुळे स्वच्छताविषयक आव्हानांचा सामना करीत आहेत. याचे कारण असे की, नियमित सॅनिटरी पॅडमध्ये कृत्रिम तसेच कर्करोगाला आमंत्रण देईल अशी सामग्री आहे आणि विविध अभ्यासातून असे सूचित होते की, कृत्रिम घटकांचा समावेश असलेले पॅड्स वापरल्यामुळे योनि भागातील किंवा त्याच्या जवळील भागांत याचा वापर वाढल्याने संसर्ग, जळजळ, अस्वस्थता वगैरे आजार होऊ शकतात.

मार्केटमधील प्रमुख विकास
२०१८ - २०१८ मध्ये अशी नोंद केली गेली की, भारतातील सॅनिटरी नॅपकिन्सवर जीएसटी (वस्तू आणि सेवा कर) हा ग्राहकांना अधिक परवडण्याकरिता काढण्यात आला. त्याच वर्षी, भारत सरकारने गरजू आणि गरीब स्त्रियांच्या आरोग्याच्या दृष्टीने आर्थिकदृष्ट्या परवडणारे बायोडिग्रेडेबल पॅड बनविले (ते प्रधान मंत्री भारतीय जनऔषधी योजना (पीएमबीजेपी) योजनेअंतर्गत विकले जाऊ लागले)
२०१७ - बॉडीफॉर्म (एसिटी ब्रँड) ने #bloodnormal या मोहिमेचा एक भाग म्हणून आपल्या जाहिरातींपैकी एका जाहिरातीमध्ये पारंपारिक निळ्याऐवजी लाल रक्ताने माखलेल्या नैसर्गिक नॅपकिन्सची जाहिरात केली. जाहिरातीतून लाल रक्त दर्शविणारा तो प्रथम ब्रँड म्हणून जागतिक स्तरावर लक्ष केंद्रित केले.

संदर्भ -
(द एक्सप्रेस वायर, 'इंडियन सॅनिटरी नॅपकिन मार्केट www.marketwatch.com, २०१९)


पाळी येण्याचे दिवस जवळ येऊ लागले की मुली आधी त्यांच्या पर्यायी तत्सम गोष्टींची सोय करू लागतात. पुन्हा ऐनवेळी कधीही आली तर धांदल उडू नये म्हणून.
परंतु हे पर्याय कोणकोणते असतात? त्याचे स्वरूप, फायदे, तोटे याबाबत आपण जागरूक आहोत का?
आरोग्य हा विषय आला कि समोर येतो तो 'स्वच्छता' हा घटक. त्यामुळे आज बाजारात तंत्रज्ञानाच्या आणि आधुनिकीकरणाच्या गतीने मासिक पाळीत वापरले जाणारे अनेक पर्याय समोर येत असले तरी त्याचे सखोल विश्लेषण गरजेचे आहे. जागतिकीकरणामुळे आपण विदेशातील पर्यायही भारतात आणले असले तरी हे पर्याय वापरताना अनेक समस्या उद्भवतात, त्यासाठी सद्यस्थितीला नेमके काय करणे आवश्यक आहे, कोणत्या चुका नोकरीवर जाणाऱ्या आणि आधुनिक विचारसरणी स्वीकारणाऱ्या महिला करतात आणि या पर्यायी उत्पादनांचे एकूणच फायदे तोटे आणि स्त्री तज्ज्ञांचे यावरील मत समजून घेण्याच्या दृष्टीने हा प्रयत्न.

 मासिक पाळीत वापरले जाणारे पर्याय

जेव्हा एखादी महिला तिच्या 'त्या महिन्याच्या वेळेची' आठवण करून देतात तेव्हा त्यामागे अनेक गोष्टी येतात.
पाळी ही एक मासिक प्रक्रिया आहे आणि जसं जसा काळ जात आहे, तसं तसे महिलांनी हि मासिक पाळी हि सुरक्षित, सुलभ, स्वच्छ आणि अस्वच्छ असायला हवी त्याप्रमाणे त्या उत्पादने शोधत आहेत.
याउलट, वादविवाद स्पर्धाना चांगला विषय मिळू लागला आहे, त्यात मासिक पाळीत कोणते उत्पादन चांगले आहे हा प्रमुख विषय आहे.
सॅनिटरी पॅड, टॅम्पन्स आणि मासिक पाळीतील कप संबंधित बाजारपेठेतील विविध पर्याय, आवडी, निवडी सुरु आहेत. काही स्त्रियांना टँम्पन्ससह शारीरिक स्वातंत्र्य पाहिजे तर काहीजण त्या पॅडमुळे होणाऱ्या रक्ताचे स्त्राव विखुरतात त्यापासून मुक्ती हवी आहे. म्हणूनच, प्रत्येक स्त्रीला स्वच्छ आणि मुक्त पाळी हवी आहे. त्यामुळे या प्रकरणाशी संबंधित, पाळीतील विविध उत्पादनांची माहिती घेऊन त्यांचे फायदे समजून घ्यावे.

सॅनिटरी नॅपकिन्स

सॅनिटरी नॅपकिन्स हे स्त्रियांच्या शरीरावरील द्रवपदार्थ शोषून घेण्यास आणि टिकवून ठेवण्यासाठी तयार केले जाते. वापरकर्त्यास नेहमी कोरडे आणि आरामदायक वाटावे हा याचा मूळ उद्देश असतो.
नॅपकिनचे तीन प्रमुख प्रकारचे उत्पादन आहेत, उदा. (अ) जाड सॅनिटरी नॅपकिन्स. (ब) अल्ट्रा पातळ सॅनिटरी नॅपकिन्स. (क) पॅन्टी लाइनर. सॅनिटरी नॅपकिन्स मोठे पॅड असतात जे तंतूच्या धाग्यांनी जेल शोषून घेतात , नॅपकिन्स शरीरातील रक्तस्त्राव जेलमध्ये रूपांतरित करतो. आजकाल पॅड हे मोठ्या पंखांसारखे येते, जेणेंकरून पॅन्टवर स्त्राव पसरत नाही.
आकार आणि रचना-
पॅड्स हे अंडरवियरला चिकटवले जातात. 3 ते 4 तासांनंतर ते रक्तरस्त्रावानंतर काढावे लागतात. ते रक्तस्त्राव शोषून घेते आणि ओल्या रक्तस्रावाचे जेलमध्ये रूपांतर करते.
उपयोग -
सॅनिटरी नॅपकिन्स ही रक्तसंक्रमण नियंत्रित करण्यासाठी सर्वात सामान्य उत्पादन आहे. सर्व वयोगटातील महिलांमध्ये हे उत्पादन लोकप्रिय आहे. पॅड वापरण्यास सोपे आणि विनात्रासदायक आणि विनावेदनादायक आहेत. हा पर्याय सुटसुटीत आहे. हे उत्पादन पाळीचा अनुभव सुलभ आणि आरामदायक करते. तथापि, टॅम्पॉनस आणि मासिक कप्सच्या तुलनेत पॅड्स कमीत कमी हालचालीत मुक्तपणे दैनंदिन कार्य करण्यास सुलभ असतात. परंतु, सॅनिटरी नॅपकिन्सचे शेकडो वर्षे विघटन होत नाही, कारण त्यातील जोखीम देणारा विषारी वायू पर्यावरणास घातक ठरतो.
फायदे-
पॅड्स हे आतील कपड्याला चिकटले जाते त्यामुळे, ते दिवसभर ठेवणे सोपे.
सुटसुटीत वापर आणि फायदे.
पाळीच्या दिवसात रात्रभर चांगली निवड
तोटे-
पर्यावरणास घातक
योनी संसर्गाच्या रोगांचा धोका
सॅनिटरी पॅड्समधील प्लास्टिक योनीला घासून रॅशेस
वेळेत सॅनिटरी पॅड्स बदलले नाही तर गर्भाशयाला धोका
उत्पादन पद्धत-
नॅपकिनचा सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे शोषक पॅड. शोषक पॅड हे प्लास्टिक मिसळलेल्या लाकडाच्या लगद्यापासून बनविलेले असते. शोषक पॅड प्रथम लाकडाचा लगदा आणि व्हॅक्यूम वापरून आवश्यक आकार आणि रचनेनुसार तयार केले गेले. व्हॅक्युमच्या साहाय्याने वजन स्वयंचलितपणे नियंत्रित करून आणि दाबून ते आवश्यक जाडीएवढे तयार केले जात असे. पॅड तयार करण्यापूर्वी द्रव शोषून घेण्याची क्षमता वाढविण्यासाठी लगदा सुपर शोषक पॉलिमर्स (एसएएपी) मध्ये मिसळला जात असे.
सुपर शोषक पॉलिमर मूळतः ऍक्रेलिक आधारित पॉलिमर आहे, जे द्रव शोषून घेण्याआधी जेल तयार करते. यामुळे ते 30 पट वजन पाण्यात तग धरून ठेवू शकते. हे शोषक पॅड तंतूच्या धाग्यांपासून बनवलेल्या प्रवेशयोग्य सपाट कापडाशी संलग्न केले जाते. मग ते प्लास्टिक आरक्षित तळाशी जोडले जाते. गळती टाळण्यासाठी पॅडचे तीन स्तर एकमेकांना चिकटून बंधिस्त केले जातात. काही स्त्रियांच्या मागणीवरून, पॅड्स बनवण्यासाठी चिकट टेप, सिलिंग इत्यादी सामग्री वापरणे आवश्यक असते. वेगवेगळ्या नॅपकिन्स बनवण्यासाठी वेगवेगळी सामग्री वापरली जाते.

कापडी नॅपकिन्स

सॅनिटरी पॅड्समध्ये प्लास्टिकचा वापर अधिक असतो. त्यामुळे शरीर आणि पर्यावरणास धोका असतो.  त्यामुळे, कापडी पॅड हि जुन्या वापराची नवी संकल्पना सोयीस्कर, परवडणारी, घरगुती आहे. अनेक स्वयंसेवी संस्था अशा पॅडचा प्रचार करीत आहे. कारण प्लास्टिक निर्मित सॅनिटरी पॅड्स हे ग्रामीण, गरजू, गरीब लोकांना न परवडणारे आणि टॅबू वाटतात. त्यामुळे ते पूर्णपणे याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे कापडी पॅड हा पर्याय त्यांच्या आवाक्यात येतो.
रचना:
कापडाचे सॅनिटरी नॅपकिन हे शिवलेले असतात, त्याला टच बटन म्हणजेच आतील पँटीला घट्ट धरून ठेवेल असे बटन असते. ते दैनंदिन आणि वापरायलाही सोपे वाटते.
फायदे:
कापडी पॅडचा वापर वाढला पाहिजे, कारण ते धुवून पुन्हा वापरता येतात.
बटन असल्यामुळे नोकरी करणाऱ्या, खेळाडू आणि कामात असणाऱ्या स्त्रियांसाठी हे हालचालीत सुद्धा सोयीस्कर असते.
खर्च कमी
शोषण क्षमता हि आपोआप कळते त्यामुळे ते बदलले जाते.
तोटे:
ओलेपणाची भावना.
रक्तस्त्राव शोषून घेईल याची खात्री नाही.
कापड सतत धुतल्यामुळे त्या कापडात सूक्ष्म कोळी तयार होतात, जे योनीच्या आत गेले तर गर्भाशयास धोका निर्माण होऊ शकतो.

टॅम्पून्स
पाश्चात्य देशांमध्ये प्रचलित असलेला हा प्रकार भारतात फारसा वारपला जात नाही. सॅनिटरी नॅपकिन्ससारखाच काहीसा हा प्रकार. पण पॅडस योनीच्या बाहेर राहून पाळीचा रक्तस्राव शोषतात तर टॅम्पॉन योनीच्या आत घालावे लागतात. हे बोटांच्या आकाराचे असते, जे स्त्रीच्या योनीच्या आत जाऊन रक्त शोषून घेते.

आकार आणि रचना-
टॅम्पॉन हे आकाराने लहान असते आणि मासिक पाळी दरम्यान सर्व रक्त गोठून घेते. त्या योनि भिंतींवर अतिरिक्त स्नेहकपणा देखील शोषते, ज्यामुळे स्त्रीला योनीच्या ठिकाणी कोरडे आणि सामान्य वाटते.
उपयोग-
ज्या मुलींची जीवनशैली हि सक्रिय आहे, त्यांच्यासाठी हे अतिशय फायदेशीर ठरते. कारण टॅम्पॉनस त्यांना त्यांच्या पिरियड्सबद्दल पूर्णपणे विसरायला लावतात. टॅम्पॉनस योनिजवळ आणि खालच्या भागात आर्द्रता शोषून, बॅक्टेरियाच्या संसर्गास दूर ठेवतात आणि 'तिथे काहीच नाही' याची भावना देतात. हे आपल्याला इतर मासिक उपायांपेक्षा तुलनेने स्वच्छ ठेवते आणि मासिक पाळीच्या समस्येवर नियंत्रण ठेवण्यात मदत करते.  निःसंशयपणे, टँम्पन्स वापरल्याने खेळाडू मुलींना पोहणे, उड्या मारणे इत्यादीसारखे शारीरिक स्वातंत्र्य मिळते. परंतु याचा सर्वात मोठा दोष म्हणजे टॅम्पॉनसमुळे ट्रॉमा शॉक सिंड्रोम (टीएसएस) नावाचा रोग होतो. ते नैसर्गिक गुळगुळीतपणा शोषून घेते. ते शोषून घेत असले तरीही त्याच्या वापरामुळे लघवीतून पसरलेल्या संसर्गाचा धोका आणि विषारी केमिकल्सचा धोका असतो.
फायदे :
७-८ तास शोषण क्षमता. शोषणक्षमता सर्वाधिक असते.
आकारात लहान- सुलभतेने कुठेही हालचाली करणे.
बाहेर रक्त नाही. ओलेपणाची भावना राहत नाही.
पॅडप्रमाणे दुर्गंधी येत नाही.
फिल्डवर काम करणाऱ्या महिला, खेळाडू यांच्यासाठी हे सोईस्कर ठरतात
कोणतीही लाजेची भावना नाही- लहान आकाराचे असल्यामुळे दैनंदिन कामे करणे सोपे असते.
चांगला कॅम्फोर्ट
तोटे:
विशेषतः नवख्यांसाठी हे सुरुवातीला वापराने, योग्य ठिकाणी त्याचा सुरुवातीचा भाग टाकणे कठिण आहे.
लघवी करताना अडचणीचे वाटते. कारण मोठ्या आकाराचे टॅम्पॉनस हे योनीच्या विरुद्ध दिशेने ढकलावे लागतात आणि त्यामुळे प्रवाहास अडथळा निर्माण होतो.
टॅम्पॉनमधील सामग्रीत शोषणासाठी ब्लीच वापरतात, जे शरीराला हानिकारक असते.
वेळेत काढले नाही किंवा ते काढण्यास विसरलो तर कदाचित अडकून राहण्याची शक्यता असते.
रात्री टॅम्पॉनस घालून झोपणे घातक असते.

