Sufi


सगळा निसर्गाचा प्रचंड पसारा नि त्यात तो एकच कणखर हट्टी दगड नि आजूबाजूला देहाचं मंदिर होईल इतका प्रचंड स्तब्द डोह... 
दूर दूरवर नजर जाता नजर कमी पडेल इतकी स्वतःतच मग्न अशी शांतता...
हळूहळू राज्य तिथे वर चांदण्यांचं येतं.
तीत हरवून जात मी स्वतःचा हात हातात घेते...
शांततेत त्या भोवतालच्या मी स्वतःशी आपसूक बोलू लागते, उगाच एखाद्या विचाराशी चाळा करू लागते.
तेव्हा, अलगद हातात घेतलेला माझा दूसरा हात मला स्पर्श करून म्हणतो , नको, शांत रहा जरावेळ . काहीच गरज नाही विचार आणण्याची. एकदम स्तब्द हो मनाच्या शांततेत, या पाण्यासारखी.
पण,
मन ते असं शांततेत शांत राहणार कसं!
हळूहळू राज्य मनाचं येऊ लागतं.
मी अडखळत स्वतःशी हसत स्वतःबरोबरचा संवाद टाळू लागते.
हळूहळू राज्य पाण्यावर येतं.
ते तिथे बसूनही माझ्यावर मोहिनी घालत शांत करते मज आतून बाहेरून...
त्याची ती मोहिनी लपेटत मी शब्द हे शोधत जाते,  प्रवास हा शब्दातून नवखणण्याचा हा असा घडत जातो...

जल ते वृंदावन मानुनी, ढीम्म होतो तो पाषाण,         
पसरत जाते काळोखाची किमया, 
उजेडास या कवेत घेते।।
.
वाऱ्याचेही रिते शहाणपण, न उरे या काळोखातही,
जादू त्याची तिथेही चाले, घेतो कुशीत वाऱ्यासही।।
.
.
न लवे पापणी माझी, उडे आकाशी माझीच स्वप्ने,
सौम्य रवीही आड जातो,
अंधाराला त्या साम्राज्य सोपवुनी।।
.
.
उरे शेवटी राज्य काळोखी, स्वप्न माझी हि स्तब्द होतात,
त्याच त्या पाषाणावर, मी ठिम्मपणे एक स्वप्न जन्मवते।।
 .
.
गडद होतो काळोखही तो, स्वप्न माझे सुरक्षित होते,
निराधार ते आजपर्यंतचे स्वप्न, ठामपणे खरे होत जाते।।
 ........................!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!.......................


#कुठल्याच_शब्दाला_कुठल्याच_शैलीत_न_बांधता_सुचलं तसंच


निसर्गाचा पसारा...

by on नोव्हेंबर २७, २०१८
सगळा निसर्गाचा प्रचंड पसारा नि त्यात तो एकच कणखर हट्टी दगड नि आजूबाजूला देहाचं मंदिर होईल इतका प्रचंड स्तब्द डोह...  दूर दूरवर नजर ज...

मी - काय बोलु? काय बोलु? ............
हाई बोलु? हेलो ? की मग फक्त एक स्माइली टाकु? की मग हाई बोलून स्माइली टाकु?
हाश्ह्ह्ह....... मला काहीच समजत नव्हत. पुरती चलबिचल, धांदल,गडबड,थरथर सगळ एकदाच....
हां.....पाण्याचा घोट घेतला नि ठरवल कि हेल्लोच बोलते...तितक्यात फोन वाजला ... त्याचा फोन होता तो. ओ माय गॉड……. माझा श्वास त्या फोनवरच्या आवाजात थांबला होता.
तो – हेलो
मी - हेलो कोण ?
तो – कशी आहेस.... ?
मी मनातल्या मनात हसून म्हटलं, नशीब त्याने त्या 'कोण'चं उत्तर दिलं नाही.
मी - यावर तर बरं आहे, ठीक आहे, मस्त आहे की मग मजेत ? काय उत्तर देउ? की सरळ सरळ विचारून टाकु , का फोन केला म्हणून ........ नाही, नको ....
तो - ते जाऊदे सगळं. "मला सांग कुठे आहेस आत्ता? ?"
"हेलो?"
मी - हं..... मित्राबरोबर.....
तो - काही प्लान आहे का आजचा?
मी - नाही......
तो - मी येतोय. नेहमीच्या ठिकाणी भेट. नो एक्सक्यूझेस....बाय.
“काय पटापट बोलून गेला हा.. बस्स ? मी गारठली होते, अंगात सनसनीत झणक गेली होती. त्याच्या त्या अनपेक्षित शांत शब्दांनी. जाऊ की नको ? नाहीतर मेसेज टाकते, काम आहे आज नक्कोच भेटायला... पण भेटावसही वाटतय. आज तब्बल ४ महिन्यांनी त्याने फोन केलाय, नक्कीच काहीतरी काम असणार. सोबत नीशाही असेल ? सुंदर दिसते तशी ... दोघे सोबत छान दिसतात, नाही? ओह काम ऑन आयशा , स्टॉप थिंकिंग टू मच…….” मी स्वतःलाच समजावल.

