यारी ये बेफिक्री ...। - Sufi

यारी ये बेफिक्री ...।



"काही गोष्टी सुटत नाहीत यार... 

सोडाव्या लागतात..."



साला तुमच्या डोक्यात दारूच येणार ना...

शेवटचा दिवस ए कॉलेजचा....

यार आपली बॅच, आपली सगळ्यांची दोस्ती... आणि या टिम्बटिम्बापुढे भरणाऱ्या कित्ती आठवणी दोन वर्ष देऊन जातात.
कॉलेजच्या दिवसांत सगळेजण एकमेकांचे नसून एकमेकांचे होतो...


मी- ते कोणतं ठिकाण रे?मला आठवेचना...ते बघ ना फुल्ल जंगल ए. मग त्यातून मध्ये जाऊन ते आत धबधबा... नावच आठवेना...
शी बाबा... माझी मेमरी ना.. असला राग येतो ना कधी कधी म्हणजे ना... पत्रकारितेत येऊन नावच लक्षात राहत नाही काय ***पणा हा?
तो - देवकुंड ... 😂😂 आणि तो माझ्या स्वभावाला वाकिफ होऊन फिदीफिदी हसायला लागला...
मी - हां... तेच तेच ...हसतो काय हरामखोरा तू काय झंडे गाडले का एवढ्या वर्षांत...
तो - यंदा पण जायचंय कुत्रे. समझी क्या?मी - जाऊ की!पण ... मन मायूस झालं होतं...
यंदा सगळं किती बदलेल ना रे .?
कॉलेज नसेल, ऑफिस असेल.
मग सुट्ट्या घ्यायच्या. तेही आपल्याच आनंदासाठी तिर्हाईताकडून परवानगी... माणूस किती उधार होत जातो ना.? किती वेगळं.तो - उलट भारी की... आपण आझाद होऊन जाऊ. आणि घ्यायची मग सुट्टी.

तुला
काय, कष्टाने एक सुट्टी घ्यायची... वेळेत यायचं, पाऊस असेल तर आजारी पडेल या भीतीनं भिजताना पण विचार करायचा, उन्हात भाजायचं असेल ते पण ऑफिसात टॅन पडलेलं अंग कसं दिसेल याचा विचार. उद्या पुन्हा ऑफिसला जायचं याची टिकटिक. कारण रोज रोज सुट्टी द्यायला आपला बाप तर नाही, ना आपले मास्तर.

त्यात घाणेरडं फीलींगच हे होतं कि कॉलेज सुटणार...

हातातले सगळेच उनाड क्षण, उनाड दिवस, अवखळ फिरणं, बागडण, चुका करणं, चौकटीतल्या आयुष्याला लावारिस करून , सगळं सोडून दूर कुठेतरी कॉलेज बंक करून निसर्गाच्या सानिध्यात जायचं, ते बंकींगचं खोटं कोणालाही विकणं हे कॉलेजमध्ये शक्य पण ऑफिस सुरू केलं की हे खोटं स्वतःलाच विकायचं.

सगळच अंगावर घ्यायचं. जगायचं तेही सहज नाही प्लॅन करून....
आज बाहेर कडाक्याच्या उन्हात पाऊस पडताना पाहिलं... हेच तर कॉलेजचे दिवस असतात. सगळं आयुष्य भकास कोरड असतं, त्यातला सावन म्हणजे हे कॉलेज डेज असतात.

या दिवसांचा भूतकाळ होणार, हि कल्पना मनाचा थरकाप उडवत होती....

मनात सगळंच येत होतं, कॉलेजच्या पहिल्या दिवसाची अनोळखी नजर, ते अपघातानेच कितीतरी चेहऱ्याना भेटून, तेच कमीने एका आठवड्यात हक्काचे सोबत बनायचे, रोज टकल्या पकवणार म्हणत म्हणत कॉलेज मास्तरांची खेचायची, आणि एकाच त्या हातावर कित्येक टाळ्या पडायच्या... स्साला टेलिपॅथी हि फक्त कॉलेजच्या मित्रांमध्येच असते जेव्हा समोरचा टीचर 'आयुष्यात कधी सिरीयस होणार, हि दुनियादारी आता नाही कळायची... तुम्ही तिघे बाहेर उभे र्हा म्हणायचे' त्यांच्या या अशा सिरीयस लेक्चरला आज शेवटच्या दिवशी सिरीयस व्हावं वाटत....

