2019 - Sufi

हे बाप्पा... 

मनुष्याची शांतता तू...

आर्त भावनांचा अंत तू!

वेध अंतरीच्या वादळांचा,
दाता तू आत्म्यातील स्तब्धतेचा...

तूच भटकलेल्यांचा आधार तू!
माणसाला आकार दिलास तू,
त्यातून तुझ्यासारखाच 'माणूस नावी देव' जन्माला घातलास तू!

पण बघता बघता हा देव स्पर्धेतही उतरवलास तू...
नि बघता बघता मनुष्याच्या मायारुपी दुनियेने जन्म घेतला...

आज माणूस तुला मूर्तीत आकारतो,
स्वआत्म्यातील शाबूत कल्पनांना साकारतो...
कल्पनेतली आत्म्याच्या परिसाला मूर्त स्वरूपी ललकारतो.

हे बाप्पा,
शिल्पाचा तू घडवताना,
गुरु तुझ्यातला पुनः माणसाला, 'देव' घडवू लागतो...
तो कलाकारही मातीपासून देवच घडवू लागतो...

त्याचा तुला घडवण्याचा प्रवास नि तुझा माणसाला देव घडवण्याचा प्रवास, तुझ्या आगमनाने घरात येतो ...

विघ्नकर्त्यापासून विघ्ननाशक तू त्याला बनवत जातो...

घडवणाऱ्या जिवंत हातातून तू स्वतःला घरात नि घरापासून प्रत्येकाच्या टाळ्यापर्यंत नि त्या प्रत्येक टाळीतून त्यांच्या मुखापर्यंत नि मुखातून त्यांच्या आत्म्यापर्यंत जाऊन हक्काने विराजमान होतो नि पुन्हा थाटात भक्तांकडून म्हणवून घेतोस,
दरवर्षी घडवून मला, तू स्वतःतल्या माणसाला देव बनवतो...
त्यासाठीच,
माझ्यातल्या देवाला देव म्हणवू दे, तुझ्यातल्या माणसाला देव बनवू दे!
यावर्षी आणलस मला, पुढच्या वर्षीही लवकर येऊ दे!




हे बाप्पा ...!

by on सप्टेंबर ०१, २०१९
हे बाप्पा...  मनुष्याची शांतता तू... आर्त भावनांचा अंत तू! वेध अंतरीच्या वादळांचा, दाता तू आत्म्यातील स्तब्धतेचा... तूच भ...


आताच्या घडीला आमच्या पिढीतली प्रत्येक मुलगा/ मुलगी कशाच्या तरी शोधात आहे. ते शांत दिसले तरी ते शांत राहत नाही, ते रस्त्याने जात असतील तरी शांत राहत नाही, मुली जवळ बसले तरी शांत राहत नाही, ते शांत बसूनही शांत राहत नाही, ते एकटक पाहत असूनही शांत राहत नाही...
ते प्रत्येकवेळी कशाच्यातरी शोधात असतात... हा शोध कधीतरी डोक्याच्या अडगळीत पडलेल्या एक एक एक एक विचारांचा असतो तर कधी एकदाचा डोकं दुकानासारख बंद करणारा असतो... 

त्यांना मुलीला डेट वर न्यायचं, त्यांना कामही करायचं पण त्यांच्यावर घराची जबाबदारीही असते. हे सगळचं आधीही होतं पण तरी आता त्याला रूटीन मध्ये रमून चालत नाही. त्याला त्याचा बार शोधावा लागतो, त्याला रोज सोशली काहीतरी द्यावं लागतं. ऑडिएन्स वाढलाय त्याच्यासाठी त्याला रोज बलिदान द्यावे लागतं. सोशल मीडिया आलं तशा संधी आल्या तशी सगळ्यांची लागली. सतत डोक्यात हे करायचं ते करायचं, त्याच्यापेक्षा वेगळं कसं याच्यापेक्षा वेगळं कसं ... मग ओरिजनल कसं डूपलिकेट कसं ? ...
एवढं होऊनही सतत स्क्रीनच्या भिंतीवर तो सतत कशाच्या तरी शोधात असतो.

लोक त्याच्या प्रेमाला नावं ठेवतात, लोक तो आई वडिलांचा अनादर करतो त्याला नावं ठेवतात, लोक तो युट्यूबर, फोटोग्राफर आहे म्हणूनही नावं ठेवतात. या लोकांच्या नावांनी तो बेनाम होऊन भरकटत जातो.
त्याला फरक पडतो, नि पुन्हा मोकळ्या रस्त्यांवर शोधू लागतो तो काहीतरी... कशाच्यातरी शोधात तो सतत असतो...

रात्री शांत झोपणारी भारतीय संस्कृती आता मुलं चार चार पर्यंत जागता म्हणून फक्त ओरडते, कधीतरी त्या रात्रभर बसून एडिट केलेल्या व्हिडिओ पिसला बघावं ही स्पर्धा पॅशन ची जन्माला आली आहे ...
ही शांतता हवीय सगळ्यांना, अगदी नोकरी करणाऱ्यापासून बेरोजगारांना... सगळ्यांना गच्चीवर झोपून आकाशातल्या चांदण्या मोजायच्या पण आता गच्चीवर चार्जर नाही म्हणून तेही बलिदान करायला तयार झालो आम्ही, तरीही सूर्य उगवण्यापर्यंत सतत शोधात असतो कशाच्या तरी....

शेवटी तुझे घरचेच आहे, तुझ्यासाठी चांगलंच बघतील, म्हणणाऱ्यांना कसे सांगायचे, आता घटस्फोट फक्त मुलीच्या आडमुठेपणामुळे किंवा मुलाच्या दारू पिण्यामुळे न होता ऑनलाईन डेटिंग, ऑफिस सेक्रेटरी,  डिलीव्हरी बॉयमुळेही होतात. त्यामुळे खऱ्या प्रेमाच्या शोधात ते कधीच नसतात..  पण तरीही ते कशाच्या तरी शोधात सतत असतात.

एका क्लिकने आयुष्य बदलतं, एका क्लिक ने वाट लागते... भीती नेहमी याचीच असते त्यासाठी कायम डिप्रेस्ड राहून सतर्क राहावं लागतं. भावनिक राहून इथे भागत नाही, अभ्यासात मंद चालेल तंत्रज्ञानात अडून चालत नाही.
त्यामुळे डोकं त्यांचं आधीच्या पिढीत ठेवण्यापेक्षा त्यांना नवे मजबूत नि या पिढीत टिकून ठेवतील असे पंख बनवायला मदत करा नि मग खुशाल म्हणा, "मोठे झाले नि पंख फुटले यांना ...."
त्यांचा शोध चालूच राहील सतत अगणित, कारण त्यांचं विद्यार्थी होणं अखंड लांबलय. आधीसारखं थांबून घरचे सांभाळत नाहीत, आता ज्याचं त्याचं ज्याच्या त्याला उडावं लागतंय, त्यासाठी शोध हा कायम ठेवावाच लागतो, आयुष्यभर विद्यार्थी बनावच लागतं, जगाच्या भरकटलेल्या स्पर्धेत पडून स्वतःला शोधून जिंकावच लागतं .... शोध हा अखंड चालू राहील... 

- पूजा ढेरिंगे

सतत कशाच्यातरी शोधात आहे!

by on ऑगस्ट २८, २०१९
आताच्या घडीला आमच्या पिढीतली प्रत्येक मुलगा/ मुलगी कशाच्या तरी शोधात आहे. ते शांत दिसले तरी ते शांत राहत नाही, ते रस्त्याने जात असतील ...

खरंच एखाद्या वेळी एखाद्या व्यक्तीच्या खूप जवळ असणं, किती तोट्याच असतं. तो येऊन केवळ त्याचं दुःख शेअर करतो.
त्याचा वेळ मात्र तो इतरांना देतो. त्या इतरांना दिलेल्या वेळेतील दुःख, वेदना आणि उणेधुणे वाटण्यासाठीही पुन्हा आपण जवळचे बनतो. कधीतरी त्याचा वेळ मिळावा यासाठी त्रयस्थ बनाव वाटतं. एखादा अनोळखी सहकारी?

कारण सततच्या त्याच भूमिकेत राहून बोथट होण्यापेक्षा सुखातला तो बघता, अनुभवता यावा, ही मनोमनी दुःखद वेदना सलते कधीतरी हळूच. पण त्याला आपण नेहमीचे झालेले असतो आणि त्याच्या दुःखाच्या भावनांना आपली सवय ! एवढीच काय ती घट्ट मिठी हळूहळू उरते, कुरवाळली जाते, दुःखाची मिठी...! 

बघताना प्रियकर प्रेयसीचे नाते सुंदर वाटते. पण प्रत्यक्ष ते एकमेकांचे आधार बनतात, सोबती बनण्याची चूक ते करत जातात. प्रेमाच्या सुरुवातीला साथी बनण्याची स्वप्न मिळून पाहतात. स्वप्न साकार करू लागतात, एक-एक म्हणत आपापल्या करियरमध्ये उंची गाठतात, पण कधीतरी चुकून दोघे सोबत सायंकाळी नोकरीवरून लवकर घरी परतताना आवडणारा रोमँटिक पाऊस आता बालिश वाटू लागतो... लॅपटॉप भिजतो म्हणून त्या पावसात भिजण्याचा स्वांत आनंद त्या ढगात रिव्हर्स जातो. ओलावा निघून जाऊन त्याची ओल उरते केवळ!

शेवटी हळूहळू नोकरीच्या आधीन होऊन नातं सुटत जातं. पण नातं तुटत नाही. प्रेम संपलेल नसतंच कधी, ना ते संपाव अशी मनी भावना येते. यात मात्र कधीतरी त्याचं प्रेम उफाळुन येतं तेव्हा ती कामात व्यग्र असते, तर कधीतरी तिचं प्रेम उफाळुन येतं तेव्हा तो मग्न असतो. प्रेमाच्या प्रोपोजच्या क्षणी आयुष्यात एकदाच आणि शेवटचं प्रियकर प्रेयसी या दोघांना एकावेळी प्रेम होतं. त्यानंतर एकदा एकाला तर दुसऱ्यांदा दुसऱ्याला. त्यामुळे कधीतरी दोघांचा एकमेकांना वेळ मिळावा, यासाठी त्रयस्थ बनाव वाटतं.

नोकरी करणाऱ्या व्यक्तीचे ' जवळचे ' होण्यापेक्षा त्याचे सहकारी व्हावं वाटतं. "सहकाऱ्यांसाठी नाते फेक असते, प्रेम करणाऱ्यासाठी नाही" हा आनंद प्रेम करणाऱ्याने आतून कितीदा वाटून घ्यावा?. सगळ्याच गोष्टींची उकल त्याच्याकडे येऊन केली जाते पण त्यात सगळचं रुक्ष आणि कोरडे असते.  प्रेम करणाऱ्याला त्याचा आनंद, त्याचं समाधान आणि शांत तो कधीच अनुभवता येत नाही.
चंद्राचं नेहमी आकाश होण्यापेक्षा चांदणी व्हावं वाटतं!
मंदिरातला देव होण्यापेक्षा एक भक्त व्हावं वाटतं... !
मंदिराला भक्तांची आस असते, देव रोजचाच झालेला असतो. ! त्यामुळे कधीतरी फक्त कधीतरी
सोबत्याचा आधार होण्यापेक्षा सोबतीन व्हावं वाटतं! 

- पूजा ढेरिंगे
इमेज सोर्स: इंटरनेट

दुःखाची मिठी!

by on ऑगस्ट २४, २०१९
खरंच एखाद्या वेळी एखाद्या व्यक्तीच्या खूप जवळ असणं, किती तोट्याच असतं. तो येऊन केवळ त्याचं दुःख शेअर करतो. त्याचा वेळ मात्र तो इतरांना ...

४४८ करोडात मंगळावर गेलेल्या यानाच्या एका चित्रपटाने आज बॉक्स ऑफिसवर ९२ करोडाच्या घरात धंदा केला. मंगळ यानावेळी चित्रपट आला असता तर सरकारला तेवढाच हातभार लागला असता.
आणि अक्षयने तेवढी मदत केलीच असती नाही?
तर्र...
मिशन मंगल यासाठी पहावा...
आजपर्यंत जे विज्ञानात शिकवले ते बाऊन्स गेलंच होते. परंतु यापुढे चंद्रयानसारखे प्रयोग जेव्हा देशात घडतील, तेव्हा बातम्या ऐकून त्यामागचं रसायन, त्याची मूलभूत रचना तुम्हाला माहिती असेल. अंदाज येईल की, एका सॅटेलाईटमध्ये कितीतरी रॅकेट बसविले जातात, पण त्याकरिता डिझायनिंग, प्लॅनिंग, व्यवस्थापन, बॅटरी, ऑटोमॅटिक सुईंग कपडा/ इतर घटक, छोट्या जागेत सगळे तंत्रज्ञान बसविणे, कॅमेराचा वापर, इंधन आणि मुख्यत्वे वातावरण या सगळ्याचे काय महत्व असते. चित्रपटापूर्वी याची मला खरंच कल्पना नव्हती. हे जरी गुगल बाबाकडे उपलब्ध असले तरी ते वाचण्यापेक्षा मनोरंजनाचा टच असलेल्या सिनेमाकडून ते कळत असेल तर ते जाणून घेण्यात साहजिक उत्सुकता वाटते. शिवाय प्रत्येक दृष्यानंतर वेगवेगळे भाव अनुभवायला मिळतात. आणि शेवटच्या दृष्य्यात संपूर्ण थिएटरात सन्नाटा, जॉ ओपनिंग मुमेंट आणि गर्व अनुभवायला मिळतो. ते वेगळंच!
का पाहू नये?
देशभक्ती जागृत झाली म्हणून जाऊ नका. शेवटी चौकीदारच्या आवाजातल्या चार ओळी ऐकायला लागतात आणि दुर्दैवाने मिशन मंगलचे क्रेडिट त्यांनी घेतले होते, तो क्षण आठवतो. बाकी, अक्षय कुमारच्या मोदिमय असण्याला बाजूला ठेऊन हा चित्रपट पाहताना अक्षय खरंच हँडसम वाटतो...

