जुलै 2019 - Sufi
Blessed with love!

क्षण आठवून आनंद होतो पण क्षणांच्या पाकळ्यांचा दिवसच आपला असेल तर ..? 
एखादाच पण संपूर्ण दिवस आपल्याला मिळावा, एवढंच स्वप्न प्रियकर वर्गाचं असतं. 
माझा देव त्यात फार रोमँटिक... त्याने दोघांच्या नावे म्हणून की काय, अक्षरशः पावसाळी अन् बर्फाळी वातावरण भिजू घातलं होतं. माझ्या मूडला उधाण आलं होतं. फार काही नाही पण तो जवळ असायलाच हवा होता हा अट्टाहास मनाला टाळता येत नव्हता. पण नोकरीवरून सारखं सारखं कितीदा सुट्टी घ्यायची. त्यात नात्याचे आणि प्रेमाचे चोचले अती जास्त असतात.
पण गोड असतात नाही? म्हणजे त्याशिवाय का आम्ही एकमेकांत बांधले गेले असतो?. त्यातल्या त्यात हे चोचले म्हणजे आवड होती एकमेकांची.
प्रेम शाबूत आहे, जोपर्यंत प्रेम तुमच्यात आहे. तेही दोन्ही व्यक्तीकडून तितकंच खरं नि महत्त्वाचं म्हणजे निरागस हवं.!त्याला या बाहेरच्या राजकारणी, दिखाऊ प्रेमाचा स्पर्शही नसावा! जे वेंधळटही चालेल, पण किमान त्यावर लिहिलं जावं इतकं स्वच्छ असावं! 
"तुझं पण ना.."
(मागून कुणाची बारीकशी पुटपुट ऐकू आली)
"कधीही लिहायला सुचतं बाई तुला. एवढा एकटा वेळ मिळालाय आणि आम्ही हे असे नशिबी ज्यांच्या नशिबी लेखिकाबाई आल्यायत. ज्यांना दोघांच्या एकट्या वेळेतही 'किस' सोडून कविता होताय." त्याने मुद्दाम मला डिवचत म्हटलं.
"दोन चहा चालतील.
चहा मसाला टाक फक्त." मी म्हटलं.
"बरं चालतंय, पण त्यानंतर मला दोन ओळी माझ्या हव्या! "
"हावऱ्या, तुझ्यावर मी केसच करणारे ! असं दरवेळी माझ्या लेखणीकडून रिश्र्वत घेतोस... " 
"चहा हवाय ना? " त्याने खोडकरपणे विचारलं. 
"अरे मुसाफिर, तुम सिर्फ बनाकर लाओ | हम हमारे लहेजे
के साथ आपके सामने आपका पेगाम हाजिर रखेंगे...|"
"उफ ! आलोच ... "


अंहा, हे दिसतंय तितकं साधं नाही हां...

एक खोली दोघांना मिळणं... सगळं सुरळीत होणं अजिबात नाही. तेही जात-पात, स्त्री चारित्र्य, अविवाहित मुलगा मुलगी एकत्र आणि महत्त्वाचं म्हणजे शेजाऱ्यांच्या उपस्थितीत एका खोलीत लग्नाआधी पलंगापर्यंत जाणं म्हणजे भलतंच दरारक!
पण तरीही... बॉयफ्रेंडच्या मित्राचं घर तो नसताना रिकाम ठेवणं, आपल्या नव्या शास्त्रात न बसणारच. बॉयफ्रेंडने मित्राकडे प्रस्ताव ठेवण्याचा उशीर मित्र राजी न व्हायचा प्रश्न दुरदुरवर नव्हता. त्यामुळे तो जाणार हेच आमच्यासाठी प्रेमाचं स्वप्न रुजू करायची वेळ होती. अन्ह... शारीरिक नाही, रोमँटिक नि अलगद भावनिक स्वप्नकथेचं स्वप्न!
खूप बोलायचं, ऐकायचं, लिहायचं, अनुभवायचं नि हे सगळं करून कसलीच घाई न करता त्याच्या मिठीत गुडूप व्हायचं, एवढंच या आजच्या दिवसाचं सुख येणाऱ्या कित्येक निराशांना परतवणार होतं. 
आम्ही दोघे आनंदून गेलो होतो. हुरहुर मनात होतीच पण एक वेगळचं जग एका दिवसात फील करायला मिळणार होतं. म्हणजे लिव्ह-इनचं एक पाऊल आम्ही जगणार होतो. भीती नव्हती, उत्सुकता होती...
नव्या नात्याचा जिव्हाळा अजीर्ण करेल असं काहीतरी करावं, एवढाच ध्यास मनी होता. नात्यातील काही गोष्टी किरकोळ भासत असल्या तरी त्या किरकोळ थेंबात पावसासारखं मजबूत नि मनमोहक आयुष्य साकारण्याची धमक असते.
"मोहतर्मा, आईयेगा जमीन पर. ये गालिब इंतजार कर रहा हैं|" त्याचा चहा झाला होता..
मी या एवढ्या विचारांच्या गर्तेत त्याच्या अजीर्ण अस्तित्वाला लिहित गेले होते...
तर्र... तुझ्यासाठी...

