Sufi


"अगरबत्तीचा धूर... जर मी अगरबत्ती पेटवून तिला आयताकृती हवाबंद डबीत कोंडून घेतलं तर ?
निर्जीव ती, श्वास कोंडेल तरी तिचा...?
तिचा श्वास कोंडण्याची मी वाट का पाहावी ?
आपण आपल्या आयुष्याच्या पलीकडे जाऊन का कुणाच्या आयुष्यावर ताबा मिळवायचा प्रयत्न करत असतो?
पण तरीही तिची दमछाक एक सोहळा म्हणून पाहण्यासाठी मी तसं करत जाते... 
तेव्हा, तिची घुसमट, नाकातोंडाचा श्वास संपून, शरीरातला होता नव्हता श्वास संपवत ती शेवटच्या क्षणी श्वास सोडून द्यायला जाते तेव्हा ती विझून जाईल का... ? असा हा निर्दयी आनंद मी या उघड्या डोळ्यांनी पाहू लागते.
मग अशावेळी जर थोड्या माणुसकीच्या लेबलाला जागत मी मरणाच्या दारातून तिला बाहेर काढलं तर नेमकं तिचं काय होईल? या शक्यतांना मी सजवू लागते. 
तिला बाहेर काढल्यावर श्वास एकदाचा मोकळा झाल्याच्या आनंदात (?) भपक्याचा लोटच्या लोट बाहेर पडेल तिथे...  धुराचा...? 
ती राख, चिंगारी आणि अंगारा वाटेल?
आणि तेव्हाच ती कधीही भडका करून पेट घेण्याची शंकाही मी तिच्यावर घेईल.
कारण, जे तिला बाहेर काढल्यानंतर घडेल ते सगळं एका घुसमटलेल्या जीवाचा तळतळाट असेल."
ही घुसमट, हा तळतळाट म्हणजे तांडव आहे. या पुस्तकाच्या नावाप्रमाणेच वास्तविक घटना, ज्यांना पूर्वीपासून रितीरिवाजांची तोरणे लावून सोहळ्यासारखं साजरा केलं जातं, त्या या समाजमान्य रिवाजांच्या अवडंबराचा तांडव म्हणजे हे पुस्तक.

हे पुस्तक अनेकदा अनेकांच्या तोंडून मौखीकरित्या माझ्यापर्यंत पोहोचलं होतं पण त्याच्याशी प्रत्यक्ष भेट ही या रविवारच्या कातरवेळी झाली.
गॅलरीत कपात एक अस्खलित अद्रक घातलेला कडक चहा घेऊन सायंकाळच्या वेळात हे पुस्तक मी हातात घेतलं, बाकी काही नाही चहातील कडकपणा, त्याचा रोजचा तळफळाट, त्याच रोजचं उकळणं आज पहिल्यांदा मला खूप जवळून जाणवलं, कि मग मी पुस्तकाच्या पहिल्या पानावरूनच पूर्वीच्या वास्तवातल्या प्रत्येक गोष्टीला आताच्या वास्तवात रिलेट करू लागले होते? 
माझ्या मनाच्या प्रत्येक विचारांत किंचितसा बदल झालेला जाणवत होता मला.
पुस्तकाची पाने जसजशी पुढे जात होती. माझे डोळे सुसारासारखे मोठे होत, त्या काळातल्या प्रत्येक रिवाजामुळे तापत होते.  
पुस्तकाच्या ४५व्या पानावर मी होते. जिथे सतीप्रथेचं त्या काळातील ते वर्णन अगदी हुबेहूब मांडलं होतं. त्या क्षणापुर्वी मी कधीच सतीप्रथा काय असतं याबद्दल जागरूक नव्हते. फक्त पतीच्या चितेत, जिवंत पत्नीही सती जाते, एवढी या प्रथेची तोंडओळख होती. पण काल जेव्हा या आताच्या जगात मुलगी म्हणून वावरत असताना मी हा सतिप्रसंग या उघड्या डोळ्यांनी, मनाने आणि शरीराने वाचला, तेही कुठल्याच बंधनाविना. तेव्हा मला अभिमान वाटत नव्हताच कि माझी त्यातून सुटका झाली. मला अभागी वाटत होतं त्या सती गेलेल्या कित्येक स्त्रियांसाठी.  
त्यावर बोलण्याआधी ते वर्णन मला आधुनिक पिढीपर्यंत पोहोचवावे वाटते, तो प्रसंग असा होता... 

"सतीचा माळ ( सती जाण्याचं वर्णन पहिल्यांदाच वाचल म्हणून पुस्तकातील वर्णन जसच्या तसं टाईप करून टाकत आहे )
माळावर झाडाखालीच्या हालचालीला वेग आला होता. खणल्याचा धुपधुप आवाजही येत होता. पाद्री आपल्या मांगरातून निघून खाली सतीच्या माळाच्या बाजून चालायाला लागला. तिथं वरच्या बाजूला बरीच गच्च झाडी होती, त्याच्या आडोशाला तो उभा राहीला. तिथं त्यांनी कमरभर खोल एक खड्डा खणला होता. त्या खड्यात लाकडं टाकून चिता रचाली होती. आता ते पाचसहाजण झाडाझाडांच्या बुंध्यांशी बसून वाट पाहत होते. सगळे उगी चिडचीप होते. कुणी कुजबुजत ही नव्हता. इतक्यात अकस्मात ढोल बडवल्याचा, झांज वाजवल्याचा आवाज येऊ लागला. काही वेळान आवाज जवळ आला आणि कानालाच भिडला. पाद्री अत्यंत धिर होऊन आवाजाच्या दिशेने पाहत होता. वाजंत्र वाजवीत, माणसांचा घोळका त्या बाजूनं येत होता. सर्वात पुढे खंद्यावर एक तिरडी होती. तिरडीच्या मागून पांढरी वस्त्र परिधान केलेली, मळवट भरलेली एक स्त्री चालत होती. स्त्री कसली ती, एक पंधरा सोळा वर्षाची मुलगीच होती. ती गोरी कृश बांध्याचीच होती. रडून रडून तिचे डोळे सुजलेले होते. आत्ताही सारखी रडत होती. स्फुंदून स्फुंदून  रडताना मध्येच तिचा श्वास छातीत अडखळत होता. पायही लडबडत होते. गुंगीची औषधं घेतल्यासारखी मधूनच झोकांड्या देत होती.
त्या घोळक्यात काही स्त्रिया ही होत्या. ते सर्व माळवरच्या सीमेवर येताच थबकले. बरोबरच्या स्त्रिया काही वेळ छाती बडवून घेत मोठ्यामोठ्यानं रडल्या. मळवट भरलेल्या स्त्रीला नमस्कार करून त्या निघून गेल्या. ढोलताशे अवसर आल्यासारखे मोठ्यामोठ्यानं वाजतच होते. ढोल तर इतका मोठा होता, वाजवणाऱ्याच्या गळ्यापासून ढोपरापर्यंत लोंबत होता. 
त्यांनी तिरडी आणून 'वाट संपली रे देवा' म्हणत खड्यातल्या चितेजवळ ठेवली. त्या सती स्त्रीला एका दगडावर तिथंच बसवलं. मग तिरडीचे पाश कोयत्यानं कचाकच तोडून प्रेत खाली चितेवर ठेवलं. बरोबर खांद्यावर पेटत्या गोवऱ्या आणि पाण्याच्या लहान मडक्याची कावड घेऊन एक लहान मुलगा आला होता. तो ईं ईं करून सारखा रडत होता. मधूनच तो भिऊनसा एखाद्याला विचारत होता,  "वाहिनीला आणि कशाला आणलंत हो तुम्ही इथं".
तो मेलेल्याचा धाकटा भाऊ प्रेताला अग्नी देणार होता. त्या खांद्यावर जाणत्यांनी पाण्यानं भरलेलं मडकं दिलं. पाठीमागून त्या मडक्याला कोयत्याची चोच मारून भोक पाडलं. ती गळकी धार सांडीत त्यानं त्या स्त्रीसह चितेला तिन प्रदक्षिणा घातल्या, मग मडकं तसंच फोडून टाकलं भूमीवर आपटून. आता परता ढोल, झांज, ताशा रंवरंवत वाजत होते.
सती स्त्रीला आणून त्यांनी खड्याच्या कडेला एका दगडावर आणून उभी केली. एकीकडं ती रडत होती. दुसरीकडं दगडावर तोल सावरून उभं राहायचा प्रयत्न करत होती. परत परत तिचा तोल जात होता. पाद्री सिमाँवला वाटलं, निःसंशय या लोकांनी तिला गुंगीच काही खाऊ घातलं आहे. ती गरीब असाहाय्य स्त्री, ते दांडगे पुरूष, वाजणारी वाजंत्रं यांमुळे तो संभ्रमित होता, भयग्रस्त झाला होता. त्याला काहिच सुचत नव्हतं. पुढं होण्याचं धाडसही होत नव्हतं. तो पुतळ्यासारखा स्तब्ध उभा होता. 
ढोल आभाळापर्यंत वाजत होता. ती स्त्री त्या खड्यातल्या नवऱ्याच्या प्रेताकडं पहायलाही तयार नव्हती. दिवस आता बराच वर आला होता. तरी वराच्या कदंब वृक्षाच्या पानांतून अजून काळोख गळतोय असं वाटतं होतं. चितेवरचं ते प्रेत कधीपासून कुजायला टाकलं आहे, त्याचं पोट फुगलं आहे. त्याला बुट्टाण दुर्गंधी मारतेय असं उगीच वाटतं होतं. तिथं पूर्ण जिती जिवंत होती ती स्त्री. ती व्याकूळ होऊन रडत होती आणि सर्वांगानं थरथरत होती. 
कुणीतरी उंडेलच्या तेलाचा मटका चितेवर रिता केला होता. बरंच सरण तेलानं भिजून गेलं होतं. त्या मुलानं चुडतांची चूड पेटत्या गोवऱ्यांवर पेटवून घेतली आणि चितेला अग्नी दिला. तेलासह सरण पेटू लागलं. शिळेवर उभ्या असलेल्या त्या स्त्रीकडे एक वयस्क माणूस गेला आणि त्यानं ढोलताशांचा आवाज भेदीत मोठ्यामोठ्यानं म्हटलं, "आयाव मरण मेल्यास स्वर्गाचं द्वार तुला उघडं होईल. नवऱ्याच्या चितेत तुझ्या पापाचं जळून भस्म होईल. तुला मुक्ती मिळेल. तुला मोक्ष मिळेल. जन्मोजन्मी तुला हाच नवरा मिळेल.
तू देवीच्या पदवीला पोचशील.
तू अंखड आयाव राहशील.
तू मोठी पतिव्रता होशील.
आता कचरू नकोस. भिऊ नकोस. आनंदानं नवऱ्याच्या चितेच्या अग्नीचा स्वीकार कर".
चितेच्या अग्नीच्या उठलेल्या ज्वाळा एकदम तिच्या अंगावर आल्या. त्या तापानं ती एकदम मागे सरकली. तेव्हाच त्या वयस्क माणसानं आपल्या दोन्ही मुठी पाठीमागून तिच्या कमवरेवर टेकवून तिला आगीत ढकलून दिलं. तेव्हाच वरच्य लोकांनी हरहर महादेवाचा गजर केला. वाजंत्रं उच्छादं मांडल्यासारखी वाजत होती. झांजेचा झ्या झ्या आवाज कानावर झापडं टाकत होता. 
चितेवर पडलेली ती मोठ्यामोठ्यानं किंकाळ्या मारत होती. अकस्मात तिनं चितेतून बाहेर उडी मारली आणि ती खड्याच्या कडेवर आपटली. तिथं एक माणूस हातात लांब दांडा घेऊन उभा होता. त्यानं तिला पुन्हा आगीत ढकलली. तिच्या किंकाळ्या चालूच. 
पाद्रीला ते पाहवलं नाही. तो दुखावला, तिरमिरला, देहभान विसरून चितेकडं धावला. "काय करता तुम्ही हे, दुष्ट पाप्यांनो? देवा नरकात ढकलेल तुम्हांला."
तो त्या स्त्रीला ओढून घेण्यासाठी आगीत हात घालून पाहत होता. पण चारपाच जणांनी त्याला ओढून, बाजूला नेऊन जमिनीवर आपटला. एकानं हातातल्या काठीनं त्या मारलं, "हा परधर्माचि चांडाळ आमचा मरणविधी भ्रष्टवायला आला आहे. आमची क्षत्रियांची वंशपरंपरा आहे ती. चल चालायला लाग इथून."
पाद्री सिमाँव उठला आणि धडपडता चालायला लागला. त्याला आता चितेच्या दिशेला पाहण्याचंही धाडस नव्हतं. पण आता त्या स्त्रीचा आवाज मावळला होता. तिचा आता कोळसा होऊ घातला होता.
पाद्री जड पावलांनी आपल्या मांगराशी परत येत होता. मांगराच्या दाराशी पोचल्यावर त्यानं मागं वळून पाहिलं. वाजंत्रांचा आवाजही आता थंडावला होता. सतीच्या माळावर आता भयान थंड शांतता पसरली होती. तिथं आता आगीचे लोट नव्हते तर चितेतून फक्त काळा धूर उठत होता. जळून गेलेल्या मानवी मांसाचा वासही त्यात मिसळला होता. तो बुरसा धूर झाडाझुडपांतून पसरून होता. त्यानं सूर्याचा उजेडही खाऊन टाकला होता.
- तांडव, महाबळेश्वर सैल." 
-------------------------
हे वाचून होतं... 
मी निशब्द होते.... मला बोलायचं असतं किंवा नाही. माहिती नाही. परंतु, माझा राग अनावर झालेला असतो....
कारण त्यांच्या मानण्याप्रमाणे 'देवी तेव्हा होता येतं जेव्हा जिवंत स्त्री चितेत मारून टाकली जाते.'
कधी जन्मली असेल ना ही सडकी मानसिकता?
तिचा जन्म झाल्याझाल्या त्या माणसाने स्वतःच्या मनाला मारून का टाकलं नाही?
आणि पुढे वाचताना 'तिथे एक क्षत्रिय म्हणतो, आपल्या मरणविधीत हा त्रयस्थ व्यक्ती व्यत्यय आणत आहे? ' 
म्हणजे जिवंत माणसाला जपण्यापेक्षा, या धर्मांधांना हे मरणाचे सोहळे धर्मरक्षक बनवतात ? 
'आजच्या घडीला तरी ही परिस्थिती वेगळी आहे का?' हा सहज प्रश्न मनात येतोच, माझं मन 'फक्त त्याचं स्वरूप बदललं', इतकंच उत्तर देतो.  
यापलीकडे जाऊन माझा संताप तेव्हा होतो जेव्हा हे सगळं घडवून आणण्यासाठी, गावातल्याच बायांना धाय मोकलून रडायला लावलं जातं, ढोल आभाळापर्यंत वाजवायची ऑर्डर दिली जाते, म्हणजे या सगळ्या आवाजाच्या झंझावातात याची खबरदारी घेतली जाते कि, 'सती जाणाऱ्या त्या बाईच्या मरणाचा आवाज तसूभरही बाहेर पडलाच नाही पाहिजे.' 
एक एक ओळ वाचताना माझा अक्षरशः ओळीओळीला संताप वाढत होता, त्या बाईच्या वेदनेने अंगावर काटा येऊन नसानसातून जाणारा श्वास मला अडखळत म्हणतो, 'तू भाग्यवान आहेस, या पिढीत जन्माला आलीस.' 
तेव्हा माझा संताप होतो कारण, "आज म्हणतात खून करणं पाप आहे, पण हा तर समाजमान्य खून होत होता. आणि तेव्हाच्या काळी काय आणि आताच्या पिढीत काय, जसं तेव्हाच्या काळी सती जाणं, हा खून होता. तसं आताच्या काळात मुलीच्या मनाविरुद्ध लग्न लावून देणं हा जिवंतपणी त्या मुलीच्या आयुष्याचा, इच्छेचा, स्वप्नांचा खून आहे."
तीव्रता कमी झाली, पण स्त्रियांना या काय तर प्रत्येक युगात सहनच करावं लागलं आहे. स्त्रियांनाच फक्त... अभ्यासक्रम आणि स्वरूप फक्त वेगळं झालं.  
या पुस्तकांची पन्नासच पाने वाचून झाली आहे. त्यामुळे यात सखोल असं काही लिहणार नाही. फक्त या वास्तवाशी माझ्यासारखी अनेक मुलं फक्त तोंडओळखीने ओळखत असतील तर एकदा याची दीर्घ ओळख करून घेण्यासाठी 'तांडव'ची सुरुवात कराच... 
नावाप्रमाणेच आहे पुस्तक.