चित्रपटाबद्दल :
सेमी बायोग्राफिकल सायफाय फिल्म असलेला मिशन मंगल सिनेमा विद्या बालन, सोनाक्षी सिन्हा, तापसी पन्नू, निथ्या मेनेन, कृति कुल्हारी, शर्मन जोशी, हरिहर दत्तात्रेय आणि अक्षय कुमार या सगळ्यांचा. 
पण हे मिशन मिसाल झाले ते राकेश धवन, तारा शिंदे, एका गांधी, कृतिका अग्रवाल, वर्षां गावडा, नेहा सिद्दीकी, परमेश्वर नायडू, अनंत आयर आदी वैज्ञानिकांमुळे.

पात्र:
‌वर्षा पिल्लाई (निथ्या मेनेन) :  जी टीममधील इतर शास्त्रज्ञांपैकी जाडी असते, त्यावर फॉर्म बघताना विद्या अक्षयला म्हणते कुछ जादा मोटी नहीं? आणि त्यालाच जोडून ती हळूच म्हणते, "ये बोलने का मुझे हक नहीं | "
हे संभाषण तेव्हा प्रभावी वाटते जेव्हा आपल्याला आठवते की, काही दिवसांपूर्वी विद्यालाही बॉडी शेमिंगमुळे ट्रेण्ड केले जाते. त्यामुळे या वाक्यात इमोशन जाणवून त्यावर तिने सफाईदारपणे तिची बाजू मांडल्यासारखे भासते.
याशिवाय, पिल्लाई यांची सासू नातू व्हावा म्हणून खडूस झालेली असते... ही एक युनिक शास्त्रज्ञ असते जी गर्भवती होऊन मंगळ प्रोजेक्टसाठी काम करण्यास सुरुवात करते. 

‌दुसरी असते कृत्तिका अगरवाल (तापसी पन्नू) : लेफ्टनंट असलेल्या नवर्याला फिल्डवर दुखापत झाल्यामुळे चिंतेत येऊन ती या प्रोजेक्ट मधून माघार घेते. पण नवरा देशभक्त म्हणून तिचं या मिशनचा भाग होणे सहज शक्य होते. 

‌नेहा सिद्दीकी (कृति कुल्हारी):  जी मुस्लिम दाखवली असून तिच्या नवर्याचे बाहेर अनैतिक संबंध असल्यामुळे ती हॉस्टेलवर राहू लागते. परंतु एकटीसाठी घर शोधताना तिच्या जातीमुळे तिला कोणीच घर द्यायला तयार नसते. 

‌एका गांधी (सोनाक्षी सिन्हा): जी अनाथ असते पण इस्त्रोकडून तीन वर्षाचा अनुभव घेऊन तिला अमेरिकन नासा मध्ये जाण्याची इच्छा असते.  

‌परमेश्वर (शर्मन जोशी) : हा आजही ३ इडिएट्समधीलच राजू आहे.  त्याच्याशिवाय हा रोल कुणाचाच नव्हता. 

अनंत अय्यर (हरिहर दत्तात्रेय): हा व्यक्ती वयाच्या मानाने अधिकच भाव खाऊन गेला. कमी वेळ आहे पण जास्त आहे तेही. 

आणि शेवटी उरते ती तारा शिंदे (विद्या) प्रोजेक्ट डायरेक्टर आणि ती उरतेच! मनात आणि शरीराच्या नसानसांत तिचं चैतन्य स्फुरते आणि वाटते, गृहिणी म्हणजे कमीपणा नाही. बॅक ऑफ द माईंड स्वप्न सतत चालू असावं. त्यामुळे इस्रोची स्त्री असो वा कुठलीही तिचं घर तिचीच जबाबदारी असते.  

या पाच स्त्रिया, तीन पुरुष आणि १७ हजार शास्त्रज्ञांच्या मिशनला मॉम हे नाव दिलं जाते... 

फिल्म अप्रिसिएशन : 
कॉमेडी, वास्तविकता, संगीत, कथा लेखन, स्क्रिन प्ले, पात्र, एकसंगती आणि या सगळ्यांची जुळून आलेली ही साखळी खऱ्या अर्थाने पॅकेज आहे. 
पण चित्रपटाची नेमकी सुरुवात कुठून करायची हे किती मोठं आव्हान असेल, नाही?. कारण विषय तितका शास्त्रीय आहे. लोकांना समजावा असा विचार करून संहिता लेखन ( स्क्रिप्ट रायटींग) करणं म्हणजे लोकांच्या मानसिकतेचा अभ्यास करणं आहे. पण मंगळवर जाणाऱ्या टीमची खासियत होती की, "होम सायन्सने मंगळावर जाणे शक्य आहे. होम सायन्सने रॉकेट सायन्स शक्य... !" या समिकारणाला समोर ठेवत प्रत्येक चलचित्र जोडले गेले आहे.
त्यामुळे सुरुवात होते विद्याच्या वैयक्तिक आणि संसारी  आयुष्यापासून ... या पहिल्या सिनमध्ये तिचा नवरा पूर्वग्रहदूषित दाखवला असून तो घरातील सगळ्या गोष्टीवर नियंत्रित ठेवण्याचा दिखावा कम प्रयत्न करतो. एक मुलगा आहे, ज्याला ए आर रेहमानसारखा सुफी संगीतकार व्हायचे म्हणून तो मुस्लिम धर्माला फॉलो करू लागतो. कारण त्याला वाटते मुस्लिम धर्मांतर केले तर आपण सहज ए आर रेहमान बनू शकतो, एक सासरे आहे ज्यांना सुनेच्या कामाची कदर आहे आणि एक मुलगी आहे जी पाश्चात्य संस्कृती फॉलो करणारी आहे. या सगळ्यांची मॉम आहे तारा शिंदे. पण, या शास्त्रज्ञाची खासियत आहे, तिची कशाबद्दल तक्रार नाही. कारण तिचे स्वप्न तिचा फोकस आहे. पण म्हणून चूल आणि मूल या ओझ्याखाली न राहताही घरातील सगळी कामे आवरून इस्रोला जाते.
विचार येतोच मनात, हे शक्य आहे का ?

आणि सुरुवात होते चित्रपटाला... 

चांद्रयान सॅटेलाईट अवकाशात सोडणाऱ्या दृष्यापासून. पण हे मिशन अयशस्वी ठरते, याचे नेतृत्व राकेश धवन (अक्षय कुमार) करत असतात. मिशन अयशस्वी होण्यामध्ये काही अंशी विद्या बालनने केलेली चूक कारणीभूत ठरते. कारण सॅटेलाईट अयशस्वी होण्याच्या कारणांपैकी 'हवामान' हे एक कारण असते, ते त्यावेळी समजत जाते. त्याशिवाय एक अयशस्वी सॅटेलाईट किती नुकसान करते, तसेच मिशनवर काम करणाऱ्या शास्त्रज्ञांसाठी अशी परिस्थिती म्हणजे 'जगा किंवा मरा' अशी असते... हे पहिल्या सिनमध्ये जाणवू लागते.
हळूहळू मन विद्या बालन होऊन चित्रपट पाहू लागतं.
पहिल्या अयशस्वी सॅटेलाईट लॉन्चिंगनंतर इस्रोब्रांच भारतातून नासामध्ये गेलेल्या व्यक्तीला दलीप ताहीलला पुढील मिशनसाठी बोलावते. तेव्हा आपलीच लोकं ज्याप्रमाणे नासासमोर इस्रोची तुलना करतात, ते मनाला दुःख देणारे ठरते. 

परंतु अयशस्वी मिशनमुळे धवन यांना कुचकामी मिशन मंगळवर पाठविण्यात येते. या अपयशामुळे इस्रोचे प्रमुख जेव्हा अविश्वास दाखवता तेव्हा धवन म्हणतो, संशोधक आहे, म्हणून काहीतरी शोधायचं म्हणत "आजपर्यंत कुठलाच छंद नाही ना नाती जपली मी. आता अचानक अस झाल्यानंतर लग्न करू का? " ही उपरोधिक ओळ विचार करायला भाग पाडते.

अपयशामुळे राकेश धवन निराश झालेला असतो. ताराही तिच्या संसारात लक्ष देऊ लागते. पण तिला तिच्या चुकीची कायम रुखरुख लागून राहते. त्यामुळे एकदा घरात गॅस संपल्यानंतर तापलेल्या कढईत बंद गॅस करून सगळ्या पुऱ्या तळल्या जातात, तेव्हा अचानक तिच्या डोक्यात कल्पना येते. हे शक्य आहे मिशन मंगलच्या बाबतीत. !
आणि ती वेड्यासारखी सुट्टीच्या दिवशी धावत पळत  धवनकडे जाते आणि अशक्यप्राय ते होम सायन्सने शक्य करून सांगते. 

तेव्हा धवन तिच्या प्रयोगावर हसतो, कारण यान पाठविणे पुऱ्या तळण्याईतके सोपे नाही, अशा कल्पनेवर सुरू झालेला हा विचार आता मात्र धवनसह इस्रोचे प्रमुख ही गांभीर्याने घेऊ लागतात. तेव्हा धवन म्हणतो, "प्रत्येक शास्त्रीय यश हा पहिले विनोदच असतो."
प्रेक्षक संपूर्ण शास्त्रमय होऊन जातो.
अकरा महिन्यांचा कालावधी देऊन आणि आठशे करोडचे बजेट देऊन हे मिशन पूर्ण करण्याची परवानगी त्यांना मिळते. एवढ्या कमी बजेटमध्ये हे अशक्य असते. परंतु तरीही काम सुरू केले जाते. नासाच्या माणसाला मिशन मंगल या मिशनसाठी वैज्ञानिक टीम निवडण्याची जबाबदारी दिली जाते. तो काळजीपूर्वक अनुभव नसलेली टीम मिशनसाठी निवडतो.
टीमही सुरुवातीला धवन आणि ताराला वेड्यात काढू लागते. सतत अशक्यचं तुणतुणं वाजवू लागते.
कारण मंगल मिशन तारासाठी स्वप्न, पण इतरांसाठी नोकरी असते. त्यामुळे सुरुवातीला काम नीट होत नाही. लोकांप्रमाणे या शास्त्रज्ञांनाही नोकरीसारखे हे काम करून संपवायचं असतं. 
शिवाय मंगळावर जाण्यासाठी अमेरिका ४ वेळा आणि रशिया ८ वेळा अयशस्वी ठरलेली असते..त्यामुळे अमेरिकेला नाही जमलं ते आपल्याला जमणार? हा अविश्वास सोबतीला असतो. आणि चंद्रावर जाणे सोप्पे आहे कारण चंद्र पृथ्वीचा उपग्रह पण मंगळवर जायला गुरुत्वाकर्षण शक्ती पार करावे लागते. 
या सगळ्याची कल्पना या टीममधील प्रत्येकाला असते. त्यातच त्यांच्यासाठी दह्यात साखर म्हणून, शासनाकडून पैसे मिळण्यास नकार मिळतो, त्यामुळे चंद्रयान २ कडे लक्ष दिले जाते.  त्यामुळे सगळे खोटे सांत्वन देऊन राजीनामा देतात.
तारा आणि राकेश हे स्वप्न सोडण्याच्या मार्गावर असतात. पण तेव्हा ताराच्या डोक्यात सुपीक कल्पना येते, धवन ही कल्पना इस्रो प्रमुखांना कळवतो, डॉ. अब्दुल कलाम यांच्या आदर्शाने सगळ्यांना कन्व्हेयन्स करतो. शेवटी साडेचारशे करोडमध्ये हे मिशन करायला इस्त्रोवाले परवानगी देतात. (मिशन पूर्ण होण्यासाठी ४४८ करोड लागतात. त्यामुळे मंगळ यान टीम प्रत्यक्षात दोन करोड सरकारला प्रामाणिकपणे रिटर्न करते.)
आणि सगळे खाच खळगे दूर करत मिशनला सुरुवात होते. मग 'हे अशक्य आहे' पासून सुरू झालेलं मिशन 'कॉपी दॅट' पर्यंत पोहोचते... 
या मिशनमध्ये सहभागी झालेला रादर कुठलाही शास्त्रज्ञ डोक्याच्या प्रत्येक भागातील प्रत्येक कल्पनेला कोणत्या प्रकारे अनुभवतो हे पाहण्यासारख आहे. या सगळ्यामध्ये विद्याचा आत्मविश्वास आणि ऊर्जा... वाह... टाळ्या वाजवत इतक्या... आणि अक्षरशः थिएटरमध्ये खरंच तीन सिन्सच्यावेळी टाळ्या वाजवल्या जातात.