पिरीयड पॅंटी
अमेरिकेतल्या काही कंपन्यांनी अशा पँटी बाजारात आणल्या आहेत, त्यांची शोषक्षमता टॅम्पॉन एवढीच, किंबहुना जास्त आहे असा त्यांचा दावा आहे. पाळी दरम्यान फक्त ही पँटी घालायची आणि दुसऱ्या कुठल्याही गोष्टीची गरज पडणार नाही या कंपन्यांचं म्हणणं आहे.
भारतात या पँटी ऑनलाईन उपलब्ध आहेत. काही भारतीय कंपन्यांनीही अशा प्रकारच्या अंडरवेअरचं उत्पादन करण्यास सुरुवात केली आहे. सिरोना इंडिया, फ्लिपकार्ट, अमॅझॉनवर या पॅंटी उपलब्ध आहे.

रचना
पॅँटीच्या आत पाळीचा रक्तस्राव शोषण्यासाठी पॅड, टॅम्पून किंवा कप वापरण्यापेक्षा पॅन्टीच रक्तस्राव शोषणारी आहे.
त्या पॅन्टीत शोषण क्षमता असणारे कापड समाविष्ट असते.
फायदे:
दैनंदिन दिनक्रमासारखाच पाळीचा दिवस वाटतो.
कम्फर्ट नेहमीसारखा
तोटे:
ओलेपणा जाणवतो.
नीट धुतले न गेल्यास जंतू संसर्ग
नीट वाळले नाही तर रक्तस्त्रावातून निर्माण होणारे जंतू त्या भागात राहतात.

मासिक कप

हा कप सिलिकॉन किंवा लेटेक्स रबरापासून बनवलेला असतो. ते उलट्या ग्लासच्या आकाराचे असतात. सॅनिटरी नॅपकिन पाळीतला रक्तप्रवाह शोषून घेतात, पण हा कप मात्र पाळीचा रक्तप्रवाह जमा करतो.

वापर:
पाळीच्या वेळी हा कप अशाप्रकारे योनीमध्ये बसवावा लागतो की त्यात पाळीचा रक्तप्रवाह जमा होईल.
आकार आणि संरचना:
कप्स हे भिजत नाही. ते बाहेर पडलेले रक्त गोळा करते. एका कपमध्ये सुमारे 30-40 मिली रक्त गोळा करण्याची क्षमता असते.
फायदे:
मासिक कप्स हे तुलनात्मकदृष्ट्या पर्यावरण आणि वापरकर्ता यांच्यासाठी अनुकूल असतात.
कप धुवून त्याचा पुनर्वापर सहज शक्य असतो.
कप्स हे टॅम्पॉनस आणि पॅडमुळे होणाऱ्या संक्रमण आणि रोगांपासून वाचवते.
संसर्ग होण्याचा धोका कमी आहे.
कपच्या रचनेमध्ये रसायने, ब्लीच आणि फायबरचा समावेश नसतो.
हे कप वापरायला अगदी सोपे आहेत आणि अनेक वर्षं वापरता येतात.
पॅड वापरल्यामुळे येणारे रॅश, डाग लागण्याची भीती,  कप्स वापरल्यामुळे यातलं काहीहि होत नाही.
जितक्या महिलांनी मेन्स्ट्रुअल कप वापरले आहेत, बहुतेक जणींना ते अतिशय सोईस्कर वाटतात.
तोटे:
पहिल्यांदा योनीत घालण्यास भीती असते.
कशा पद्धतीने वापरावे, याचे ज्ञान नसल्यामुळे योनीच्या आत जाऊन योनीस घासण्याची शक्यता.
नीट धुतले नाही किंवा अँटीसेप्टिकचा वापर झाला नाही तर संसर्ग होण्याची शक्यता असते.

आरोग्याबद्दल स्त्री तज्ज्ञ म्हणतात…

एमसीजीएम कलिना म्युनिसिपल मुंबई येथील स्त्री तज्ज्ञ सुमेध मोरे यांचे मत असे कि, स्त्रिया आमच्याकडे अनियमित मासिक पाळी, अधिक रक्तस्त्राव, पांढरा डिस्चार्ज, जळजळ, पाळीच्या काळात दुखणे या समस्या घेऊन येतात. परंतु त्या यावर मोकळेपणाने आजही बोलत नाहीत. शिवाय सोबत आलेली व्यक्ती ही पुरुष असेल तर सगळे प्रश्न डॉक्टरांना विचारावे लागतात. स्त्रियांची सर्वसाधारणपणे काय चूक होते यावर ते म्हणाले कि, स्त्रिया सुरुवातीच्या काळात त्यांच्या समस्या लपवून ठेवतात. खूप त्रास होत असेल तेव्हाच त्या डॉक्टरांना दाखवतात.
                  सॅनिटरी पॅड्सबद्दल स्त्रियांना माहिती असते, विशेषतः मुंबईतील स्त्रियांना. पण ते खरेदी करून वापरावे एवढेच ज्ञान त्यांना असते. शास्त्रीय ज्ञान शून्य असल्यामुळे आजही मासिक पाळीचा टॅबू कायम आहे. 
पूर्वीच्या स्त्रियांचे राहणीमान आणि आधुनिक राहणीमान यात बदल हा वाटतो कि आताच्या स्त्रिया या आरोग्याची काळजी घेण्याकडे दुर्लक्ष करीत नाही. माध्यमांचा या विषयातील सहभागाबद्दल त्यांना विचारले असता ते म्हणाले, वृत्तपत्रांमधून मासिक पाळीबाबत चर्चा होते, पण ती सर्वांगीण आणि वाचकांसाठी पुरेशी वाटत नाही. त्याचबरोबर टॅम्पॉनस किंवा कप्स यांसारखे नवीनतम पर्यायी सोयी बाजारात उपलब्ध झाल्या आहे परंतु त्याचा वापर प्रत्येक व्यक्तीच्या त्या उत्पादनाबद्दल असलेल्या ज्ञानावर अवलंबून आहे. जर त्या उत्पादनाबद्दल पुरेशी माहिती असेल तरच हे पर्याय स्वीकारावे.  हा विषय केवळ सोशल प्लॅटफॉर्मवर कुजबुजण्यापेक्षा तो शहरी स्तरापासून ग्रामीण तळागाळापर्यंत बोलला जावा आणि सरकारने कमी पैशांत उत्तम दर्जाचे पॅड्स गरजू लोकांना उपलब्ध करून द्यावे, यामुळे मूलभूत समस्यांना आळा बसेल. स्त्रियांना जर हा विश्वास दिला कि, त्यांच्यासाठी सॅनिटरी पॅड्सशिवाय दुसरा कुठलाच पर्याय नाही तेव्हा त्या ते उत्पादन सहजतेने स्वीकारतील.
याउलट, नाशिकच्या बिर्ला हॉस्पिटलमधील स्त्रीतज्ज्ञ श्वेता पानसरे यांनी सांगितले कि, स्त्री डॉक्टर असल्यामुळे स्त्रिया मोकळेपणाने त्यांच्या समस्या मांडतात. जर स्त्री रुग्णाच्या सोबत शिक्षित पुरुष आला असेल तर तो तिच्या समस्येबद्दल अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. उदाहरणार्थ आता दिलेली औषधे हि कुठला बाह्य परिणाम करणार नाही ना ? पण जर अशिक्षित पुरुष असेल तर तो काहीच न बोलता बसून राहतो. मासिक पाळीत स्त्रियांकडून होणाऱ्या चुकांबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, स्त्रिया सामान्यपणे त्यांचे नॅपकिन्स वेळेवर बदलत नाही, ज्यामुळे संसर्ग होण्याचे प्रमाण अधिक असते.
          सॅनिटरी पॅड्सची जनजागृती लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ग्रामीण भागातील महिलांना ते कसे वापरले जावे हे सांगणे गरजेचे आहे. 
त्याचबरोबर व्यावसायिक जाहिराती या सॅनिटरी पॅड्सबद्दल अचूक आशय पोहोचवत नाही. या आशयात सुधारणा व्हावी, जेणेकरून लोक ते मनोरंजन समजून पाहण्यापेक्षा गरज म्हणून बघतील. सॅनिटरी पॅड्सबद्दल स्त्रियांना माहिती असली तरीही आजही त्या ते वापरण्यास घाबरतात. पूर्वीच्या स्त्रिया पाळीच्या दिवसांतही खूप कामे करायच्या. तसे करणे चुकीचे आहे कारण पाळीच्या दिवसांत स्त्रीचे शरीर ८०मिली रक्त बाहेर पडते. त्यामुळे या दिवसांत विश्रांती गरजेची असते. आधुनिक स्त्रिया या खूप जास्त आराम करतात, पूर्ण विश्रांती घेणेही चुकीचे असते, काही प्रमाणात शरीराची हालचाल आवश्यक असते. टॅम्पॉनस किंवा कप्स यांसारखे नवीनतम पर्यायी सोयी बाजारात उपलब्ध आहे परंतु त्या वापरताना काळजी घेणे आवश्यक आहे. कारण जर हे दोन्ही पर्याय योनीच्या आत जातात, जर ते व्यवस्थित बसले नाही तर ते पुन्हा बाहेर येऊन मूत्रमार्गास हानी पोहोचवू शकतात.
भारतीय समाजातील मासिक पाळीशी निगडित अंधश्रद्धाबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, जर स्त्री हि तिच्या रक्तामुळे अपवित्र मानली जात असेल तर तिच्य रक्तातून निर्माण झालेलं हे संपूर्ण जगच अपवित्र आहे, असे मानायला कमीपणा वाटायला नको.

संदर्भ:
२.२.१, २.३.१ कलिना हेल्थपोस्ट मुंबई, डॉ. सुमेध मोरे, स्त्री तज्ज्ञ, बिरला हॉस्पिटल नाशिक, स्त्री तज्ज्ञ डॉ. श्वेता पानसरे,


मासिक पाळीत 'हे' ही वापरता येऊ शकते?

by on मे २९, २०१९
पाळी येण्याचे दिवस जवळ येऊ लागले की मुली आधी त्यांच्या पर्यायी तत्सम गोष्टींची सोय करू लागतात. पुन्हा ऐनवेळी कधीही आली तर धांदल उडू नये ...

भाग - ३ 

तुम्हाला माहिती आहे का, पहिले सॅनिटरी पॅड हे पूरूषांसाठी बनवले गेले. ?

तर अभ्यासावरून हे दिसून आले कि पहिले डिस्पोजेबल सेनेटरी पॅड फ्रान्समध्ये युद्धात नर्सने विकसित केले होते. ते युद्धक्षेत्रात जखमी सैनिकांमधील अति रक्तस्त्राव नियंत्रित करण्याचा पर्याय म्हणून निर्माण केले गेले. ते शोषक आणि स्वस्त आणि वापरल्यानंतर फेकून देण्यास सोयीस्कर होते. बेन फ्रँकलिनच्या आविष्कारामुळे सैनिकांना जबरदस्त जखमांपासून बचावले, या डिस्पोजेबल नॅपकिन्स वायूच्या वेळेस सहज उपलब्ध होते अशा सामग्रीमधून बनविल्या गेले. ते अत्यंत सोयीस्कर आणि वापरल्यानंतर फेकून देण्यासाठी स्वस्त होते.

व्यावसायिक उत्पादकांनी ही कल्पना उधार घेऊन प्रथम डिस्पोजेबल पॅड १८८८च्या सुमारास - साउथबॉल पॅड या नावाने निर्माण केले. अमेरिकेत, जॉनसन आणि जॉन्सन यांनी १८९६ मध्ये 'लिस्टर्ज टॉवेल: सेनेटरी टॉवल्स फॉर लेडीज' या नावाने त्यांची स्वतःची आवृत्ती विकसित केली.

आताची परिस्थिती

जेव्हा स्त्रिया म्हणतात कि, एकविसाव्या शतकातही पुरुष मासिक पाळीचा टॅबू कायम ठेवण्यास कारणीभूत आहे. त्यावेळी याचा प्रत्यक्षात अभ्यास केल्यावर लक्षात येते कि, मासिक पाळीबाबत खेड्या - पाड्यातील, वाड्या - वस्तीवरील महिलांमध्ये जागृती करणे आवश्यक असून, शिक्षणात लैंगिक शिक्षणात मासिक पाळीबाबत स्वतंत्र विषय असावा व अगदी पाचवीपासूनच मुलीमुलांना मासिक पाळीबाबत जागृत करणे आवश्यक आहे.. खरतर आधी शेतात काम करावं लागायचं, नदीतून पाणी आणायचं, कपडे नदीवर धुवायला न्यावे लागायचे, दळण जात्यावर दळाल जायचं, हि सर्व कष्टाची कामे होती, त्यावेळी मासिक पाळी आली असता हि कामे करणे खूप कठीण असायची, शिवाय अशक्तपणा असायचा, त्यावर उपाय म्हणून घरचे लोक त्यांना आराम मिळावा म्हणून एकजागी बसायला लावायचे, आणि असे नियम लावलेत कि त्यांना कुणातच न मिसळून काम करावे लागू नये, हे तेव्हाच्या काळात योग्य होते, कालांतराने याची अंधश्रद्धा होत गेली, आणि आता सर्व कामे सोपी झाली आहे, पॅड्स, टॅम्पॉनस, मासिक कप्स वापरून सहजपणे केली जाऊ शकतात, त्यामुळे कुठलेच नियम, अंधश्रद्धा आता पाळण्याची गरज नाही. तसेच शबरीमाला मंदिरात सर्व स्त्रियांना जाण्याची अनुमती द्यायला हवी.