मरणाच्या सोहळ्याचा 'तांडव'

by on सप्टेंबर १४, २०१८
"अगरबत्तीचा धूर... जर मी अगरबत्ती पेटवून तिला आयताकृती हवाबंद डबीत कोंडून घेतलं तर ? निर्जीव ती, श्वास कोंडेल तरी तिचा...? ...
घराच्या बाहेर कॉरीडोअरमध्ये पायऱ्यांवर शांत बसायला मी जाते.
शांत म्हणताना हा 'शांत' शब्द सहज म्हणावा तसा का म्हणून जातो आपण? त्या शांsssssssत शब्दात कितीतरी गूढ आहे. आणि त्यापर्यंत अजूनतरी कुठला मनुष्य पोहोचलाच नसणारे. ते न जमणार काम आहे.
मोठं झाल्यावर आपण शांत कधी असतो? मला तरी मी अशी शांत कधी सापडलेच नाही. फारफार तर ही शांतता मला मी खुश असल्यावर मिळते. त्याशिवाय, शांततेच्या नावाखाली फक्त एकांत शोधणं असतं. एकांतातही असंख्य विचारांना मी का बळच आमंत्रित करीत असेल? 
हा एकांत मी 'माझा वेळ' म्हणून काढत असते आणि त्यातसुद्धा कुठलीच मला सुखावणारी गोष्ट नसते.
साधं उदाहरण आहे, बाहेर कॉरीडोअरमध्ये मी आज कितीतरी दिवसांनी बसले आहे, येरझारा घालणारी हवा, समाजातील निरव शांतता आणि रातकिड्यांचा आवाज एवढंच काय ते बॅकग्राऊन्डला आहे. तो आवाजही नको म्हणत कानांना हेडफोन लावून मी काय ऐकते? तर .... 'क्यों मैं जागूssss' हे एकट्याचं, एकांताचं आणि आयुष्याला कंटाळलेलं गाणं... 
म्हणजे अशाप्रकारे मी यशस्वीरीत्या एक घटका घटक्याने माझ्या विचारांची घुटन वाढवणारी बुदली भरत असते. तरीही मनाला माझ्या प्रश्न पडत राहतो, 'नेमकं तुला काय झालं आहे?'
'कुठे शोधू हा एकांत?' म्हणत जेव्हा हा एकांत मला सापडतो, मला स्वतः मुळेच दचकायला, घाबरायला होतं. कारण या शांततेच्यावेळी हा 'स्व' काय निर्णय घेईल मला याचा कुठलाच अंदाज येत नाही. 
अशात कुठेतरी स्वतःच्या स्वप्नांचा विचार करण्याचा मी थोडाफार प्रयत्न  करायला जाते, होतं काय माहिते...? मीच माझा आत्मविश्वास 'बघता येईल, वेळ येईल तेव्हा....' म्हणत त्याला जन्मुच देत नाही. 
शेवटी 'स्वप्न का पाहतो माणूस?' 
विचारते मी स्वतःला कधीतरी तो लहानपणीचा प्रश्न; 'काय व्हायचंय तुला...?'
मोठे झाल्यांनतर विशी पार केल्यानंतर प्रत्येकचजण डॉक्टर, इंजिनियरपेक्षाही 'मला शांत व्हायचंय...' म्हणणारा असतो.
'स्वप्न का पाहतो माणूस?'
जिवंत राहण्यासाठी म्हणणारी मी आहेच. 
पण त्यापुढे जाऊन, माझं बनलेलं एखादं स्वप्न हे माझ्या आवडीमुळे बनतं कि पैशांसाठी ते स्वप्न बनत असतं. ?
मनापासून सांगू तर माझं स्वप्न मला माहित नाही. आजही माहीत नाही. लोकं मला अशामुळे डेडबॉडी समजतील, मला ते मंजूर आहे. 
या आधी प्रत्येकवेळी स्वप्न पाहायला मला कुणीतरी भाग पाडलं आहे. पण तेही माझं चिरकाल स्वप्न नसतंच... 
लोकं म्हणतात, 'खूप मेहनत घे, खूप प्रसिद्ध होशील.!'
माझा प्रश्न असतो, का...? आणि झाले प्रसिद्ध मग... ?
लोकं असतील आजूबाजूला, सगळं जग मला ओळखेल, बेसुमार प्रेम चौफेर कानाकोपऱ्यातून बरसेल. ते तर आजही आहेच. 
ए पण नको, तेव्हा मिळणाऱ्या प्रेमात भेसळ असेल. आत्ताच मला मिळतंय ते प्रेम 'प्रेम' शब्दाला पूर्ण करणारं आहे. 
बरं तरीही वाटतं कधीतरी, 'व्हावं खूप मोठं सगळं जग ओळखेल एवढं' म्हणून खटाटोप घेणारं हे प्रामाणिक मनही असतं.... माणूस आहे ना. 
पण तेच प्रामाणिक मन सांगतं, 
'ते मोठं होणं कशासाठी माहिते का?' 
पैशांसाठी. 
आणि पैसे कशासाठी माहिते?
'हवं ते करण्यासाठी.' 
"मला हवं ते करायचंय..." हे स्वप्न आहे माझं. 
दुर्दैव प्रत्येकाच्या आयुष्याचं हेच असतं. स्वतःला वैयक्तिक हवं ते कधी करता येतच नाही , त्रास कुणालाच द्यायचा नसतो. फक्त स्वतःच्या आयुष्याच्या मानसिक, आंतरिक शांततेसाठी हवं ते करायचं असतं. 
आणि ते न करून आपण आपल्या या सुंदर आयुष्याची हसूनच एक चिरफाड करून टाकणारे आयुष्य एका कॉरीडोअरमध्ये छानपैकी डिजाईन करत असतो...
.
 मीही तेच करणारी एक डेडबॉडी बनत होते... ?  