शेवटचा सिन :
प्रत्येक प्रयत्न आणि प्रत्येकाच्या मेहनतीनंतर जेव्हा ते तयार होतं तेव्हा किती भीती पण किती गर्व वाटतो मनात. 
आणि तिन्ही गाण्याचे कौतुक करावे ते कमीच. प्रत्येक गाणं हे त्या मिशनला पूर्ण होण्याची फिलिंग देणारे आहे.
एवढे असूनही शेवटच्या क्षणी मात्र पावसामुळे आणि प्रतिकूल वातावरणामुळे मिशन पुढे ढकलले जाते. बॅक अप प्लॅन म्हणून पाच दिवसांचा कालावधी हातात असतो. तेवढ्या वेळात वातावरण स्वच्छ होणे आवश्यक असते. त्यामुळे पहिल्या दिवशी कामातून विश्रांती म्हणून पार्टी होते, सगळे रिलॅक्स होतात. पण लगातार पाचही दिवस पाऊस थांबत नाही..
५ नोव्हेंबर शेवटची संधी असते पण तेव्हाही पाऊस थांबलेला नसतो. सायंकाळच्या वेळी मिशन अबॉर्ट म्हणत सगळे माघारी जातात. कारण त्या दिवशी झाले नाही तर पुढचे कितीतरी वर्ष वातावरणामुळे शक्य होणार नसते. त्यामुळे ही शेवटची संधी असते, पण निसर्ग अडून असतो. धवन निराश होऊन परतू लागतो तोच, शेवटच्या क्षणी सगळे आकाश साफ होऊन सूर्य उगवतो. श्र्वासाचा विलंब न करता तो मिशन पुन्हा सुरू करतो... सगळ्या लेडीज तिथेच असतात. आणि
"गो सर, गो सर, गो सर... अँड येय... फायनली..."
२४ सप्टेंबर २०१४ ला योग्य वातावरण आणि योग्य वेळी यान मंगळावर पाठवले जाते.
सगळीकडून आनंद, शुभेच्छा, अशक्य ते शक्य अशी खूप स्तुतीसुमने उधळली जातात.
पण...
पण...
एका पॉईंटला यान रेडिकल्सला धडकल्यामुळे गुरुत्वाकर्षण शक्ती पार करून मंगळाच्या कक्षेत गेले की नाही हे दिसनेच अशक्यप्राय होते.
मनात हुरहुर, उत्कंठा... शिवाय मनात एकदाही येत नाही की, हे मिशन तर यशस्वी झालंय माहिती ना आपल्याला तरी कशाला हुरहुर लावून घ्यायची. कारण चित्रपटाची आणि स्क्रीन प्लेची ताकद इथे कामी येते. स्क्रिन वरून नजर हटत नाही...
अँड दॅट हिरॉईक ममेंट !
एखाद्या साऊथ इंडियन चित्रपटमध्ये दाखवतात तसे
सॅटलाईट स्लो मोशन मध्ये एंट्री करते. आणि थिएटर चा माहोल पाहण्यासारखा असतो.
सगळ्यांचे आवंढे आणि मनातील धाकधूक शांत होते. आणि हळूहळू टाळ्यांचा आवाज येतो ...
काबिल हैं भारत तू! इतकं सुंदर वाटून जातं सगळचं.
फक्त शेवटी मोदींच्या आवाजातली ऑडीओ क्लिप दाखवायला नको होती, ना? एखाद्या शास्त्रज्ञाचा बाईट अजुन शोभा वाढवणारा ठरला असता, असे वाटले.
#पहावाअसानाही_पहावाचअसाआहे
- पूजा ढेरिंगे

अँड दॅट हिरॉईक ममेंट !

by on ऑगस्ट २१, २०१९
४४८ करोडात मंगळावर गेलेल्या यानाच्या एका चित्रपटाने आज बॉक्स ऑफिसवर ९२ करोडाच्या घरात धंदा केला. मंगळ यानावेळी चित्रपट आला असता तर स...


खूप पूर्वी वाचनात आलं होतं गुलजार म्हणजे फुलांचा बगीचा. गुलजार हे व्यक्ती नाही भावना आहे, असे मानणारी तरुण पिढी गुलजार साब यांना प्रेमाच्या आणि आयुष्याच्या प्रत्येक चढ उतारात जवळ करते. एखाद्या कलाकाराने असंख्य हृदयाचं प्रेम बनणे, ही गोष्ट किती भाग्याची असते.
इतरांसाठी कुणीही असो पण माझ्यासाठी उर्दुची डिग्री देणारा हा प्रोफेसर आहे. तो फक्त माझ्यासाठी तसा नाही, तो मीना कुमारी यांच्यासाठी सुद्धा एक उर्दूचा जादूगार होता. अनेकजण एकलव्य होऊन या अवलीयाकडून आयुष्याच्या परे जाऊन काहीतरी शिकतात. जिवंतपणी एवढं भरभरून देणारा हा पहिलाच व्यक्ती असणार. लोकांना मेल्यानंतर वाचलं जात, पण याने प्रत्येक भावनेला न्याय देऊन स्वतःच्या अंतरंगात पाहायला शिकवलं.
गुलजार यांचे खरे नाव संपूरणसिंग कालरा. पेशाने फिल्म दिग्दर्शक, संगीतकार, लेखक, कवी आणि संहिता लेखक असलेला हा शेर भारतीय चित्रपट सृष्टीसाठी वरदान ठरला. पाकिस्तानच्या दिना (पंजाब) येथे जन्मलेला हा शेर भारत-पाक फाळणीनंतर भारताची राजधानी दिल्ली येथे स्थायिक झाला. सुदैव भारतीयांचे की गुलजार यांनी मातृभूमी म्हणून भारताची निवड केली. फाळणीनंतर गुलजार कधीच जन्मभूमीकडे गेले नाही. पण ७० वर्षानंतर त्यांनी दिना या जन्मभूमीला भेट दिली. 
याबाबत गुलजार म्हणतात, "लहानपणीचे आठ वर्ष दिनामध्ये घालविल्यानंतर फाळणी दरम्यान आम्ही सुरक्षित भारताची निवड केली. हे आयुष्य चक्र पूर्ण होण्यासाठी शेवटचं 'दिना'ला जाणे गरजेचे होते. पण कदाचित ही जन्मभूमिला दिलेली शेवटची भेट असेल."
सुरुवातीच्या मेहनतीच्या काळात त्यांनी गॅरेजमध्ये मेकॅनिकचे काम केले. त्यानंतर त्यांच्या करियरची सुरुवात बंदिनी या चित्रपटाने झाली. मेहनतीच्या काळात त्यांनी चित्रपट सृष्टीला इजाजत, आंधी, कोशिश हे चित्रपट तर, तुझसे नाराज नहीं जिंदगी, मेरा कुछ सामान, जय हो, तेरे बिना जिंदगी से कोई, आनेवाला पल हे प्रेमाने गच्च भरलेले लेजेंडरी गाणे दिले.
गुलजार यांचे चित्रपट पाहताना लक्षात येते, ते नेहमी 'फ्लॅशबॅक'चा वापर करतात. याबाबत ते मानतात, आयुष्याप्रमाणे चित्रपटही भूतकाळाशिवाय अपूर्ण आहे. अशा प्रत्येक शब्द, फ्रेम आणि आयुष्यातील प्रत्येक क्षणाला अर्थ आहे, तो अर्थ म्हणजे या व्यक्तीचं त्याच्या कलेतून व्यक्त होणं आहे.

पण असे म्हणतात, "एक कलाकार कधीच एक फुल-टाईम जीवनसाथी बनू शकत नाही. कारण त्याचं पहिलं प्रेम त्याची 'कला' असते, त्यानंतर इतर सगळे..." तसेच राखी मुजुमदार आणि गुलजार या जोडप्याचेही झाले. राखी म्हणजे करण अर्जुनमधील शाहरुख, सलमानची आई...
गुलजार आणि राखी यांचे लग्नानंतर वाद विकोपाला जाऊन त्यांच्यात सेटवरही भांडणे होऊ लागली आणि त्यावेळी गुलजार यांनी राखीवर हातही उचलला होता. त्यातूनच त्या दोघांचा घटस्फोट झाला पण त्यानंतर लगेच एका वर्षाने राखी आणि गुलजार यांचा अंश म्हणून, आपल्या वडिलांची प्रत्येक कला आत्मसात करून आणि वडिलांची भूमिका अधिक ठासून जगासमोर आणणाऱ्या मेघना गुलजार हिचा जन्म झाला.
गुलजार वडील असतील तर हर जर्रा 'गुलजार'ही बनेगा।
तीही एक लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता बनली. तिने २०१८ चा अवॉर्ड विनर' राझी ' प्रेक्षकांना दिला. मेघना हिने गुलझार अधिकाधिक कळावे आणि ते जीवंत असतानाच कळावे याकरिता आत्मचरित्र म्हणून " कारण तो आहे ---- (बिकॉज ही इज ...) " हे पुस्तकही लिहिले.
तरीही मी मानते, एखाद्या आवडत्या कलाकाराची फक्त कला पहावी. त्याच्या वैयक्तिक आयुष्यात डोकावले की वास्तविकता दिसते. पण कलेत त्याचा आत्मा दिसतो, वास्तविकतेत त्याच्या कृतीचे प्रतिबिंब. त्यामुळे
"किसीको इतना गहराई तक भी ना जानो कि पानी की सुंदरता देखने की बजाए, कुए की बदसूरती दिखाई दे। "
या शायद...
"खूबसूरती ज़र्रे को जानने में हैं, पूरे शरीर की सुंदरता एक दिन खत्म होनी हैं।"
आणि म्हणूनच गुलजार यांच्या जन्मदिनी व्यक्तिशः समजून घेताना वास्तविक आयुष्य कळले पण मला त्या कलाकाराच्या वैयक्तिक गोष्टीवर म्हणजेच कलेवर प्रेम आहे, त्याच्या कुठल्याच वास्तविक घटनेवर नाही.
इसलिए,
वो एक उर्दू पढ़ाव हैं, तो शिष्य मैं हूं।
और दुनिया में,
कोई जिंदा ख्वाब हैं तो वो 'गुलजार' हैं।
- पूजा ढेरिंगे

कोई जिंदा ख्वाब हैं तो वो 'गुलजार' हैं।

by on ऑगस्ट १८, २०१९
खूप पूर्वी वाचनात आलं होतं गुलजार म्हणजे फुलांचा बगीचा. गुलजार हे व्यक्ती नाही भावना आहे, असे मानणारी तरुण पिढी गुलजार साब यांना प्...

उशीर झाला थोडासा, पण आज एैतवारी काहीतरी पहावं म्हणून लॅपटॉपवर 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' मालिका लावली.
मध्यंतरी भ्रमंतीच्या वेळी एका हॉटेलात ही मालिका मोठ्या रसिकतेने चालू होती. मालिकेत चालू असलेले शाळेतील एक दृश्य पाहून मन थबकल होतं. शिवाय, आंबेडकर हे आजवर दलितांचे, संविधानाचे आणि अस्पृश्यांचे... इथवर माझी नि त्यांची समाजाने करून दिलेली ओळख होती.
त्या पलीकडे ना ते माझ्या वाट्याला आले ना मी त्यांच्या वाट्याला गेलेले. पण आज वाटलं ते यामुळे की पत्रकारिता शिकताना बऱ्याचदा शाहू, फुले, आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे. त्यांच्या मूकनायक, बहिष्कृत भारत या वृत्तपत्राचा नमुना पाहिल्यानंतर मनाची उत्सुकता जाणून घेण्याच्या शिगेला पोहोचलेली.
त्या माणसाने जे केलं होतं, ते आजही कुणी करायला धजावत नाही... कारण ज्याप्रमाणे त्या माणसाला त्याच्या लहानपणी या जाती व्यवस्थेचा शिकार व्हावं लागलं तसं आता होता येत नाही. आताची परिस्थिती ही काही बरी नाही. पण वेगळी आहे.
मनात हे थोडेफार विचार चालूच होते. तेव्हा आईने विचारलं, "काय लावतेस?"
तिला सांगितलं, "डॉ. बाबासाहेब आंबेडकर..."
परंपरागत चालत आलेल्या विचार साच्याने तिनेही तितकीशी स्वीकारार्हता दाखवली नाही. पण तरीही मी माझा निर्णय अढळ ठेवला.
सुरुवात केली... मालिकेत पुल देशपांडे यांच्या चित्रपटात भूमिका साकारलेला सागर देशपांडे दिसला. आई म्हणाली, हा तर देशपांडे चित्रपटातला दिसतोय.
तेव्हाच मलाही क्लिक झालं. मग मालिका सुरू झाली, सुरुवात ही आंबेडकरांच्या विचारांनी, संविधानाने आणि नंतर हळूहळू शाहू महाराजांच्या भेटीने होते.
शाहू महाराजांच्या भेटीतून उलगडत जातात, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महत्त्वाचे जीवन पैलू.
"सैन्य भरतीत अस्पृश्याना बंदी" हा नवा निर्णय जेव्हा जाहीर केला जातो तेव्हाच जन्म होतो भीमरावचा... नि सुरुवात करतानाच आंबेडकर म्हणतात, माझा जन्मच 'अन्यायाच्या' दिवशी झाला. तेव्हा या अन्यायासाठी जन्मणार वादळ कसं असतं, याची प्रचिती येण्यासाठी खऱ्याखुऱ्या वादळाची चाहूल प्रसूतीच्या दृष्यातून साकारली जाते.
तेव्हा सुरू होतो, लहानग्या भीमाचा प्रवास. त्यात येणारी वादळे, नि वादळांपेक्षाही आपल्या सारख्याच देहाच्या माणसांकडून मिळणारी वागणूक आणि त्या वागणुकीतून लहानग्या जीवाला पडणारे असंख्य बोचक प्रश्न.
"महार म्हणजे काय रे आनंदा? किंवा बाट म्हणजे काय? मग उच्च जाती म्हणजे कोण आणि आपल्या अंगाला घाण लागलेली असते का?" या प्रश्नांचा संच इतका बलाढ्य आहे की एखाद्या व्यक्तीचं आयुष्य टोकाला नेऊ शकतं. ही वागणूक आपल्याला दिली तर? एवढा कचरत विचार माझ्या मनात आला नि माझा प्रवास मी आंबेडकर म्हणून सुरू केला. त्या मालिकेतला आंबेडकर केवळ बघण्यापुरता म्हणून तरी जगून पाहू अशी धारणा मनी केली आणि बघू लागले.
कारण जेव्हा दुःख आपलं होतं तेव्हा सगळचं योग्य वाटतं. तेव्हा खरा चटका कळू लागतो, चटक्याचा त्रास होऊ लागतो.
हा चटका लागतो, जेव्हा आर्मीतील रिटायर्ड शिक्षक म्हणजे वडील रामजी जात समजू नाही म्हणून त्यांचं सकपाळ आडनाव बदलून गावाच्या नावावरून ' अंबवडेकर' आडनाव लावतात... या अंबवडेकरने दिवस सरू लागतात, पण आता भीमाला शाळेत टाकण्याचा दिवसही समोर येतो. वडील भीमा आणि आनंदाला शाळेत नेतात. शाळेतील मास्तर गुरुजी म्हणजे आंबेडकर गुरुजी यांच्याकडे ते प्रवेशाची चौकशी करतात. नाव - आडनाव सांगेपर्यंत गुरुजी नेहमीसारख्याच मूडमध्ये असतात. पण जेव्हा शालेय पटावर 'जात' टाकणं अनिवार्य असतं, तेव्हा मात्र रामजी ' महार ' म्हणतो. तोच गुरुजी म्हणतात "ठीके ठीके, उद्यापासून त्यांच्या सोबत बसणं द्या आणि शाळेत पाठवा.!"
भिमजी आणि आनंदपासून मुले आजूबाजूला पळतात, दूर बसू लागतात, स्वतःच्या डब्ब्यातला खाऊ देत नाही, खेळायला घेत नाही, कचरा टाकतात, तू शिवला तर तीनदा अंघोळ करावी लागेल म्हणून मनावर जातीचा पगडा घट्ट करू लागतात... असं पोळणारं वास्तव, त्या वास्तवाचे निखारे इतके का कठोर की खरा जाळ इतका पोळत नसेल... अन् इथून सुरू होतो प्रवास भिमारावाचा!
या ऐतवारी लावलेल्या या मालिकेने जास्त काही नाही, मनोरंजनाच्या या प्रयत्नांमुळे किमान घरातली माय हे पाहू लागली, तिला गोडी लागली. तिला त्या लहानग्या भिमात नि त्याला सोसाव्या लागणाऱ्या वेदनेत तिचं मुल दिसलं, तिला त्या समाजातील लोकांच्या वागणुकीची कणव आली, तिला राग आला, द्वेष आला, माणूस म्हणून तिने मला मोठं केल्याचा अभिमान हळूहळू बळावत चालला. तिने तिच्या मुलींच्या विचारांचा मजला आंबेडकर विचारांचा केल्याचा तिला अभिमान वाटला. जोपर्यंत प्रत्येक समजातल वास्तव समोर येत नाही, नि त्यातली अढी सुटत नाही, तोवर हा समाज एकमेकांपासून जातींच्या किडीने किडत जाणार. त्याला एकत्र करायचं असेल तर प्रत्येक धर्माला मनापासून स्वीकारणं जमायला हवे, आणि या बदलाची सुरुवात ' स्व_पासून करायला हवी. जेव्हा आपल्याला दुसऱ्याच्या जातीला बनुनही पाहता येतं तेव्हा आपल्याला माणूस होता येतं. कारण प्रत्येक धर्माचा संघर्ष वेगळा निर्माण झालाय, त्या समाजातला माणूस एकसंध सांधायचा असेल तर त्यासाठी हे छोटे छोटे बदल स्वीकारायला हवे.
हे बदल इतके स्वीकारायला हवे की एकेक जात मुळासकट नष्ट होऊन लाल रक्तसारखा समाज उरायला हवा, आडनाव नाही, ना त्याला चिकटून येणारी जात. जे उरावं ते निखळ नि माणूस म्हणून एकमेकांना प्रेरित करणार असावं!
कारण खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे!