“एनी प्रॉब्लेम?” मित्राने विचारलं.
मी - नो, नॉट ऐट ऑल...
फोन कट झाला होता. काहीच बोलली नव्हते मी, कारण आजचा हा फोन नि त्यानंतर झालेल संभाषण, आयुष्यात पहिल्यांदा जाणवलं, की आज त्याला माझी गरज आहे.
आम्ही भेटलो. तो आला. मी पाहिलं.
माहीत नाही का ? पण आज पहिल्यांदा सोबत असलेल्या मित्राला मी 'मीठी मारुन बाय' केल. तो बघतच होता. माझं मन आज चक्क शांत होत, निगरगट्ट गार. जे हृदयाचे ठोके त्याला बघून धडधडायचे ते आज जणू नव्हतेच.
शर्ट तर तोच घातलाय, पहिल्या भेटीचा. पर्फ्युर्मही तोच, स्पाइक्स, स्टॅंड कॉलर, ब्लॅक शर्ट बस्सच... याआधी तर कद्धी असं झालं नाही ..? काही हवंय का याला? ती सोबत नाही दिसतेय ... काही गडबड तर नसेल?
तो हसला. मला खोट हसावं लागलं. चार बाय सहाच्या खोलीत जितकं गुदमरत नाही, तितकी घुसमट त्या एसी गाडीत होत होती. कारण, काहीही झाल तरी 'माझ प्रेम संपलय' हे त्याला दाखवायचं होतं, आणि यावेळी ते गरजेचही होत. अवघड होत? नाही… बिलकुल नाही ... मी असे एक ना असंख्य विचार करत होते.
गाडी सुरू झाली, पण संवाद मात्र नव्हताच. नजरानजरही झाली नाही किंवा मुद्दाम टाळली त्यानेही... २० मिनिटांचा वेळ गेला.
आम्ही दोघेही शांत होतो, इतके शांत की आवाज होता, फक्त एसी नि रेडियोच्या 'आपकी मुलाक़ात'चा.
तो - गाणं बदलू..? नाहीतर तूच लावते का एखादं? असही तुला माझी प्लेलिस्ट आवडत नाही ना ....
मी - हां :) ..... ( पुन्हा एकदा मनाला समजावलं, प्रेम संपल आहे आणि ते पुन्हा होणार नाहीच , बस्स ..यापुढे काहीही विचार करायचाच नाही) या तन्द्रित अजाणतेपणी मी 'ब्रेकअप सॉँग' लावलं.
हश्ह्ह्ह्ह.... दोघांची नजरानजर झाली आणि एकदाची ती शांतता भंग झाली, आता मात्र दोघेही खळखळुन हसलो.
तो -तू केव्हापासून अशी गाणी ऐकायला लागलीस ? ' त्याने सहजच विचारल'
मी - नवाब साब, मोहब्बत क़ी थी इसलिए, मोहब्बत जी रहे थे|
अब दिल टूटा है, तो उसे भी अपने दर्द की खुशी बाटने का मौका दो||
तो - तू बिलकुल नही बदललीस |
“मी आताही शांतच होते. खरं सांगायचं, तर केव्हा एकदा बडबड करते अस झालं होतं. या शांततेची बिलकुल सवय नव्हती, ना मला ना त्याला. माझा तो थंडावा त्याला आतून खात असावा, तो तेवढा ओळखतोच ना मला ?.... नक्कीच आयशा, हा काय प्रश्न झाला?
पण मग “निशा नि माझ्यामध्ये त्याने निशाला निवडल,” माझ्यावर प्रेम होत ना? ..” तो असतानाही मी स्वतःबरोबर बोलणं अधिक पसंत करत होते ......... पण तरीही कदाचित काहीतरी वाटल असावं किंवा नाहीसुद्धा किंवा मग मी बोलावं म्हणून…म्हणूनच त्याने "लग जा गले" लावलं. माझं भयानक आवडतं गाणं.!
आता मात्र माझ्या मनातल्या आठवणी, प्रेम, एकत्र घेतलेला चहा, ज्ञानप्रबोधिनीची एसपीडीपी, डाकेची दाबेली , वडापावचा चटका, डॉमीनोझचा पिझा, ऐन पावसात छत्री नसताना उडालेली धांदल, राग, रुसवा, त्याचं मनवनं ,चीडचीड, त्याच्याबरोबर घालवलेला प्रत्येक आल्हाददायी क्षण यांना ओहोटीसारख उधाण आलं होतं. ४ महिन्यात सहन केलेला तो दुरावा, तो एकटेपणा त्या एका गाण्यामुळे मी पुरती विसरून गेले, स्वतःलाच मन म्हणत होतं,
"लग जा गले के फिर ये, हसीं रात हो ना हो|
शायद फिर इस जनम में, मुलाक़ात हो ना हो || " गाण्याचे बोल मला बोलतं करू पाहत होते. ओठांवर शब्द इतके ऊसळुन आले होते की, कोणत्याही क्षणी तोल जाऊन बाहेर पडतील,