माझ्या एकांताची कहाणी !

by on सप्टेंबर ०४, २०१८
घराच्या बाहेर कॉरीडोअरमध्ये पायऱ्यांवर शांत बसायला मी जाते. शांत म्हणताना हा 'शांत' शब्द सहज म्हणावा तसा का म्हणून जातो आपण? त्...
आजचा दिवस हा सगळ्या फोटोग्राफर्सच्या जिव्हाळ्याचा दिवस असतो. जीव असलेल्या कॅमेराबद्दल पार जीव ओवाळावा इतकं प्रेम येतं नि एक फोटोग्राफीचा काळ डोळ्यासमोरून जातो....

बदलत्या काळासोबत किती गोष्टी बदलतात. आणि
बदल हा या फोटोग्राफीचा सगळ्यात प्रमुख नियमच जणू !
जसं जसं काळ बदलत गेला, तेव्हा तेव्हा हा काळ कैद करून ठेवलाय तो या कॅमेराने. कॅमेराने काळही स्विकारला नि तोच काळ सतत कैद करण्याचं अमीष फोटोग्राफर्सला सूपूर्दही केलंय. फोटोग्राफीने सामान्यातल्या सामान्याला अमीर बनण्याची मुभा दिली. स्वतःच्या निव्वळ वेगळ्या दृष्टीने, दृष्टीकोणाने स्वातंत्र्य दिलं स्वतःच असं वास्तविक आयुष्य कल्पनेत जगण्याचं.
एकदा हातात कॅमेरा आला की सुरुवात जरी स्ट्रीट फोटोग्राफी, कॅन्डीड फोटोग्राफी,  पोट्रेचर फोटोग्राफी यांचे अगणित प्रयत्न करून होत असली तरी, त्याचा शेवट कुठे नसतो, हे फोटोग्राफीचं गूढ असतं. माणूस रोज नवीनपणे खुश होऊ शकतो ही ताकद तिच्यात असते.
कालपर्यंत घर कॉलेजचा उंबरठा सोडून, दुसरे कुठलेही स्वप्न न जगणारा हाच फोटोग्राफर आपल्याच विश्वात अमीरांचा बादशाह होऊन स्वप्न बघतो ट्रॅव्हलर बनण्याचं, जगभर फिरून ते जग आपल्या कॅमेराने कैद करून स्वत: जगून लोकांपर्यंत ते सुपूर्द करण्याचं... आणि इथेच त्याच्याही नकळत एका गरिबाचं एक व्यक्तीमत्व नकळत पडद्याआड तयार होत असतं. तो एक फोटोग्राफर म्हणून वृद्धिंगत होत असतोच, पण घडवत असतो स्वतःच एक संवेदनशील मन आणि त्याचबरोबर एक भटका ट्रॅव्हलर, ट्रेकर, आणि एक जगाला जगापर्यंत पोहोचवण्याचा दुवा.
वैयक्तिक पातळीवर, तसं माझ्यासाठी फोटोग्राफी ही डीएसएलआरपासून सुरु झाली नाही.  तिची सुरुवात ही टकटक मोबाईलपासून.
तसं मनात ठेवलं नि फोटो काढला, अशा अर्थी मी कधी फोटोग्राफीकडे वळलेच नाही.
हे तंत्रज्ञान असलं तरी माझ्यासाठी हे जादूचं खेळणं होतं, जे मला आनंदी ठेवत होतं.
लहानपणी माझ्यासाठी हे फोटोग्राफीचं जग एका दुरदेशी असलेल्या आणि कधीही आपल्या हाती न लागणारं खेळणं होतं. पण मोठी होत गेले. शिक्षण घेता घेता कॉलेजच्या कॅंपसला कॅमेराचं वरदान मिळालं नि मला ते दिसलं. हातात ते वेव्ह फोनमधून न येणारे, सगळे ब्लर्ड फोटो खचाखच न खचता क्लिक करायला लागले. हळूहळू न दिसणारं स्वप्न माझ्यासमोर येउ लागलं नि नकळत मित्राने उधार म्हणून कॅमेरा माझ्याकडे ठेवायला दिला. त्यातून जन्म झाला एका तोडक्या मोडक्या फोटोग्राफरचा ! आणि वाटायला लागलं 'या क्षणी मी या आयुष्याचे सगळ्यात सुंदर क्षण जगतेय.' जेव्हा मी हातात हा कॅमेरा घ्यायचे. त्यामुळे लिखाणाचं भूत होतंच त्यात कॅमेराने आपलंस केलं नि माझी दृष्टी मोट्ठी होऊ लागली.  हा माझा अनुभव आणि मी घडले, चुकून उधार कॅमेरा हातात आल्यानंतर...
माझ्यासाठी फोटोग्राफीचा सगळ्यात आवडता प्रकार म्हणजे आरशातली फोटोग्राफी...
या प्रकारात ना कुणा  फोटोग्राफरची गरज असते. तिथे असतो फक्त तुम्ही आणि कॅमेरा. त्याला हॅण्डल करून त्यातून स्वतःला कसं सुंदर दिसावायचं ही जोखीम भयंकर मोहक असते. 
ती कशी त्याची ही उदाहरणं ;


तसं लोक म्हणतात, "एक फोटो हजारो शब्द व्यक्त करतो.", पण एक फोटोग्राफ घ्यायला हजारो क्लिक्स काढून बघावे लागतात, हे अव्यक्तच राहते. त्यामागे आवड, छंद जरी असला तरीही तिथे शारिरीक कष्ट अव्यक्त असतात. मन सुखी असतं पण शरीराला सूज येउन जाते. पण फिकर त्याची नसते, हजारोतून एक निवडणं ही दुसरी जोखीम असते.

सध्याच्या परिस्थितीला अल्मोस्ट लोकांसाठी फोटोग्राफी हे एक फॅड झालं आहे. हातात कॅमेरा आला कि ऑटोवर कॅमेरा टाकायचा आणि ते क्लिक बटनची जागा शोधायची आणि एकेक फोटो काढत बसायचं. आक्षेप तिथे माझा नाही, पण हे किती दिवस ? ऑटोच्या पुढे जाऊन मॅन्युएलवरही प्रयत्न करून केव्हा बघणार ? तिथेच खुश राहणारे हे असतात. म्हणजे एखाद्या खेळण्याला मोठ्या आनंदाने विकत घ्यायचं नि त्याला नीट न्यायही द्यायचा नाही? त्याचा लोक करतात तसाच वापर करायचा ? ? नवीन असं काहीच नाही? अशावेळी वाटतं पुढे जावं त्यांनी. त्यात मजा आहे, त्यात नशा आहे. ती समजून घ्यावं त्यांनी. असो ! ही ज्याची त्याची आवड... यापुढे जाऊन काही लोक म्हणतात मला यातील तांत्रिक बाबी समजत नाही. चुकत आहेत तुम्ही. फोकस तुमचा चुकतोय. आयएसओ , अपर्चर, शटरस्पीड, या सगळ्या भंपक कल्पना आहे. जोड याची हवीच,
 पण 'प्रकाश' हा याचा महत्वाचा जोडीदार ठरतो. तो ओळखता यायला हवा आणि तोचतोचपणा फोटोत आणण्यापेक्षा आपल्या दृष्टिकोनाला आव्हान देता यायला हवं, मग 'डीएसएलआर आहे म्हणून फोटो काढतो.' हे टोमणे बंद होतात.

बाय दी वे, 'बीहाईंड दी सिन... ' म्हणजे 'दिसणाऱ्या फोटोच्या मागे काय घडतं? 'हे फोटोग्राफीत सगळ्यात मोठं वरदान किंवा शापही असतो म्हणा....
जर फोटोमागे घडतं ते सगळं आपल्याला हवं तसं असेल तर तो फोटो आपल्याला हवा तसा मिळतच नाही. याशिवाय फोटो ज्याचा क्लिक करणार असतो त्यांच्यात आणि फोटोग्राफरमध्ये अंडरस्टॅन्डिंग आणि मॅच्युरपणा नसेल तर सगळा फोटोशूट फ्लॉप जाऊन मग त्या शूटला नीट करावं लागतं फोटोशॉप किंवा स्नॅपसीडसारख्या एडिटिंग ॲप्समध्ये.
पण या दोनच गोष्टी नसतात फोटोच्या मागे. तिथे असते धम्माल, फेक कॅन्डीड काढण्याचे भयानक भारी प्रयत्न. त्याचबरोबर माझ्या अनुभवावरुन तरी हे फेक कॅन्डीडच फोटोग्राफरला बेस्ट आणि इतरांहूनही वेगळा फोटो, फ्रेम देतात. त्यामुळे हा बीहाइण्ड दी सिन एक अनोखा आणि प्रत्येक शूटला वेगळा माहोल देणारा भाग असतो.

फोटोग्राफीने जसं फोटोग्राफरला विश्व दिलं तसंच, स्वतःच विश्व दिलं या 'नजरेला.' नजरेलाही एक विश्व असतं, तिलाही आपलं मन कुठल्यातरी माध्यमातून व्यक्त करता येतं. या विश्वात माणसाच्या मनातलं नजर व्यक्त करते आणि त्याच नजरेला व्यक्त व्हायचं असतं तेव्हा हा  कॅमेरा तिचं माध्यम बनतं.
या सगळ्याअनुभवांतून एक मोडकीतोडकी फोटोग्राफर झाल्यानंतर एकच घटित कळलं,
"निसर्गापेक्षा सुंदर फोटोग्राफर नाही आणि माणसांच्या डोळ्यांपेक्षा सुंदर लेन्स नाही."
तरीही स्वतःसाठी करत राहू या कॅमेराचे लाड आणि बनू होममेड खुशीचा हकदार!