दोन वर्षांपूर्वी पत्रकारिता शिकायला सुरुवात केली होती. हे दोन वर्षाचं शिक्षण तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात पारंगत करण्याचा प्रयत्न असतो. पत्रकारिता शिकतेय म्हणजे बातमीदार होणं किंवा टीव्हीवर झळकन एवढंच नसतं, हे मला पत्रकारितेमुळे समजले. त्यामुळे आपला आवाज, आपली पत्रकारिता किंवा आपला चेहरा, आपली पत्रकारिता म्हणण्यापेक्षा आपली भूमिका आपली पत्रकारिता असते.

पत्रकारितच्या पदवीसाठी शिक्षण घेणारी पोरं अगदी कोवळी असतात. त्यांना पत्रकारिता म्हणजे लोकमान्य, आगरकर, आंबेडकर, जांभेकरांच्या काळातली वाटते. पण दुर्दैवाने तेही अनेकांना माहीत नसतात. पण तरीही कुठलीच मागासलेपणाची रेषा मनात नसते. कारण हे दोन वर्ष त्यासाठीच असतात. शून्यापासून सुरुवात करून या ज्ञानशून्य शरीराची नापीक जमीन सुपीक करायची असते. पण वेगळेपण असते. प्रत्येकचं गोष्ट अभ्यासण्यासारखी असते आणि प्रत्येक गोष्टीत दडलेला एक गाभा असतो एक खूप काळापासून दडलेला आत्मा असतो, याचा पाठपुरावा या दोन वर्षात होत असतो. 
कारण हि दोन वर्ष म्हणजे सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, मनोरंजनात्मक, सिनेमात्मक, असे बरेच पैलू समोर आणणारे असतात. यातून हळूहळू आपली आवड आपल्याला खुणावत राहते आणि शेवटी एखादा हिरा आपल्या या नापीक जमिनीत रुजू लागतो. रोज खतपाणी मिळाल्यामुळे आणि तारुण्यातील ऊर्जेमुळे नापीक जमीन गुळगुळीत होऊ लागते. जेवढं स्वीकारता येईल स्वीकारू लागते.
त्याच दिवशी टीव्ही जर्नालिजम शिकवायला बाई येतात. टीव्ही बद्दल कमालीचं आकर्षण हि भारतीयांची एकमताची बाजू.
बाईंनी बेसिकपासून सुरुवात केली. कोणत्या भाषेतून शिकवले तर चालेल?
बहुमताने सगळे ओरडले, मराठी...
पण इतर भाषिक मुलेही असल्यामुळे हिंदी-मराठी असं द्वैभाषिक शिक्षण सुरु झाले. बाईंनी प्रश्न विचारला, वृत्तवाहिन्यांवर काय पाहता?
आम्ही सगळे सुरु झालो, चला हवा येऊ द्या, रोड़ीइज, नागीण, गाणी, पोगो, क्रिकेट आणि एकजण म्हणाला, रवीश कुमार प्राईम टाइम... 
मला आजही आठवतं तो एकटाच विद्यार्थी होता, जो रविशला प्रत्येक पावलावर फॉलो करत होता... स्वतःशिवाय दुसऱ्या कुणाचा इतका चाहता होणं मला पटायचं नाही. पण बाईंनी त्याची दाखल घेतली नि रवीशमुळे माझ्यातला हा 'स्व'चा न्यूनगंड नकाबसारखा खाली पाडला.
पत्रकारिता शिकत असल्यामुळे वर्गातच चित्रपट, शॉर्ट फिल्म्स, वृत्तवाहिन्यांवरील विशेष स्टोरीज हे बघणं म्हणजे शिक्षणाचा भाग होता. बाईंनी रवीश कुमारचा "प्राईम टाइम" सुरु केला.
आयुष्याच्या एवढया कठीण आणि जबाबदारीमुळे वाकलेल्या प्रत्येक मनुष्याला कुठेनाकुठे आपल्या मूल्यांशी तडजोड करावी लागतेच. पण रवीश कुमार रवीश कुमार राहिला. यात वाटा आणि आधार एनडीटीव्हीचाही होताच. रवीशच्या विश्वासावर आत्मविश्वास दाखवणं तेही या स्पर्धेच्या काळात, हे महत्वाचं होतं... नि प्राईम टाइम सुरु करत, दिल्लीच्या शांत थंडीत एक साधारण आवाज येतो  आणि या वातावरणात येणारे ते ठाम शब्द आणि त्या प्रत्येक शब्दाचं महत्व समजावून सांगताना वापरलेले शब्दांचे पीच... म्हणजे मनामनात ठासून राहणारी बातमी होते, नि माणूस चाहता होत जातो रविशच्या सादरीकरणाचा आणि व्यक्तिमत्वाचा...
मग सर्च करून फडशा पडतो रविशच्या असल्या नसल्या सगळ्याच लिखाणाचा... तेव्हाच रवीश माझ्यासारख्या कित्येकांसाठी लिहू लागतो 'नई सडक' ब्लॉग... आणि उलगडू लागते पत्रकारितेचे महत्व! तेही शुद्ध हिंदीत...
भाषा नाही, भूमिका बोलते... त्यामुळे भाषा कमकुवत बनवत नाही. भाषेचा आधार घ्यावा, तिचा गर्व नसावा! याच शैलीत रवीश कुमार स्वतःला पुढे आणत जातो आणि आमच्यासारख्या कित्येक भरकटल्या पोरांना रस्ता दाखवत जातो...
पत्रकारितेच्या याच दोन वर्षात आम्ही मुले सहलीच्या योगाने नव्या दिल्लीतुन रवीश कुमारच्या भेटीला जाऊ लागतो. पण वेळ आमची चुकते आणि रवीश कुमारची भेट हुकते. पण तरीही दुरूनच त्याला स्टुडिओच्या बाहेर उभे राहून बघण्यात आनंद वाटतो.
या अनोख्या कलाकाराच्या हातातला माईक पाहून अभिमान वाटतो त्याच्या आवाजाचा... पदोपदी आवाज आणि शब्द यांचं महत्व आणि आदर समजावणार हा वेगळाच कलाकार लांबून बघण्यात सार्थक वाटतं... 
पत्रकारितेच्या क्षेत्रातील हिडीस, विक्षिप्त आणि अंगावर धावून येण्याचा स्वभाव कुठल्यातरी चंबळच्या खोऱ्यात पुरून रवीश आजही तितक्याच संयमाने आणि  जिवंतपणाने न्याय देत त्याच्या क्षेत्राला श्रद्धेने पुढे नेतो... 
ज्याच्यामुळे हिंदी वाचनाची गोडी लागली या गोडितुन लिखाणाच्या ओंजळीत हिंदी उर्दूचे चार शब्द पडले नि मीही नकळत कधी हिंदी लिहू लागले कळलही नाही....
गुलझार म्हणतात, "शायर बनने के लिए मोहब्बत की एक मुक्कमल डिग्री चाहिए"  
लेकिन मेरे लिए "ये डिग्री रवीशजी की थी, जो भावनाओंसे लपेटी डिग्री मेरे रूह को लिखने पर मजबूर करती थी |"
तरीही रवीश म्हणतो तसं कुणाचाच चाहता बनू  नका कारण, चाहत्याचा आवाज तुमचा बनेल आणि त्यामुळे तुम्ही तुमचा आवाज विसराल. म्हणून आजच्या त्याच्या दिवसासाठी, सगळ्या देशाला अभिमान असणाऱ्या रवीशसाठी ......

'शब्दों से कीचड़ नहीं उठाते' कहता हैं,
मिडिया की खामियोंको भी लिखता हैं,
शब्द से शब्द का मतलब हैं समझाता हैं,
ये शख्स बुझी 'पत्रकारिता'को जिंदादिल जगाता हैं|

रविश एक इंसान नहीं शहर बनता हैं,
जो राजनीति और इंसान की गिरी नीति में ढले शब्द की पवित्रता समझाता हैं |
जो स्पर्धा के ज़माने में भी खुद के मूल्यों को ना छोड़ता है,

कहते हैं भाषा का आभाव हैं, ये इंसान गांव वाला हैं| 
फिर भी मैं देखती हूँ,
आवाज ये गांव की हैं, लेकिन 'नई सड़क' इसकी शहर में हैं,
कौन इंसान गांव का रास्ता इस बुझदिल शहर तक लाता हैं,
वो 'रवीश' ही होता हैं, जो खुद के उसूलों पर डटे रहकर कामयाबी पाता हैं| 

Ravish Kumar Ramon Magsaysay Award 2019.

रवीश कुमार; कलाकार माइक और उसूलों का |

by on ऑगस्ट ०२, २०१९
दोन वर्षांपूर्वी पत्रकारिता शिकायला सुरुवात केली होती. हे दोन वर्षाचं शिक्षण तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात पारंगत करण्याचा प्रयत्न असतो. ...
Blessed with love!

क्षण आठवून आनंद होतो पण क्षणांच्या पाकळ्यांचा दिवसच आपला असेल तर ..? 
एखादाच पण संपूर्ण दिवस आपल्याला मिळावा, एवढंच स्वप्न प्रियकर वर्गाचं असतं. 
माझा देव त्यात फार रोमँटिक... त्याने दोघांच्या नावे म्हणून की काय, अक्षरशः पावसाळी अन् बर्फाळी वातावरण भिजू घातलं होतं. माझ्या मूडला उधाण आलं होतं. फार काही नाही पण तो जवळ असायलाच हवा होता हा अट्टाहास मनाला टाळता येत नव्हता. पण नोकरीवरून सारखं सारखं कितीदा सुट्टी घ्यायची. त्यात नात्याचे आणि प्रेमाचे चोचले अती जास्त असतात.
पण गोड असतात नाही? म्हणजे त्याशिवाय का आम्ही एकमेकांत बांधले गेले असतो?. त्यातल्या त्यात हे चोचले म्हणजे आवड होती एकमेकांची.
प्रेम शाबूत आहे, जोपर्यंत प्रेम तुमच्यात आहे. तेही दोन्ही व्यक्तीकडून तितकंच खरं नि महत्त्वाचं म्हणजे निरागस हवं.!त्याला या बाहेरच्या राजकारणी, दिखाऊ प्रेमाचा स्पर्शही नसावा! जे वेंधळटही चालेल, पण किमान त्यावर लिहिलं जावं इतकं स्वच्छ असावं! 
"तुझं पण ना.."
(मागून कुणाची बारीकशी पुटपुट ऐकू आली)
"कधीही लिहायला सुचतं बाई तुला. एवढा एकटा वेळ मिळालाय आणि आम्ही हे असे नशिबी ज्यांच्या नशिबी लेखिकाबाई आल्यायत. ज्यांना दोघांच्या एकट्या वेळेतही 'किस' सोडून कविता होताय." त्याने मुद्दाम मला डिवचत म्हटलं.
"दोन चहा चालतील.
चहा मसाला टाक फक्त." मी म्हटलं.
"बरं चालतंय, पण त्यानंतर मला दोन ओळी माझ्या हव्या! "
"हावऱ्या, तुझ्यावर मी केसच करणारे ! असं दरवेळी माझ्या लेखणीकडून रिश्र्वत घेतोस... " 
"चहा हवाय ना? " त्याने खोडकरपणे विचारलं. 
"अरे मुसाफिर, तुम सिर्फ बनाकर लाओ | हम हमारे लहेजे
के साथ आपके सामने आपका पेगाम हाजिर रखेंगे...|"
"उफ ! आलोच ... "


अंहा, हे दिसतंय तितकं साधं नाही हां...