तसेच, मासिक पाळी आणि त्या दरम्यान होणारे सॅनिटरी नॅपकिन्स या विषयाबद्दल बोलल्याशिवाय अडचणी कळणार नाहीत. त्यामुळे बोलणे गरजेचे आहे. आजकाल इंटरनेट, सोशल मीडिया अशा माध्यमातून या विषयावर मोकळेपणाने चर्चा होत आहेत. शाळा आणि कॉलेज जिथे खुले वातावरण असते तिथे मित्र मैत्रिणींसोबत या विषयांवर बोलायला कोणताही संकोच होत नसल्याने याबद्दल जाणीवनिर्मिती होत आहे.... हा बदल सकारात्मक आहे.

काही पुरुष म्हटले कि, आता मूलभूत गरजा केवळ तीनपुरत्या मर्यादित राहिल्या नसून त्या सकारात्मक पद्धतीने विस्तरायला हव्या. समाजाने जल, जंगल, जीवन आणि जिज्ञासा याबाबत शिकायला हवे. आणि आपल्या समाजाने अशा टॅबूबद्दल बोलायला हवे, त्याला स्वीकारायला हवे. त्यात स्वच्छता महत्त्वाची. सोशल मिडीया, चित्रपट, डॉक्युमेंट्री ही माध्यम नक्कीच समाजसुधारणेला वाव देणारी आहेत. पण, आजही खेड्यापाड्यातील सुशिक्षित लोक आणि स्त्रिया मासिक पाळीला वाईट समजतात किंवा देवाशी जोडतात. चित्रपट किंवा सोशल मिडीया अशा माध्यमातून ही कीड सहज निघणारी नाही. त्यासाठी मुली आणि महिला स्पष्ट बोलतील तेव्हाच ही कीड नाहीशी होईल. आमच्या गावातल्या एकानेही पॅडमॅन थिएटरमध्ये जाऊन पाहिला नसणार आणि जेव्हा टिव्हीवर रिलीज झाला तेव्हाही गावातल्या एकाही कुटुंबाने तो सोबत पाहिला नसणार याची मी पुण्यात बसून खात्री देतो. प्रत्येक मुलगी स्पष्ट आणि बेधडक बोलेल तेव्हा हा विषय सहजसोपा होऊन जाईल.

काही स्त्रिया मासिक पाळीच्या वेळी त्यांच्या गरिबीमुळे वृत्तपत्रे , चिखल, आणि राखेचा ही वापर करतात. यामुळे मात्र संसर्ग वाढतो आहे. त्यामुळे संसर्ग टाळण्यासाठी भारतात आरोग्याच्या दृष्टीने आणि विकासाच्या दृष्टीने विकसित व्हायला हवे. जागरुकता ग्रामीण भागात होणे अत्यंत गरजेचे आहे.ती काही घाणेरडी गोष्ट नाहीये म्हणून लपवून ठेवावी.याबाबत जास्तीत जास्त जनजागृती झाली पाहिजे. जागृती झाल्यामुळे माझ्या आया बहिणी यांच्या वरील होणारे दुष्परिणाम त्यांच्यावरील होणारे अंधश्रद्धाचे सावट दूर होतील.शो ऑफ किंवा मार्केटिंग कंपनी पेक्षा जास्त फोकस हा स्त्री शरीर व मानसिक स्वास्थ्य हे विषय हवेत. हा विषय एवढा नॉर्मल होयला हवा की त्याचे फारसे वावगे ही कोणाला वाटू नये एवढा साधा. जसे की पाणी पिणे, जेवण करणे, झोपणे इत्यादी.

या अभ्यासावरून हे लक्षात आले कि, स्त्रीयांपेक्षाही पुरुष जास्त व्यक्त होत आहे. जेव्हा आदिवासी भागात स्वयंसेवी संस्था मासिक पाळी जनजागृतीसाठी जातात तेव्हा त्यात ८०% पुरुषांचा सहभाग असतो. परंतु २०% महिलांनाच बोलावे लागते कारण आदिवासी स्त्रिया या पुरुषांसमोर मोकळेपणाने बोलत नाहीत, त्यामुळे संस्थेच्या इतर कामात पुरुष सहकार्य ठेवतात.

( क्रमश: )
भाग: २ 

सर्वेक्षणातून काही प्रश्नांची उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न जेव्हा केला. खरे तर वास्तव किती वेगळे आहे ते जाणवले. कारण
पौगंडावस्थेतील मुली आणि स्त्रियांना मासिक पाळीशी संबंधित सामाजिक, सांस्कृतिक आणि टॅबू पद्धतीबद्दल विचारले तेव्हा स्पष्टीकरण देण्यास त्या असफल राहतात. त्यांचे म्हणणे असते कि, आम्ही केवळ त्या पाळत आलो, कारण त्यांना असे करण्यास सांगितले गेले.

या अंधश्रद्धामध्ये, धार्मिक प्रथा, धार्मिक स्थळांपासून दूर राहणे, औषधे न खाणे, नवीन कपडे न घालणे, लोणच्याला स्पर्श न करणे, काजळ न लावणे, अतिथींचे आदरातिथ्य न करणे, अन्न न शिजवणे या आणि अशा इतर गोष्टींपासून दूर राहण्यास पाळीच्या पहिल्या दिवसापासून सांगितले गेले.

झोपडपट्टीतील मुलींमधील मासिक पाळी आलेल्या मुलींमध्ये सामान्यतः गैरसमज आहे कि या दिवसांत अंघोळ केल्यास रक्तप्रवाह अधिक प्रमाणात होतो. तसेच काही कुटुंबांमध्ये केसांवरून पाणी घेण्यास कठोरपणे बंदी आहे, कारण गर्भधारणेच्या काळात प्रसूतीदरम्यान यामुळे धोका उद्भवतो असा समज आहे. त्याचबरोबर काही कुटुंबांमध्ये, प्रत्येक वेळी मासिक पाळीच्यावेळी शौचालयास गेल्यानंतर तिला तिचे हात मातीने धुवावे लागत असे, त्यानंतरच ती शुद्ध मानली जाते.

थोडक्यात, या काही अंधश्रद्धा आहेत, ज्या किशोरवयीन मुलींमध्ये मासिक पाळीची भीती निर्माण करतात. या टॅबूमुळे या रूढी अजूनही प्रचलित आहेत. त्या भीतीदायक पद्धतीने मांडल्या जात असल्यामुळे स्त्रीयांच्या शरिरावर जीवघेणे परिणाम होत आहे आणि ‘ मासिक पाळीला’ सामाजिक दृष्टिकोनातून क्षुल्लक समजून दुर्लक्षित केल्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने, मासिक पाळीबाबत अज्ञान वाढतच चालले आहे.  
शहरी, ग्रामीण, आदिवासी आणि दिव्यांग पातळीवरील मासिक पाळीचे स्वरूप हे सर्वेक्षणानुसार आधारे मांडले आहे ते पाहूया;
सर्वेक्षणासाठी किती लोकांचा सहभाग?

तर, शैक्षणिक वार्तालेखाचे प्रात्यक्षिक प्रमाण आणि आकडेवारी याकरिता मी सिन्नर, गोंदे या खेड्यातील आणि नाशिक, पुणे, मुंबई या शहरातील सर्वसामान्यांची मानसिकता, सामाजिक दृष्टिकोन  समजून घेण्याकरिता सर्वेक्षण केले. त्याकरिता मी  १५-३० वयोगटातील २५ स्त्रिया, ३०-४५ वयोगटातील २५ स्त्रिया आणि ४५ वयानंतरच्या २५ स्त्रिया यांच्याकडून प्रश्नावली भरून घेतली.
त्याचबरोबर सदर  विषयात पुरुषांचा सहभाग जाणून घेण्यासाठी पुरुषांकरिता वयोगटानुसार प्रत्येकी २५ अशी प्रश्नावली भरून घेतली आणि विषयाचे सविस्तर आकडेवारीनुरूप आणि पाय चार्टद्वारे हि आकडेवारी मांडली आहे.
तसेच, स्वयंसेवी संस्थांचे कार्य जाणून घेण्याकरिता पाच संस्थांशी संपर्क करून माहिती समजून घेतली.

शहरी भागात :

प्राचीन काळापासून आपल्याकडे मासिक पाळीचा धर्म आईकडून मुलीला शिकवला जातो. पण आजच्या धकाधकीच्या शहरी स्पर्धेच्या युगात, आई ही सुद्धा मूलभूत ज्ञानापेक्षा जाहिरातीच्या गर्तेत अडकलेली दिसून येते. मुलीजवळ आईच्या आधीच टीव्हीवरील भडक व बीभत्स जाहिराती येऊन पोहचतात. या जाहिरातींत दाखवल्या जाणाऱ्या सॅनिटरी नॅपकिन्सवरून मुलींना हा काळ वरवरचा आणि सहज वाटतो, पण अनुभव येताच मात्र त्यांची चिडचिड व्हायला लागते. तेव्हा त्यांची सर्वांत जवळची मैत्रीण ही आई असते. मात्र या दिवसांत शारीरिक व मानसिक स्तरावर होत असलेल्या बदलांमुळे स्त्रियांना ताण येतो. त्याचा साहजिकच परिणाम या चार दिवसांकडे दुर्लक्ष करण्याकडे होतो. यातूनच जंतूसंसर्गापासून ते कर्करोगापर्यंतच्या आजारांना निमंत्रण मिळते. मासिक पाळीबद्दल अंधश्रद्धा फक्त ग्रामीण भागापुरती मर्यादित नाही, तर शहरी भागातही तितक्याच प्रमाणात त्याचा प्रभाव अजूनही आहे. परंतु बऱ्याच घरांत जुनी पिढी होती तोपर्यंत बाजूला बसणं, घरात कोणत्याही वस्तूला हात न लावणे, काही हवं असल्यास मागून घ्यायचे त्यासाठी दुसर्यावर अवलबूंन राहावे लागायचे. आधुनिक पिढीत हे स्वरूप बदलून फक्त घरात देवासंबधी कार्यक्रम असेल तर बाजूला बसविले जाते.

सॅनिटरी पॅड्स तुमचा जीवही घेऊ शकतात…

होय, कारण शहरी भागात ज्या स्त्रिया नोकरीवर जाणाऱ्या आहेत त्या चौथ्या दिवशी सॅनिटरी पॅड्स सहा तासाहून अधिक वेळ ठेवतात. सॅनिटरी पॅड्स योनीच्या ठिकाणी अधिक वेळ ठेवल्यामुळे त्यातील प्लास्टिक आणि इतर सामग्री म्हणजेच सोडियम ऍक्रिलेट, पोटॅशियम ऍक्रिलेट, अल्किल ऍक्रिलेट हे योनीच्या भागास घातक असतात. यामुळे संसर्ग होऊन गर्भास धोका आणि तो त्रास न कळल्यामुळे जीव जाण्याचा धोका असतो.

ग्रामीण भागात :

जास्तीत जास्त मुलींनी शाळेत जावे यासाठी राज्य पातळीवर प्रयत्न होऊ लागले. पण या प्रयत्नांनंतरही मुलींचे घरी राहण्याचे प्रमाण वाढत होते. बऱ्याच पाचवी सहावीच्या मुली मोठ्या संख्येने शाळा सोडू लागल्या होत्या. याचे कारण शोधले असता लक्षात आले कि, मुलींच्या पहिल्या मासिक पाळीत उद्भवणाऱ्या अनेक समस्या आणि नव्या अनुभवांना त्यांना तोंड द्यावे लागत होते.

ग्रामीण भागात तर मासिक पाळी हि एक समस्या वाटते आणि त्यांना या समस्येबद्दल काहीही माहिती नसते. ९-१२ वयातील मुलींसाठी तर हि मासिक पाळी एक त्रासदायक अनुभव असतो, जो समाजाने निषिद्ध मानल्यामुळे व मर्यादा घातल्यामुळे अव्यक्तच राहतो आणि परिणामी, माहिती संदर्भात ग्रामीण भागातील प्रत्येक घटक हा प्रचंड ‘माहितीशून्य’ आहे.

ग्रामीण भागातील स्त्रियांची स्थिती भयानक आहे. कारण गैरसमजुती, कर्मकांड, अज्ञान; इतकंच नव्हे तर सर्वांत मोठी अडचण आहे आर्थिक अडचणीची! हातावर पोट घेऊन जगणाऱ्या कुटुंबांकडून स्त्रियांच्या मासिक पाळीसाठी महिना २०० ते ३०० रुपये खर्च उचलणं ही अशक्य गोष्ट असते. अशा वेळेस कितीही नवं तंत्रज्ञान समोर असलं तरी ग्रामीण व मध्यमवर्गीय कुटुंबं ही पूर्वीपासून चालत आलेल्या कालबाह्य साधनांचाच उपयोग करतात. यामध्ये सुती वा सिंथेटिक कपडा, वर्तमानपत्रं, वाळूच्या पिशव्या, पॉलिथिन बॅग्ज इ. मासिक पाळीमध्ये केवळ सॅनिटरी नॅपकिन्सच वापरावीत असंही नाही. सुती कपडाही वापरता येऊ शकतो. पण या कपड्याची स्वच्छता ठेवणंही ग्रामीण स्त्रियांना शक्य होत नाही. त्यातून खाज येणं, जंतुसंसर्ग होणं, पांढरं पाणी जाणं यांसारखे आजार होऊ शकतात. त्यामुळे केवळ स्त्रियांचंच आरोग्य धोक्यात येतं असं नाही, तर संपूर्ण सामाजिक आरोग्य धोक्यात येतं, हे आपण आजही समजून घेत नाही.