जग फोटोग्राफरचं !

by on ऑगस्ट १९, २०१८
आजचा दिवस हा सगळ्या फोटोग्राफर्सच्या जिव्हाळ्याचा दिवस असतो. जीव असलेल्या कॅमेराबद्दल पार जीव ओवाळावा इतकं प्रेम येतं नि एक फोटोग्राफीचा ...
दोस्त ....
म्हणे दोस्त...
नीट बघा बरं दोघांना...  दोस्त दिसता का हो ते ?
"त्यातला एक तुम्हाला बाप वाटेल आणि दुसरा त्या बापाने दत्तक घेतलेला मुलगा..."
याव्यतिरिक्त,
तुम्ही लोकं वेडे असतात त्यांना मित्र म्हणतात...
तुमची काही चुक नाहीच म्हणा ते दोघे हरामी, तुम्हाला जे दाखवायचं तेच दाखवता..
बघायची तुम्हाला त्यांची यारीच, तर जा त्या ठिकाणी (ते ही त्यांनी येऊ दिल तर ) जिथे ते दोघे मित्रांशी खोटं बोलून गपचुप कुठेतरी फिरायला जाताय... लोकांसमोर शांततेचे ते पुतळे बसतात, पण नजरेनेच ते एकमेकांचा आनंद बनता .... जा अशा ठिकाणी,  जिथे ते एकमेकांच्या सोबतीने रडतात... आणि जा अशाही ठिकाणी, जिथे ते एकमेकांच्या सोबत नसू या भावनेने रडतात... जा  तिथेही जिथे ते निव्वळ शांत बसलेले असतात स्मशानांतता असते आणि तरीही ते निशब्द बोलतात ...
पण अशावेळी तुम्ही कुठे असता माहिते ? तुम्ही असतात त्यांच्या व्यावहारिक मैत्रीत ...
चांगलंय तेही, त्यांनाही तुम्हाला तिथेच तर ठेवायचं असतं...
'व्यावहारिक मैत्रीच' तर फक्त ते तुम्हाला दाखवू पाहतात...
किंवा फार फारतर तुम्ही असतात, मुलगा मुलगी मित्र नसतातच म्हणजे हे एकत्र सिनेमाला जाता, एकत्र खाता, हातात हात घालून फिरता हे सगळं पाहून समाज बनून या पवित्र बंधनाला तुम्ही दुषणं देता, स्वतःच्या बुद्धीच्याआकाराएवढे!
आणि मग तुम्ही त्यांच्या मैत्रीवर स्वार्थी जळून त्यांच्यात फाटे फोडतात... आणि तिथेच त्यांची मैत्री सिद्ध होऊ लागते...
एक गोष्ट सांगू? ...
"दोस्त कभी सस्ता नहीं होता...
मी गेल्यावर माझी किंमत कळेल, यापेक्षा दोस्त  असतानाची किंमत कैकपटींनी जास्त असते. तेव्हा त्याची किंमत ठेवा." !
फक्त आठवण करून देते, मित्राला गृहीत धरणं,  मोठी चुक असते ...
त्यावरच गोष्ट आहे...
मित्र होतो आम्ही दोघे, तीव्र जिवाला जीव देणारे ... एकमेकांशिवाय कॉलेजचा एक दिवस जगलो नव्हतो.कॉलेज संपलं आणि मैत्री...?
पावसाळ्याचे दिवस चालू होते...
बाहेर धोधो पाऊस कोसळत होता. टेलिव्हिजनवर बातम्या चालू होत्या. आम्ही दोघे आमच्या कॉलेज दिवसातले किस्से रंगवत होतो. दिवस तो 3 ऑगस्ट होता, बर्रोबर मागच्या वर्षी आम्ही लडाखला गेलो होतो...
आज के दिन मौसम , कुदरत सगळं इतकं सुंदर जुळून आलं होतं की मी वाट पाहत होते तो मला म्हणेल 'चले?'
तो अर्ध वाक्य म्हणायला आलाच मी "ऑफ कोर्स एस्स" ... म्हणून पूर्ण केलं.
आणि क्षणही न दवडता आम्ही गाडी, कपडे, पैसे, दोरी, कॅमरा आणि एक हरवलेली मुस्कुराहट घेऊन लग्गेच निघालो ...
वातावरण बाप झालं होतं...
वातावरणात मैत्रीचा गंध पसरला होता... यारी पें हमारे कुछ जादा ही प्यार आ राहा था|
लडाख म्हणजे आमची यारी होती.
जिच्यात प्रचंड ओढ होती आणि प्रत्येकाच्या आयुष्यातलं ते स्वप्न, फक्त माझ्या वाट्याला येऊन पूर्ण होत होतं, तेही प्रत्येक फ्रेंडशिपडेच्या दिवशी..! एकमेकांना नकळत दिलेलं ते प्रोमिसच होतं, "कोणी मरत जरी असेल तरी फ्रेंडशिपडे पुढे ढकलला जाणार नाही. भेटायचं म्हणजे भेटायचंच. फिक्सच!."
ठरल्याप्रमाणे निघालो आम्ही.
आम्ही जुने किस्से पुन्हा आठवत, कॉलेजमधल्या पिंकी चिंकीला आठवत, पहिल्या प्रेमाच्या, पहिल्या ब्रेकअपला शिव्या घालत,  हळूच 'एखादा हॅंडसम मुलगा ओवर्टेक करून गेला की त्याच्यावर मी लाइन मारत आणि सुंदरशी मुलगी गाडी चालवत गेली की त्याला दाखवत' आम्ही आमचे दिवस पुन्हा आणून जगत होतो. हा आनंद एका वर्षभरात मी वेड्यासारखा मिस्स केला होता... आयुष्याच्या गर्तेत हा फुकटचा, होममेड आनंद मी विसरूनच गेले होते. पैसा करीअरच्या घाईत मी माझा आनंदच दावणीला लावलेला होता. आज भेटणं कशापेक्षाही जास्त महत्वाचं होतं नाहीतर पुढे होणार होतं ते कसं झालं असतं?
तसं मध्ये एक वर्षाचा गॅप गेला होता. आमचा एकमेकांशी कॉंटॅक्ट झालेला नव्हता. तरी आज भेटलो होतो आम्ही. आम्ही भेटलो तेव्हा या मधल्या एका वर्षाबद्दल टेलिपथीने ठरवलंच असावं की "मधल्या काळात काय झालं हे गौण आहे कारण आजचा दिवस आपला आहे. ते आपण सगळ नंतर बोलूया. काय भांडायचं नंतर भांडूया..."
या'नंतर'च्या भरवशावर आमच्या प्रवासात एक पूल आला, त्यावर खड्डे जमले होते. बाहेर बेधडक पाऊस कोसळत होता... मागच्यावेळी हेच खड्डे आम्ही "चल डरपोक , हम हम हैं, जायें या नहीं जायें? हम नहीं सोचतें. चल एक जान होके पार करते है।..."
पण यावेळी तो त्याचं तो पुढे गेला, मी माझं...
आणि अर्ध्यात तो पूल एक दोरी निसटून खाली कोसळला...आणि क्षणात काय झालं माझ्या डोळ्यासमोर कळलंच नाही. श्वास लिटरली अडकले होते...
यावेळी वेगवेगळे गेलो म्हणून मी मरणार होते...
'मेरी यारी मुझ में जान भी डालती है।' हे मला त्या क्षणी कळत होतं. माझं भानच गेलं होतं... हे घडणं प्लॅन नव्हतं मग असं कसं घडत होतं, मी घाबरून गेले होते. तितक्यात तो मागून जिवाच्या आकांताने ओरडायला लागला होता, "हर्रामीsssss, कित्ती मिस्स केलंय तुला कल्पना नाहीये भूता आणि त्याचा बदला मला लडाखला पोहोचून घ्यायचाय, तुला वाचायचंय कळतंय का... तु ब्रेव्ह गर्ल आहेस. धीर सोडू नको. नाहीतर मी दुसरा मित्र कुठून शोधू?" ... ते ऐकून जागी होऊन मी गाडी सोडून दिली,
आणि म्हणाले, "शोधूनही मिळेल काळ्या?" मला या परिस्थितीतपण त्याचा राग आला होता. माझी रिप्लेसमेंट मला नकोचे. तो करणारही नाहीये खात्री असून त्याची गच्ची पकडून त्याला जाब विचारायचा म्हणून तरी मला वाचायचं होतं ... एका  हाताने त्या पुलाची सुटलेली दोरी घट्ट पकडली. मोठय़ाने श्वास घेतला पण त्याचं तोंड बघण्यासारखं झालं होतं, ते डोळे सुसरासारखे मोठेठे  झाले होते ... त्याचा जीव अर्ध्यात येऊन पडला होता...
त्याचा तो थरकाप, माझ्याप्रतीचं प्रेम पार डोळ्यातून बाहेर आलं होतं पहिल्यांदा ... त्याच्या डोळ्यात "मला रहायचंय तुझ्याबरोबर आयुष्यभरासाठी, कधीही न सोडण्यासाठी...." दिसत होतं... हे मी त्या चार भिंतीच्या आत कोंदटलेल्या ऑफीसात मिस्स केलं होतं...
तो घाई करत, आहे तसा गाडीवरुन खाली उतरला. मी त्याच्याकडे पाहीलं आणि " यारर्र  सॉरी यारर्र्रsssssss..... का कस माहिती नाही पण तुला गृहीत धरू लागले होते... हे एवढे दिवस तुझ्याविना राहणं म्हणजे माझ्यातली मीच शिल्लक राहिली नव्हते... मला जगायचंय" म्हटलं
..
"एएएएएएssss बाई, नंतर लेक्चर झाड ना... मरायवर आलीयययय इथे... आधी बाहेर निघ इथून फिल्मी कुठली... " तो विव्हळत होता..
आणि आरडाओरडा करून, आरोळ्या देउन लोकांची मदत मागत होता. शेवटी कुणाची वाट न पाहता, एका ठिकाणी खरचटवून का असेना, त्याने मला रस्सीने व्यवस्थित बाहेर काढून एका सुरक्षित जागी ठेवलं होतं, माझ्या हक्काच्या मिठीत...! त्याचा जीव माझ्यात परत आला होता ... मला माझ्यात जीव जाणवायला लागला होता....
तेव्हा मला कळलं होतं जीव जाणं काय असतं आणि आपला जीव जाताना दुसऱ्या कुणाचा जीव जात असतो ते काय असतं.... आणि हाच तो हरामी एका अशाच क्षणी आपला होतो आयुष्यभरासाठी!!!
पण या घटनेमुळे,
तिथे तो माझा बाप झाला होता ...असा बाप जो माझ्यासाठी धडपड करत होता, ज्याला त्याच्या मुलाला जगवायचं होतं,  वाढवायचं होतं. ज्याचे त्याला सगळे लाड पुरवायचे होते. ज्याला माझ्यावर निस्वार्थ प्रेम करायचं होतं, जो माझ्या यशावर न जळणारा एकमेव प्राणी असतो या पृथ्वीवर...
त्यावेळी मला कळलं होतं तो त्याच्यातल्या मला कधी मरू देणार नव्हता मला कळलं होतं.... आणि म्हणून दोस्ती म्हणजे 'एकच व्यक्ती असते जेव्हा शोलेचं ये दोस्ती हम नहीं छोडेंगे, तुम जैसे चुतियोंका सहारा, यारों दोस्ती बडी ही हसीन, मेरी जिंदगी सवारी म्हणत जो गडी कुठल्याही गडबडीशिवाय तुमच्या शेजरी येतो तो हा व्यक्ती असतो .."
स्साला ही दोस्ती नाही, स्वार्थ असतो...
स्साला ही दोस्ती नाही, जीव असतो...
स्साला ही दोस्ती नाही, शरीर असतं...
स्साला ही दोस्ती नाही, श्वास असतो..
स्साला ही दोस्ती नाही, बाप असतो...
म्हणूनच ही दोस्ती कुठल्याच बंधनात न बसता प्रत्येक नात्याची कमी पूर्ण करणारं वरदान असतं ...

दोस्त नहीं, तो बाप असतो ...

by on ऑगस्ट ०५, २०१८
दोस्त .... म्हणे दोस्त... नीट बघा बरं दोघांना...  दोस्त दिसता का हो ते ? "त्यातला एक तुम्हाला बाप वाटेल आणि दुसरा त्या बापाने दत्...