एक खोली दोघांना मिळणं... सगळं सुरळीत होणं अजिबात नाही. तेही जात-पात, स्त्री चारित्र्य, अविवाहित मुलगा मुलगी एकत्र आणि महत्त्वाचं म्हणजे शेजाऱ्यांच्या उपस्थितीत एका खोलीत लग्नाआधी पलंगापर्यंत जाणं म्हणजे भलतंच दरारक!
पण तरीही... बॉयफ्रेंडच्या मित्राचं घर तो नसताना रिकाम ठेवणं, आपल्या नव्या शास्त्रात न बसणारच. बॉयफ्रेंडने मित्राकडे प्रस्ताव ठेवण्याचा उशीर मित्र राजी न व्हायचा प्रश्न दुरदुरवर नव्हता. त्यामुळे तो जाणार हेच आमच्यासाठी प्रेमाचं स्वप्न रुजू करायची वेळ होती. अन्ह... शारीरिक नाही, रोमँटिक नि अलगद भावनिक स्वप्नकथेचं स्वप्न!
खूप बोलायचं, ऐकायचं, लिहायचं, अनुभवायचं नि हे सगळं करून कसलीच घाई न करता त्याच्या मिठीत गुडूप व्हायचं, एवढंच या आजच्या दिवसाचं सुख येणाऱ्या कित्येक निराशांना परतवणार होतं. 
आम्ही दोघे आनंदून गेलो होतो. हुरहुर मनात होतीच पण एक वेगळचं जग एका दिवसात फील करायला मिळणार होतं. म्हणजे लिव्ह-इनचं एक पाऊल आम्ही जगणार होतो. भीती नव्हती, उत्सुकता होती...
नव्या नात्याचा जिव्हाळा अजीर्ण करेल असं काहीतरी करावं, एवढाच ध्यास मनी होता. नात्यातील काही गोष्टी किरकोळ भासत असल्या तरी त्या किरकोळ थेंबात पावसासारखं मजबूत नि मनमोहक आयुष्य साकारण्याची धमक असते.
"मोहतर्मा, आईयेगा जमीन पर. ये गालिब इंतजार कर रहा हैं|" त्याचा चहा झाला होता..
मी या एवढ्या विचारांच्या गर्तेत त्याच्या अजीर्ण अस्तित्वाला लिहित गेले होते...
तर्र... तुझ्यासाठी...

दोन शब्द लिहिले, एक मोठ्ठा शब्द लिहिला. 
पण...
पण कर्ज तुझं जास्त आहे, वर काळजीचं व्याज वाढलंय. कोणत्या दोन ओळी लिहू? 
.
तुझं प्रेम लिहू की तुझा स्पर्श लिहू की तुझ्या असण्याच वर्णन करू? की लिहू तू किती हवायस मला? 
कोणत्या दोन ओळी लिहू? 
.
त्या ओळींना चंदनाची दृष्ट लावू की तुझ्या प्रेमाची साठवण टाकू? कोणत्या दोन ओळींत मावतं हे प्रेम? कपाट थोडी आहे की कप्प्यात टाकलं नि मावलं हे प्रेम !
...
त्यापेक्षा हे बघ... या डायरीवर, इतकं मुक्त सोडलंय मी त्याला. 
त्यामुळे दोन ओळी खोडून, लिहून प्रेमाच्या एका भावनेचं किती संशोधन केलंय, ते कोण्या शास्त्रज्ञाच्या बस की बात नहीं समझे खुश नसिब| 
पण... 
तरीही ज्याला शेवट नसतो असा चहा आहे तुझं प्रेम, 
ज्याची तक्रार असते असा प्रश्न आहे तुझं प्रेम! 

...

अशा दोन ओळी आहेस तू, ज्याला नेहमीच लिहून पुन्हा लिहित रहाव वाटतं! 
किंवा मग ... 
"ए किंवा मग काय? हा काय महाप्रसाद आहे?" तो मग्न ऐकत होता, पण त्याचा कुठल्याच प्रतिसाद नाही म्हणून मी चिडत म्हटलं,
एकवार चहाचा चस्का घ्यायचा उशीर त्याने माझ्या मानेवर त्याची हनुवटी ठेवत विचारलं, 
"पसारा नको, मुसाफिरला मंजिल ऐकायची आहे." तो म्हणाला
"थोडा मुश्किल हैं। ". मी उत्तरलो
"इश्क कहा आसान था? 
हम तरस रहे हैं...." त्याने प्रत्युत्तर केलं.
" सुनियेगा..." मी प्रयत्न करत म्हटलं. 
"क्यों? क्या सच में इतना खूबसूरत होता हैं दूसरा कोई?...
(याने हम...)
जो इंसान खुद के हिस्से का प्यार बिनशर्त बाट देता हैं बेझिझक |" 
....
इतकं हेट करतेस ? 
खूपच ! 
ये की अशी मग... त्याने लागलीच शब्दांसह मला मिठीत ओढलं.  हा पाऊस खट्याळ आपल्याला मिठीत पाहायला त्रस्त झाला नि तुला त्याच्यावर लिहून त्याला खुश करायचं सुचतंय, अन् तरीही त्या खट्याळला आपलं हे प्रेम मिठीत पहायचंय !
"खोटारडा शहाणाच आहेस की!" 
"चहा आणला ना, ये की मग अशी जवळी!"
गुदगुली नको ना, उघड्या अंगाला ओढ तुझ्या स्पर्शाची आहे, गुदगुल्या कसल्या करतोयस. तुम्हा आजकालच्या मुलांना प्रेमही जमत नाही. हे प्रेम कसं अलवार हवं. बागेतल्या झाडांवर फुलपाखराने भिरभिराव पण फुलाला टोचुही नाही, स्पर्श बागडावा या मोकळ्या कळीवर !
नि तोच त्याच्यातल्या प्रियकराला छेडल्यामुळे इम्रान हाश्मी जागा होत त्याने अलगद माझ्या पाठीच्या कडांना त्याच्या बोटांच्या स्पर्शाने लयीत ओघळत नेलं, पावसाचा थेंब पाडवा तसं नि शहारून मी मिठीत जावी त्याच्या इतकं अलवार नि रोमांच उभे करणार होतं.
यापुढे काही होणार नाही, असं काहीसं मनात होतं, कारण शारीरिक प्रेमाने भावनिक प्रेम दुरावलं जातं.
त्याने अलगद मला कोणत्याच नजरेने न पाहता उचलून हलकेच बाथ टबात नेलं. तोच स्पर्श नीलायम ठेवत त्याने आमच्या ठेवणीतले निकोलसचे " ए वॉक टू रिमेंबर" हे पुस्तक वाचायला सूरुवात केली. पण वाचता वाचता एका वाक्याशी अचानक तो थांबला नि म्हणाला, बघ ना...
या पुस्तकासारखा एक वॉक तर आपण घेतलाय. या पुस्तकाला वाचताना आपण एकमेकांसोबत हा वाचनाचा प्रवास तर केलाय. पण हा लेखक निकोलस स्पार्क्स पुस्तकाचा शेवट असा करतो की, "आपल्या प्रेमातला हा पायी प्रवास खडतर पण लक्षात राहणारा होता. यामुळेच मला चमत्कारांवर विश्वास बसू लागला. हा प्रेमाचा चमत्कार एवढा सुंदर असतो आणि शेवटी ती मरते."
याला काय अर्थ आहे... या वॉक मध्ये सगळचं तुटक आहे, कशालाच पूर्णत्व नाही. वॉक हा असा अर्धवट राहतो...?
तो इमोशनल होऊन त्या टबा वर डोकं टेकवून बोलतच राहिला. .
"होना, अर्धवटच राहतो."
म्हणत मी त्या टबाच्या कड्यावरून पळून जात घासरणारच तोच त्याच्या पिळदार हातांनी माझ्या कमरेच्या विळख्यात हातांचा स्पर्श गुंफवून त्याने मला सावरत जवळ घेतलं नि म्हणाला,

"पुस्तक किती प्रश्न किती उत्तरे आणि किती समजूतदार बनवतात ना माणसाला? आणि या पुस्तकांची लेखिकाच मला मिळाली...
आपला वॉक अर्धवट नाही ठेवणार मी! कधीच नाही, मी तुला उचलुन घेऊन चालेल, तू साथ देशील ना? ..."
-----




पाऊस नेहमीसारखा बरसत होता.
वातावरण काहीसं असं होतं... नोकरीच्या निर्जीव भिंती, मनाला लागलेलं बंधन, समोर कॉम्प्युटरची निगरगट्ट भिंत, शेजारी पाण्याची बॉटल अन् माझ्या डोळ्यात खिडकीच्या काचेला चिकटलेले ते थेंब... हळूच आत शिरलेली रोमँटिक हवा, झाडांच्या पानांवर धोधोधोधोधो बरसणारा तो...
याला काय अर्थये.?
त्याने मनसोक्त स्वतःच्या असण्याचा आनंद घ्यायचा आणि आम्ही ते बाटलीच्या आत बंद झालेलं पाणी तोंडात टाकून मुक्त उडण्याची सगळीच तहान भागवायची.?
नैराश्यात ते ऑफिसाच रटाळ काम करत मी ना उम्मीद बसले होते.  तोच ऑफिसात उमीद येते. ऑफिसात उमेद आहे,  आशा आहे एक विरणारी आशा.!
एक अनावधाने समोर आलेला क्षण! ज्याच्याकडे मी फक्त बघतच राहिलेले क्षणभर !
या ऑफिसच्या आझादी कोंडलेल्या माहोलात अलगद दरवाजा उघडला. एक थंड वाऱ्याचा झोका आला नि एक चमचमीत पिळदार शरीरयष्टी असलेला पुरुष केसांच्या हालचालीला दोन्ही हाताने मागे करून त्या अंगाला चिकटलेल्या टाईट सफेद शर्टाच्या बाह्या वरती सरसावत ऑफिसमध्ये शिरला... रोमँटिकपणा मी मनात दडवत त्याच्याकडे फक्त एकवार बघत मनात सगळा खेळ सुरु केला...
पांढऱ्या सदऱ्यात लपेटलेला तो ओल्या कपड्यात ओल्या मातीतलं शिल्प भासत राहिला. त्याची प्रत्येक हालचाल माझ्या मनात प्रणयक्रिडेची आशा जागवत होता. या वातावरणाला जागत हृदयाच्या आत गंटागळ्या खाणारं मन बॅकग्राऊंडला 'हम दोनो दो प्रेमी दुनिया छोड चले' म्हणत म्हणत अचानक त्याच्या सोबतीला गेले. चित्रपटात जसं सलमान खान ऐश्वर्याच्या मागे पळत विदेशात जाऊन गाणं म्हणू लागतो ना अगदी तसं!
Captured: Pooja Dheringe
या मूडमध्ये एकदम हातात हात घालून मॅरेथॉनमध्ये धावावे तसे आम्ही कात्रजच्या टोकाच्या टेकडीवर पळत पळत गेलो. एकमेकांकडे बघण्याची फुरसत काढून बघणार होते मी त्याच्या शरीरावरून ओघळणाऱ्या पावसाच्या थेंबांना पण पाऊस इतका घनदाट बरसु लागतो की मनाला बेफान होऊन त्याची बेगम होऊन भिजायचच असतं.
दोघेही अल्लड होऊन त्या टेकडीच्या रस्त्याने पाखरासांरखे बेछूट रस्ता कापू लागतो. जाताना एका पॉईंटला दोघे थकून जातो. थांबावं वाटतं, पण दूरवर एक दिवा चमकलेला दिसतो, तिथे जाईपर्यंत हाय खायची नाही म्हणून त्या टपरीवर  जायची स्पर्धाच लागते.
एका पॉईंटला तर इतकी सुंदर अत्तर शिंपडणारी बाभूळ लागते, तिचं सौंदर्य पाहून  दोघांच्या पावलांची हालचाल एकाच ठिकाणी स्तब्ध होते. तो हळूहळू पाऊल टाकत माझ्या जवळ येऊ लागतो. मी स्वतः ला त्याच्या जवळ नेत दूर जाऊ लागते.  त्या काळ्याकुट्ट बाभळीच्या काट्यांच्या खाली छपराला गळती लागावी तसे थेंब दोघांवर बरसू लागतात. दोघांची हालचाल थांबते. तो माझ्या जवळ आलेला असतो. मी आधीपासूनच त्याची झालेली असते. तो बघत राहतो. काजवेही आमच्यात सामावून गेलेले असावे, एवढी शांतता पसरते. पावसाच्या तडाख्यात मध्येच एखाद्या विजेचं येणं होतं. हिंदी चित्रपटात ती त्याच्या कवेत जाते, तसं खऱ्या आयुष्यात कुठलाच सीन होत नाही.
वीज येऊन जाते. वास्तवातील मुलगी मात्र स्वतःच्या चारित्र्यावर सफेद चादर पांघरून स्वतःलाच कोंडून घेत राहते. ती विजेला घाबरून त्याच्या मिठीत जात नाही आणि तोही शाहरुख खान होत नाही. पण हेच वास्तव धावत जातं जेव्हा वरती तो बरसत असतो,
मनात एक ना अनेक हरहुन्नरी भावना उफाळत असतात पण बाईने आधी पुरुषाच्या जवळ तरी जावं का? मनात किंतू येतो आणि पुरुषात हे क्षण सोडण्याचा संयम मात्र नसतो. तोच मी निशब्द आणि स्तब्द होते.
शेवटी त्याने मला आहे तसं जवळ घेण्याच्या अपेक्षेविरहित मीच जाते... त्या कुठला अबला नारीची पांढरी चादर दूर भिरकावून देत, त्याच्या त्या सरसावलेल्या पांढऱ्या सदऱ्याला गच्च धरत मिठीत घेऊन त्याच्या त्या वरच्या बटणाला खाडकन तोडत त्याच्या 'असण्याला' मिठीच्या आकाशात संपूर्ण घेऊन इतकं घट्ट करते की, ही रात्र या मिठीच्या आकाशात अशीच घट्ट राहावी अन् त्याचे चुंबन माझ्या कपाळाच्या क्षितिजावर दीर्घकाळ असावं ! ज्याचं कुण्या अडगळीतल्या चित्रकाराने पंचवीस वर्षानंतर जसच्या तसं काळं-निळं चित्र काढावं. लोकांनी त्या चित्रात जाऊन अनुभवावा माझ्या ऑफिसातल्या स्वप्नातल्या पांढऱ्या राजकुमाराला नि त्या शरीरयष्टीला अन् त्या रोमान्सला जसच्या तसे हुबेहूब.!  
.
पण, "रोमान्स त्याला काढता येईल?"
माझ्या या अडखळत्या स्वप्नांत मी कुठे हरवून गेले होते माझं मलाही कळलं नाही. पण त्याच्या पापण्यांचा थेंब माझ्या कपाळावर पडला तेव्हा माझी तंद्री तोडून मी त्याच्याकडे आकाशाकडे एकटक पहावे तसे पहातच राहिले. त्या नजरेत या मादक निसर्गातील अवकाशाचा स्पर्श होणं शक्य वाटलं!
त्याचा स्पर्श होऊ लागला होता. एक मादक रसायन जेव्हा स्पर्श करतो, रोमांच उभे राहतात अंगभर.
काहीच सोडावं वाटतं नाही. पण ती झोपडी आमची वाट पाहत असते.
तरीही त्याचा मादक स्पर्श माझ्या सर्वांगावर हावी होऊन गेलेला असतो. या क्षणाला समाजाचे गालबोट लावण्याआधी आम्ही दोघे एकमेकांना स्वतःच्या हबकत्या स्थितीत ठेऊन चालू लागलो.
अशावेळी स्वतःच्या श्वासांचा वावर उघड्या अंगावर होऊ लागतो. सगळ्या धमण्यांत तेवढंच काय ते जीवंत वाटत असतं.
शेवटी श्र्वासांच्या गतीत पाऊलांचा खेळ करत आम्ही झोपडी पर्यंत येतो खरे! आता मात्र समाज आजूबाजूला होता. 'मर्यादांचा बांध या मोकळ्या शेताला घातला गेला होता' या ठिकाणी मात्र आम्ही एकमेकांकडे बघून सगळ्या शारिरीक अनुभूतीच्या कल्पनांचा स्वर्ग गाठत होतो.
कल्पनेच्या दुनियेची मला खरंच मजा वाटते, हे जग जे आपलं नाही, जे जगू शकत नाही, याची किंचितही खंत मनाला भासू देत नाही.
या दुरून दिसलेल्या झोपडीत एक काजळीत सत्तरी गेलेला कंदील होता, एक सत्तरीची आजी, एक स्टोव आणि तीन पाच लोकांची गर्दी.
आम्ही दोघे पावसाने ओलेचिंब नि कुडकुडत अवघडलेल्या स्थितीत आत आलो. त्यातल्या तिन्ही मुलांनी माझ्याकडे वळून पाहिलं नि दोन मुलींनी त्याच्याकडे वळून पाहिलं आणि आम्ही दोघांनी एकमेकांकडे पाहिलं.