ग्रामीण भागातील प्रमुख चिंता ही 'स्वच्छता' आहे. स्वच्छता न पाळण्यामागे प्रमुख कारण म्हणजे मासिक पाळीचा आजवर जपला गेलेला टॅबू! हा टॅबू गुप्तपणे आजही एखाद्या गुप्तरोगासारखा लपून ठेवला जात आहे. मासिक पाळीत महत्त्वाचं म्हणजे कापड वापरण्याचे प्रमाण अधिक आहे. तरीही त्यात वाढ म्हणजे मासिक पाळीत वापरलेले कापड हे एकत्र कुटुंबपद्धतीमुळे ते कापड मोरीत वाळत घातले जाते. त्यामुळे दमटपणा राहून कपड्याचा दुर्गंध येतो, आणि रोगांचा प्रादुर्भाव होतो. महागडे सॅनिटरी नॅपकिन्स ग्रामीण स्त्रिया वापरू शकत नाहीत. यावर अनेक सामाजिक संस्था व आरोग्य संघटनांनी आवाज उठवला. तेव्हा सरकारी संस्था पुढे आल्या. पण या संस्थांकडून कमी दरात जे नॅपकिन्स पुरवले गेले ते अतिशय निकृष्ट दर्जाचे असल्याने स्त्रियांना जंतुसंसर्गाला समोरं जावं लागलं.

ग्रामीण स्त्रियांच्या आरोग्य रक्षणासाठी महागडे डॉक्टर्स व खर्चिक तंत्रज्ञानही लागत नाही. लोकजागृती करून स्त्रियांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणं एवढंच गरजेचं असतं. ‘लाख मेले तरी चालतील पण लाखाच्या पोशिंद्याला आपण वाचवलंच पाहिजे’, असं आपण म्हणतो, पण स्त्रियांकडे पोशिंदा म्हणून पाहण्याची दृष्टी जोपर्यंत तयार होत नाही, तोपर्यंत पुरुषी मानसिकतेतून तिच्या आरोग्याची हेळसांड होतच राहील.

आदिवासी भागात:

आदिवासी भागात बऱ्यापैकी भागात कापड वापरले जाते. परंतु काही ठिकाणी तांदूळ काढल्यानंतर त्याचे काड असतात किंवा मक्याचे आवरण वापरले जाते.

मक्याच्या कणसाचे आवरण पॅडच्या रचनेनुसार करून, त्याच्या आत राख किंवा माती किंवा गहू तांदळाचे खोड/ काड याचा भुगा करून वापरले जातात. हे पर्याय सुरुवातीला योनीच्या ठिकाणी टोचतात, परंतु याशिवाय गत्यंतर नाही हे कळल्यानंतर तेथील स्त्रिया याचा स्वीकार करून हळूहळू याची सवय करून घेतात.

एकूणच आदिवासी राहानिमाणावरून निरीक्षणाअंती लक्षात येते कि, हे लोक गहू, ज्वारी खात नाही. त्यामुळे पोषक आहार त्यांना मिळत नाही ज्यामुळे कुपोषणाचे प्रमाण अधिक आहेच. परंतु महिल्यांच्या बाबतीत सकस आहार नसल्यामुळे मासिक पाळीच्यावेळी ब्लीडींगचे प्रमाण कमी आहे. त्याचबरोबर हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी आढळते आणि अंगावरून पांढर जाणे हे तीन मुख्य तोटे समोर येतात. पण त्याचबरोबर आदिवासी स्त्रिया काटक असल्यामुळे त्यांना त्रास होतो पण त्रास जाणवत नाही.

आदिवासी अंधश्रद्धा:

आदिवासी क्षेत्रात प्रत्येक भागात अंधश्रद्धा आहे. याचे उदाहरण समोर ठेऊन गडचिरोलीसारख्या आदिवासी भागाचा अभ्यास केल्यानंतर समोर येते कि, आदिवासी भागांत मासिक पाळीतील या आठ दिवसांसाठी स्त्रियांकरिता विशिष्ट घर असते त्याला 'कूर्माघर' संबोधले जाते. या घरात पाळी आलेल्या स्त्रियांना ७ दिवस ठेवले जाते, ते वैयक्तिकही असते आणि सार्वजनिकही असते. कूर्माघर म्हणजे एक सहा बाय सहाची खोली असते, ज्यात जेमतेम महिला झोपू शकतील एवढी जागा असते. त्यातच त्यांनी खायचं, प्यायचं, बादलीभर पाणी साठून ठेवायचं, त्यातच आठ दिवस पाळीतील कापडही धुवायची आणि या घराचा मूळ हेतू म्हणजे या दिवसांत तिने बाहेर यायचेच नाही, तिची सावलीही पडू द्यायची नाही. सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले तर या काळात स्त्रियांना विश्रांतीची गरज असते म्हणून हि कल्पना योग्य जरी समजली तरी घटितांनुसार तेथील सगळी घरे हि बांबूची असतात. त्यामुळे तिथे राहणे सोयीस्कर नसते. जागा छोटी असल्यामुळे योग्य ती स्वच्छता राखली जात नाही. त्यामुळे मानसिक शारीरिक त्रास होत असतो. याचे उदाहरण म्हणजे गडचिरोलीत जयंतीचा अधिक रक्तदाबाने झालेला मृत्यू, ते झाल्यांनतर सात दिवसांनी कळलं.

पश्चिम महाराष्ट्रात विभक्त कुटुंब पद्धतीमुळे तीन चार माणसांच्या कुटुंबात एकाच स्त्री असते, अशा भागात ती महिला स्वतःउन येऊन गर्भाशयाची पिशवी काढून टाकते. कारण पाळी आल्यामुळे स्वयंपाक कोण करणार यामुळे ते काढली जाते. आणि याबाबात डोक्टर काही सांगत नाही कारण त्यांचा व्यवसाय त्यावर चालतो.

दिव्यांगांची मासिक पाळी

मी, तुम्ही, सरकार आणि फारफारतर स्वयंसेवी संस्था या मासिक पाळी म्हटल्यानंतर कुठपर्यंतचा विचार करतील तर, ग्रामीण, शहरी आणि त्यातच थोडा वेगळेपणा म्हणून आदिवासी स्त्रियांचा. त्यात वेगवेगळे प्रयोगही करतील किंबहुना आजही होत आहेत. पण मग या वर्गवारीत सगळ्याच स्त्रिया समाविष्ट होतात का ? दिव्यांग मुली या स्त्रिया नाहीत का ? त्यांना मासिक पाळी चुकली आहे का?

याचा विचार करून जेव्हा अशा मुलांची शारीरिक मानसिक स्थिती पडताळून, जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा सगळा गोंधळच उडाला कारण सर्वसाधारण धडधाकट मुलीलाही पाळी आल्यानंतर गोंधळून जातात. दिव्यांग मुली तर मानसिकरीत्या स्वतःतच हरवलेल्या असतात. मग अशावेळी अभ्यासातून असे लक्षात आले कि, सर्वधारणपणे या मुलींचेही पोट, पाठदुखी सुरु होते. परंतु त्यांच्या त्यांच्यातील दिव्यांगांनुसार पाळीतील रक्तप्रवाहाचे प्रमाण निश्चित होते.

पहिली गोष्ट दिव्यांगांची मासिक पाळी वेगळी नसते. परंतु दिव्यांग स्त्रियांची पाळी हि पालकांची जबाबदारी ठरते.

दिव्यांगांचेही पोट दुखते, पायाला गोळे येतात, चिडचिड होते. यात सगळ्यात आव्हानात्मक म्हणजे मतिमंद मुलींना आलेली मासिक पाळी. कारण त्यांची इंद्रिये योग्य तो प्रतिसाद देत नसल्यामुळे नेमके रक्त का वाहते हे समजत नाही.

पहिली मासिक पाळी येते तेव्हा मानसिक आणि शारीरिक रित्या असा अनुभव असतो की, ते त्यांच्या जेवणावर, पाणी पिण्यावर नियंत्रण ठेवतात. कारण त्यामुळे शौचास जाणे, लघवीला जाणे टाळले जावे. कारण दिव्यांगाचे त्यांच्या शरीरावर नियंत्रण नसते. त्यामुळे जेव्हा अशा मुलींना पहिली पाळी येते तेव्हा त्यांना कळत नाही. घरच्यांनी याकडे विशेष लक्ष द्यावे लागते. तरीही सुरुवातीला त्यांचेही रक्त येते. सुरुवातीला काही प्रमाणात रक्ताच्या गाठी पडतात.

परंतु पालक किंवा संस्था अशा मतिमंद मुलींची गर्भाशयाची पिशवी काढण्यास प्राधान्य देतात. जेणेकरून संस्थेकडून शारीरिक शोषण होऊ नये आणि पुढे जाऊन तिला गर्भधारणा करावी लागू नये म्हणून, ही पिशवी काढणे योग्य ठरते.

सॅनिटरी नॅपकिन्सचा वापर दिव्यांगांसाठी फायद्याचा ठरतो कारण सॅनिटरी नॅपकिन्स हे एकाजागी चीटकते. त्यामुळे त्यांच्या हालचाली करताना अडचणी येत नाही.

दिव्यांगासाठी जनजागृतीचा भाग म्हणजे, दिव्यांगांसाठी त्यांच्या त्यांच्या शारीरिक आकारानुरुप कस्टम पॅड बनविले जावे. यात प्रसार माध्यमे ही मागे आहेच परंतु समाज माध्यमांनी या लोकांना दिलासा दिला आहे कारण या व्यासपीठावरून कमी प्रमाणात का होईना पण लिहिले जात आहे.

(क्रमश: ) 

समाजात अडकलेली मासिक पाळी!

by on मे २६, २०१९
भाग: २  सर्वेक्षणातून काही प्रश्नांची उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न जेव्हा केला. खरे तर वास्तव किती वेगळे आहे ते जाणवले. कारण पौगंडावस्...
 भाग- १ 
"या दिवसात बाहेर नको पडू... तुला आलीये...? मग आता पाण्यात कशी येणार...?, मंदिरापर्यंत सोबत ये, पण आत येऊ नको बरे...? हो, गोमूत्र शिंपडून घे. तू लोणच्याला हात कसा लावला...? तुला तुझी तारीख लक्षात राहत नाही का...?, आता स्वयंपाक घरात येऊ नको बरं...! आणि ए, काकांसमोर कशाला सांगतेस, ती काय मोठ्याने सांगायची गोष्ट आहे का...?"

एव्हाना या “त्या” दिवसांची गुपितं स्त्रियांपासून पुरुषांपर्यंत सगळ्यांना मनोमनी तोंडपाठ झाली. तरीही विकासाच्या वाटेवरील या एकविसाव्या शतकात आजही त्याला 'टॅबू' नावाच्या पाश्चात्य बंधनात अडकवून भारतात यावर बोलण्यास अप्रत्यक्ष बंदी आहे. 
लहानपणापासून आपल्या निरीक्षणास येते कि, कायदेशीर नियम कुणी इतक्या काटेकोरपणे पाळणार नाही, पण मासिक पाळीच्या चार दिवसात आपल्या कुटुंबातील स्त्रिया मात्र पूर्वापार चालत आलेल्या रुढी, परंपरांचे पालन इतक्या काटेकोरपणे करून स्वतःला एक 'आदर्श व्यवस्था' म्हणून सिद्ध करण्यात कसलीच कसर ठेवणार नाही.

त्यातही ‘ग्रामीण, शहरी, आदिवासी आणि दिव्यांगातील स्त्री’ हि तिच्या तिच्या चौकटीत कशी वेगवेगळ्या नियमांना आणि त्यातील पुरुषसत्ताक रूढींना अधिक बळकट करून बाईपण सांभाळतात, हे वाखाणण्याजोगे आहे. कारण ‘बाईचं बाईपण बाळगण्याचा बाईलाच अभिमान नाही, तर इतर लोकही तिला कमीच हिनवणार’ हे विधान लहानपणीपासूनच्या या निरीक्षणातून मासिक पाळीला वर्णण्यास चपखल बसते.

परंतु अलीकडच्या काळात आधुनिक मानसिकतेमुळे या विषयातील बंधने आणि मासिक पाळीवरील गुप्ततेचे मळभ दूर करण्याचे प्रयत्न होताना दिसत आहेत.

अनेक दशकापासून आपण बघत आलो मासिक पाळी आली म्हणजे ‘कावळा शिवला म्हणून तू दूर राहा’ या अशा गैरसमजुतीच्या वेढ्यात अडकली आहे. परंतु शास्त्रीय दृष्टीकोनातून, मासिक पाळी हि प्रत्येक स्त्रीच्या शरीरातील जैविक आणि नैसर्गिक प्रक्रिया आहे, असे असूनही सगळीकडेच या विषयाबाबत बोलताना हळूच बोलले जात होते.

या विषयाकडे माध्यमांचा सकारात्मकरित्या कल वाढला आहे त्यामुळे नवनवीन माध्यमे नवनवीन आणि आकर्षक आशय निर्माण करीत आहे. त्यावर प्रतिसाद देता येणे शक्य झाल्यामुळे लोक हळूहळू का होईना मनातील कुजबुजलेला आवाज समाज माध्यमांवर मुक्तपणे बाहेर काढत आहे.

कधी कधी वाटते, मी नव्या तंत्रज्ञानाच्या आणि सामाजिक माध्यमांच्या संपर्कात आल्यामुळे मला मासिक पाळी या विषयातील हा बदल जाणवत असेल. त्यामुळे याचा सखोल अभ्यास मूलभूत घटकापासून सुरु केला. 