आज खरं सांगू ??? तू एकदा प्रश्न विचारलेलास..."इतकं कसं लिहितेस तू.? तेही माझ्यासारख्या विषयावर...?"
आज त्याचं उत्तर द्यावसं वाटतंय...
             जेव्हा वेगळे झालो आपण... आठवण तुझी इतकी घट्ट यायची की त्या आठवणींची ती मिठी सुटायचीच नाही किंवा कदाचित मला ती सोडावीशीच वाटायची नाही... तुझं इतक्क जीवजाणं व्यसन लागलं होतं की त्याची नशा उतरवावी वाटायची नाही. रात्र-रात्र थरकाप व्हायचा 'तू सोबत नाही' या भावनेने ... तो थरकाप तू तुझ्या हातात घ्यावा त्यासाठी तरी तू सोबत असावा वाटायचास...
          अनेकदा खोटे भास मी स्वतःच्या मनाला खरे करून सांगितले आठवतंय मला कारण माझा विश्वास होता, "एकदा खरं प्रेम केलं की तिथे ब्रेकअपसारखे नसते उपद्व्याप नसतातच..  प्रेमच प्रेम असतं. सुरुवातीलाही आणि शेवटपर्यंतही." वाटलं होतं, अशावेळी तरी तू येऊन माझ्या बोलण्याला खरं करशील.... पण हळूहळू तू त्या प्रत्येक ठिकाणी कुठेच आला नाहीस, तेव्हा मी लपेटून घ्यायला लागले स्वतःला, माझ्या लेखनीच्या आकारात, उकारात, शब्दांत ... त्यांच्या अस्तित्वाने किमान आपल्यातली ती सतत पोखरणारी शांतता मला तोडायची होती म्हणून स्वतःला मी गुरफटवत गेले त्या निळ्या काळ्या शाईच्या गर्तेत ...
         तू त्या कल्पनेतही माझ्या कित्ती जवळ असायचास वेड्या. जसा खरोखर सोबत आहेस__फक्त एका श्वासाच काय ते अंतर... त्या कल्पनेतही स्वतःचाच इतका हेवा वाटायचा आणि त्यामुळे तिथेच अशा खुऊपशा रात्री मी अशाच निवाआआअंत घालवायचे. आणि त्या चार भिंतीत आपलं दोघांमधलं 'लग जा गले' शोधत राहायचे...
         तुला आठवतंय, त्यावेळी मी तुला "माझ्या घरी येऊन मला मिठीत घेऊन दाखव मग मानेल तुझ्या प्रेमाला" म्हटलेलं... त्यावेळी नेमकं घरी कुणी नसल्याचा स्मार्ट डाव तू खेळला होतास शहाण्या ... मी चितपट झाले होते, संपले होते तुझ्या त्या एका प्रेमातल्या कटाक्षाने नि नंतरच्या अघुर्‍या "तू माझीच आहेस फक्त कळलं.?" या भावनेने ...
         सध्या भोवती वास्तवात नाहीयेस तू ... पण या स्वतःला स्वतःच्या लिखाणात लपेटून घेतल्यामुळे तिथे तू नसूनही तू माझा आहेस आणि तू नसल्याचे दुख मला तिथे तू नसतानाही त्यातून बाहेर पडल्यावर खुश करून पाठवत आहे... तुला लपेटण्यापेक्षा या शाईला लपेटून मी तुला 'तू माझा असल्याचा' हक्क तर दाखवूच शकते, जी वास्तवात एक कल्पना आहे...!!!
शेवटच एक सांगू...?
काल शेवटचं ठरलंय...
काल तुझ्या त्या 'एका आठवणीबरोबर' मी कितीतरी वेळ खेळत बसले होते ...
थोड्या गप्पाही झाल्या...
तुझ्या येण्याची आम्ही दोघींनी आतुरतेने वाट पाहिली ...
मी थोड़ी जास्तच नेहमीसारखं!
न राहवून ती म्हणालीच, "बावळट आहेस का गं तू.? तो आला असता तर मी आले असते का.? तू इतकी आंधळेपणाने कशी कुणाची होऊ शकतेस.? ... "
ती आपलं बोलत राहिली, बोलत राहिली नि मी तिच्या त्या बोलण्यातही तुझं 'येणं' शोधत राहिले...
शेवट निघताना तटस्थपणे तीच म्हणाली;
            यापुढे लक्षात ठेव,
आपण तिघे एका ठिकाणी नसूच शकतो ... स्पष्ट नाही...
त्यामुळे स्विकारून टाक त्याचं माझ्यातलं असणं,
तो फक्त माझ्यात असेल यापुढे आता ... आणि यार्र्र आता बस कर हा आठवणींचा पसारा, तोचतोपणा आणि बरोबरची ती जुनी शाई. आऊटडेटेड झाली आता...
विचार मीही तोच करायला लागलेय !
कारण, आठवणींचा समुद्र तुझा अंगावर येतोय आता,
माझ्यासकट माझं पूर्णत्वच घेऊन जातोतू.
सवड दे मला थोडीशी,
घट्ट रुतून बसते किनाऱ्याला.
तीर स्वतःचे बांधायचे आहे,
त्यात राहतील तुझ्या आठवणी, मीही पूर्ण !

शाईतल्या ईकारात 'तू '...

by on ऑगस्ट ०२, २०१८
आज खरं सांगू ??? तू एकदा प्रश्न विचारलेलास... "इतकं कसं लिहितेस तू.? तेही माझ्यासारख्या विषयावर...?" आज त्याचं उत्तर द्यावस...