शरीराचं आकर्षण खरंच इतकं ऍट्रॅक्टिव्ह असतं का?
इतकं सुंदर असतं की एक महोल तयार होतो, कुठल्याही अत्तराविना एकमेकांकडे बेहकले जाण्याचा माहोल. पण आम्हाला त्या माहोलचा भाग व्हायचं नव्हतं. आम्ही एकमेकांतच पुरेसे आणि तरीही खूप जास्त प्रेम करायला उरलेले असे होतो. 
आम्ही दोन चहा मागवले. आजीने तिच्या जुन्या काळातला मटका चहा दिला. चहाची चव ही खरी, त्यात त्याचं माझ्या खांद्यावर हात टाकणं, हळूहळू झोपडी बाहेरचा चंद्र दाखवत माझ्या गालाला ओढ लावणं.
मी तर क्षणात विरघळून गेले होते. इतकं सगळं गोड्ड अन् स्वप्न सुख होतं... ते इथे संपत नाहीच, आम्ही आमच्या मनात असताना टिक म्हणत टेप ऑन होतो, अंहा ss अहहाह अन्हा अहहाहा " टीप्प टीप बरसा पानी"
उफ !
तन, मन आणि संपूर्ण जगच प्रेमाच्या धुंदीत बुडालेलं होतं आणि त्याचं जवळ असणं? हे कुठल्याच उपमेच्या बंधनात अडकतच नव्हतं. त्याचा सहवास बस! याहून सुख नव्हतं .
ते गाणं लागलं त्याने माझ्याकडे, मी त्याच्याकडे अन त्या पाच जणांनी आम्हा दोघांकडे पाहिलं. कारण नकळत आम्ही एकमेकांच्या इतक्या जवळ आलो होतो की, एकमेकांचे ओठ एकत्र होण्याचा उशीर होता. ते अधीर होऊन आमच्याकडे पाहू लागले होते.
तितक्यात,
"असाइन्मेंट झालेली दिसतेय ?" जवळून आवाज आला.
आं? मी गोंधळून जागी झाले...
ओह ओह ओह गॉड. कसे हे भारतीय लोक्स यार. ! मोक्याच्या क्षणी सुख गेलं... हे ऑफिसवाले प्रेमही करू देत नाही यार....
मग काय,
त्याबाहेरच्या 'टीप टीप बरसा 'ला  खिडकीच्या कांचांत रंगवून, तीच काच पुन्हा पुसून टाकून मी त्या निगरगट्ट स्क्रीनकडे लक्ष देत त्या कल्पनेच्या विश्वाला उद्गारवाचक चिन्ह लावून झोपडीच्या काळया बाकावर ठेऊन आले.
अशी कल्पनेतली प्रेमं खरे किती खुशनसीब होऊन हवं तसं जगून घेता, नाही.?
ऑफिसवाल्यांचाही एक अलगच रोमान्स असतो, मनातल्या मनात शिजणारा आल्हाददायी गुपचूप क्षण असतो !...


भारतातील मासिक पाळीचे एकंदरीत स्वरूप समजल्यानंतर हीच परिस्थिती आंतरराष्ट्रीय पातळीवर कशी असेल, या विषयाचा टॅबू, व्याप्ती आणि दृष्टिकोन कसा असेल हे समजून घेणे औत्सुक्याचे होते. पुढारलेले देश म्हणजे पुढारलेली मुक्त मानसिकता का? हे प्रश्नचिन्ह डोक्यात होतं. तोच याचा अभ्यास सुरू केला...
जगात आणि आश्चर्य वाटेल पण भारतातही काही चांगल्या प्रथा आहेत, ज्यात मुलींची पहिली मासिक पाळी साजरी केली जाते. या शोधानंतर काही देशांतील मासिक पाळी संबंधित प्रथांबाबत समजले ते खालीलप्रमाणे;

१. दक्षिण भारत : 
आपल्या भारत देशात भलेही पाळी विषयी अनेक गैरसमज आणि मान्यता असल्या तरी देखील, दक्षिण भारतात ह्यासंबंधी एक चांगली परंपरा बघायला मिळते. ज्यानुसार जेव्हा मुलीला पहिली पाळी येते तेव्हा तिची पूजा केली जाते.

२. फिलिपिन्स : 
फिलिपिन्समध्ये जेव्हा कुठल्या मुलीला पहिल्यांदा पाळी येते तेव्हा तिची आई तिची पाळीची पॅण्टी स्वतः धुते आणि त्यानंतर त्या पॅण्टीला मुलीच्या चेहऱ्यावर लावल्या जाते. ह्यामागे त्यांची अशी मान्यता आहे की, ह्यामुळे मुलीच्या चेहऱ्यावर मुरूम येत नाही. तसेच मुलीला तीन पायऱ्यांवरून उडी देखील मारावी लागते. ह्याचा अर्थ असा की तिला तीन दिवसांची पाळी राहील.
३. आईसलंड :
आईसलंड येथे मुलीला तिच्या पहिल्या पाळीवेळी रेड केक खायला मिळतो. हा केक लाल आणि पांढरा असतो, जो तिची आई बनवते.

४. जपान : 
जपान येथे मुलीच्या पहिल्या पाळीवेळी तिची आई ‘Sekihan’ नावाचा एक पारंपारिक पदार्थ बनवते. ह्या पदार्थात तांदूळ आणि बिन्स असतात. ह्यावेळी संपूर्ण कुटुंब ह्या पदार्थाचा आस्वाद घेतात आणि मुलीची पहिली पाळी साजरी करतात.

५. ब्राझील :
ब्राजीलमध्ये तर ही एक ब्रेकिंग न्यूज असते. नातेवाईकांमध्ये ह्याची घोषणा केली जाते आणि ही बातमी साजरी केली जाते.

६. इटली :
इटली येथे पहिल्या पाळी नंतर मुलीला ‘Signorina’ (miss/young lady) असे म्हणून संबोधले जाते. येथे देखील सर्वांना ही बातमी सांगितली जाते. एवढच नाही तर लोकं मुलीचे अभिनंदन करण्यासाठी देखील येतात.

७. दक्षिण अफ्रीका :
दक्षिण आफ्रिका येथे मुलीला तिच्या पहिल्या पाळी वेळी एक ग्रँड पार्टी दिली जाते. त्यांना अनेक भेटवस्तू दिल्या जातात. पण पाळी दरम्यान त्यांना तीन दिवस घरातून बाहेर जाण्यास मनाई असते तसेच त्यांना पुरुष आणि लहान मुलांपासून देखील दूर राहण्यास सांगितले जाते.


८. इस्त्राइल : 
इस्त्राइल येथे मुलीला पहिल्या पाळीच्या वेळी मध खाऊ घातला जातो. ह्यामागे अशी मान्यता आहे की ह्यामुळे तिला तिच्या पुढील मासिक पाळीत त्रास होणार नाही.


९. कॅनडा : 
कॅनडा येथे मुलींच्या पहिल्या पाळी संबंधी एक विचित्र प्रथा आहे. येथे पहिली पाळी आल्यावर ती मुलगी एक वर्षांपर्यंत बेरी खाऊ शकत नाही. एक वर्षानंतर तिला जेवढ्या वाटेल तेवढ्या बेरी ती खाऊ शकते.

१०. तुर्की : 
तुर्की येथे देखील पहिल्या पाळी संबंधी एक विचित्र प्रथा पाळली जाते. येथे मुलीला पहिली पाळी आल्यावर तिच्या कानशिलात लगावली जाते.

११ आसाम: 
आसामच्या कामाख्या देवीचं मंदिर एक शक्तिपीठ म्हणून पाहिलं जातं. हे मंदिर गुवाहाटी इथे आहे. कामाख्या देवीला "Menstruation Goddess" असा दर्जा दिला आहे - म्हणजे 'मासिक पाळीची देवी'. एकीकडे शक्तिपीठ म्हणून कामाख्या देवीची पूजा केली जाते तर दुसरीकडे मासिक पाळीबद्दल असणाऱ्या अंधश्रद्धांना वाव दिला जातो.

१२. नेपाळ :
नेपाळच्या खासकरून पश्चिम भागामध्ये आजही मासिक पाळीच्या चार दिवसांत स्त्रियांना घराबाहेर, गावाबाहेर एका छोटय़ा खोलीत, ज्याला ‘छोपाडी’ म्हणतात, तिथे जाऊन राहावे लागते. काही जणींना गोठय़ात त्यांचे ‘ते चार’ दिवस काढावे लागतात, तर काही जणी त्यांच्या घराच्या खालच्या अंधाऱ्या जागेत चार दिवस राहतात, असं सांगितलं जातं.

मासिक पाळी या गोष्टीकडे आपण कधी उघड्या आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलंच नाही. भारतातच नव्हे तर जगातील अशा बऱ्याच देशांमध्ये मासिक पाळीबद्दल आजही निष्ठुर, निर्दयी अंधश्रद्धा पाळल्या जातात.


जगभर 'अशीच' मासिक पाळी !

by on जुलै २२, २०१९
भारतातील मासिक पाळीचे एकंदरीत स्वरूप समजल्यानंतर हीच परिस्थिती आंतरराष्ट्रीय पातळीवर कशी असेल, या विषयाचा टॅबू, व्याप्ती आणि दृष्टिकोन ...

-मिसेस मुख्यमंत्र्यांना सोशल मीडियावर नापसंती


मुख्यमंत्र्यांच्या गाडीवर सांडगे वाळत घालणारी बाई पहिली का हो. !
विनोदच आहे हा.
महाराष्ट्रभर गाजलेली आज्या आणि शितलीची बॉर्डर वरची लव्ह स्टोरी संपून त्याजागी एक अशी मालिका आली ज्यावर सोशल मीडियावर बऱ्याच स्त्रियांनी आक्षेपार्ह प्रतिक्रिया देऊन पोस्ट लिहिल्या. मिसेस मुख्यमंत्री नावाने.
त्या पोस्टींवर कमेंट्सच्या माध्यमातून पुुुुरुषांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न ही केला.
मग मला प्रश्न पडला, आक्षेपार्ह असण्यासांरखं त्यात आहे काय ?
तेव्हा ट्रेलरवरून अंदाज आला.  ही मालिका काल्पनिक पात्र आणि घटनेवर आधारित आहे.  म्हणूनच त्यात मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्याची बावळट बायको हे समीकरण दाखवले आहे.
जर समजा तुम्हाला कोणी सांगितले. की मुख्यमंत्र्याची बायको ही गाडीवर वडे / सांडगे वाळत घालते तर? किंवा मग मुख्यमंत्र्यांची महत्त्वाची बैठक चालू असताना बिनडोक सारखी दारातून डोकावून त्यांना आवाज देते, मुख्यमंत्री ऐकत नाही तेव्हा ती खट्याळ पणे म्हणते की, "अहो आज कुणी गडी माणूस नाही तेवढे दळण आणून देता का ?"
मग तिसऱ्या प्रोमोत हे दिसते की मुख्यमंत्री, इतर नेते आणि बायको कुठेतरी जात असते पण मध्येच म्हशी आड येतात तेव्हा बायको गाडीतून उतरते आणि म्हशींना त्यांच्या स्टाईलमध्ये हकलते.
हे हास्यास्पदच नाहीं का?
तरी सोशल मीडियावर स्त्री वादी स्त्रिया यावर बोलता, चिडता आणि भांडताय.
याचं कारण काय असेल ? म्हणजे स्त्रियांना हा विनोद आवडत नाही आणि पुरुषांना तो पटतोय. ?
मग मला वाटलं की विनोदासाठी यांच्याकडे असा बावळट नवरा का दाखवला गेला नाही?
मग प्रश्न येईल की या आधी अस झालं तेव्हा अशा स्त्रियांनी त्या लेखकाची पाठ थोपटली नाही. पण मग आज का या विनोदाच्या पद्धतीला गांभीर्याने घेतलं जात आहे?
तेव्हा मला आठवतात, ते नवरा बायकोचे मेसेजेस. जे प्रत्येक सोशल मीडियावर फिरत असतात. असे वाटते त्याचा आस्वाद घेण्याची सवय लग्न झाल्यानंतर प्रत्येक पुरुष स्वतःला लावतोच. याचाच पुढचा परिणाम म्हणजे आता तर स्त्रियाही हे स्वीकारून त्यावर हसतात. चला हवा येऊ द्या सारख्या प्रचंड लोकप्रिय शोज मधून याचे भागच्या भाग प्रसारित केले जातात.
यावर मन नाही भरत तर मी बघते माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका. तर तुम्ही म्हणाल बायकोला बिझनेस वुमेन दाखवायची तर त्याचा ग्राफ खालून वर असावाच. त्यासाठी बायकोने आधी बावळट असायलाच हवं. याचेच उदाहरण 'पुढचे पाऊल ' सीरियल. त्यामधील बायको धूळ पडलेला लॅपटॉप पाण्यात भिजवून वाळत घालते.
विनोद बुद्धीची वाहवा नाही करावी वाटत. वाटते,
आजही मराठी चित्रपटांना जसे चांगले दिवस येत आहे तसे मालिकांना केव्हा येणार?
मालिकांचे भाग लिहिताना कोणती मानसिकता डोक्यात असेल लेखकाच्या? या बायकोच्या अशिक्षित अडाणीपणाचा बोभाटा, त्यातून प्रेक्षकांकडून वाहवा, तिची भावनिक बाजू, नवऱ्याचा पुरुषीपणा याशिवाय   सिरियल बनणार कशा? आणि बनल्या तरी प्रेक्षक त्या स्वीकारतील? तर अशावेळी आठवण होते ,"एका लग्नाची दुसरी गोष्ट, दिल दोस्ती दुनियादारी सारख्या खुमासदार शैलीत उचलून धरलेल्या मालिकांची.
आज झी मराठी सारख्या ताकदीच्या वाहिनीवर यासारखी कृती दाखवली जाते. पुरुषांचे म्हणणे आहे की, इतक्यात या सीरियलचा प्रोमो बघून मत प्रदर्शन नको, कारण यात पुढे ट्विस्ट असतील. काय ट्विस्ट? कोणती वळणे? जास्तीत जास्त काय होईल ? एक बावळट गृहिणी बायको मुख्यमंत्री होऊन घरासह राज्य सांभाळेल. अशा स्क्रिप्ट लिहून काय होतं माहिती?
पहिले तर या अशा मालिका बघणारा वर्ग गृहिणी आणि जास्तीत जास्त कंटाळलेल्या पुरुषांचा असतो. त्यामुळे लेखक विचार करतो, या प्रेक्षक वर्गाच्या आवडीनुसार आणि अपेक्षेनुसार मालिका बनवू. म्हणजे माझी लेखणीही गाजेल आणि प्रेक्षकही खुश. पण असे प्रयोग खूप कमी होतात जिथे लेखक आपल्या लेखणीतून अनपेक्षित कलाकृती बनवतो. ज्यातून जास्त काही नाही पण आपण जे लिहिलं त्यातून मानसिकतेत बदल होतो.