तेव्हा एक सर्वमान्य प्रश्न पडला कि, जर मासिक पाळी हि नैसर्गिक आणि शारीरिक प्रक्रिया आहे, तर त्यात समाजाच्या दृष्टिकोनाला इतके महत्व का दिले जाते? आणि हा सामाजिक दृष्टिकोन तोपर्यंत नियंत्रणात असतो, जोपर्यंत तो कोणाला हानी पोहोचवत नाही. परंतु निरीक्षणातून लक्षात येते कि, समाजातील या विषयाला निषिद्ध मानण्यामुळे स्त्रियांवर मानसिकरीत्या परिणाम होतोच पण समाजातील या सवयींमुळे स्त्रियांच्या स्वच्छतेच्या सवयींवरदेखील परिणाम होत आहे.
टॅबू

टॅबू म्हणजे निषिद्ध!

स्त्रियांच्या आरोग्याची गोष्ट जेव्हा येते तेव्हा त्यातील अनेक समस्या या अव्यक्त राहिल्यामुळे होतात. त्यातील एक महत्वाची गोष्ट म्हणजे मासिक पाळीतील टॅबू!

शारीरिक निर्बंध तर आहेतच पण त्याचबरोबर, त्यांच्या शास्त्रीय प्रक्रियेबद्दल बोलणेही टाळले जाते. पण शास्त्रीयदृष्ट्या पाहिले तर, मासिक पाळीचे चक्र हे निरोगी शरीराचे आणि प्रजननक्षम स्त्रीचे प्रतिनिधीत्व करते. तरीही सामान्यतः हा विषय गुपचूप आणि पुरुष सदस्यासमोर कधीच बोलला जात नाही.

पाउलो फ्रीरने जगभरातील गरीब देशांच्या आणि त्यांच्या शिक्षणाच्या संदर्भात 'द पेडॅगोगी ऑफ द ओप्रेस्ड' (2005) या पुस्तकात 'शांततेमागील संस्कृती' या संकल्पनेचा उपयोग केला. फ्रीरने असे म्हटले की, ‘शांततेमागील संस्कृती हि इतरांना त्यांच्या सत्तेत ठेवण्यासाठी अस्तित्वात आली.’

या सिद्धांतानुसार, प्रत्येक मुलीसाठी मासिक पाळी जवळ आली कि, तिला शांत राहण्यास शिकवले जाते आणि या घटनेबद्दल गुप्तपणे बोलावे असे सांगितले जाते.

प्रत्येक किशोरवयीन मुलीसमोर मासिक पाळी कशी हाताळावी, ही जोखीम असते. बर्याच निषिद्ध, सामाजिक आणि सांस्कृतिक निर्बंधामुळे किशोरवयापासून मासिक पाळी हि मनात भीती निर्माण करणारी ठरते. म्हणूनच, किशोरवयीन मुली मासिक पाळी स्वीकारण्यास लाजतात आणि गुप्तता कायम ठेवतात.

ज्याप्रमाणे वधू पक्षाकडून अप्रत्यक्ष हुंडा घ्यावा तसे आपण सगळेच घरात आधुनिकतेच्या नावाखाली अप्रत्यक्षरीत्या छुप्या पद्धतीने अनेक अंधश्रद्धा घरातल्या घरात पाळतो.. ज्यामुळे येणाऱ्या पिढीवर तसेच किशोरवयीन मुलींवर विशेषतः त्यांच्या मासिक पाळीच्या विश्वासावर आणि शास्त्रीय दृष्टिकोनावर पूर्वापार चालत आलेला नकारात्मकतेचा पडदा कायम ठेवण्याचा प्रयत्न केला जातो.


थोडक्यात,
मानवाची निर्मिती करणारी हि ‘मासिक पाळी’ आजही लपवली जाते. पण ज्याप्रमाणे जगाचा पोशिंदा करणाऱ्या शेतकऱ्यावर बोलले जाते त्याप्रमाणे समस्त माणूस जातीची निर्मिती करणारी हि ‘स्त्री’ वर्गातील ‘मासिक पाळी’ मुक्तपणाने बोलली जाऊन साजरी करावी, असे वाटते.


(या विषयाचा अभ्यास करून त्यावरून आलेले निष्कर्ष नोंदविण्याचा हा प्रयत्न...
क्रमश: ) 

'तिचं' माझ्याशी बोलणं झालं आज.
ती आमची तिसरी ओळख होती. पहिली ओळख तिच्या कामातून मला झाली होती. दुसरी ओळख मी तिच्याही नकळत सोशल साइट्सवर तिला शोधून केली होती. माणूस एखाद्याकडे खेचला गेला की त्याची संपूर्ण छाननी करूनच बाहेर पडतो. मीही सुरुवातीला तिला वरवर ओळखलं होतं. पण मध्ये खूप काळ लोटला होता. मी विसरूनही गेले होते.
पण आज अचानक दिवसाच्या ओघात ती मला दिसली.
रवीने तिच्याबरोबर असलेला एक सुंदर फोटो आणि तिच्या कर्तुत्वाची कहाणी टाकली होती. रवी आमचा म्युच्युअल फ्रेंड होता.
मला ती आठवली. ती सर्वसाधारण नव्हती पण खुपही प्रसिद्ध नव्हती.
पण ती  माझ्यासाठी प्रसिद्ध होती.
तिची दृष्टी माझ्यापर्यंत पोहोचली होती, ती माझ्या मनात तितकी प्रसिद्ध झाली होती.
मी स्वत:च्या विश्वात तिला रुमझुम‌ म्हणू लागले होते.
रुमझुम दिसायला इतरांसारखीच होती. तसे सगळेच एकमेकांसारखे असतात. पण झूम केलं की मग खरं वेगळंपण दिसू लागतं.
शरीरयष्टी जाड, नाक बसक, भुवयांना विरळ केसांचे सौंदर्य होते, केसांची कुरुळी एक बट त्या गरगरीत मुखड्यावर ओघळत आलेली. पण तिची त्वचा वेगळी होती, चमचमीत होती. मी त्या फोटोला न्याहाळत होते, एक सेकंदपरतून मी पुन्हा त्या चमचमीत त्वचेला पाहू लागले. एक सुरकुती नाही ना कुठलाच फुटकळ स्कार... एक आयुष्य इतकं साफसूथरं? कदाचित ते वरतून दिसणारं असावं.?
पण म्हणजे एखाद्या गोल गरगरीत कोऱ्या कागदावर, उशीर आहे डोळे, कान, नाक आणि त्या भुवया ठेवण्याचा.? 
माझ्या मनात तिचं व्यक्तिमत्व आधीच उच्च स्थानावर होतं, आता तिच्या बाह्यांगाला मी पाहत होते. तिचा साचा मला पहायचा होता. म्हणजे मी जजमेंटल न बनता तिला बघणार होते, जणू एक संपूर्ण यशस्वी अन् वेगळं व्यक्तिमत्व कसं असू शकतं याच कुतूहल मनात होतं, मी तिला पहात गेले. 
ती एक कॅमेराबरोबर खेळणारी अन् त्यातून जादू निर्माण करणारी निर्माती होती. तिला तिच्या आयुष्याच्या मर्यादा नव्हत्या. कुठल्याच नाही! 
हे माझ्या जमण्याच्या बाहेर होतं कारण मी माझ्यातून एखादा उडण्याचा, नि चौकटी बाहेरचा निर्णय घेऊन बाहेर पडणारच असते, पण बाहेर लगेच माझे घरचे उभे असतात. त्यामुळे कुठल्यातरी आचारसंहितेने आखलेल्या आयुष्यात , कलेच्या आझादीला मर्यादा येतात. त्यामुळे बहुतेकदा माझी कला घुस्मटत, गटांगळ्या खात असते.  
तिला मोकळं उडायचं असतं ते हवं तेव्हा. ! त्यावेळी माणसांच्या आयुष्यातल्या सामाजिक बंधनाचा तिला राग असतो. माझंही तेच होऊ लागलं होतं. 
पण मी रुमझुमला बघायचे. ती मुक्तछंदी होती. स्वतःच्या स्वप्नांना अलगद जपणारी. तिच्या स्वप्नांना स्वतः आधी आदर देणारी!
अशावेळी ते असतं ना, आपलं स्वप्न दुसरं कुणी जगत असलं की आपण त्याला दृष्ट लावत नाही, त्याच्या स्वप्नात आपलं स्वप्न पूर्ण व्हायची ओढ बघत असतो. मी यातच वाढत होते. 
      हळूहळू रुमझुम आणि माझं वरवरचं बोलणं होऊ लागलं होतं. 
रुमझुमला माझी कला, माझं व्यक्त होणं आवडत होतं. ती मला कौतुकाची थाप देत असे. मी भारावून जात असे. तिच्या आयुष्याशी माझा संबंध होता की नव्हता मला आजही माहीत नव्हतं. पण ती बोलली की मला छान वाटायचं. हुरूप यायचा काहीतरी लार्जर दॅन लाईफ करण्याची प्रेरणा यायची. तिचा आधार वाटू लागला होता. एका मित्राचा वाटतो तसाच तिचा आधार !
याच काळात, काल माझा दिवस एका मित्राच्या विश्वासघातामुळे वाईट गेला, त्यामुळे एकांतात खुप चिडचिड करून शेवटी एक दुखी स्टेटस टाकून मी झोपी गेले. 
सकाळी पाहते तर रुमझुमचा मेसेज.... :O आणि तोही असा कोणता फॉर्मल मेसेज नव्हता. 
मी ना आधी डोळे चोळत चोळत लगेच त्या मेसेजला टॅप करून वाचू लागले. 
"हे नाजनी ( ब्युटिफुल), काय झालं ?
एवढं नाही मनावर घ्यायचं, आयुष्य आहे क्षण उडून जायलाच असतात... क्षण उडतात, दुःख का कवटाळून ठेवायचं?
आता उगाच फॉर्मलिटीमध्ये अडकणार नाही. दुःख करून घे एक दिवस दोन दिवस यापलिकडे नाही. त्याला अर्थ नसतो कारण अशी माणसे येत राहतात, जात राहतात. आयुष्याला वाऱ्यासारख मोकळं सोड.!"
     मला म्ह्णजे काय बोलावं, काय लिहावं, काय मांडावं सुचेना. जे जे लिहीत होते कीबोर्ड हातातून सुटत होता. पण मला शब्द आणि रचना आणि तिच्यासाठीचां पहिला मेसेज खास लिहायचा होता. कसलीच माझ्या व्याकरणानुसार चूक नसलेला संदेश,
"उम्मम... सॉरी रुमझुमा,
हे सॉरी माझ्या आयुष्यातल्या त्या व्यक्तीसाठी ज्यामुळे माझा वेळ वाया गेला. पण त्याच व्यक्तीला शुक्रियाही म्हणेल ज्यामुळे आज तुझा संदेश या इनबॉक्सपर्यंत स्वतःहून आला. तोही साधा संदेश नाहीच, तुझ्या व्यक्तिमत्त्वाला साजेसा 
आणि काही व्यक्ती असतात ना शिंपल्यांसारखे. अपेक्षेने आपले केलेले शिंपले, सुटत नाही सहज. 
पण आता लाटा बनून समुद्रात ढकलून देईल हा शिंपल्यांचा कडवटपणा. तू म्हणतेय नं, खरंय वारा आहे हे आयुष्य! 
तूच ...! "
आमच्या दोघींच्या आयुष्यातला हा एकमेकींना पाठवलेला साजेसा सुंदर सुबकतेने पाठवलेला पहिला मेसेज... त्यानंतर आम्ही सुरू जे झालो... ते कधी इतक्या शाब्दिक अन् स्वच्छ भाषेत बोललोच नाही. 
अनोळखीतून मैत्री झाली,
मैत्रीतून चेहरा बघणारी भेट झाली. भेटीत दोन नवे विचार, नवे चेहरे आणि नवे आयुष्य अन् त्या आयुष्यातली कथा भेटल्याचा आनंद होता. 