दोन शब्द लिहिले, एक मोठ्ठा शब्द लिहिला. 
पण...
पण कर्ज तुझं जास्त आहे, वर काळजीचं व्याज वाढलंय. कोणत्या दोन ओळी लिहू? 
.
तुझं प्रेम लिहू की तुझा स्पर्श लिहू की तुझ्या असण्याच वर्णन करू? की लिहू तू किती हवायस मला? 
कोणत्या दोन ओळी लिहू? 
.
त्या ओळींना चंदनाची दृष्ट लावू की तुझ्या प्रेमाची साठवण टाकू? कोणत्या दोन ओळींत मावतं हे प्रेम? कपाट थोडी आहे की कप्प्यात टाकलं नि मावलं हे प्रेम !
...
त्यापेक्षा हे बघ... या डायरीवर, इतकं मुक्त सोडलंय मी त्याला. 
त्यामुळे दोन ओळी खोडून, लिहून प्रेमाच्या एका भावनेचं किती संशोधन केलंय, ते कोण्या शास्त्रज्ञाच्या बस की बात नहीं समझे खुश नसिब| 
पण... 
तरीही ज्याला शेवट नसतो असा चहा आहे तुझं प्रेम, 
ज्याची तक्रार असते असा प्रश्न आहे तुझं प्रेम! 

...