मला माहिती आहे आपला समाज ना कीर्तनाने सुधारला ना तमाशाने बिघडला. पण मला हे चूक वाटतं, कारण गृहिणीच्या वागण्यात मालिकांमुळे नकळत एक बदल घडत असतो कारण मालिकांचे आयुष्य हे जास्त असते.  त्यामुळे बघणाऱ्यांच्या कानावर, डोळ्यावर, मनावर हे नकळत परिणाम करत असते. आणि एखादी गोष्ट सतत कानावर पडत राहिली की आपणही ती तशीच आहे असे मानून चालतो. त्यामुळे आपला समाज हा बदलत्या मानसिकतेचे नाटक करतो. त्यामुळे त्यांना अशा पद्धतीने विडंबन करून स्त्रियांचं सामर्थ्य पचनी पाडण्याचा लेखकाचा प्रयत्न प्रामाणिक का असेल पण या सगळ्याची गरज नाही वाटत.
कारण देश इतकी शतके पुढे गेला तरीही आजही बाष्कळ आणि बावचाळलेली विनोद बुद्धी बदललेली दिसत नाही. आपली पायामुळे आणि संस्कृती लोक सोडत नाही, सोडणार नाहीत. त्यामुळे हे असे केविलवाणे प्रयत्न एखाद्याच्या दुर्बुद्धी ला आवडणारे असतील पण त्याचे नकारात्मक परिणाम होत असतात.
विनोद बुध्दीचे प्रकार नसतात. तीही लिंग भेदात विभागलेली असते. हे माझं विधान काहीसं स्त्रीवादी असेलही पण मला चुकीचं वाटत नाही. कारण माझ्यासमोर दोन उदाहरणे उभी राहतात, एक काल संसदेत रामदास आठवले यांनी राहुल गांधी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना वापरलेली विनोद पद्धती आणि तीच विनोद बुद्धी  स्त्रियांवर विनोद करायचे म्हटले की तिचा कमीपणा लक्ष्यकेंद्री करून किंवा जास्तीत जास्त तिच्या शरिरपर्यंत मर्यादीत असते.

त्यामुळे स्त्रीवादी न होता हा केविलवाणा प्रयत्न नाकारण्याचे धाडस करेल. पण या मालिकेच्या पूर्व जाहिरतीवरून लेखक काहीतरी शिकेल, अशी अपेक्षा .

विनोदबुद्धी की मागासलेपणाचे प्रतिबिंब

by on जून २३, २०१९
-मिसेस मुख्यमंत्र्यांना सोशल मीडियावर नापसंती मुख्यमंत्र्यांच्या गाडीवर सांडगे वाळत घालणारी बाई पहिली का हो. ! विनोदच आहे हा. मह...


"दूर ५० मीटरवर एक बाबा उन्हाळ्यात पाणी, आईसक्रीम विकत बसलेले दिसतात."

त्यांच्याशी संवाद वाढवायचा, त्यांना म्हणायचं,
"काय हो बाबा, हि दगडं कशी पडली?" यावर ते त्यांच्या रोजच्या पर्यटनाची कॅसेट सुरू करतात.
त्यात एक गोष्ट प्रकर्षाने सांगितली जाते, "ते तुम्हाला आवडतेय ना दूरवर ते झोपडीचं ठिकाण. तिथे अजिबात जाऊ नका ( दबक्या आवाजात).
हे काहीतरी थ्रिलिंग वाटत होतं म्हणून मी त्यांना विचारलं, "का हो बाबा? छान आहे कि ती झोपडी. या मंदिरासारखी पडलेलीही नाही."

त्यावर ते काहीच आश्चर्य न दाखवत म्हणू लागतात, "काही दशकापूर्वी त्याच दूरवरच्या झोपडीत एक वर्हाड गेलं होतं. तेव्हा झोपडीच्या तिथून लागलीच मंदिरात यायला भुयार होतं. लोकं पाण्यामुळे तिथून ये-जा करायचे. पण एके दिवशी त्या भुयारातून गेलेलं जोडपं अन त्यांच्याबरोबरच वऱ्हाड पुन्हा कुठे कधीच दिसलही नाही आणि मंदिरापर्यंत पोहोचलही नाही. त्यामुळे इथून जाताना थोडं जपून!
तेथील कोरडी जमीन, अनोळखी माणसे आणि हे वेगवेगळे किस्से यामुळे मनाचे आधीच भीतीने खिळखिळे झालेले फुफ्फुस हळूहळू स्वतःला समजावू लागताच ते पुढे म्हणतात,
"तुम्ही आता ज्या उंच कळसाला पाहत आहे ना, त्याची दगडं आतून पोखरली गेली आहे आणि ते बाजूचं वेगळं पडलेलं मंदिर आहे ना, त्याच्या आत गेले की एका वृत्तपत्राच्या पानावर कुंकवाचे सडे दिसतील. त्या आतल्या भागाला ओलांडण्याचे चुकूनही धाडस करू नका."
तरी बरे त्यांनी सांगायच्या पूर्वीच ते धाडस मनाने करून झालेलं होतं. त्यामुळे मनात कसलाच किंतु न ठेवता ते अनुभवले तरी.
त्यात वेगळं काही नव्हतं. कारण 'कुंकवाचा पडलेला लाल सडा हा मनाला अडवेंचर जगायला शिकवतो.'
मी ते डोळ्यासमोर आणून बाबांचं ऐकू लागते.
बाबा बोलू लागतात, "अन् त्याच एकट्या मंदिराच्या बाहेरच्या बाजूच्या शिळांना दुसऱ्या एका बारीक दगडाने वाजवून पाहा. तिथे असलेल्या प्रत्येक पाच दगडातून वेगवेगळा आवाज येतो. हा प्रयोग मी करून पाहिलाच. तेव्हा मला कळलं प्रत्येक दगडाची ठेवण ही वेगळी आणि काही दगडे ढीली झाली आहेत. बरीच कारणं असू शकतात. त्यामुळे या गोष्टीला मी घाबरले नाहीच.
मग "हा मंदिराच्या बाजूलाच एवढ्या मोठ्या दगडांचा ढीग कसा? "

मी खूप वेळ त्या ढीगाकडे पाहत होते, तेव्हापासून डोक्यात सतत चालू होतंच. तोच ते म्हणाले, "हा मंदिराच्या बाजूलाच एवढा मोठा दगडांचा वेडावाकडा ढीग तो त्या काळात होता मोठा तटबंदी दरवाजा."
असे वाटले जसे काही वर्षांपूर्वी घडलेलं सगळंच कल्पनेच्या स्वरूपात माझ्यासमोर पात्रांसकट उभे राहिले. हा सगळा एका नव्वद वर्षाच्या मूर्त माणसांकडून मिळालेला 'पळसदेव'चा वसा.
यावरून त्यांना हे सांगायचं होतं की, आजही हे मंदिर म्हणजे पुरातन घटनांचं वास्तव्य असलेलं ठिकाण आहे.

मी होकारार्थी मान डोलावत पुढे आले खरी. पण डोक्यात या जुन्या समजुतीचे पारायण चालू होते.
उर्वरित प्रश्र्नांपैकी "नेमकं त्या जोडप्याचं काय झालं असेल ?" एवढा प्रश्न अनुत्तरित राहत होता.
तेव्हा मंदिराच्या इतिहासाची उत्सुकता चाळवली -
पळसदेव गावात असलेलं हे पळसनाथ मंदिर. चालुक्य राजाने, ८ ते ११ या तीन शतकांमध्ये हेमाडपंथी पद्धतीने बांधले. पुण्याहून हे मंदिर १३० किलोमीटरवर आहे. जायला साधारण ३ तास लागतात.
पुण्याहून सोलापूर रस्त्याने जाताना, भिगवाणच्या पुढे गेल्यानंतर उजनी धरणाची मागची बाजू दिसू लागते. त्या मागच्या बाजूचा रस्ता कापत कापत जेव्हा हळूहळू पुढे जाऊ लागतो.
तिथे दूरवर अर्ध्या पाण्यात एक जुन्या घडणीतलं मंदिर दिसू लागतं. हे काहीतरी चित्रपटाच्या शूटिंगची आठवण करून देणारं असतं. 
या मंदिराचा एक स्वतःचाच नियम असतो.
पाणी खूप असेल तर पाण्याचा फक्त वरचा भाग किंवा कळसच दिसतो. परंतु सध्या महाराष्ट्रातल्या दुष्काळाने होरपळलेल्या जमिनींमुळे पानी पातळी प्रचंड प्रमाणात खाली गेली आहे. त्यामुळे हे विदारक चित्रण असले तरीही, पळसदेव बघणाऱ्यांसाठी हा एक विचारात पाडणारा पण पर्वणी अनुभव असतो. 
कारण काही वळणे पार केल्यानंतर एका पॉईंटला पोहोचल्यानंतर स्वतःची वाहने आपण नेऊ शकत नसतो. केरळात असते तसं ह्या बाजूने त्या बाजूला जायचे तर प्रत्येकी ५० रुपये नाववाल्याला देऊन मंदिरापर्यंत पोहोचणे शक्य होते.

त्यानंतर हळूहळू वातावरणाचा अंदाज घेत मन प्रसन्न आणि नवं खाद्य मिळाल्यासारखे कावरबावर होऊन सगळचं न्याहाळू लागते. प्रवास पाण्यातून जाणारा असल्यामुळे मन मंदिरापर्यंत पोहोचण्याआधीच प्रसन्न होऊन जाते. नावाडी हे दिवसातून अशा अनेक पर्यटकप्रेमींना हे सुख देत असतात. त्यांची कमाई दिवसाला अंदाजे सातआठशे होते, असे हा प्रवास करताना त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर लक्षात येते.
इथे प्रामुख्याने दोन मंदिरं आणि एक धर्मशाळेची परस आहे.

या मंदिरांच्या आवारात जरी मन प्रसन्न होत असले तरी एका दृश्याने मनाची घालमेल होते कारण येथील मुख्य मंदिराच्या कळसाला ज्या आखीवरेखीव दगड, शिळांचा आधार आहे. त्यावर संपूर्ण टोकापर्यंत, कळसाच्या भागापर्यंत चपला घालून, धडधड आदळत वर जाता येणं शक्य आहे. 
हि एक व्यक्ती म्हणून लज्जास्पद मानसिकता आहे कारण येथे जाणारे लोक हे त्या मंदिराची डागडुजी किंवा बांधकाम बघायला न जाता ते तिथे सेल्फीज, टिकटॉक व्हिडीओज किंवा फोटोज काढून सोशल मीडियावर कुल दिसण्यासाठी जातात. त्यामुळे इथे एखादीतरी 'दिशादर्शक' पाटी असावी. जेणेकरून त्या मंदिराचे पावित्र्य आणि त्यावरील भाग विस्कळीत होणार नाही. 
१९७८ला जेव्हा उजनी धरण बांधले गेले त्यांनतर हे मंदिर फक्त इ.स. २००१, २०१३, २०१६, २०१९ ला पाण्याबाहेर आले होते. 
मंदिराच्या दिशेने गेल्यानंतर पात्रे, चौकोनी खांब, लवा, बेल, स्तंभ या पंचशाखांच्या पायाभरणीवर सुस्थितीत दिसते. नंदी, मरगळ, सुंदर शरीरयष्टी असलेले आणि अजंठा लेण्यांवर कोरलेले दगडातील शिल्प इथेही आहे, जुन्या दगडांना हे कोरलेले दगड शोभून दिसतात. 
मंदिराची भटकंती झाल्यानंतर पाऊलं आपोआप उजनी धरणाच्या पाण्याकडे जाऊ लागतात, कारण उन्हाच्या झळांनी लाही लाही झालेला प्रवास दूर लोटण्याचा प्रयत्न त्यात असतो. महाराष्ट्रातला दुष्काळ त्या उजनीच्या पाण्याच्या बाहेर असलेल्या जमिनीत भेगा खोदून खोदून झिरपलेला दिसतो. तेव्हा पायाला मेलेले मासे, खेकडे आणि बगळे लागतात. तरीही येथे येणाऱ्या पक्षांची उजनीसोबतची नाळ तुटत नाही. ते याचा मनसोक्त आनंद एखाद्या कट्ट्यावर बसून लुटत राहतात.