भावना व्यक्त करून, खाऊन, पिऊन घरी गेल्यानंतर मेसेजिंग वाढलं, घट्ट झाले धागे. सगळं असं कोणत्यातरी नव्या जगातलं वाटू लागलं. दोघींना लाल रंग आवडायचा नाही, काळाच्या प्रेमात पडलो. पाणीपुरी नाही, दालचा आम्ही वेड्यासारखा खाल्ला. झेड ब्रिजवर नाही रिकाम्या रस्त्यांवर मध्यरात्री  बेफिकीरीने फिरलो. तिच्या कमरेला माझ्या हाताच्या वळणाने आपलंस करण्यात मला तिचा रस्ता होण्याचं सुख मिळू लागलं. दोघींच्या भावना, प्रतिसाद, हसणं बदलू लागलं. हसणं आता लाजणं होऊ लागलं होतं, चिडणं आता मनवण्यासोबतच आलं होतं.
मैत्री की मितवा यात अडकत कसं गेलो कळलच नाही आम्हाला.
पण मुलगी मुलगी? प्रेम? 
श्या.! 
ए काहीही! हे असं नसणारे. हो नं ? 
आम्ही दोघी एकमेकींना समजावत राहिलो. चार दिवस नीट बोलून त्यातला एखादा दिवस अचानक ती बोलणं बंद करायची, आणि तसच अचानक एखादा दिवस मी बोलणं बंद करू लागले. 
'सवयींचे आजोळ महागात पडणार' म्हणून आम्ही हे अंतर एकमेकींत आणत होतो. पण तरीही एकदा प्रेमाचं स्फुलिंग चेतलं की, त्यातून मग काहीच दाबलं जात नाही. त्यातून केवळ ते प्रेम उफाळुन येणं असतं. त्यामुळे हे निष्फळ प्रयत्न एकमेकींना समजत होते. तरीही एकीचीही हिंमत होत नव्हती. माझा ता दूरवर विषयच नव्हता.
मी पुढाकार घेणार नव्हतेच कारण हे 'आयुष्य' माझ्या वाट्याला आलं होतं, ते कुठल्याही वळणावर मला 'पोरकं' करेल या भीतीने मी त्याबाबत बोलणं टाळू लागले...
आता हा संवाद मला बंद करणं भाग होतं कारण जर तसं केलं नसतं आणि तिच्या मनात तसं काहीच नसतं तर मी आयुष्यभर तिच्या प्रेमात तशीच विचार करत, आलेल्या नव्या आयुष्याला झुरत ठेवलं असतं.
त्यामुळे तिच्या मनातलं जाणून घेण्यासाठी मी तिच्याशी बोलणं बंद केलं.
तिला सुरुवातीला समजलं नाही. ती रोजच्या दिवसांसारखे दिवस ढकलू लागली.
कारण याआधी आम्ही असं चार दिवसातून एकदा न बोलण्याचे खेळ खेळायचो. म्हणून सुरुवातीचे चार दिवस तिने नेहमीसारखे प्रयत्न केले. पण यावेळी चार दिवसांच्या वर जाऊनही मी तिला मेसेज, कॉल केले नाही. आता मात्र मला आतून एका मनाला वाटायचं, तिचा कॉल येईल, ती मला जाब विचारेलच.
नाहीतर किमान मेसेज तरी? मी स्वतःच्या मनाला समजुतीने वेड्यात काढत बसायचे, जर आता मम्मी मला ओरडली नाही तर तिचा कॉल येणार नाही, पण जर मम्मी ओरडली तर कॉल येईल आणि हे असे आणि अनेक प्रकार करून पाहायचे. पण माझे प्रयत्न फसत होते.
पाचवा दिवस फेल गेला.
तिचा कॉल मेसेज आलाच नाही. 
तुला काय वाटतं? 
काय करेल ती? 
तिचं प्रेम आहे?
जर आज पेपर टाकताना पेपरवाल्याचा चेहरा दिसला तर तिचं प्रेम आहे. पण नाही दिसला तर? 
ते जाऊदे पण तिचा कॉल येईल. 
येईल ना?... 
मी अशी एका प्रेमाच्या समुद्रात दोन दगडावर पाय देऊन उभी असल्यासारखी भासत होते, एका दगडावर प्रेम आहे एकावर नाही.
माझा तोल जात होता, पण मोबाईल हातातून सुटत नव्हता. कारण तो क्षण मला वार्यावर उडू द्यायचा नव्हता, जिथे तिची माझ्या आयुष्यात येण्याची चाहूल असेल, एक पहिला हक्काचा श्वास असेल माझ्यात येण्याचा तिचा. तो मी असाच सोडणार नव्हते. 
सातवा दिवस असाच प्रतीक्षेत गेला. 
आता दिवसाबरोबर आशा पण मावळत चालली होती. मनातल्या मनात सारखं, 'संपलं स्सगळ!' म्हणत मी आशा सोडत होते. तरीही आमचं नातं माझ्या उमेदीचा हात धरून मला धीर देत होती. 
आता हळूहळू दिवस ढकलायला मी माझे मन कामात गुंतून ठेऊ लागले. तरीही माझ्या चित्रकलेत तिच्या अन् माझ्या अस्तित्वाच्या अप्रत्यक्ष खुणा दिसू लागल्या होत्या. चित्र 'कपल'चे असेल त्यात मला आम्ही दोघी दिसू लागलो होतो, चित्र ऍबस्ट्रॅक्ट असेल तर त्यातही मला कुठल्याही आकाराने ब्रश फिरताना तुटलेल्या अवस्थेत मी, नाहीतर जोडलेल्या हातांनी आमचे दोघींचे एकमेकींच्या आयुष्यात गुंफलेले हात दिसायचे. 
मनाचे हेच खेळ सतत चालू होते. दिवस जात नव्हता, रात्रीला आमच्या आठवणी पुरायच्या.
शेवटी आज मी ब्रश हातात धरला. खूप धीराने स्वतःला सामोरं जायचं ठरवलं, तिला विसरून आज ग्राहकाला हवं तसं पेंटिंग देऊ, व्यावसायिक पेंटिंग, त्यात प्रेमाचा अंश नसेल असं पेंटिंग. शक्य होतं? ... मी इतक्या मोठ्या विचारांच्या अडचणीत होते, तोच टिडींग... फोनचा मेसेज बॉक्स वाजला. 
"भेटूया! ... उडणाऱ्या वाऱ्यात काही पाखरं एकच झाडावर येऊन बसतात, त्यातलं एक पाखरु ते झाड सोडत नाही.सुटत नाहीच ते झाड त्याच्याकडून. 
आपल्या ठिकाणी ये.! जमल्यास माफ कर. " 

माझा चेहरा, माझा हातातला ब्रश त्या चित्रावर कोरडा राहिलेला, तो मेसेज एका हातात ब्रश ठेऊन वाचला. मेसेजचां पूर्णविराम वाचतानाच तो ब्रश नकळत त्या काळ्या रंगाच्या डब्यात जाऊन त्याचं टोक एबस्ट्रॅक टाकत त्या छटेला त्या कोऱ्या कागदावर मोकळं करताना पाहताना जो प्रेमाचा रंग नी श्वास त्या कागदावर उमटला त्याने उमेदीची परमोच्च पातळी गाठली.
शेवटी दोघींनी भेटायचं ठरवलं.
ती भेट प्रतिक्षेच्या क्षणाची शेवटची आशा होती. 
मी खूप स्वत:ला मानसिकरीत्या जागेवर ठेवून जात होते.
तिचा नावडता ड्रेस आणि रंग मी घातला. केसांना कुठलेच वळण ना चेहऱ्याला लिपस्टिकचा रंग ओढला. मनात ओघळत असलेले एका ब्रशाचे आनंद, सुख, उकळ्या, प्रेम हे ओघळ होते, पण दुसऱ्या धारेत लगेच तो ओशाळलेला, नाराज अन् तुटलेपणाचा राखाडी रंग होता. त्या कागदाला तो रंग नको होता. 
आम्ही भेटलो, ती खूप सुंदर, नाही सुंदर नाही ती त्या क्षणी माझ्या आयुष्यातल्या दुष्काळातील, 'निसर्ग' होती. तिने येणं हेच माझ्यासाठी सुख होतं यापुढे तिने शब्दही न बोलावा. तिचे अस्तित्वच मला उमेद द्यायला पुरेस असायचे. 
"सोडून गेली तर आशा कुठून शोधावी? " मनातल्या मनात स्फुटत असलेलं वाक्य ओठांनी अचानक बाहेर 
ढकलल.
"हाहाहा sssss...." 
ती हसली. 
ती हसली की माझं टेंशन जायचं वगैरे मान्य होतं. पण ती वेळ माझ्या महत्त्वाच्या वळणाची होती. मला कुठलेच भाव तिथे नको होते. तिने आल्या क्षणी तिचे मन, तिची भावना, मला कुठल्याच एक्स्प्रेशन फॉर्मलिटी शिवाय सांगावे अशी माझी इच्छा होती. पण तिचं मन काय विचार करते, ते समजणं गरजेचं होतं. 
'का हसलीस?' मी शांत होत विचारलं. 
ती - तू वेडी आहेस. 
मी - बरं
मग? 
ती - कशी आहे ग? आधी मी आले की सुरुवात काहीतरी सुंदर्षा कॉम्प्लिमेंटने करायचीस, आज विसरली? 
तुझं मुलांसारखेच असणारे, तसच होणारे. 
मी - जाऊदे ना एवढ्या दूरचा तुला काय फरक पडतो.? 
ती - फरक ? होना कसा पडेल ? काय पण ना... मैत्रीत कसा बर फरक पडेल.? 
मी - म्हणजे मैत्री आहे...? आपल्यात.? 
मी शंकेच्या प्रश्नचिन्हाने तिचं मत जाणून घ्यायचा चुकीचा प्रयत्न करत होते. पण ती शातिर होती. कुठलीच जागा माझ्या गोलात देत नव्हती. 
"काय ते सांगून मोकळी हो. 
फक्त एवढं सांग हो की नाही.?
हो असेल तर, तेवढी हिंमत कर आणि सगळ्यांसमोर एक लॉंssssन्ग किस कर आणि नसेल तस काहीतर इथून तत्काळ उठून जा."
हे बोलून माझं मन मोठ्या शंकेच्या डोहात बुडाले.‌ 
मी मोठ्ठा श्वास घेतला, मनाची तयारी केलीच.
प्रेम माणसाला सगळ्या भावनांचा आदर करायला शिकवते. 
तोच ती उठली.
माझा एक श्वास माझ्या पोटात गोळा आला. भूवयांवर टेंशनचं सावट. डोळे झाकूनच गेले घट्ट... 
तिच्या वावरण्याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न माझं नाक करत होतं, अंधारात चाचपडावं तसं स्वतःच्या प्रश्नात उत्तर शोधण्याचा किती टोकाचा प्रयत्न मी करत असले माझं मलाच माहीत होतं. स्वतःची एवढी परीक्षा मी कधी पाहिली नव्हती,
आणि चाचपडतानाच अचानक तिच्या ब्रेसलेटचा धागा माझ्या मानेला लागला, डोळे उघडणारच पण ती चूक होणार होती म्हणून मी आतल्या आतच सगळ्या श्वासांचे प्रेमात मिश्रण करून उमेदीची खिडकी उघडली, नि क्काय? तिने दोन्ही हातांनी मानेला घट्ट पकडून माझ्या ओठांवर ओठ घट्टपणे ठेऊन टांगत्या श्वासांना मुक्त केलं.

पोटातला गोळा मुक्त झाला होता, श्वासांत आझादी आली होती
नि वार्याबरोबर उडणार्या पाखरांसारखे काही पाखरं असतात, शिकवलं तिनेच... 
निशब्द यापुढे आम्ही दोघीही त्या किसमध्ये अतोनात प्रेमाची उसंत टाकून तो सर्वांगात अनुभवून खुउउउउउप शांत झालो...



माझ्या विळख्यातली 'ती'

by on मे १६, २०१९
'तिचं' माझ्याशी बोलणं झालं आज. ती आमची तिसरी ओळख होती. पहिली ओळख तिच्या कामातून मला झाली होती. दुसरी ओळख मी तिच्याही नकळत...


'आई...'
आजपर्यंत जे लिहायला माझं मन तयारच होत नाही, हा एवढा एकच विषय असेल. कारण लिहायला जावं तिथे डोकं काहीच बोलत नाही.