आज खूप दिवसांनी त्याची आठवण झाली ...प्रेम बीम नसावच ते, पण मला तो आवडायचा... त्याच्या मित्रांमुळे मला तो आवडायला लागला. मी बघितलं आणि त्याच्या मित्रांनी मला बघितलं. इथेच माझे कॉलेजचे दिवस सुरू झाले. मग मला कुछ कुछ होता है पण आवडला, नि राजा हिंदुस्थानीही आवडला.
कॉलेजमध्ये आपली पण एखादी लव्हस्टोरी असावी म्हणून ते प्रेम होत बहुदा... ! घरचे म्हणता म्हणून लग्नासाठी पोरगा बघावा तसं त्याचे मित्र आम्हाला चिडवता म्हणून आमची पण लव्हस्टोरी असावी. एवढा साधा आयुष्याचा मोटो होता. म्हणून एकच ध्येय, की त्याच्याबरोबर निदान पुढच्या इयत्तेत जाण्याएवढा अभ्यास करावा. मग त्यात कोणत्याही सरांची बोलणी खावी, अगदी गोड वाटायचं सगळं...
         खरं सांगायचं तर, त्यावेळी ना फेमची भूक, ना रीचनेसची बाडबिस्तर, नाही शाइनिंगची दुकान ... त्याने फक्त आहे तसं स्वीकाराव नि त्याच्या मित्रांनी असच जोडीनं चिडवत राहावं इतकंच काय ते वाटायचे. एकवेळेला स्वीकारलं नाही तरी चालेल, पण एकवार त्याने ते गोंडस हसून पहाव इतकंच. वेड होतं ते पुरतं. आजच्या रिचनेसमध्ये मी त्याच्या रिचस्माइलवर मरत होते. आजही ते सगळं आठवून स्वतःला निरागस बावळट म्हणण्याचा चान्स मी सोडत नाही.
          हॅहॅहॅ.... तो गॅदरिंगचा दिवस कसा विसरू!  ....कधी नाही ते साडी घालायचं मनावर घेतल. का ते सांगू नाही शकत. इश्श लाज वगैरे वाटते जरा. अशातच तो भरमसाठ झगा गावभर घेऊन कॉलेजपर्यंत जायचं, 'वैसे उसके लिए ना सही, लेकिन उसके एक झलक के लिये इतना तो बनता था यार' ...मी छान तयार होऊन गेले. मी सांगते, वायफळ तयार होणं होत ते.... टोटल वायफळ ! आयुष्यातला व्यर्थ दिवस.
          आमच्या एकतर्फ्या प्रेमाची चर्चा गावभर नसली तरी ग्रूपभर होती. त्यामुळे त्यांना आयता बकरा मिळाला होता....त्यांच्या चिडवण्याचा मला काडीमात्र फरक पडत नव्हता. फक्त तो का दिसत नाही?, एवढ एकच एक मनात घोळत होतं. कॉलेजमध्ये घुसल्यापासून डोळ्यात फक्त त्याची झलक होती. पण तो दिसायला तयार नव्हता. तसं कॉलेजच्या दिवसांत 'आपणही सुंदर दिसु शकतो हे ध्यानीमनीही नव्हतं'. त्याच काळात ती गारव्या हिरव्या रंगाची साडी, ओठांना लाल रंग, चेहऱ्याच्या कातडीला फाउंडेशन वगैरेचा झोलच नव्हता, आपली पौंड्स पावडरच ते तेज जे खुलवायची ते लाजवाब असायचं आपल्या नैसर्गिक त्वचेला कसला धक्का लागायचा नाही. नि ब्लश ? ब्लश हे गालांना लावलं जातं हे आत्ता कळण्याचे दिवस. त्या काळात हा ब्लश आनंदाने सजवायचा तो फक्त आपल्या प्रिय व्यक्तीच्या हातून. विकत न मिळणारा हा ब्लश भलता मौल्यवान वाटायचा.
हाच ब्लश चेहऱ्यावर येत नव्हता कारण तो अजूनही कॉलेजमध्ये आला नव्हता. की मग आला होता पण मला दिसत नव्हता ? माझी हुरहूर संताप वाढत होता.  शेवटी बळीचा बकरा बनले मी ! माझं गृपमध्ये लक्ष नाही हे बघून मित्रांनी  मला तो येईपर्यंत 'अलका याग्निकच्या आवाजातल घूंगट की आड से' कंटिन्यू एकामागे एक प्रोपोगंडा राबवावा तसं ऐकायला लावलं .... न ऐकण्याच्या आविर्भावात असलेली मी मित्रांनी त्याची शपथ दिल्यावर विरघळले होते.  आणि त्या रणरणत्या तापत्या उन्हात मी एका परफेक्ट सोलमेटसारखं ते गाणं कानातून रक्त येईपर्यंत ऐकत होते, ऐकत होते, ऐकतच होते! पण मी गाण्याचा एक शब्दही ऐकला नव्हता कारण माझी नजर, कान, डोळे हे फक्त आतुर होते त्याच्यासाठी.  तरी तो दिसला नाही.  ते सहा मिनटाचं गाणं तो दिसेपर्यंत कमीतकमी सहा-सात वेळा मी ऐकलं असेल, तेव्हा कळलं किती दुख त्या चित्रपटातल्या नटीला झालं असेल जेव्हा तिच्य शृंगारानंतर तिच्या प्रियकराने तिला पाहिलं नसेल ...पण मी मुलगी असुन मी लवकर आवरून आले याला का इतका वेळ लागतोय?. माझी स्वतःवर आणि त्या झग्यावर प्रचंड चीडचिड होत होती. आणि गेस व्हॉट फायनली तो दिसला नि यांनी 'जब तक ना पडे आशिक़ की नजर' म्हणून इशारा केला.. आणि चक्क या कॉलेजच्या एका वर्षाच्या नजरानजरमध्ये पहिल्यांदा तो हसला, मला विश्वास बसेना तो हसला होता. आयेहाय....! ते हसणं, त्याचे ते ओठ जे मला बघून हसले होते, आणि ते डोळे मला बघून दुजोरा देत होते की 'तु हे माझ्यासाठी केलं आहेस आणि मला ते कतल-ए- नजर' आवडलं आहे....  वूओवssssss माझा आनंदच कमी होत नव्हता.  काय गुदगुल्या होत होत्या म्हणून सांगू, गालावरचा तो ब्लश तर ओसंडून वाहत होता. बिकाउ ब्लश असता तर या ब्लशपुढे उडून गेला असता. हा मौल्यवान होता! 
          गोष्ट एवढ्यावरच थांबली नव्हती, तो हसलाही आणि थोड्यावेळाने मित्रांबरोबर त्याने पुढे जाऊन पुन्हा एकवार वळून मागे बघितले होते त्याने . मला त्याला ओरडावंस वाटत होतं की ' वेडाये का तू ? ऐसे देखकरही मार डालोगे तुम'.अहाहाsss अलका याग्निक मानवली होती. माझं सर्वांग त्याच्या त्या 'फिरसे मुडकर देखना तुम्हारा रास आ रहा हैं हमें, युं ऐसेही देखा करो ना हमें' म्हणत त्याचं स्वागत करत होती. .... मी खूsssssप खूप खुश होते.
           माझं साडीप्रकरण गाजलं होतं.  ते आजही मन शाहळून जातं ... त्याचा तेवढाच एक फोटो मेमरीमध्ये कॅप्चर झाला जो आजही कुठली अलमारी उघडून बघावा नाही लागत. आठवण आली की समोर माझ्या तो फोटो येउन ठाकतो.
 त्यानंतर बारावी झाली, कॉलेज संपलं, ती निरागसता ते प्रेम नावाचं व्यसनही सुटलं. या मोठ्या गोष्टींच्या गर्तेत ते ऊनही विसरले नि अलका याग्निकलासुद्धा. आठवणीत होतं फक्त त्याचं गोंडस हसणं  ..बस्स ती पहिली नि शेवटची स्टेप स्वतःच्या प्रेमासाठी आणि प्रेमाच्या तसल्लीसाठी. !
अशावेळी वर्तमानात डोकावून पाहिलं की वाटतं, कुठलं प्रेम करतात आजकालची ही सात-आठवीची मुलं ...?
          मला आठवतंय, ना त्याचा हात हातात घेतला ना हिमतीनं त्याच्या डोळ्यात कधी पाहिलं. उलट त्याला पाहून ब्लश करणं नि लाजणं हाच प्रेमातला नाजूकपणा होता, जीवंतपणा होता!
          ऊप्स ती केमिस्ट्री, बायोलॉजी, फिजिक्स लॅब.. ते  विसरले तर कॉलेज आणि तो पूर्ण होईलच कसा  ? याची तर मज्जाच वेगळी असायची. त्याने मला वर नजर करुन पहावं म्हणून निमित्त करत आम्ही रोज उशीरा पोहोचायचो नि कितीतरी वेळ सरांची तीच ती बोलनीही खायचो. सर तिकडे बोलत बसायचे मी इकडे डोळ्यांचे चोचले पुरवायचे... कित्ती गोड चिडायचे ते सर .... आणि तेवढं करुनही सरांच मन भरायचं नाही ते आमच्या बॅच वेगवेगळ्या करायला जायचे. ये जुदाई मै भला होणे देती. मी बंड करून उठायचे नि म्हणायचे ' त्या लॅबमध्ये बर्नर, माचीसपेटी नाहीये सर, मॅडमने इकडेच पाठवलंय' आणि एवढ्या धाडसाने त्याच्याच बॅचमधे प्रॅक्टिकलला बसायचे. प्यार धाडस देता हैं कुछ भी करने का ... आणि हेच धाडस करत नजर मैत्रीणीशी भिडवत त्याच्याकडे हात करत बर्नरसाठी माचीस त्याच्याकडेच मागायची. नजरेला गुस्ताखी करण्याची संधीच द्यायची नाही. त्यामुळे सगळं बोलायचो पण बोलायचोच नाही.  अजब असायचं सगळं काही ....
             हाहाहा तो मराठीचा पेपर .... आज आठवतानासुद्धा कस ताजं वाटतय सगळं, जसं आत्ताच घडलं असावं नि मी चित्रपटात पाहत असावी.  त्याच्याकडे पेपर लिहायला परीक्षा पेपर नव्हता. मित्रांकडे मागितल्यानंतर मलाही मागितली. त्याने पहिल्यांदा काहितरी मागवलं आणि मी त्याला नकार द्यावा हे मला पटत नव्हतं म्हणून मी ' आहे  ना... पण बाथरुमला जाऊन येते मग देते.' म्हणून जी त्या कॉलेज स्टेशनरीत धूम ठोकली ती  माझ्याकडे नाही म्हणून परीक्षा सुरु व्हायचा शेवटच्या मिनिटापर्यंत बाहेर थांबून ती घेतलीच नि ती घेऊनच वरती आले. पण्ण माझं दुर्दैव हे की त्याआधीच त्याला परिक्षा पेपर मिळाल होता पण सुदैव हेच की परिक्षा निरिक्षकाने  पेपरला बसू दिलं. डर नापास व्हायचं नव्हतं रे कधी... दुसऱ्या वर्गात जाऊन बघायला कष्ट लागले असते ना जरा आणि स्वतःच्या वर्गातून त्याला बघण्याची मजाच काही और असायची. म्हणून ही उठाठेव !
          काय एक एक खूळ असायचं त्यावेळी मैत्रीणींच्या सांगण्यावरून नवीन ड्रेस घातला, नवीन हेअरस्टाईल केली की वाटायचं आधी त्याने बघावं एवढी साधी इच्छा आणि आणि आनंद असायचा तेव्हा. नाहीच कधी बघितलं तर थोडस हार्टफेल व्हायचंच यार्र प्यार नहीं था लेकीन एकतर्फा तो था त्यामुळे....'प्रेमात खचून नाय जायच बॉस ' हा मंत्रा कॉलेजभर पुरला ... पुढल्या दिवशी पुन्हा नवीन प्रयोग नवीन प्रयत्न, ना अहंकार ना ऍटिट्यूड ... सगळ कसं एकदम निर्मळ नि हार्मलेस होतं...
           सगळ झालं. आज तीन वर्षे झाली. सगळ्या गोष्टी केल्या. त्याच्या असण्यापासून त्याची अटेंडेन्स लावण्यापर्यंत सगळंपण त्याला ना कधी कळलं, ना मला सांगावस वाटल ....
त्ते म्हणतात ना प्रश्न,भांडण,वाद आणि ब्रेकअप या गोष्टी प्रेम व्यक्त केल्यावर सुरू होतात म्हणून मी कधी बोललेच नाही.
 कारण त्याच्याबरोबर ब्रेकअपच दुख: नव्हत मला, फक्त माझ्या प्रेमाबरोबर मला ब्रेकअप नव्हतं करायच खरंच! जसं होतं तसं मस्त होतं, माझं होतं. यात मी खूश होते प्रचंड! ना अपेक्षा ना भीती. जो जवळच नाही, तो दूर जाण्याची भीती नसते आणि जो हृदयात आहे कित्येक वर्षापासून एकतर्फी प्रेमात, त्याने आपल्याला सोडावं हा लवलेश नसतो ....
"उसने कभी उस नजर से मुझे देखा नही बात अलग है,
लेकिन मे उसे उसी एकतर्फी-नजर से देखुंगी ये भी तेय है ||" या वाक्यातलं समाधान मला जपायचं होतं.
एकच समाधान असेल आयुष्यभर की, हे माझं हक्काच प्रेम ना लग्नानंतर मला आडवं येईल ना आत्ता ....
            फक्त ते दिवस असमंजस, खुळे निरागस आणि खऱ्या प्रेमाचे होते. ते परिकथेचे दिवस गेल्याचं थोडं दुख या समंजस आयुष्याचा ताण आला की मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी आहे.  अन पहिला दिवस आठवल्यावर त्याचा चंपू तेल लावलेला चेहरा नि सेंड-ऑफच्या दिवशी स्पाईक्स केलेला चेहरा , दोन्ही बिफोर-आफ्टरसारखे आठवतील नि या बिफोर आफ्टरमधला एक अख्खा आठवणींचा जलाशय, त्याच्या हास्याने नि फक्त त्याच्या अस्तित्वाने तुडुंब भरलेला दिसेल ...

#shades of Love


ये उन दिनों की मोहब्बत हैं|

by on जुलै २४, २०१८
आज खूप दिवसांनी त्याची आठवण झाली ... प्रेम बीम नसावच ते, पण मला तो आवडायचा...  त्याच्या मित्रांमुळे मला तो आवडायला लागला. मी बघितलं आणि...