अशा दोन ओळी आहेस तू, ज्याला नेहमीच लिहून पुन्हा लिहित रहाव वाटतं! 
किंवा मग ... 
"ए किंवा मग काय? हा काय महाप्रसाद आहे?" तो मग्न ऐकत होता, पण त्याचा कुठल्याच प्रतिसाद नाही म्हणून मी चिडत म्हटलं,
एकवार चहाचा चस्का घ्यायचा उशीर त्याने माझ्या मानेवर त्याची हनुवटी ठेवत विचारलं, 
"पसारा नको, मुसाफिरला मंजिल ऐकायची आहे." तो म्हणाला
"थोडा मुश्किल हैं। ". मी उत्तरलो
"इश्क कहा आसान था? 
हम तरस रहे हैं...." त्याने प्रत्युत्तर केलं.
" सुनियेगा..." मी प्रयत्न करत म्हटलं. 
"क्यों? क्या सच में इतना खूबसूरत होता हैं दूसरा कोई?...
(याने हम...)
जो इंसान खुद के हिस्से का प्यार बिनशर्त बाट देता हैं बेझिझक |" 
....
इतकं हेट करतेस ? 
खूपच ! 
ये की अशी मग... त्याने लागलीच शब्दांसह मला मिठीत ओढलं.  हा पाऊस खट्याळ आपल्याला मिठीत पाहायला त्रस्त झाला नि तुला त्याच्यावर लिहून त्याला खुश करायचं सुचतंय, अन् तरीही त्या खट्याळला आपलं हे प्रेम मिठीत पहायचंय !
"खोटारडा शहाणाच आहेस की!" 
"चहा आणला ना, ये की मग अशी जवळी!"
गुदगुली नको ना, उघड्या अंगाला ओढ तुझ्या स्पर्शाची आहे, गुदगुल्या कसल्या करतोयस. तुम्हा आजकालच्या मुलांना प्रेमही जमत नाही. हे प्रेम कसं अलवार हवं. बागेतल्या झाडांवर फुलपाखराने भिरभिराव पण फुलाला टोचुही नाही, स्पर्श बागडावा या मोकळ्या कळीवर !
नि तोच त्याच्यातल्या प्रियकराला छेडल्यामुळे इम्रान हाश्मी जागा होत त्याने अलगद माझ्या पाठीच्या कडांना त्याच्या बोटांच्या स्पर्शाने लयीत ओघळत नेलं, पावसाचा थेंब पाडवा तसं नि शहारून मी मिठीत जावी त्याच्या इतकं अलवार नि रोमांच उभे करणार होतं.
यापुढे काही होणार नाही, असं काहीसं मनात होतं, कारण शारीरिक प्रेमाने भावनिक प्रेम दुरावलं जातं.
त्याने अलगद मला कोणत्याच नजरेने न पाहता उचलून हलकेच बाथ टबात नेलं. तोच स्पर्श नीलायम ठेवत त्याने आमच्या ठेवणीतले निकोलसचे " ए वॉक टू रिमेंबर" हे पुस्तक वाचायला सूरुवात केली. पण वाचता वाचता एका वाक्याशी अचानक तो थांबला नि म्हणाला, बघ ना...
या पुस्तकासारखा एक वॉक तर आपण घेतलाय. या पुस्तकाला वाचताना आपण एकमेकांसोबत हा वाचनाचा प्रवास तर केलाय. पण हा लेखक निकोलस स्पार्क्स पुस्तकाचा शेवट असा करतो की, "आपल्या प्रेमातला हा पायी प्रवास खडतर पण लक्षात राहणारा होता. यामुळेच मला चमत्कारांवर विश्वास बसू लागला. हा प्रेमाचा चमत्कार एवढा सुंदर असतो आणि शेवटी ती मरते."
याला काय अर्थ आहे... या वॉक मध्ये सगळचं तुटक आहे, कशालाच पूर्णत्व नाही. वॉक हा असा अर्धवट राहतो...?
तो इमोशनल होऊन त्या टबा वर डोकं टेकवून बोलतच राहिला. .
"होना, अर्धवटच राहतो."
म्हणत मी त्या टबाच्या कड्यावरून पळून जात घासरणारच तोच त्याच्या पिळदार हातांनी माझ्या कमरेच्या विळख्यात हातांचा स्पर्श गुंफवून त्याने मला सावरत जवळ घेतलं नि म्हणाला,

"पुस्तक किती प्रश्न किती उत्तरे आणि किती समजूतदार बनवतात ना माणसाला? आणि या पुस्तकांची लेखिकाच मला मिळाली...
आपला वॉक अर्धवट नाही ठेवणार मी! कधीच नाही, मी तुला उचलुन घेऊन चालेल, तू साथ देशील ना? ..."
-----