नेहमीचे असंख्य विचार असणारं मन अशावेळी काय आठवून देतं माहिते?
"तिचा हिरव्या चुड्याने भरलेला दणकट हात, जो कधीही पडायचा उशीर असायचा... "
दणकट होती ती, आजही तितकीच स्थिर आणि त्याहून जास्त खमकी!
आज मला मुक्तपणा कळतोय, बंधने, गुलामी, अहं पणा कळतोय, स्वार्थी लोकांतील राजकारण कळतंय हे सगळं तिच्यातून मला आलेलं देणं आहे. कारण जेव्हा एक आई विचारांनी आणि कृतींनी दणकट असते तेव्हा तिच्यातील मातृत्वाबरोबर तिच्या विचारांचा अंशही आपल्यात वावरत असतो. पण तरीही सगळं कळून आपण या वरच्या गुणांचा भाग कधी व्हायचं नाही, हेही तिचंच देणं आहे.
एक शुद्ध आत्मा कसा जन्माला घालायचां आणि त्याची निर्मिती करून त्याला शिल्पकार जसा घडवतो तशी छाननी करीत घडवायचं हे एवढं विशाल व्याप्त काम ती मन लाऊन अगदी सहज, अलवार करून जाते.
आई हे वेगळं रसायन असतं, ज्यात खूप असतं. ती म्हणजे एक मोठीच्या मोठी बुदली आहे, ती कुठल्याच कलेतून व्यक्त करताना कमी पडत नाही, ती कधीच संपत नाही, ती वाढत जाते आणि निव्वळ वाढतच जाते.
आईसाठीचं काही आठवत असेल तर, 'माझ्याही नकळत तिला माझ्यातल्या लिखाणाची चाहूल माझ्या आजूबाजूच्या लोकांनी दिली होती आणि माझ्याही आधी तिला ती कळली होती.'
परीक्षेचे दिवस होते. माझं शिक्षण महानगरपालकेच्या शाळेतलं. तेव्हा त्या शाळेच्या आपुलकीबद्दल अन् गोंडस दिवसांबद्दल कधीतरी लिहिल, पण या शाळेतील एक महत्त्वाचा दिवस होता तो.
आमच्या वार्षिक परीक्षेचे दिवस होते ते. आणि परीक्षेला मराठीच्या पेपरात "माझा पहिला नंबर आला तर...? " हा निबंध आला होता. तेव्हा मी चौथीत असेल.
मोबाईल फोन गॅझेटच्या महागड्या सावलीलाही नव्हतो आम्ही. त्यामुळे घरच्यांनी लहानपणी लहान राहणं जमवून आणि जपून ठेवलं होतं. एवढं काहीच कळायचं नाही पण 'आई जवळची आहे, ती कळायची.'
'तिचं' कसं असायचं, दिवस तिथूनच सुरू व्हायचा अन् मधल्या दुपारच्या वेळेत जे लहानपणीच सुख असतं ते अनुभवायचं अन् रात्र पुन्हा तिच्याच जवळ संपायची. गणित आयुष्याचं इतकं सहज सोप्प होतं.
त्यामुळे आयुष्याच्या दुनियादारीपासून आईने खूप जपलं.
"आई घरकाम करायची, आम्ही नातेवाईकांकडे शिक्षण घ्यायचो आणि परिस्थिती ही आपल्या फेवरमध्ये नाहीये." या तीन वस्तुस्थिती माझ्या मनावर प्रोपोगांडा राबवावा तशा मनावर बिंबत होत्या. पण एका बाजूला याच वस्तुस्थिती मला मोठं करू लागल्या. तेव्हाही मला माहीत नव्हतं, हे लेखक बिखक नेमकी प्रकरण काय असतं, जे आजही मला कळत नाही .
पण मी लिहिलं होतं त्या निबंधात, तो जो  दिवस होताsssssss.. तो मला त्यावेळी काहीच कळला नव्हता 😅
मी निबंधात लिहिलेल्या दोनच ओळींनी माझ्या बाई अनपेक्षितपणे माझ्याकडे पाहू लागल्या होत्या. बाईंनी तसं या पूर्वी कधी पाहिलेच नव्हते म्हणून काहीच तर्क लागतं नव्हते. 
मॅडमने नेहमीप्रमाणे पेपर वाटायला घेतले. 
माझा नंबर आला. पण मला पेपरच दिला नाही, तो बाजूला ठेवला. सगळ्यांचे पेपर वाटले. मी रडवेली होऊन मॅडमकडे पाहू लागले. कारण नापास होणं म्हणजे आईच्या मेहनतीचा अपमान होता तो.
मी त्यांच्यासमोर बोलेल इतकी बिनधास्त नव्हतेच कधी. थोड्यावेळाने बाई उठल्या. मला समोर बोलावलं. माझा पेपर हातात घेतला. आणि संपूर्ण वर्गात तो निबंध वाचून दाखवला. मला खूपच कसतरी वाटलेल. मला तरीही काही कळलं नाही, ना माझ्या वर्गातल्या मुलांना हे कळलं. म्हणजे त्यात एवढं काय होतं ? ते कौतुक होतं का? मला तेही कळलं नव्हतं. पण मी चुकीचं काहीच केलं नाही एवढं मात्र मला माहित होतं आणि बाई एवढ्यावरच थांबल्या नाहीत, त्यांनी दुसऱ्या दिवशी शाळेला येताना सोबतीला आईला घेऊन यायला सांगितलं.
आई धास्तीने आली की, नेमकं मी काय उद्योग करून ठेवलेय. कारण घरकामाला सुट्टी घेऊन येणं आम्हाला परवडणार नव्हतं. पण तरीही शिक्षणाच्या बाबतीत तिला तडजोड मान्यच नव्हती.
ती आली. मॅडमने कौतुकाने सांगितले, तुमच्या मुलीने काय लिहिलंय सांगितलं तुम्हाला? ती अजुनच घाबरून गेली. कारण तिला याची पूर्वकल्पनाच नव्हती. आई भोळेपणाने म्हणाली, नाही मला काहीच माहीत नाही, काय केलंय तिने?.
आता डोळे माझ्याकडे करून तिने डोळ्यांनीच रागाने विचारलं, पूजे अभ्यासाकडे लक्ष द्यायचे का नुसते उपद्व्याप करून ठेवतेय. ती खूप चिडून गेली होती. ती अजून चिडणारच तेव्हा मॅडम बोलल्या, " शाबासकी द्या तिला आणि या ओळी वाचा." आई साधारण शिकलेली त्यामुळे तिने वाचलं. 
मी लिहिलं होतं, "माझा पहीला नंबर आला तर, मला खूप आनंद होईल. पण मला खूप आनंद होईल कारण माझ्या आईला याचा खूप आनंद होईल. त्यामुळे खूप मोठ्ठं शिकून एक नंबर मिळवायचाय! " 
तिनेही माझ्याकडे पाहिलं आणि तिच्या डोळ्यात मला पाणी दिसलं. 
पाणी म्हणू की शाबासकी म्हणू की ते आनंदाश्रु होते.? तिच्या कष्टाचं चीज होतंय, तिच्या कष्टाचं रोपटं पुढे खूप मोठं होणारे, तिच्या डोळ्यात तो विश्वास मला जवळ घेऊन कौतुकाची थाप दिल्यावर मला दिसला होता. नकळत्या वयात आई आपल्याला मोठ्ठी स्वप्न दाखवू लागते.
"गरिबीतून मोठ्ठं होण्याचं स्वप्न तिने त्या दिवशी मला दिलं होतं. "
परिस्थिती हे अपयशाचं कारण कधीच नसते. तुला ते करायचं आहे तेव्हा तुला कोणीच थांबवू शकणार नाही. ते आजही तिने मला कधीच थांबवलं नाही.
आईच्या डोळ्यात जेव्हा आपल्या कलेविषयी आदर आणि स्वप्न दिसतात, तो दिवस आपल्या आयुष्याचा सोहळा असतो. सुदैवाने हे लिखाणातील कौतुकाचे सोहळे मी तिच्या आनंदाश्रुच्या सौख्यात दोनदा अनुभवले. त्याला कसलीच बरोबरी नसते. ते सुख असतं, कुठल्याच किंतुशिवाय मिळालेलं एकमेव सुख!
त्यामुळे स्वतःच्या स्वप्नांना आईच्या शाबासकीचे तोरण लागले की स्वप्न पूर्ण वाटू लागतात आणि आयुष्य स्वर्ग वाटू लागतो. वास्तवाचे चटके सहन होणार नाही इतके असतील पण त्यातही सौख्याचा सागर तिच्या हाताच्या स्पर्शात असतो. 
वास्तव स्वीकारलं नाही तरीही ते असणारच आहे पण, त्या वास्तवातील कविता होणे तुम्हाला जमायला हवे! हे शिकवून अन् घडवून जाते ती ! 
अशा माऊलीला "मौल्यवान मातृदिनाच्या मातृमय शुभेच्छा !"

वास्तवातली कविता !

by on मे १२, २०१९
'आई...' आजपर्यंत जे लिहायला माझं मन तयारच होत नाही, हा एवढा एकच विषय असेल. कारण लिहायला जावं तिथे डोकं काहीच बोलत नाही. नेहमी...

आयुष्याला नेहमी दोन वाटा असतात, "एकतर करायचं, नाहीतर सोडून द्यायचं... "
'तिच्या' चेहऱ्यावरही तेच होतं...
रात्रीचे नऊ वाजले होते. आम्ही डी मार्ट वरून परतत होतो ...
मला रात्र आवडते कारण ती जिवंत असते. तिच्या सानिध्यात श्वास मुक्तपणे घ्यावेसे वाटतात, श्र्वासांच अस्तित्व जाणवत. मी सहसा रात्रीच्या वेळी बाहेर पडत नाही त्यामुळे कधीतरी बाहेर पडल्यानंतर " माझ्यासाठी रात्र म्हणजे वेगळी नशा असते."
त्या नशेत मी धुंद होते. बसमध्ये गर्दी नव्हती. पण अनेक चेहरे थकलेले होते. बस ' खानापूर ' असल्यामुळे त्यातून प्रवास करणारे चेहरे हे दिवसभर कष्ट करून थकलेले, कष्टाचे बोलके चेहरे, हातावर पोट असलेले...
त्यामुळे या बसमध्ये शीण होता... पण बस मिळाली, रिक्षाचे जादाचे पैसे वाचले, याचा सुस्कारा त्या प्रत्येकाच्या मनात होता... बस सुरू झाली... साधारण एक किलोमीटर गेल्यानंतर बस एका स्टॉप नसलेल्या ठिकाणी थांबली.
अचानकच...
विचारांच्या तंद्रीतून बाहेर येत सगळ्यांनी "नेमकं काय झालं.?" म्हणून बाहेर पाहिलं, मीही डोकावले.
तर बसच्या कंडक्टरला त्याच्या नशेची तलफ आली होती...
तो त्याच्या नशेशी इतका प्रामाणिक की, त्याने दुनियेला विसरून स्वतःची इच्छा पूर्ण केली...
ते मला इतकं सुंदर वाटलं की, कसं एखादा माणूस परिस्थितीला विसरून स्वतःच्या आयुष्यात 'राजा ' म्हणून जगू शकतो, त्याच्या त्या 'असण्याला ' मनात बसवून गाडी पुढे जाणार होतीच. पण क्षणाचा वेळ न गमवता मी हातातल्या मोबाईलचा कॅमेरा ओपन करून तो क्षण माझ्याकडे घेतला... त्याचं वास्तव काहीही असो तो माझ्यासाठी या दुनियेत, 'आयुष्याला जिंकलेला माणूस होता. '



मी क्लिक केला आणि माझ्या जवळच बसलेल्या (इतक्या वेळात माहीत नसलेल्या) मावशीने माझ्या त्या क्रियेला दाद देत खुदकन हसल्या...
मला स्वतःच मी प्रॉम्प्ट वाटले. आवडले. पण पुढे त्यांना बोलायचं होतं...
" ए हे कित्ती लग्गेच झालं... मस्त केलं फोटो काढला..." दैनंदिन आयुष्यातील संवादापेक्षा हे वाक्य वेगळं होतं.
प्रत्युत्तर देण्यापेक्षा मी त्यावेळी फक्त एक ओळखीची स्माईल दिली.
"कुठे उतरणार... ? "
त्यांच्या नजरेशी नजर मिळाली, त्यामुळे मी वेगळच काहीतरी निरखत राहिले,
आणि त्यामुळे मला लगेच उत्तर सुचलं नाही.
पण पुढे " उममम.... हां xyz इथे."
मग 'थोड सेकंदभर बोलू का यांच्याशी?'असा सहज विचार मनात आला,
म्हटलं, "तुम्हाला?"
त्या लगेच म्हणाल्या, "वडगाव..."
मी प्रश्नार्थक नजरेने पाहिले... त्यांनी कन्टिन्यू केलं.
" बाई काय करू मग, ही बस आतपर्यंत जात नाही
... पण बस लवकर येत नाही. त्यामुळे आता बाहेरच उतरून चालत जावं लागेल घरापर्यंत."
"होना तेच म्हटलं बस खानापूर मग वडगाव कसं? "
पण बरं झालं याच बसमध्ये चढल्या. तशी बसची संख्या कमीये. त्यात रात्रीचं वाट पहावत नाही. घरी जावं वाटतं आपल्यापल्या. " मी त्यांच्या कलाने बोलले.
"आपलं कोण सांगून ऐकतं? त्यात इथून रोज दहाला घरी पोहोचायच. त्यांनतर पुढे स्वयंपाक... असं वाटतं ना कुणीतरी म्हणावं गेल्या गेल्या की झोपून घे. मी खुशाल झोपेल." त्या सलग बोलू लागल्या...
" मुलगी नसते का घरी?" मी सहज स्वाभाविक प्रश्न विचारला.
" लग्न झाली त्यांची. घरी सासू, नवरा आणि मुलगा असतो."
मी म्हटलं, " मुलगा काय शिकतो? "
त्यांना माझ्याशी बोलून आधार वाटत होता, अनोळखी पण आवडता संवाद होता तो.
" त्याचं शिक्षण झाले, तो आता मुलांना स्विमिंग शिकवतो, काय म्हणतात त्याला?
म्हटलं, " स्विमिंग ट्रेनर." हे समजल्यानंतर मला विचारावं वाटलेलं की, 'तो लवकर येतो मग तो स्वयंपाक करून नाही ठेवत का?' पण म्हटलं आई आहे ती. आणि तेही ' मुलाची आई' म्हणून माझं वास्तविकतेने बोलणं मी टाळलं.
"हां तेच... " त्या म्हटल्या. मी माझ्या विचारातून बाहेर पडले.
"त्यात मालकीण इतकी राबवून घेते. कसंही वागवायच कामाला म्हणून?. त्यात कळतही नाही इतक्या लांब जायचं, तरी कधी लवकर सोडत नाही" त्या सांगत होत्या.
" कुठे कामाला जातात तुम्ही.? " त्यांच्या आयुष्याचा भाग होत मी विचारलं.
" डेक्कनला ... "
मग मी डोक्यात गणित करून त्यांना विचारले, " म्हणजे तुम्हाला दोन बस बदलून यावं लागलं असणार. "
" दोन नाही तीन. तिथून डायरेक्ट बसही नाही. देवही कसा कोणाला देतो तर भरभरून आणि काहींच्या नशिबी फक्त कष्टच..... मोठ्ठा पौज घेऊन त्या सलग बोलू लागल्या. " पण जे चाललं ते छान आहे. "
पुढे म्हटल्या, "तू हॉस्टेलवर की घरी राहते. " माझ्याबद्दल सांगितल्यानंतर स्वाभाविक प्रश्न विचारला, " भाऊ नाही तुला? "
मी खुश होत म्हटलं, " नाही."
आजवरचा युनिव्हर्सल डायलॉग त्याही बोलल्या पुढे, "त्याला काय, आजकाल मुलीही काय कमी नाहीये."
मला आता सवयीचं झालं त्यामुळे मी पुढे म्हटलं , "मुलगा मुलगी काय फरक नसतो मावशी. शिक्षण असेल तर मुलगा मुलगी फरक पडत नाही."
"होना... " माझ्या मताशी सहमत होत्या पुढे म्हणाल्या, " हो बाई, शिक्षणावर खर्च करावा. आपलं लाईफ मस्त करावं, लग्न करावं पण ' चांगला पार्टनर ' पाहून. पार्टनर चांगलाच बघ, कितीही वेळ लागू.
त्यांच्या त्या दोन इंग्लिश शब्दांनी मला आतूनच खूप सही वाटलं, मी ऐकू लागले, " एक चांगला पार्टनर खूप महत्त्वाचाय . मी माझ्या मुलींची लवकर दिली लग्न लाऊन. पण आता बघते, पश्र्चाताप होतो. घर सांभाळून नोकरी करतात, पण गुलामीसारखं ."
मला धीर मिळाला त्यांच्या पुढारलेल्या विचारांनी मी म्हटलं, " हो बरोबरे. म्हणूनच भर शिक्षणावर आहे. कारण उद्या लग्न झाले, पार्टनर चांगला नसला तरी आपण स्वतंत्रपणे सक्षम असायला हवे. "
हो बाळा, शिक मोठी हो...
माझं स्टॉप आला.
निघताना म्हटले, "काळजी घ्या..."
मी सहजच आपल्या माणसांना म्हणते तसं आपोआप तोंडातून निघून गेलेलं... त्या मावशींना ते इतकं इतक्क हृदयाला भारी वाटलं, "हसतच म्हटल्या घेते बाई काळजी..." आणि हे सगळं त्या पुन्हा त्यांच्या बरोबरच्या मैत्रिणीला खूप आपुलकीने सांगू लागल्या, आपोआप त्या बसभर पसरलेला तो हास्याचा सुखद गारवा दोघींच्या मनास सुखावून गेला, भेट संपली, संवाद संपला पण त्या घटनेने, तिच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या आणि शीण याने एका कष्टाशी ओळख झाली. एका प्रवासाच सार्थक झालं...