पण मग मनाने प्रश्न केला,
"आठवते ती रात्र.? जेव्हा तू सोबत होती. तू अडचणीत होतीस. तो ही सोबत होता. हेच गाणं बाजूला चालू होतं. तो तुझा हात धरून विचारू शकत होता की " पिल्लू काय झालयं? मला सांग बरं..... मी आहे ना सोबत ... ही अशी रुखीरखी परी छान नाही वाटत बघ...." पण तेव्हाही त्याला फोन आला. काळजी घे, म्हणून तो निघून गेला, तो गेलाच.
त्यामुळे आज तू काहीही बोलणार नाहीस हे कन्फर्म. कारण तुझं प्रेम तू मारलं आहेस, तुझ्या भावनांना तू मारलं आहेस नि ते कायमचंच.! आता कोणतीही तडजोड नाही, कारण नातं वाचवण्यासाठी जी तडजोड करत होतीस तू, ते नातंच आता राहील नाही, मग तडजोड ती कशासाठी?”
त्याने माझी तंद्री तोंडात विचारलं,
तो - आज उपवास आहे?
मी - अं...?
तो - नाही, इतकी शांत तू कधी नसतेस ना, म्हणून विचारलं.
मी - हमारे चेहरें पे तो हरदम मुस्कुराहट हुआ करती थी| शायद, हमारा वही अंदाज आपको रास नही आया ||
तो - असं तुटक का गं बोलतेयस ? बोल ना काहीतरी एकदम धाडधाड फाडफाड आधीसारखं.... तुझी ही शांतता पोखरतेय मला.
"एकदा माफ कर ना!"
मी - माफी ? कशासाठी?
तो - सगळ्याच गोष्टींसाठी.
मी - कोणत्या गोष्टी ? मला काहीच कळत नाहीए...
तो - पिल्लू, तुला सगळं कळतय. नको ना अस करुस. मला नाही ना राहता येतंय तुझ्याशिवाय....
मी - मला खरंच नाही रे कळतेय, तू कशाबद्दल माफी मागतोयस ते.
तो - बर मी काय करू म्हणजे तू आधीसारख वागशील ?... सांग ना .........
मी - अरे थांबव..... थांबव..... थांबव.... घर आलं ना माझं. चल बाय, छान वाटलं भेटून ... :)
तो - तू बदललीस.... इतकी की, तू शांत झालीयेस प्रचंड आणि मला त्रास होतोय त्याचा. कान तरसलेत गं तुझ ते "आज जाने की ज़िद ना करो " ऐकायला. आज हवं तितका वेळ थांबेल, तू जा म्हटली तरी नाही जाणार, पण तू बोल गं… मी खूप एकटा पडलोय गं..... काहीतरी तर बोल....प्रेम करतो गं मी तुझ्यावर..........
मी - "बस्सससस्स्स्स्स्स्स हां.......... यापुढे एक शब्दही नकोय मला....... नॉट ए सिंगल वर्ड ... प्रेम ? वाह बॉस.... सवयीला प्रेमाच नाव देऊन मोकळा झालास ?,ज्याला तू प्रेम म्हणतो, ती निव्वळ एक तडजोड आहे , आपल्या या सो कॉल्ड तडजोडीला कंटाळून प्रेम कधीच लुप्त झालय.. हे जे आपण भेटलोय ते काही प्रेम म्हणून नाही , मुळीच नाही. आपण भेटलोय, कारण आपल्याला एकमेकांची सवय झालीय. तुला भीती मला गमवण्याची मुळीच नाहीए, तू घाबरतोय त्यानंतर येणार्या एकटेपणाला नि तुझा तो एकटेपणाच आज माझ्यासमोर माफी मागतोय.... त्यामुळे ना....".
पुढे बोलणारच तितक्यात फोन वाजला......” हे! कैसे हो ? बहोत दिनों बाद ....? ” फोनवर बोलता बोलताच त्याला अलविदा केल नि मी निघाले.
मी शरिराने तर घरी आले होते, पण मनात विचारांनी घरच्या घर बांधली होती, आसवांची अतिवृष्टी होतानाही, का कुणास ठाऊक, पण मनाचा एक कोपरा इतका सुखावला होता की, डोक बंद होतं नि मन तूटल होतं तरीही तो आनंदित होता ...पण का ?.... .........
आता सगळच संपल होतं... हो ना?. सगळंच....
मग का ? रात्री रेडियोवर लागलेल्या ''आज जाने की ज़िद न करो '' ऐकताना मी रडले? का पुन्हा 'त्याच्या नसण्याच्या'नुसत्या कल्पनेने कोलमडले आणि याहीवेळी नेहमीसारखंच माझ्या अश्रुंचा समुद्र बघण्यासाठी ती रात्र नि तिचा काळोख होता….. तो नाहीच….!