पाऊस नेहमीसारखा बरसत होता.
वातावरण काहीसं असं होतं... नोकरीच्या निर्जीव भिंती, मनाला लागलेलं बंधन, समोर कॉम्प्युटरची निगरगट्ट भिंत, शेजारी पाण्याची बॉटल अन् माझ्या डोळ्यात खिडकीच्या काचेला चिकटलेले ते थेंब... हळूच आत शिरलेली रोमँटिक हवा, झाडांच्या पानांवर धोधोधोधोधो बरसणारा तो...
याला काय अर्थये.?
त्याने मनसोक्त स्वतःच्या असण्याचा आनंद घ्यायचा आणि आम्ही ते बाटलीच्या आत बंद झालेलं पाणी तोंडात टाकून मुक्त उडण्याची सगळीच तहान भागवायची.?
नैराश्यात ते ऑफिसाच रटाळ काम करत मी ना उम्मीद बसले होते.  तोच ऑफिसात उमीद येते. ऑफिसात उमेद आहे,  आशा आहे एक विरणारी आशा.!
एक अनावधाने समोर आलेला क्षण! ज्याच्याकडे मी फक्त बघतच राहिलेले क्षणभर !
या ऑफिसच्या आझादी कोंडलेल्या माहोलात अलगद दरवाजा उघडला. एक थंड वाऱ्याचा झोका आला नि एक चमचमीत पिळदार शरीरयष्टी असलेला पुरुष केसांच्या हालचालीला दोन्ही हाताने मागे करून त्या अंगाला चिकटलेल्या टाईट सफेद शर्टाच्या बाह्या वरती सरसावत ऑफिसमध्ये शिरला... रोमँटिकपणा मी मनात दडवत त्याच्याकडे फक्त एकवार बघत मनात सगळा खेळ सुरु केला...
पांढऱ्या सदऱ्यात लपेटलेला तो ओल्या कपड्यात ओल्या मातीतलं शिल्प भासत राहिला. त्याची प्रत्येक हालचाल माझ्या मनात प्रणयक्रिडेची आशा जागवत होता. या वातावरणाला जागत हृदयाच्या आत गंटागळ्या खाणारं मन बॅकग्राऊंडला 'हम दोनो दो प्रेमी दुनिया छोड चले' म्हणत म्हणत अचानक त्याच्या सोबतीला गेले. चित्रपटात जसं सलमान खान ऐश्वर्याच्या मागे पळत विदेशात जाऊन गाणं म्हणू लागतो ना अगदी तसं!
Captured: Pooja Dheringe
या मूडमध्ये एकदम हातात हात घालून मॅरेथॉनमध्ये धावावे तसे आम्ही कात्रजच्या टोकाच्या टेकडीवर पळत पळत गेलो. एकमेकांकडे बघण्याची फुरसत काढून बघणार होते मी त्याच्या शरीरावरून ओघळणाऱ्या पावसाच्या थेंबांना पण पाऊस इतका घनदाट बरसु लागतो की मनाला बेफान होऊन त्याची बेगम होऊन भिजायचच असतं.
दोघेही अल्लड होऊन त्या टेकडीच्या रस्त्याने पाखरासांरखे बेछूट रस्ता कापू लागतो. जाताना एका पॉईंटला दोघे थकून जातो. थांबावं वाटतं, पण दूरवर एक दिवा चमकलेला दिसतो, तिथे जाईपर्यंत हाय खायची नाही म्हणून त्या टपरीवर  जायची स्पर्धाच लागते.
एका पॉईंटला तर इतकी सुंदर अत्तर शिंपडणारी बाभूळ लागते, तिचं सौंदर्य पाहून  दोघांच्या पावलांची हालचाल एकाच ठिकाणी स्तब्ध होते. तो हळूहळू पाऊल टाकत माझ्या जवळ येऊ लागतो. मी स्वतः ला त्याच्या जवळ नेत दूर जाऊ लागते.  त्या काळ्याकुट्ट बाभळीच्या काट्यांच्या खाली छपराला गळती लागावी तसे थेंब दोघांवर बरसू लागतात. दोघांची हालचाल थांबते. तो माझ्या जवळ आलेला असतो. मी आधीपासूनच त्याची झालेली असते. तो बघत राहतो. काजवेही आमच्यात सामावून गेलेले असावे, एवढी शांतता पसरते. पावसाच्या तडाख्यात मध्येच एखाद्या विजेचं येणं होतं. हिंदी चित्रपटात ती त्याच्या कवेत जाते, तसं खऱ्या आयुष्यात कुठलाच सीन होत नाही.
वीज येऊन जाते. वास्तवातील मुलगी मात्र स्वतःच्या चारित्र्यावर सफेद चादर पांघरून स्वतःलाच कोंडून घेत राहते. ती विजेला घाबरून त्याच्या मिठीत जात नाही आणि तोही शाहरुख खान होत नाही. पण हेच वास्तव धावत जातं जेव्हा वरती तो बरसत असतो,
मनात एक ना अनेक हरहुन्नरी भावना उफाळत असतात पण बाईने आधी पुरुषाच्या जवळ तरी जावं का? मनात किंतू येतो आणि पुरुषात हे क्षण सोडण्याचा संयम मात्र नसतो. तोच मी निशब्द आणि स्तब्द होते.
शेवटी त्याने मला आहे तसं जवळ घेण्याच्या अपेक्षेविरहित मीच जाते... त्या कुठला अबला नारीची पांढरी चादर दूर भिरकावून देत, त्याच्या त्या सरसावलेल्या पांढऱ्या सदऱ्याला गच्च धरत मिठीत घेऊन त्याच्या त्या वरच्या बटणाला खाडकन तोडत त्याच्या 'असण्याला' मिठीच्या आकाशात संपूर्ण घेऊन इतकं घट्ट करते की, ही रात्र या मिठीच्या आकाशात अशीच घट्ट राहावी अन् त्याचे चुंबन माझ्या कपाळाच्या क्षितिजावर दीर्घकाळ असावं ! ज्याचं कुण्या अडगळीतल्या चित्रकाराने पंचवीस वर्षानंतर जसच्या तसं काळं-निळं चित्र काढावं. लोकांनी त्या चित्रात जाऊन अनुभवावा माझ्या ऑफिसातल्या स्वप्नातल्या पांढऱ्या राजकुमाराला नि त्या शरीरयष्टीला अन् त्या रोमान्सला जसच्या तसे हुबेहूब.!  
.
पण, "रोमान्स त्याला काढता येईल?"
माझ्या या अडखळत्या स्वप्नांत मी कुठे हरवून गेले होते माझं मलाही कळलं नाही. पण त्याच्या पापण्यांचा थेंब माझ्या कपाळावर पडला तेव्हा माझी तंद्री तोडून मी त्याच्याकडे आकाशाकडे एकटक पहावे तसे पहातच राहिले. त्या नजरेत या मादक निसर्गातील अवकाशाचा स्पर्श होणं शक्य वाटलं!
त्याचा स्पर्श होऊ लागला होता. एक मादक रसायन जेव्हा स्पर्श करतो, रोमांच उभे राहतात अंगभर.
काहीच सोडावं वाटतं नाही. पण ती झोपडी आमची वाट पाहत असते.
तरीही त्याचा मादक स्पर्श माझ्या सर्वांगावर हावी होऊन गेलेला असतो. या क्षणाला समाजाचे गालबोट लावण्याआधी आम्ही दोघे एकमेकांना स्वतःच्या हबकत्या स्थितीत ठेऊन चालू लागलो.
अशावेळी स्वतःच्या श्वासांचा वावर उघड्या अंगावर होऊ लागतो. सगळ्या धमण्यांत तेवढंच काय ते जीवंत वाटत असतं.
शेवटी श्र्वासांच्या गतीत पाऊलांचा खेळ करत आम्ही झोपडी पर्यंत येतो खरे! आता मात्र समाज आजूबाजूला होता. 'मर्यादांचा बांध या मोकळ्या शेताला घातला गेला होता' या ठिकाणी मात्र आम्ही एकमेकांकडे बघून सगळ्या शारिरीक अनुभूतीच्या कल्पनांचा स्वर्ग गाठत होतो.
कल्पनेच्या दुनियेची मला खरंच मजा वाटते, हे जग जे आपलं नाही, जे जगू शकत नाही, याची किंचितही खंत मनाला भासू देत नाही.
या दुरून दिसलेल्या झोपडीत एक काजळीत सत्तरी गेलेला कंदील होता, एक सत्तरीची आजी, एक स्टोव आणि तीन पाच लोकांची गर्दी.
आम्ही दोघे पावसाने ओलेचिंब नि कुडकुडत अवघडलेल्या स्थितीत आत आलो. त्यातल्या तिन्ही मुलांनी माझ्याकडे वळून पाहिलं नि दोन मुलींनी त्याच्याकडे वळून पाहिलं आणि आम्ही दोघांनी एकमेकांकडे पाहिलं.