पाऊस यावा आणि तो माझ्यासाठी यावा.. स्वार्थी मी व्हावं... या पावसात माझी बरीचशी काळजी सहज ओसरते अनुभव आहे आतापर्यंतचा. त्यामुळे सगळ्या दुनियेला, त्याच्या मोहमायेला झुगारून मी त्याच्याशी समरूप होते, सगळं दु:ख सांगुन मोकळी होते...!
त्या घट्ट आकाशाच्या काळपट रंगात डोळ्यात डोळे घालून मी म्हटलं, "अब याद नहीं आती उनकी... सच ही तो कह रही हूँ| "
तितक्यात मला आठवलं सोबत मित्रही आहे आणि त्याच्या एका संभाषणाला कंटिन्यू करत तो एकसकट एक वाक्य म्हणाला,
"जितकं लवकर एखादी भावना स्वीकारशील ना, तितकं तुला सोप्प जाईल त्यातून बाहेर येणं किंवा किमान त्यातून सर्वाइव्ह करणं सोप्प होईल. नाहीतर ती मनात दाबून टाकली कि तिचा विस्फोट होतो... उधाण आलं तरी चालेल, बोलून टाकायला हवं... "
खरं होतं ते?
नेम्मक्क तेव्हा अचानक एखाद्या आठवणीला डोकवायचंच असतं, निमित्ताच्या ती शोधात असते....
आणि यावेळी मित्र म्हटल्याप्रमाणे मी त्या आठवणीला स्विकारून येऊही दिलंच... मलाही निमित्त हवं होतं...
"काय होतंय जास्तीत जास्त...?" म्हणत मी स्वतःलाच प्रश्न केला ...
"त्याची कडाडून आठवण येतेय." उत्तर मिळालं. पण मी चहा ठेवायचा बहाणा करून ते टाळल्यासारखं केलं ..
बाटलीतलं पाणी घटाघटा चहासाठी टाकला. साखर त्याची नि माझी मिळून दोन चमचे टाकली .... त्यात रागारागात गवतीचहा टाकलाच आवर्जून.
रागारागात ज्याची आठवण आली त्याच्याशी संवाद साधल्यासारख करत ध्यैर्याने मी बोलत होते; तुझ्या आठवणी मला आवडत नाहीत. पण गवतीचहाने त्यांना उधाण येणार असतं आणि मला ते उधाण निर्लाज्जसारखं हवं असतं... 'का हवं असतं?' हा दुधखुळा प्रश्न तु मला न विचारलेलंच बरं. हक्क तोही नाही तुझा.!
पण तितक्यात तो उकळणारा गवतीचहा विक्षिप्तपणे त्याच्या येणाऱ्या बुडबुड्यांतून मला खॊचकपणे विचारूनच टाकतो, "कुठे, आहे कुठे तो?"
मी त्यालाही टाळल्यासारख करते...
समोर मित्र बसलेला आहे...
गवतीचहाच्या दोन पाती न गाळताच तो कप स्वतःला घेत, दुसरा 'आज माझ्या हातचा चहा पाजते तुला.' असं म्हटलेला चहा त्याच्याकडे सरकवते. त्या सरकवण्याबरोबर रिटर्नमध्ये आधीची आठवण बॅकग्राऊंडला सुरु होते.
मित्राची  बडबड चालू असते आणि माझ्या बॅकग्राऊंडला तुझ्या भासांची असंख्य, अखंड बडबड सुरू असते...
"जिथे तु आणि मी असते फक्त."
जिथे तुझं अस्तित्व नसतं, मला ते नकोही असतं... कारण मला आत्ताचा तू नकोच आहेस... हवा आहे तो व्यक्ती, जो कधीकाळी माझा होता, ज्याच्यात मी होते... ज्याच्यात मी स्वतःला ठेवल्यावर मला कसलीच क्षणभरही काळजी नसायची.. कारण तूच म्हणायचास "मी तुझ्या सोबत नाही, तुझ्या आत आहे."
मी माझ्यातल्या तुला जोपर्यंत तू 'माझा' म्हणून होतास तोपर्यंतच्या आठवणीत जपलंय कारण त्या वेळचा तू दूषित नव्हतास. आणि मला या पावसात शुद्ध गोष्टी आवडतात... त्यामुळे आपल्यातले 'आपले' क्षण मी ठेवलेय कि... या सायंकाळच्या पावसातल्या चहासाठी नि बॅकग्राऊंडला असलेल्या तुझ्यासोबत कट्ट्यावर बसून तुझ्यात हरवून जाण्यासाठी. तू असाच तिथे राहा... कधीच जाऊही नको ना येऊही नकोस... 
मी आनंदाने स्वीकारतेय तुझं आठवणींमधलं असणं..
आणि माणसांमध्ये राहूनही स्वतःत जगणं ...

गवतीचहाचा बहाणा ...

by on जुलै २२, २०१८
पाऊस यावा आणि तो माझ्यासाठी यावा.. स्वार्थी मी व्हावं... या पावसात माझी बरीचशी काळजी सहज ओसरते अनुभव आहे आतापर्यंतचा. त्यामुळे सगळ्या दु...
कुटंबातल्या नात्यांत...
धागे गुंततात, उलगडायला वेळ लागतो.
एकत्र जोडुन धरायला वेळ लागतो की, मग उलगडणं महत्वाचं वाटत नाही ?
असमान आसमंत अटळ होत जातो. निर्मितीकक्षा चिवट होतात आणि 'पुन्हा सगळ्यांनी एकत्र यावं' हा आविर्भावही कुणाच्या मनावर बिंबत नाही ...माणुस समुद्र नाही होऊ शकत, तो तितका विशाल नाही बनू शकत. त्याच्यात कुणाला आपलंस करण्याच सामर्थ्य नसतं...तो निस्वार्थ होणं म्हणजे ... असो ! 
सुरेश आज खूप दिवसांनी घरी आला. मी खुश होते. अम्मू पण खुश झाली. जाईच्या चेहर्यावर मात्र कडवट भेग विस्फारली. मन्याला काही कळणं तर अशक्य होतं. शेवटी प्रश्न होता सुरेशचा ...
नात्यांतल्या गैरसमजाचा, वादाचा हा खेळ खुऊप कडवट असतो. समजण्या आणि समजावण्यापलीकडचा ...
सुरेश आयुष्य जगला होता. 'रुबाबतील ढब' एक व्यक्तिमत्व होतं त्याचं. समोरचा बेधडक गार होऊन त्याचं ऐकायचा, असा तो होता. घरातल्या किंवा बाहेरच्या कुठल्याच नात्याला मानायचा न जपायचा तो. त्याचं व्यक्तिमत्व म्हणजे सुस्पष्ट ढोंगीपणा होता. जेही होतं जगासाठी, जगाच्या दृष्टीने.. 
दूर कशाला जायचं, कालचंच उदाहरण सांगते.
शलाखाने (मैत्रीण) फेसबुकला स्टेटस टाकलं होतं,
"रिश्तोंसे खूबसूरत कोई दौलत नहीं होती, दौलत होकें भी रिश्ते ना हो तो आपकी खुशिया भी दुबली हो जाती है | "
त्यावर त्याने कॉमेंट केली:
"बहोत खूब शलाखा... आजकाल की जनरेशन कहाँ ईतना सोचती है ...."
सुरेश इथेच सिद्ध झाला.! 

पण.............
हो 'पण' आहेच.
स्वभावबद्ध प्रतिमा कधीकधी बदलतात. इतक्या की सुखद अपेक्षाभंग होतो आणि आवाक भाव जखडून मन जोखिमीने प्रश्न करून उठतात.
सुरेशने आज 'मला' घरी आणलं होतं. यावेळी घरी येताना त्याने स्वतःच्या पलिकडे बघण्याचे कष्ट घेतले होते. 
मन्याला बोटांनी अक्षरओळखीची पाटी आणि अम्मूसाठी साडी आणली होती .... सुरेशचं हे बदलणं अनपेक्षित होतं.! 
यासगळ्यात जाई मात्र कडाडून तापलेली होती. तिच्या रेखीव डोळ्यांत तो अंगार झळकला. अम्मूने हातानेच शांत केलं तिला. प्रेमळ सासू असली तरी सुरेशची ती आई होती. त्यामुळे स्वाभाविक तिचा कल सुरेशकडे जास्त होता.
भेगाळलेला राग तिचा एखाद्या नसेतून बाहेर येणार होताच, तोच रेडिओ 'सदाबहार'ला अलका याग्निकचं 'क्या तुम्हे याद हैं।' लागलं...
आणि...
आणि चक्क सुरेशने जाईचा हात हातात घेतला. तिला एका जेंटलमनसारखं 'वूड यू लाईक टू डॅन्स विद मि ?' विचारलं. अडखळत, गोंधळत जाईची पुरती धांदल होत, विचारांची फरफट होत ... हो? नाही? च्या वावरातच ती नकळत त्याच्याबरोबर संलग्न झाली होती.
घरात आम्ही सगळे होतो, अगदी आधीचेच सगळे ... पण त्याने घेतलेल्या या अनपेक्षित स्वभाव वळणाने आम्हीही चाटच पडलो...
घरात ही अशी कित्येक दिवसानंतर क्षणाक्षणावर, घरातल्या भिंतीभिंतींवर ख़ुशी बहरत होती. भेगाळलेल्या भिंतींत ती बसली होती. 
आता पुढे कित्येक वर्षे या दृष्ट लागल्या घरी पुन्हा कुणी रुसणार नव्हतं, रागावणार नव्हतं, अबोला धरणार नव्हतं....  
जाई खुश होती. कारण जाईसाठी भेट म्हणून खुद्द सुरेशच आला होता. तिला आता काहीच नको होत ... अम्मूची तर काळजी तेव्हाच मिटली,जेव्हा सुरेशने आईसाठी साडी घ्यावी, या विचाराने साडी आणली. अक्षरओळखीची पाटी आणून न सांगता त्याने मन्याची जबाबदारीही घेतली. 
आणि मी ?
माझं काय ?
मी तीच होते जी त्या रात्री सुरेशच्या आयुष्यात आले ....
"खुशी/आनंद/सुख"

त्यामुळे माणूस जेव्हा जेव्हा 'स्व' पलीकडे जाऊन बघतो तेव्हा त्याच्या आनंदाच्या कक्षा दुपटीने  विस्तारतात...  आणि म्हणून कित्येक कडवट रात्रीनंतर सुरेशच्या एका पुढाकाराने  ती रात्र 'माझी' ठरली .....


(वरती वापरलेले "मी, माझी, मला" हे शब्द "आनंद, ख़ुशी, सुख: या अर्थाने वापरले आहे. )

ती रात्र 'माझी' ठरली .....

by on जुलै ११, २०१८
कुटंबातल्या नात्यांत... धागे गुंततात, उलगडायला वेळ लागतो. एकत्र जोडुन धरायला वेळ लागतो की, मग उलगडणं महत्वाचं वाटत नाही ? असमान आसमंत अ...

           लहान होते मी, तेव्हा माझ्यासारखाच छपरावरचा पाऊस पत्र्याच्या त्या छतावर  ताडताड उड्या मारायचा ... खेळायला, बागडायला, दंगा करायला त्याला ही पत्र्याच्या छपराचीच खोली बरी आवडायची...? प्रश्न नाही पडायचा मला. पण मग कधी इतकं इतकं नाचायचा की छप्पर तुटून त्यातून स्वतःला त्या खोलीत पाडायचा... पाऊस हातावर घ्यायचा हे मोठ्या लोकांचे चोचले !
          पावसा, तु पडताना पाहून आत कामात गुंतलेली ती स्त्री घाई करत तुला तिच्या टोपलीत झेलायची. तु पडणार अजून पडणार, बेदम जोरजोरात पडणार. एक दोन करत करत दहा बाय दहाच्या त्या खोलीत २५-३० छिद्र करणार. ती कुठल्याही तक्रारीविना, तीन थेंबाना मिळून एक भांड लावणार, त्या तुझ्या तसुभर पण मौल्यवान थेंबाला झेलायला. 
          तुझं त्या एवढुश्या छपराखाली हे असं रॉयल स्वागत व्हायचं नं मला तीची धावपळ बघवायची नाही. तुला इथेच का पडायचंय म्हणून राग यायचा तुझा. पाऊस सुखावतो, पिक मोठं करतो, शेतीसाठी पाऊस जीव असतो. हे मोठेपण मला कळायचं नाही, मला तो 'माझ्या छपरावरच का पडायचा?' हा प्रश्न 'बदला घ्यावा त्याचा' इतका जवळचा वाटायचा .
त्या खोलीतच मग एखादा चुकून न गळणारा कोपरा शोधून ती माउली मला अभ्यासाला बसवायची . माझे डोळे तिच्या तुझ्यासाठी चाललेल्या धडपडीने गरगर फिरायचे. तिची कळकळ समजायची "अभ्यास कर गं बाई माझी...!" आणि तितक्यात पुढे बघत पुस्तकाच्या त्या पानावर "पावसाच्या सरसर सरी हातावर घेऊ ..."  या कवितेच्या ओळी  ढोंगी वाटायच्या. ..
          आता दिवस बदलले,... पावसावर रोमॅन्टिक कविता कराव्या वाटल्या तरी वास्तवात तो तितकाच हिडीस, निर्दयी वाटतो कधीतरी. त्याचं हे रुप अशा या छपरांखाली भेटतं.
          "छप्पर असूनही ओसाड आकाश त्या छपरातून खाली पडलेलं असतं... "
            तरीही अशावेळी दूर कुठेतरी हातात कॉफीचा मग, रोजनिशी, पार्करची लेखणी, डोक्यावर सिमेंटचं मजबूत छप्पर, वर अजून मजबूत घरं आणि अशा ठिकाणी खिडकीच्या शेजारी खुर्ची टाकून या पावसाला पाहताना असे दोन चार सुखी शब्द सापडणारा माझ्यासारखा कुणीतरी सहज असतो . कारण त्या चार भिंतीत हा पाऊस त्याच्या डोळ्यांनी पाहता येतो, बाहेर डावा हात काढून, ते थेंब त्या हातावर झेलून उजव्या हाताने त्याला आहे तसं लिहिणं सहज सोप्प असतं कारण तो माझ्याकडे अंगावर येणारा नसतोच. भातलावणी करणारा शेतकरी फोटो काढायला फ्रेमिंग म्हणून छानच वाटतो. पण त्यापलीकडचे कष्ट, त्यामागचं स्ट्रगल खोल असतं, या सुरक्षित चार भिंतीत चार ओळी लिहिण्याइतपत त्याची खोलीही नसते.
          कला फक्त निसर्गात आहे... बाकी कलाकार आपल्याला कला येते हे ढोंग उत्तम करतात.
आज सुरक्षित ठिकाणी बसून,
"छपराखाली आसरा शोधणाऱ्यांना थोडं ज्ञान द्यावंस वाटतं,
छपराखालीही हा असा पाऊस पडतो सांगून टाकावंस वाटतं..."
#Unavoiding_reality