प्रेम? सवय? तो ?

by on नोव्हेंबर २३, २०१८
मी - काय बोलु? काय बोलु? ............ हाई बोलु? हेलो ? की मग फक्त एक स्माइली टाकु? की मग हाई बोलून स्माइली टाकु? हाश्ह्ह्ह....... मला...







जुन्या पेटीत 'ती' चिठ्ठी सापडली.
आज घराची सफाई करताना
सापडलेला तो कागद एक 'भूतकाळ' होता.
यांना जाऊन आज जवळजवळ ५ वर्षे झाली.
आता तर काळ्या टिकलीचीही सवय झाली होती.
मग या अचानक सापडलेल्या तोफ्याचं प्रयोजन काय होतं ?
ती चिठ्ठी नवी होती की, ?
पण ती चिठ्ठी ....
हो ती यांच्याच अक्षरातली होती.
मला ते गुलदस्त्यातले दिवस आठवले ...
पन्नास वर्षांपूर्वी यांनी मला लिहिलेली ती खमकी 'माझी' चिठ्ठी आठवली ....
त्या चिठ्ठीला 'प्रेमपत्र' म्हणणं मुद्दामच टाळलं. कारण आजही ते आठ्ठवून हसायला येतं कारण ते प्रेमपत्र नाही,
 ती 'किराणामालाची' यादी होती.
संताप माझाही तासभर झालाच होता.
कारण, दुसऱ्यासाठी लिहिलेलं माझं प्रेमपत्र तिसऱ्यालाच गेलं होतं... आणि त्या भल्या माणसाला याचा कणभरही संताप नव्हता??
हो ... माझं प्रेमपत्र यांच्याकडे गेलं आणि यांची किराणामालाची यादी माझ्याकडे आली.... आणि मी लिहिलेल्या प्रेमापत्रातला तिसरा तो बाजूलाच राहिला.
नशीब ! पत्रावर ठळक लिहिलेल्या फोन नंबरमुळे तासाभरात यांचा फोन तरी आला...
त्यांचा आवाज तोच होता, जो माझ्या आयुष्याला हवा होता. ज्यात ताकद होती, आयुष्यभर माझ्यामागे खंबीरपणानं उभं राहण्याची.
ज्याला पत्र लिहिलं तो बाजूला राहिला, पण त्याच्यामुळे आम्ही एकमेकांना भेटलो...
आणि भेटलो ते आयुष्यभरासाठी.... 😍😍

"कसं असतं ना... आपली एखादी चूकही आपल्याला आयुष्यभराची आनंदाची शिदोरी देऊन जाते... "  
हे सगळं आज आठवून न राहवून मला त्यांची आठवण अनावर झाली. व्यक्ती असा अर्ध्यात सोडून जाऊ नाही. साथ सोबतीची आहे ती अर्धवट राहायला नको, वाटतं.
 पण आता मात्र पानावलेल्या डोळ्यांतुन अश्रू पडून चिठ्ठीतील अक्षरे पुसण्याआधी मला पुन्हा त्यांच्या अक्षरातले ते शब्द वाचायचे होते.
माझं तरुण्यातलं प्रेम उभारून येऊन, आत्ता ती चिठ्ठी वाचताना सोबतीला त्यांचा हात असावा राहून राहून वाटत होतं...
शेवटी नाईलाजाने मी ती चिठ्ठी भराभरा उघडली....
उत्सुकता शिगेला पोहोचली होती...
काळ्या अक्षरात मजकूर होता,
"मी गेलो तरी लाल टिकली लावत जा सरकार (नानांच्या आवाजात).
आपल्यावर शोभून दिसते ओ...
समाजाची चिंता कशाला करता..?
काळी लावताच ना ? फक्त रंग बदलून लाल लावा ...
देवा शपथ तुमच्या गोर्या मुखड्यावर भारी शोभून दिसते ती ..."