शरीराचं आकर्षण खरंच इतकं ऍट्रॅक्टिव्ह असतं का?
इतकं सुंदर असतं की एक महोल तयार होतो, कुठल्याही अत्तराविना एकमेकांकडे बेहकले जाण्याचा माहोल. पण आम्हाला त्या माहोलचा भाग व्हायचं नव्हतं. आम्ही एकमेकांतच पुरेसे आणि तरीही खूप जास्त प्रेम करायला उरलेले असे होतो. 
आम्ही दोन चहा मागवले. आजीने तिच्या जुन्या काळातला मटका चहा दिला. चहाची चव ही खरी, त्यात त्याचं माझ्या खांद्यावर हात टाकणं, हळूहळू झोपडी बाहेरचा चंद्र दाखवत माझ्या गालाला ओढ लावणं.
मी तर क्षणात विरघळून गेले होते. इतकं सगळं गोड्ड अन् स्वप्न सुख होतं... ते इथे संपत नाहीच, आम्ही आमच्या मनात असताना टिक म्हणत टेप ऑन होतो, अंहा ss अहहाह अन्हा अहहाहा " टीप्प टीप बरसा पानी"
उफ !
तन, मन आणि संपूर्ण जगच प्रेमाच्या धुंदीत बुडालेलं होतं आणि त्याचं जवळ असणं? हे कुठल्याच उपमेच्या बंधनात अडकतच नव्हतं. त्याचा सहवास बस! याहून सुख नव्हतं .
ते गाणं लागलं त्याने माझ्याकडे, मी त्याच्याकडे अन त्या पाच जणांनी आम्हा दोघांकडे पाहिलं. कारण नकळत आम्ही एकमेकांच्या इतक्या जवळ आलो होतो की, एकमेकांचे ओठ एकत्र होण्याचा उशीर होता. ते अधीर होऊन आमच्याकडे पाहू लागले होते.
तितक्यात,
"असाइन्मेंट झालेली दिसतेय ?" जवळून आवाज आला.
आं? मी गोंधळून जागी झाले...
ओह ओह ओह गॉड. कसे हे भारतीय लोक्स यार. ! मोक्याच्या क्षणी सुख गेलं... हे ऑफिसवाले प्रेमही करू देत नाही यार....
मग काय,
त्याबाहेरच्या 'टीप टीप बरसा 'ला  खिडकीच्या कांचांत रंगवून, तीच काच पुन्हा पुसून टाकून मी त्या निगरगट्ट स्क्रीनकडे लक्ष देत त्या कल्पनेच्या विश्वाला उद्गारवाचक चिन्ह लावून झोपडीच्या काळया बाकावर ठेऊन आले.
अशी कल्पनेतली प्रेमं खरे किती खुशनसीब होऊन हवं तसं जगून घेता, नाही.?
ऑफिसवाल्यांचाही एक अलगच रोमान्स असतो, मनातल्या मनात शिजणारा आल्हाददायी गुपचूप क्षण असतो !...