मन आतापर्यंत हा दुष्काळ स्वीकारण्याची तयारी करतो कारण प्रवासात आणलेली पाण्याची बाटली हि पळसदेव लागायच्या आधीच संपलेली असते आणि बाबांकडून विकत घेतलेल्या पाण्याने कोरड संपत नसते. जेव्हा दुष्काळ आपल्यापर्यंत पोहोचतो तेव्हा त्याची झळ, दाहकता आणि त्यातलं वास्तव याची धग जाणवू लागते. ते कोरडे दृश्य मनाला वाचा फोडू लागतं.


उजनीला आलात पण उजनीचे 'मासे' नाही खाल्ले असे मांसाहारी नाहीत. त्यामुळे भिगवणची खासियत म्हणून तिथल्या चवदार, बोटे चाखत बसावे अशा माशांचा धंदा करणारा व्यापारीही मंदिराच्या ५० मीटरनंतर तुमची वाट पाहत असतो.
परतताना जास्त काही नाही पण मंदिराचं सौंदर्य, गुपितांची कुपी अन् बाटलीच्या तळाला लागलेल्या पाण्याच्या घोटाचं महत्त्व अधोरेखित करून मन नाविन्याने पण खिन्न होऊन जाते.



सुचत नाही कधी कधी... सुन्न व्हायला होतं. सगळं आयुष्य रुक्ष वाटू लागतं. जेव्हा डोकं 'डिप्रेशन ' नावाच्या राक्षसाच्या तोंडात जाऊ लागते. मन हात वर करून त्या खोलात जाणाऱ्या ' स्वतःला ' बाहेर ओढत असते, पण डोक्यातल्या डिप्रेशनने स्वतःवर ताबा मिळवलेला असतो.
नकारात्मक सहवास, एकटेपणा, स्वतःशीच बोलणे, तर्क वितर्क लाऊन स्वतःवर प्रेम न करणे, स्वतः बद्दल शंका उपस्थित करणे, खूप खूप मेहनत करून सतत अपयशच येणे, करीयरच्या टप्प्यात आपल्याला हे जमत नाहीये अस वाटणे यामुळे हे डिप्रेशन अधिकाधिक वाढू लागतं.
माझं तसचं होऊ लागलंय.
माझं वय कमी आहे असं आजूबाजूचे म्हणतात.
हेही म्हणतात की, तू राहते, दिसते, हसते सगळं नॉर्मल आहे. मग डिप्रेशन आलंय कसलं. ?
मी माझ्या मनात येणारे असंख्य नकारात्मक विचार टाळू लागते. पण तरीही हे डिप्रेशन जात नाही... मला वाटतं की हा कुठेतरी माझा नाही, माझ्या पिढीचा आणि येणाऱ्या पिढीचा दोष आहे.
त्यानंतरच्या पिढ्या या जन्मतः तयारीनिशी येतील. पण आम्ही जे जन्मलो ते सगळे अर्ध्य्या हळकुंडाने पिवळे होऊन आलो, आणि आजही तसेच आहोत.
वाटते, टिकाव लागावा या स्पर्धेच्या युगात.
वाटते, हातातून काहीच सुटू नये.
वाटते, आपण करू शकतो काहीतरी अचंबित मग का करू नये?
नव्वदीत जन्मल्यांचा हा एकंदरीत  प्रॉब्लेमच झाला आहे. एकतर ते ना तळ्यात ना मळ्यात. ते इतके भरकटले आहे की रस्ताच स्पष्ट नाही आणि रस्ता स्पष्ट नसला की आयुष्याची फरफट होते. आणि ही फरफट म्हणजे "डिप्रेशन."

हे लिहिण्याचे कारण माहिते? काल सोशल मीडियावर एकाने त्याची आत्महत्येची नोट शेअर केली. " मी तुमच्यापासून खूप खूप लांब जात आहे. आई बाबा मला क्षमा करा"
"आत्महत्या? ". मी शंकेने स्वतःलाच विचारले.
"नाही तो असं करणं शक्य नाही. " मीच त्याचं उत्तरही दिले. पण तरीही ही नोट म्हणजे काय होतं ? हे मला सुरुवातीला कळलं नाही. कारण ज्या व्यक्तीने हे लिहिलं होतं, तिच्याबरोबर माझे अनेकदा बोलणं झालेलं. चांगला चोविशितला तरुण तो.
लगेच तातडीने फोनच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये त्याचं नाव शोधलं आणि कॉल लावला. फोन स्विच ऑफ होता. मला त्या पोस्टचा तर्क लावायचा नव्हता. कारण तो आत्महत्या करेल, असं कधी मनातही आलेलं नव्हतं. कारण, तो आताच्या पिढीतला तरुण होता. पण तो 'आताच्या पिढीतला' हे मी अनवधानाने विसरत होते.
तेव्हा मी स्वतःपासून विचार करू लागले. ही आताची तरुण पिढी म्हणजे नव्वदीत जन्मलेली उनाड बालकं. ज्यांना लहानपणी वाटायचे, आयुष्य हे  लहानपणी नकळत, निरागसपणे जगण्यासाठी आणि मोठं झालं की, जाणते होऊन पोटा पाण्यापुरत कमावण्यासाठी असते. हे आयुष्याचं प्लॅनिंग जणू लहान असतानाच त्यांचं ठरलेलं होतं.
पण मधल्या काही काळात तंत्रज्ञानाचा वापर जो भरमसाठ वाढला आणि झपाट्याने स्पर्धा वाढू लागल्या, तेव्हा वर्गातल्या एका विद्यार्थ्याला पहिलं येऊन चालत नाही, या स्पर्धेत चिरडले जाऊ नये म्हणून प्रत्येकाला स्वतःची ओळख घेऊन फरफट करत का होईना रस्ता कापावा लागतो. तसं या नव्वदितल्या मुलांचं झालं.
ही स्पर्धा म्हणजे कोणतंही ध्येय असो, चालत रहा, जिथे चालणं थांबेल तिथे तुमचे विचार थांबतील. आणि विचार थांबतील तेव्हा तुम्ही या स्पर्धेच्या खूप मागे गेलेलं असाल.
मला भीती हीच वाटते, जर आपण मागे पडलो या स्पर्धेतून तर?

आताच्या तरुणाईसाठी दोन गोष्टी एका तराजूत असतात,
"जगणं आणि स्पर्धा."
जगायचं म्हणजे आठवड्यातील पाच दिवस नोकरी, रात्री निवांत झोप, घरातल्यांबरोबर जेवण, आठवड्याचे शनिवार रविवार सुट्टी आणि सोमवार पासून पुन्हा कातरवेळी फिरायला गेलेलं मन जागेवर आणून कामाला लागणे. पण जेव्हा हाच तराजू स्पर्धेच्या पारड्याकडे झुकवावाच लागतो तेव्हा मात्र हाच तरुण दिवस-रात्र फोनचा डब्बा डोळ्यासमोर धरून स्वतःच्या प्रत्येक इंद्रियांची कसब लावत, स्वतःच्या आतल्या कसोटीला पिळून काढून पणाला लावतो. मग त्यातून कुठेतरी वाहवा मिळाली की तेवढ्यापुरता मनाला, डोक्याला शांतता. कारण स्पर्धेच्या जगात आज जे आहे ते उद्या अदृश्य झालेलं असतं . उद्या नवीन काहीतरी हवंच. रोजचा दिवस आपला नसतो. त्यामुळे रोजचा दिवस आपलाच असावा, या हट्टापोटी आता आता तंत्रज्ञानाच्या जाळ्यात अडकलेली तरुण पिढी रात्र रात्र फोनच्या डब्ब्यात तळागाळात काहीतरी शोधत, बनवत राहते. असं करत करत नोकरीवरून आलेला दिवस संपून पहाटे ४- ५ वाजेपर्यंत स्वतःच्या छंदाचे लाड पुरवत पुन्हा सकाळी १० च्या नोकरीसाठी कंबर कसून , मनाची तयारी करून त्याच उत्साहात ते तयार होतात.
पण हा उत्साह जुन्या पिढीसारखा म्हातारपणापर्यंत टिकत नाही. याचे कारणच ही, तरुणाई ही कमी-अधिक वेगाच्या रेषेत पुढे जाते. समतोल नाही यात. यामुळे डोक्यावर ताण येऊ लागतो.
शिवाय या स्पर्धेच्या युगात डोक्याच्या प्रत्येक तंतूला कामाला लावलेलं असताना घरात गेलं की घरातल्यांची वेगळीच अपेक्षा असते. पिढीतले हे अंतर त्यावेळी समजून सांगण्याच्या परिस्थितीमध्ये तरूणाई नसते. त्यामुळे घरातल्यांनी फायद्याचे सांगितले तरी ते टाळले जाते. यामुळे हळूहळू घरातून खटके उडू लागतात. आणि परिणामी, बाहेरचे टेंशन असतेच त्यात घरातून बाहेर पडताना बाहेरचे टेंशन यामुळे डोकं सतत जड वाटू लागतं. आपण हसायचा प्रयत्न केला तरी हसू येत नाही, कुणाला मदत करावी वाटते पण शरीरात उर्जाच शिल्लक राहत नाही किंवा मग कधीतरी हे सगळं आपण करतोय ते चूक करतोय हे कळत असूनही आपण स्वतःच्या मनातल्या मनातच चिडचिड करू लागतो. सगळं जग दुष्ट वाटू लागतं.
यात हळूहळू एकेका घटनेची भर पडत जाते आणि ही डोक्यातल्या गच्च भरलेल्या किड्यांची संख्या वाढू लागते. मनाला कोचे पडून जातात, पोखरून जाते आपलीच विचार शक्ती. तरीही हे थांबत नाही आणि अस करत करत सगळे आतले प्रयत्न करून झाले की मन थकते. मग ताबा मेंदू घेऊ लागतो आणि मेंदूकडे ताबा जाऊन गोष्टी अधिकच अनपेक्षित घडू लागतात. आणि शेवटी मनासमोर हार मानलेला मेंदू आत्महत्येच्या खोल दरीत मारून टाकायला जातो स्वतःला.
यानंतर मला बोलावंसं वाटतं...

आमची पिढी चुकतेय.

स्पर्धा आहेत.
खूप आहेत.
आता तर जागतिकीकरणानंतर त्या आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू झाल्या आहे. पण आपण थोडे थांबूया. थोडासा कणाकणाने विचार करूया. थोडासा या मौल्यवान आयुष्याचा विचार करूया! 
पूर्णच थांबून जाण्यापेक्षा आपली स्पर्धेत राहण्याची गती मंद ठेवूया, जितकी तुम्हाला झेपेल तेवढीच आणि एक मात्र करूया, फोनच्या डब्ब्यात सुख शोधणं बंद करू.
एकटेपणा आला की फोन घेतो आपण. हे घाणेरडं व्यसन आहे. कारण जेव्हा मनाला संवाद करायचा असतो तेव्हा जीवंत माणसेच लागतात समोर. पण सोशल मीडियावर होणारा संवाद हा डोक्याने केला जातो. कारण चॅटिंग करताना, पोस्ट करताना, कमेंट करताना आपण नेहमीच प्रत्येक शब्दाचा विचार करतो. डोक्याला विचार करण्यासाठी वेळ देतो. पण तसं प्रत्यक्षात माणूस समोर असेल अशावेळी बोलताना आपले हावभाव, आपले मन जो स्वभाव असेल तसं व्यक्त होत जातो. 
सतत डोक्याने होणारा मशिनसारखा संवाद तुमच्या मनाच्या उत्साहाला, ऊर्जेला अधिक निकामी करत आहे.
"दिवसातून किमान ५ लोकांबरोबर बोला, यामुळे तुम्ही विचार न करता मनापासून बोलाल" आणि जेव्हा कमी विचार असतील तेव्हा कामही अधिक होईल आणि हळूहळू स्वतःचं अस्तित्व तयार होईल. जेव्हा मन सुदृढ असेल तेव्हा आयुष्य सुंदर वाटेल.
डीप्रेशनचा प्रवास सुरू होतो. हे तडकाफडकी नसतं. कारण डिप्रेशन हा डोक्याने घेतलेला निर्णय असतो. त्यामुळे अशा आत्महत्येच्या वाटेवर जाणाऱ्या तरुणाईने लोकांशी बोलावं. कोणीही अनोळखी असो बोलायचं. रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांच्या आयुष्याचा विचार करायचा. रस्त्यावर जाणाऱ्या किती लोकांच्या चेहऱ्यावर आज हसू आहे हे बघायचं. जगात एवढी लोकसंख्या आहे त्यात स्वतःला कशात तरी सतत गुंतवून ठेवायचं. त्याशिवाय हे एकटेपण दूर होणार नाही.
एकटेपणाचा मोह असतो, ते व्यसन करू नका...
नाहीतर स्वतःच स्वतःचा इतका तिरस्कार करू लागाल की स्वतःचाच जीव घ्याल !
त्यामुळे समाज कितीही खराब, सडक्या मनोवृत्तीचा म्हणत असलो आपण तरी त्यातले आपले आवडते लोकं निवडायचे आणि त्यांच्याशी मूर्त स्वरूपात तोंडाने बोलायचं. व्यक्त व्हायचं. ही खरी  प्रक्रिया सुरू करायची...
एवढाच एक उत्तम उपाय डिप्रेशन विरोधात लढण्यासाठी मला वाटतो. कारण हे तंत्रज्ञानाच्या युगात कंप्युटरच्या निर्जीव दगडासमोर बसणे, सोशल मीडियावर पोस्ट करणं, त्यावरच जगणं, खुश होणं, हे मशिनच्या प्रजातीचे लक्षण.
मशीन होणं माणसाला जमणार नाही, त्यामुळेच तो डिप्रेशनमध्ये जातो. त्यावर लोकांचा लोकांबरोबर असलेला मुक्त संवाद वाढायला हवा, एवढेच कळकळीने वाटते.