स्साला हे कॉलेज कुठेच सुरु होऊन कुठेच संपत नाही... 



यात मैत्री येड्यासारखी निस्वार्थी भिनभिनत नसानसात भिनत असते... असाइनमेंट, पहिला नंबर वरून स्वार्थीपणा, आपला ग्रुप, कूलनेस, मूवीला जायचं, त्यातच सगळ्या रस्त्याभर आपलाच आवाज आणि त्यात एखाद्याच्या सामानाची सेटिंग लावणं, बळच कुणाचंतरी नाव कुणाशीही जोडून त्यांना फुल्ल सिरीयस करायचं, कशावर विनोद होत नसला तरी हसायचं मात्र पार बेंबीच्या देठापासून.... मग गर्लफ्रेंड नावाचा भरती भक्कम खांब यायचा, तिला सामान, टप्पा, पत्रा, थवा, पाखरू म्हणून चिडवायचं.
त्या आनंदाला लेबल द्यायची गरज नसायची....
#daywellspent #withfriends या हॅशटॅगचा सपोर्ट नसायचा... कारण मित्रांच्या सोबतीची खुशनशीबी हीच कि एकत्र आल्यावर मोबाईल फोन्स नावाचा दुश्मन आम्हा मित्रांपासून बाहेर पडायचा. स्साला बालपणीचा फील हे दिवस कायम ठेवता... आणि या बालिशपणाला उभारी देता ते हे कमीने मित्र....
स्साला कोण कोणाचं नसतं पण नात्याला दृष्ट लागावी असले हरामी असता....

आज सेंड ऑफ सारख्या दिवशी 'ए गपेय, मी नाही रडणार' म्हणत म्हणत त्याच हरामी चेहऱ्यांवर खूप मौल्यवान आयुष्य हातातून जातंय कि काय याची लकेर डोळ्यांतून पडत होती...

आज आक्ख कॉलेज लाईफ आठवताना एका पॉईंटला मला 'आईएम रिअली गौना मिस माय कॉलेज डेज' मधील ओळी आठवून एकटं वाटतं होतं,

"आईएम रिअली गौना मिस माय कॉलेज डेज....

मिलके लिखना वो जर्नल्स, और सब्मिशन लास्ट मिनिटपर।।।

एक्जाम्स की वो तैयारी, वो लिखना वो तीन घंटे।

और बहार आके वो कहना, स्सालाsss क्या बेक्कार पेपर सेट किया था यार "

यापेक्षा वेगळी फिलिंग नाहीये...

फेरवेलचा दिवस येतो, सगळ्या आठवणी समोर येतात... अश्रू अनावर असतात. रडावसं वाटत नाही, एकमेकांना खोट्या सांत्वनाची झालर लावून आतल्या आत सगळेच रडत असतात. इतकं कसं हे नातं तेवढ्या दिवसांत आयुष्यभराचं वाटू लागत?

'मला वाटतं इतका का बाऊ करतेय ...' मित्र म्हणतो तसं, 'मी ओव्हर रिअॅक्ट करतेय...'
बरं होत असेल ओव्हररिऍक्ट. पण का होऊ नको?
सांग ना, म्हणजे जन्माच्या चौथ्या अजाणत्या वर्षांपासून मी शिक्षणाच्या शाळेच्या पायऱ्या चढले, त्यानंतर कॉलेजच्या.
त्यात कुठलाही गॅप नव्हता. आणि आज हे अचानकच, अचानक नाहीये पण तरीही सगळं असं थांबणार ...


'जबाबदार' हा शब्द वाटणीला येणार... 

इतरांसारखे मीही ते गोडच मानून घेणार पण तरीही मला झेपवेल ते? 