भारतातील मासिक पाळीचे एकंदरीत स्वरूप समजल्यानंतर हीच परिस्थिती आंतरराष्ट्रीय पातळीवर कशी असेल, या विषयाचा टॅबू, व्याप्ती आणि दृष्टिकोन कसा असेल हे समजून घेणे औत्सुक्याचे होते. पुढारलेले देश म्हणजे पुढारलेली मुक्त मानसिकता का? हे प्रश्नचिन्ह डोक्यात होतं. तोच याचा अभ्यास सुरू केला...
जगात आणि आश्चर्य वाटेल पण भारतातही काही चांगल्या प्रथा आहेत, ज्यात मुलींची पहिली मासिक पाळी साजरी केली जाते. या शोधानंतर काही देशांतील मासिक पाळी संबंधित प्रथांबाबत समजले ते खालीलप्रमाणे;

१. दक्षिण भारत : 
आपल्या भारत देशात भलेही पाळी विषयी अनेक गैरसमज आणि मान्यता असल्या तरी देखील, दक्षिण भारतात ह्यासंबंधी एक चांगली परंपरा बघायला मिळते. ज्यानुसार जेव्हा मुलीला पहिली पाळी येते तेव्हा तिची पूजा केली जाते.

२. फिलिपिन्स : 
फिलिपिन्समध्ये जेव्हा कुठल्या मुलीला पहिल्यांदा पाळी येते तेव्हा तिची आई तिची पाळीची पॅण्टी स्वतः धुते आणि त्यानंतर त्या पॅण्टीला मुलीच्या चेहऱ्यावर लावल्या जाते. ह्यामागे त्यांची अशी मान्यता आहे की, ह्यामुळे मुलीच्या चेहऱ्यावर मुरूम येत नाही. तसेच मुलीला तीन पायऱ्यांवरून उडी देखील मारावी लागते. ह्याचा अर्थ असा की तिला तीन दिवसांची पाळी राहील.
३. आईसलंड :
आईसलंड येथे मुलीला तिच्या पहिल्या पाळीवेळी रेड केक खायला मिळतो. हा केक लाल आणि पांढरा असतो, जो तिची आई बनवते.