"एका अनोळखीबरोबर इतक्या वैयक्तिक, चार भिंती आडच्या गप्पा होऊ शकतात? ..." हा प्रश्न स्वतःला विचारून आयुष्याचं दुःख हलकं होऊन जातंय...
मध्येच प्रश्न पडतात, आधुनिक विचारसरणी गरिबातल्या गरिबापर्यंत पोहोचली, आजकाल मोबाईल आले सगळ्यांकडे मग तरीही आज त्या माऊलीला गृहिणी म्हणून जगता येत नाही. का तो मुलगा तिला म्हणू शकला नाही की, 'खूप झाले कष्ट घरी बस आता.' आज अशा गृहिणी आहे ज्यांना गृहिणी बनून कमीपणा वाटतो, पण या अशा स्त्रिया असतात ज्यांना जन्मल्यापासून आजपर्यंत कष्टाचाच दिवस घालवावा लागतो. ज्यांच्या आयुष्याला 'सुंदर आयुष्याचा एक तुकडाही नसतो, त्यामुळे अशांचा कैवारी म्हणत देव त्यांना आधार वाटत असतो, त्यावेळी मला देव जवळचा वाटतो. आयुष्याचा काहीसा भाग देवाच्या नावे देत तरी जगतात या माऊली..."

काय बोलू.?
एवढंच की,
वाईट वाटलं, आनंद झाला, सुख मिळालं एका अनोळखी, अनम्मोल, एका सच्च्या भेटीचं.

एक कष्ट बोलके...!

by on एप्रिल ३०, २०१९
आयुष्याला नेहमी दोन वाटा असतात, "एकतर करायचं, नाहीतर सोडून द्यायचं... " 'तिच्या' चेहऱ्यावरही तेच होतं... रात्रीचे नऊ...


ळूहळू सगळच बदलू लागले...
मीही बदलत चालले.
मी मोठी होते, मला अनुभव येऊ लागले.
बरे वाईट म्हणत म्हणत खूप लोक भेटू लागली. खूप भेटली म्हणून काही मागे सुटत गेली.

भावनिक पातळीवर कसं सावराव यात अडकत गेले. वयाच्या अशा परिस्थितीत आले की जूनून की भावनिक होणं?
दोघांपैकी एक निवड.
सुरुवात म्हणून मी दोन्ही निवडून रस्त्याला लागते.
पहिली शिडी उत्तम चढते, स्वतःच्या गर्वाचाही हेवा वाटायचा इतका आनंद वाटू लागला, मग दुसरी शिडी ... धत्त!
रस्ता दुभागत जातो. दोघांपैकी एकच निवडण अनिवार्य होते.
परिस्थितीला अनुकूल अस मी भावनिक होणं निवडते, लोकांशी बोलू लागते, घरच्या समस्यांना प्राधान्य देऊ लागते. 
सगळं ठीक चालू असतं. पण त्याकाळात जूनून मागे पडलेला असतो. त्यावेळी मध्ये एकच शिडी म्हणत म्हणत काळ बराच गेलेला असतो. स्वतः लाच मागे वळून पाहण्यात मी स्वतःलाच मागे सोडून येते. 
आता पुन्हा जूनून शोधू पाहते, काहीतरी राहतं म्हणत मी पुन्हा लोकांत जाते. 
त्याच लोकांमध्ये कुणीतरी मला टोकतं. 
तेव्हा मला कळतं, लोकांमध्ये गेले की मी स्वतःलाच कणाकणाने खाऊ लागते. 
कारण आजकाल मी स्वतःचीच उरतं नाही आणि शेवटी जूनून इज ऑल अबाऊट यू!

जेव्हा मीच नसणार तर जिंदगी काय उरणार?
डेड सोल !
मेलेला आत्मा!
का असं?
तर वाटतं,
जेव्हा जिवंत होते तेव्हाच स्वच्छंदी आत्मा बनले असते. त्या 'स्व' मधील छंदच सोडून गेला तर बाकी उरणार तरी काय? ...
भावनिक होण? लोकांसाठी?

कितपत जगवेल मला?
किमान माझा छंद मला जगवेल तितकं तरी.?
विश्वास कुछ अलगही कह रहा है,
मेरा जूनून मुझमे दबी हर खुशी को नीचोड लेगा |
मरी आत्मा अगर कुछ खौंफ हैं ना तो मैं तबाही मचा दुंगा।

- पूजा
Image source: pintrest

डेड सोल !

by on एप्रिल २२, २०१९
ह ळूहळू सगळच बदलू लागले... मीही बदलत चालले. मी मोठी होते, मला अनुभव येऊ लागले. बरे वाईट म्हणत म्हणत खूप लोक भेटू लागली. खूप भेटली म्हणू...


न्योतैमोरी 

हे नाव वेगळचं होतं. असं काहीतरी जे कुठल्यातरी भाषेतील कशाच तरी नाव असेल.
माणसाचं सगळ्यात जिवंत गुण म्हणजे त्याला उत्सुकता असते, कसलीही...
काल एका मित्राने विचारले की, न्योतैमोरीबद्दल ऐकलंय.?
आमच्या ग्रुपने एकमेकांकडे पाहिलं नि टाळ्या देत, याचं काहीतरी भलतच म्हणत, "म्हटलं नाही, काय संबंध, काय आहे ते?
आणि त्याच काय ? "
"तुम्ही ना ... या जगात फक्त खायला नि जायलाच आलाय." तो एकदम ऐतिहासिक काहीतरी शिकून आल्यासारखं बोलू लागला.
"बरं सांगून टाक काय ते, उगाच जुलाब व्हायचे नाहीतर" त्याला प्रोत्साहन देत त्याला विचारलं.
तोही आपलं सगळेजण ऐकताय या आनंदाने सांगू लागला...
"काल रात्री सहज वुट लावलं अन् त्यावर एका वेबासिरिजचा उल्लेख होता 'फुह से फैंटेसी'
आज जाऊन सर्च कर... कळेल मग."

फैंटेसी... म्हणजे विलक्षण कल्पना.
या शब्दात अडकलेली आमची पिढी नेहमीच एक्साईटेड असते कारण डार्क फैंटेसी म्हणजे गडद कल्पना. हे म्हणजे भलतच शारीरिक क्रियेशी संलग्न असतं.

यात अनेक प्रकारच्या शारीरिक अवयवांचे आकर्षण व्यक्तींना असते. त्यांना कधी एखाद्याच्या हातांचे आकर्षण असते, कधी ओठांचे, कधी ओठांवरील गुलाबी रंगाचे, कधी कुणाच्या कुरळ्या केसांचा आकर्षण तर कधी कुणाला स्तनांच्या आकारांचे आकर्षण तर एखाद्याला एखाद्याच्या पायांचे आकर्षण असते. हे फैंटेसी प्रकरण इतर प्रेमांपेक्षा भारी वेगळं असतं. त्यात प्रेम शरीरावर असतं तेही संपूर्ण शरीर असेलच असे नाही, ते प्रेम एका विशिष्ट भागावर असते खरे !
त्यामुळे या फैंटेसी नावामुळेच आम्ही सगळे घरी येऊन गुपचूप हे सर्च करणार हे ठरलं होतच.
मी घरी आले. डोक्यात 'फैंटेसी' चक्र फिरत होतेच.
अन् रात्री निवांत झाल्यावर मम्मी शेजारी असताना सर्च केलं.
अबब ... लगेच क्लोज !
अशावेळी मोबाईल पण शट डाऊन करता येतो, कळतं... डोक्यात तेच तिने पाहिलं तर नसेल ते चित्र ... शिट!
मग शेवटी ती झोपल्यानंतर मी पुन्हा सर्च केलं.
'न्योतैमोरी'.... हे नाव टाकताच, त्याच्या समोरच न्योतैमोरी मॉडेल्स म्हणून रेकमेंडेशन आले...
एक नग्न शरीर. आणि त्या शरीरावर नुसत्याच हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या पसरवलेल्या.

आणि ती मॉडेल म्हणजे काय मॉडेल असते. एकदम चुणचुणीत शरीराची, ते शरीर म्हणजे कुठूनही कुठलच अधिकच मांस बाहेर न आलेलं, त्या शरीरावरील प्रत्येक अवयव हे सुयोग्य पद्धतीने साचेबंद अन् इतकी सुंदर की भारतीय आई असती तर तिने रोज दृष्ट काढली असती अशी.
पण हा प्रकार मनाची उत्सुकता शिगेला नेत होता. वयही तसं होतच.
मग त्या नग्न शरीरावर पसरलेल्या खाद्यांनाचं गूढ शोधण्याच्या भागडीत पडले मी.
का कुणी त्याचा शोध न घ्यावा...? म्हणजे कल्पना करा आणि फक्त डोळ्यासमोर आणा, एका नग्न स्त्रीच्या शरीरावर गळ्यापासून स्तनांपासून, योनिपासून पायापर्यंत भाज्याच भाज्या. त्यास सुशी म्हणत.
मी "असं का? नेमकं ही पद्धत तरी काय आहे ? आणि अशा मॉडेल्स का असतात?" याची उत्तरे शोधू लागले.
उत्तर गूगल केलं पण थेअरी आली. ते नको होतं. मग मित्राने जिक्र केलं त्यावरून वेबसिरिज सर्च केली.
बघायला सुरुवात केली. हे काहीतरी भन्नाट होतं. म्हणजे वेबसिरिजमध्ये कथा नेमकी अशी सुरू होते की, भारतात न्योतिमोरी या कार्यक्रमाचे प्रयोग असतात आणि अशा कार्यक्रमाला भारतीयांचा प्रतिसाद उदंड असतो. तेव्हा कंपनीत नोकरी करणारे ३-४ भारतीय पुरुष जेव्हा न्योतैमोरी जेवणासाठी जातात तेव्हा त्यांची तारांबळ कशी उडते ते इतकं कट टू कट दाखवलं आहे की, म्हणजे भारतात स्त्रीचं उघड शरीर किती आकर्षणाचा आणि बाऊ केल्याचा विषय आहे, ते वास्तविकतेला धरून अचूक दाखविले आहे.
वेबसिरिजचा विषय खरेतर खूप वेगळा होता. नव्या गोष्टी शिकाव्याशा आणि महत्त्वाचं म्हणजे जाणून घ्याव्याशा वाटतात.
पण तरीही वेबसीरिजची सुरुवात झाली आणि त्या मॉडेलला बघून माझ्या मनात असंख्य भावना येऊ लागल्या.
या मॉडेल्सना सुशी मॉडेल्स म्हणतात.
माझं मन स्तब्ध झालं होतं. जेव्हा त्या एका चार फूट उंच मेजवानी टेबलवर केंद्रस्थानी ती शांत स्त्री आकृती अशीच निर्जीवासारखी पडलेली. जशी जन्मास आली तशीच अगदी.
म्हणजे अशी आकृती समोर आहे आपल्या आणि तिच्याकडे बघत डोळे झाकून अंतरंगात पहावं इतकी शांतता त्या चेहर्यावर की चुकूननंतर निरिक्षिताना नजर खालच्या अंगांकडे कुठेतरी जावी.
मग कळले की ही पद्धत मूळची जपानची. ते त्यांचं जेवण हे एका नग्न स्त्रीच्या शरीरावर पसरवून खातात. त्या शरीरावरून ते अन्न ( अन्नाला सुशी म्हणून संबोधतात) आपल्या ताटात घ्यायचं.
सुशी हे जर नग्न स्त्रीच्या शरीरावर असेल तर त्यास न्योतैमोरी म्हणतात.
पण जर सुशी पुरुष मॉडेल्सच्या अंगावर पसरलेले असेल तर त्यास नंतैमोरी म्हटले जाते.

हा प्रकार सामुराई कालखंडात घडत असे. राजे महाराजांच्या काळात अनेक यशस्वी लढायानंतर उत्सव म्हणून गैशा घरामध्ये 'न्योतैमोरी' होत असे.

बघितलं तर हा एका खुबसुरत कलेचा तुकडा आहे, असे  तिथल्या मॉडेल्सना आतून वाटते. किंबहुना त्यांना तसं ट्रेन केलं जात.
त्यांच्याकरीता किती आव्हानात्मक असेल की, त्या एका पोजिशनमध्ये एक तासाहून अधिक वेळ तसचं निर्जीव झोपून राहायचं. जणू एखादा चित्रकार चित्र
रंगवीत असेल त्यास ती बोलकी फ्रेम स्तब्ध लागते, तशीच या मॉडेल्सची ट्रेनिंग करून घेतली जाते.

परंतु मॉडेल्स सांगतात, जेव्हा अशा ठिकाणी राजे जेवण करत असायचे, तेव्हा ताटात हे सगळं घेतल्यानंतर ते जेवण, त्यातला एक एक घास चावताना ते आजूबाजूला बघत असायचे परंतु काही राजे लोक दारूचा घोट घेत घेत त्या स्त्रीच्या शरीरावरील कुठल्यातरी एखाद्या विशिष्ट अवयवाला एकच एकटक न्याहाळत बसायचे.

भारतातून या दृश्यास बघितले तर त्यास या अशा रिवाजांचा निषेध म्हणून नाकारले तर जाईल पण 'चवीनं' बघितलं जाईल आणि नजरेनं ' खाल्लही' जाईल. भारतात याची स्वीकृती सहज होणे नाही, पण मॉडेल्सच्या डेडीकेशनला सलाम!

(या पद्धतीचे ब्लॉग लिखाण हा केवळ आवडीचा अट्टाहास त्यामुळे, लिखाणातील काही दुव्यांमध्ये काही चुका आढळल्यास जरूर कळवावे)

कला सफर ; न्योतैमोरी

by on एप्रिल २१, २०१९
न्योतैमोरी   हे नाव वेगळचं होतं. असं काहीतरी जे कुठल्यातरी भाषेतील कशाच तरी नाव असेल. माणसाचं सगळ्यात जिवंत गुण म्हणजे त्याला उत्सु...