कॉलेजमध्ये जे आजपोहतर खूप फिरायच, कॅमेरा घेऊन रॉयल एनफिल्डला किक मारून मौसम मस्ताना म्हणत 'हम जो चलने लगे' गात, बेफाम जगाची फिकीर नसल्यासारखं फिरणं हि स्वप्न त्या कॉलेजच्या हवेत बेफिक्रे उधळून ठेवलेलं आता खरंच जमेल? ... 


सर- चला आत चला दोघे ...
मी - ए चल जाऊ उगाच सरांनी बघितलं आहे, आता बंक मारणं इम्पॉसिबल...तो - आता सरांमुळे आपला प्लॅन कॅन्सल करायचा का...?गप्प तू चल... शपथ ए दोस्तीची....
अन दुसऱ्या मिनिटाला आम्ही तिथून पसार...
मित्राकडून पुढचा किस्सा कळणार...
सरांना आम्ही न दिसल्यामुळे सर मित्राला विचारता, त्यावर तो म्हणतो, तिला पाळी आली होती त्यामुळे ती गेली.
सर - आणि त्याला ? कधीपासून? 

साला सगळं मिळेल, हे कुठून मिळणार?
याला मोल नाही... मोती आहे हे असे दोस्त आयुष्यासाठी...

कॉलेज म्हणजे दुसरं आयुष्यच असतं.... ज्यात सगळंच वास्तवाच्या पल्याड असतं. अन माझ्या या दुसऱ्या आयुष्याच्या संपूर्ण बेफिक्रे प्रवासात मला करण जोहरच्या फिल्ममध्ये असतं ते न अनुभवल्याचा पश्चाताप नसणारे...

भीती सगळ्यात जास्त होती ती, 'आपण कॉन्टॅक्टमध्ये राहूच ना' या वाक्याची . कारण माझ्या बॅकग्राऊंडला " हम रहे या न रहे कल....sss" या गाण्याचा आवाज जास्त होता.. 
उद्या मला फेबूला स्टोरी अपलोड करून "कहाँ हो मेरे कमीने दोस्तो" म्हणावं नको लागायला भीती याची वाटते...
स्साला हि फिलिंग कितीही लिहावि, लिहून संपत नाही...
साला ... मेन मॅटरच हा होणार आहे, यापुढे मी चुका करणार त्याला माफी नसणार. त्या प्रत्येक चुकितून मला जाणतेपणी काहीतरी शिकावच लागणार...

आज पहिल्यांदा इतकी ओझ्याने भरली आहे मी. 
आजपर्यंत आनंद हा निस्वार्थ होता, त्यात आपलेपणाचा वास होता, मित्रांच्या सोबतीचा सहवास होता, एका बेस्टेस्ट फ्रेंडचा हक्क होता, मार्गदर्शकांचा आयुष्यात टॉप वर नेण्याचा प्रयत्न होता... एकटं झाल्यासारखं वाटतं. किती व्यापलं जात आयुष्य हे कॉलेजच्या दिवसांनी .... वाटतं एवढंच आयुष्य असावं.... पण जाणीव वास्तवाची करून घ्यावी लागते. या क्षणापासूनच समजवावं लागतं मनाला, 'व्हा रेडी मॅडम... आता दुनियादारीत उतरण्याशिवाय पर्याय नाही!'


२ टिप्पण्या:

  1. दर्जाचं... कूल आहेस ग तू फक्त हे जगणं माझ्या वाटयाला आले नाही किंवा मला येऊ नव्हते द्यायचे हे माहीत नाही... मैत्री हा शब्द वेगळा तर आहेच पण आपलेपणा आपण विचार करतो त्या पेक्षा खूप जास्त आहे.. 👌👌👌👌🖤🖤🖤

    उत्तर द्याहटवा
  2. कसलं अफलातून लेखन आहे... व्वा..!! सारेच शब्द आपलेसे करून टाकतात... मोहात पडतात... जगायला लावतात प्रत्येक ओळींमध्ये... भावना शब्दांमधून हृदयापर्यंत पोहचवण्याची हि लकब म्हणजे आहहा.. गझल!!👌

    उत्तर द्याहटवा