४. जपान : 
जपान येथे मुलीच्या पहिल्या पाळीवेळी तिची आई ‘Sekihan’ नावाचा एक पारंपारिक पदार्थ बनवते. ह्या पदार्थात तांदूळ आणि बिन्स असतात. ह्यावेळी संपूर्ण कुटुंब ह्या पदार्थाचा आस्वाद घेतात आणि मुलीची पहिली पाळी साजरी करतात.

५. ब्राझील :
ब्राजीलमध्ये तर ही एक ब्रेकिंग न्यूज असते. नातेवाईकांमध्ये ह्याची घोषणा केली जाते आणि ही बातमी साजरी केली जाते.

६. इटली :
इटली येथे पहिल्या पाळी नंतर मुलीला ‘Signorina’ (miss/young lady) असे म्हणून संबोधले जाते. येथे देखील सर्वांना ही बातमी सांगितली जाते. एवढच नाही तर लोकं मुलीचे अभिनंदन करण्यासाठी देखील येतात.

७. दक्षिण अफ्रीका :
दक्षिण आफ्रिका येथे मुलीला तिच्या पहिल्या पाळी वेळी एक ग्रँड पार्टी दिली जाते. त्यांना अनेक भेटवस्तू दिल्या जातात. पण पाळी दरम्यान त्यांना तीन दिवस घरातून बाहेर जाण्यास मनाई असते तसेच त्यांना पुरुष आणि लहान मुलांपासून देखील दूर राहण्यास सांगितले जाते.


८. इस्त्राइल : 
इस्त्राइल येथे मुलीला पहिल्या पाळीच्या वेळी मध खाऊ घातला जातो. ह्यामागे अशी मान्यता आहे की ह्यामुळे तिला तिच्या पुढील मासिक पाळीत त्रास होणार नाही.


९. कॅनडा : 
कॅनडा येथे मुलींच्या पहिल्या पाळी संबंधी एक विचित्र प्रथा आहे. येथे पहिली पाळी आल्यावर ती मुलगी एक वर्षांपर्यंत बेरी खाऊ शकत नाही. एक वर्षानंतर तिला जेवढ्या वाटेल तेवढ्या बेरी ती खाऊ शकते.

१०. तुर्की : 
तुर्की येथे देखील पहिल्या पाळी संबंधी एक विचित्र प्रथा पाळली जाते. येथे मुलीला पहिली पाळी आल्यावर तिच्या कानशिलात लगावली जाते.

११ आसाम: 
आसामच्या कामाख्या देवीचं मंदिर एक शक्तिपीठ म्हणून पाहिलं जातं. हे मंदिर गुवाहाटी इथे आहे. कामाख्या देवीला "Menstruation Goddess" असा दर्जा दिला आहे - म्हणजे 'मासिक पाळीची देवी'. एकीकडे शक्तिपीठ म्हणून कामाख्या देवीची पूजा केली जाते तर दुसरीकडे मासिक पाळीबद्दल असणाऱ्या अंधश्रद्धांना वाव दिला जातो.

१२. नेपाळ :
नेपाळच्या खासकरून पश्चिम भागामध्ये आजही मासिक पाळीच्या चार दिवसांत स्त्रियांना घराबाहेर, गावाबाहेर एका छोटय़ा खोलीत, ज्याला ‘छोपाडी’ म्हणतात, तिथे जाऊन राहावे लागते. काही जणींना गोठय़ात त्यांचे ‘ते चार’ दिवस काढावे लागतात, तर काही जणी त्यांच्या घराच्या खालच्या अंधाऱ्या जागेत चार दिवस राहतात, असं सांगितलं जातं.

मासिक पाळी या गोष्टीकडे आपण कधी उघड्या आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलंच नाही. भारतातच नव्हे तर जगातील अशा बऱ्याच देशांमध्ये मासिक पाळीबद्दल आजही निष्ठुर, निर्दयी अंधश्रद्धा पाळल्या जातात.


जगभर 'अशीच' मासिक पाळी !

by on जुलै २२, २०१९
भारतातील मासिक पाळीचे एकंदरीत स्वरूप समजल्यानंतर हीच परिस्थिती आंतरराष्ट्रीय पातळीवर कशी असेल, या विषयाचा टॅबू, व्याप्ती आणि दृष्टिकोन ...