छपराखालचा पाऊस !!!

by on जुलै ०८, २०१८
           लहान होते मी, तेव्हा माझ्यासारखाच छपरावरचा पाऊस पत्र्याच्या त्या छतावर  ताडताड उड्या मारायचा ... खेळायला, बागडायला, दंगा कराय...
"स्पर्शून माझ्या सर्वांगाला ... 

सुगंध तुझा अलवार आहे ... 

तू घे सावरून स्वतःला...  

मला सावरने आज शक्य नाही... "
मी पावसाबरोबरच बोलत होते. पर्याय नव्हता नं, सोबत्याने दुसरा पर्याय तरी ठेवला होता का?  सोबत्याला आज भेटणं शक्य नव्हतं म्हणे...
त्यामुळे मी पावसाशी बोलूनच थोड्याशा तनहाईचं सेलेब्रेशन करत होते ...;.
पावसा, चेहर्यावरून अलवार सरकून आतपर्यन्त माझ्या नसनसात गेलास तू ...
हात मोकळे करून सारे विश्व कवेत घेत होते मी ...
त्यात हा विजांचा कडकडाट, पावसा तू मला घाबरून देत होतास ... एकटी असल्याचा हा जुलमी फायदा तू घेत होतास, पण कोणाला काय पडलं नं! मी या रोमॅन्टिकपणात माझा 'हक्क' मिस्स करत होते...
त्या थंडाव्याने गारठून मी जात होते ...
तरी मन माझे मानत नव्हते पावसा तुला सोडायला ...
हट्ट सोबत्याचे कितीदा पुरवून तुझ्यात ना भिजले मी ...
माझे हे तुझ्यात भिजणे किती त्याला मोहित करायचे माहिते.? पण माझ्यात विरघळायचा हक्क फक्त त्याचा, म्हणून तुझ्या विजेपेक्षाही कडाडून चिडायचा हा तुझ्यावर...
पण मी अशी गुंतलेले केस मोकळे करत यायचे, ते तो पहातच राहायचा.... त्यामुळे का होईना थोडा आवडायचास त्याला तु... काय म्हणायचा माहिते, शब्दांनी खोटं नाही बोलवत म्हणणार होतो सुंदर दिसतेय पण यार्र मादक दिसतेयस तू. सांभाळ स्वतःला... पण्ण केसांतून झटकताना हळूहळू गारातून पडणारे थेंब त्यालाच इतके माझ्याजवळ ओढायचे की मला त्याला सांभाळावं लागायचं... आणि त्याला सांभाळण्याच्या त्या प्लानमधून जवळ घेण्याच्या त्याच्या आकर्षणात मी स्वतःला शातीरपणे सोडवून जी घ्यायचे ...
माझ्या अंगावर थेंब पडायचे, तो त्या पावसाला नावे ठेवायचास ..." हक्क तुझ्यावर फक्त माझा आहे" कित्ती आतून तो म्हणायचा....अशा क्षणी माझं तुझ्यावरचं प्रेम ऊफाळुन यायचं ते इतकं...
आज तू पडताना झेलत होते पावसा तुझे  टभुऱे थेंब  ... तरीही सोबत्या तुला शोधत होते मी  कुठेतरी मागे पुढे सगळीकडे ...
पावसात हे सगळं जे होतं जन्नत होतं .. या आजच्या पावसात तोच नव्हता ... अपूर्ण काय ते हेच होतं ...!
डोळे बंद करून पावसाला मी संपूर्ण चेहर्यावर, अंगावर, मनापर्यंतही पोहोचू दिलं ...वाटलं चिडचिड होऊन तो भेटायला तरी येईल...  पण ... तो आलाच नाही.
शेवटी वैतागून, थंडीने कडकडून आमच्या नेहमीच्या टपरीवर त्याच्या विचारात त्याचा संताप करत एक फक्कड अद्रक चाय सांगितली... "क्या म्याडम, साब नहीं आयें...?" नेमक्का चायवाला बोलला...
"याला आजच साब आठवतोय नेमका..."
मी चहावाल्याला सर्रळ इग्नोर केलं....
केस मोकळे करून दातात क्लिप अडकवून बांधता बांधता विचारच करत होते, त्या विचारांना बाजूला सारून बघते तर्र काय ...? समोर.... तो .... :O
व्हॉट्ट.... I was like what the ***  तोंड उघडं ते उघडंच, तोंडातला क्लिप जसाच्या तसा खाली पडला पण्ण मग वाटलं भास होऊच शकतो हा गेला खड्ड्यात मला काय फरक पडत नाही... मी इग्नोर केलं... पुन्हा खरचं तो होता का या अनपेक्षेने पहायला गेले ... तो खर्रच... खर्रच खर्रच तो होता....
पण्ण त्यातही मला आठवलं मी चिडलेली आहे, त्यामुळे सगळी एक्साईटमेन्ट सगळे किसेस हग्ज दूर डोंगरावर नेऊन ठेवत मी त्याला म्हटलं,
"उशीर झाला तुला ... एक पाऊस उधार ठेवला तुझ्यावर आज मी ...निघते बाय भेटू पुन्हा तुझ्या सवडीने!'  ... नि निघणार तोच मागून हात धरून तो म्हणाला,
"ए- जान-ए-मन... पाऊस आहे तो आणि मी 'मी' आहे कळलं.... त्या पावसाला माझ्याशी जिंकण सोप्प नाहीए हे पक्क डोक्यात फिट करून घे.?"
त्याच आनंदाला लपवून चिडक्या सुरात मीही म्हटलं "ए चल्ल हट्ट जेअलस मुलगा.. दुर होके भी एहसास उसका आबाद हैं... तु आत्ता आलयंस पावसातही आणि आयुष्यातही." 
"ए - नाजनीन! कसं आहे ना... असे कित्येक क्षण माझ्या वाट्याला आले आहेत, ज्यात फक्त तू आणि मीच होतो ... तो कितीही जूना असला तरी त्याला 'मी' होणं शक्य नाही आणि तुला त्याच्यावर ' माझ्यावर करते ते प्रेम' करणं शक्य नाही....आणि उलट खरं सांगायचं तर आज थोडावेळासाठी काय त्याला 'तुझ असणं उधार दिलं' इतकंच काय घडलं.. त्यामुळे उधारी त्याची माझ्याकडे झालीय ... त्यामुळे तू जाऊ नकोस लग्गेच तो आत्ता पडेल आणि पडेलच देखना तुम .. ठरलंय तसं."
मी स्तब्ध म्हणजे त्याच्या त्या बोलण्याने काय बोलावं समजेना...  चिडचिड कद्धिच संपली होती. मला खूप नवं वाटत होतं... मी त्याच्या नजरेशी नजरच मिळवू शकत नव्हते, कारण मुळात हे सगळं फार परीकथेसारखं असलं तरी खोटं वाटत होतं मला..
अशातच इकडे तिकडे पाहत होते, त्याच्यावर चिडून आणिया निसर्गावरही... तितक्यात  वाऱ्याने काय ते सुखद खुणावलं, वार्याच्या थंडाव्यात विश्वास नाही बसला पण हळूहळू पावसाचे थेंब मला स्पर्शून जाऊ लागले ... वाढून विरळविरळ म्हणत त्या थेंबानी मला तो समोर दिसेनासा झाला... पण पावसाच्या या जोरदार मीठीत मला स्पर्श भावना आणि श्वासांत सुवास होता त्याने घट्ट पकडलेल्या माझ्या हातांचा... त्याचं  पडणं माझ्या नजरेगणिक जास्त जास्त वाढायला लागलं होतं. मी चिडलेली हळूहळू ओसरायला लागले होते पण मनातून ठरलं होतं त्याच्यासमोर ओसरायचं नाहीचे...
हळूहळू हळूहळू येणारा तो आता पूर्ण धाडधाड कोसळायला लागला... आणि थोड्यावेळाने भानावर येऊन शेजारी याच्याकडे पाहिलं, गर्वाने निरागसपणे काय पाहत होता तो माझ्याकडे मला समजलं नाही पण्ण त्या भर टपरीवर, मोकळ्या आसमंतात, माणसांच्या गर्दीत, माझ्या केसांतून तरळणार्या केसांच्या बटेला मागे सारत," माफ कर ना जीवा ¡ .... पुन्हा चुकूनही ही चूक नाही होणार .... एक्स्ट्रीअमली सॉरी नं ..."
"ही चूक नाही म्हणजे नवी चूक करणार तु ..." मी जोरात खोटंखोटं रागावले...
डोळे बारीक केविलवाणे करून पाहतच राहिला की तो .... आणि एकसाथ जे हसलो दोघे ....
पावसा खास है तू !
दोघांनी सोबत वरती पाहीलं त्याने माझ्यासोबत पावसाला अनुभवलं नि
' तू आज पुन्हा एकत्र आणलंस आम्हाला.' म्हणून मी पावसाचा शुक्रिया अदा केला
"उधारी आमच्याकडे तुझी राहीली नेहमीसारखीच." म्हणून अलविदा करत बिनदिक्कत स्वार्थी बनून मी याच्या मीठीत विसरून गेले  पावसालाही....


उधार पाऊस ...!

by on जून २१, २०१८
"स्पर्शून माझ्या सर्वांगाला ...  सुगंध तुझा अलवार आहे ...  तू घे सावरून स्वतःला...   मला सावरने आज शक्य नाही... " मी...