हे सगळं वाचून मात्र खरंच वाटलं, अश्रू पडून चिठ्ठीतली अक्षरे मिटली असती तर फार बरं झालं असतं...
ते सोबत असायलाच हवे ना...
का लालची काळी करावी लागली असती.?
एकदा एकमेकांचे झालो की वेगळे का व्हावं लागतं... ?
तरीही या माणसाच्या आग्रहाखातर मी आरशात जाऊन तो एक यशस्वी प्रयत्न केला....
"खास दिसत होते मी.
मला आवडले मी.
इवलुशी कमी होती, ती त्यांच्या किफायती तारीफदार शब्दांची."
पण मी चिठ्ठी स्वीकारली आणि त्यातील शब्दही ....

#Colourful_Shades
#Change_Is_Beautiful

-सूफी


चित्रपट सुरू होतो, बघते तर काय
"आताची पिढी नाही हो जास्त थिएटर, नाटकाकडे वळत. आमच्या काळात... " असं म्हणत म्हणत निम्म्याहून अख्खं चित्रपटगृह तरुणाईने भरलं होतं. आजचा आणि कालचा बदल अनुभवायला.
" ... आणि काशीनाथ घाणेकर" बघायला.
पिढी घटकानघटका निर्माण होते, बदलते. त्यामुळे बदल ठरलेला. पण म्हणून कला बदलत नाही, नष्ट होत नाही, तिची रूपं बदलतात...

जगतो, वाढतो, धडपडतो, प्रेक्षकांच्या लायक बनतो, माज करतो, वावरतो आणि तो बनतोच तितक्यात त्याचा प्रयोग संपतो, आणि तो होतो काशिनाथ घाणेकर ...

"बालगंधर्व रंगमंदिरात आधी रांगा लाऊन तिकिटे तेही दररोज नाटक आणि लोक गर्दी करायचे. आज ती मजा नाही राहिली.." हा संवाद आणि ही सगळी चित्रफित जेव्हा समोरुन जाते, तेव्हा वाटतं, दाखवावं यांनाही की आजही नामांकित करंडकं पटकाऊन गर्वात कॉलेजभर फिरतात मुलं.
याशिवाय, चित्रपटात दर्शविलेले वाडे, पोशाख, दोन वेण्या, जुने कॅमेरे, तसच संगीत, तेच त्या काळाला साजरं असं एडिटिंग,  तोच ठेहराव बघताना शेजारच्या प्रेक्षकाला टाळलं तर तुम्ही रमून जातात.
छान सुरेख आपल्या भारतीय संस्कृतीत साजेसा असा काशिनाथ असतो. श्रीमंत, देखणा, डोळ्यांत घारा रंग, गोरी गरगरीत त्वचा, नाकावर माज, आणि पाठीशी लग्न करायला म्हणून घरच्यांच्या हट्टाची डॉक्टर ही पदवी.
सुरुवातीला एका कटमध्ये समोर घडणारं सगळं प्रत्येक संसारी पुरुषबाईच्या आयुष्यातलं. 'घरोघरी मातीच्या चुली' वाटतं. पण जेव्हा सगळी दुनिया दावणीला टांगून आतला कलाकार घानेकरांणा
डिवचू लागतो, स्वस्थ बसू देत नाही तेव्हा, तो बाहेर इतरांनाही जाणवतो. मिसेस घाणेकरांनाही जाणवू लागतो तो.
कलाकाराच्या संसारी आयुष्यात त्याला समजणारा जोडीदार नाही, मन असावं लागतं. त्या जोडीदाराला रादर मनाला एक कला यायला हवी स्वतंत्र, नाहीतर निदान तो प्रेक्षक असावा, रसिक. तसं नसल्यास त्याची मिसेस घाणेकर होते.
मिसेस घानेकरांचं म्हणणं तसं योग्य होतंच, " दुसऱ्या बाईकडे गेलेला माणूस परत घरी तरी येतो, नाटकात गेलेला माणूस परत येत नाही..." वाक्य नाही, संवाद नाही हे वास्तव होतं. पण कसा येणार तो माणूस आपल्या कलेतून बाहेर.? एकतर तो प्रामाणिक राहू शकतो, नाहीतर समाजातला ढोंगी...
शेवटी बायको सोडून जाते.
मुळात चित्रपटाची मजा तेव्हा येऊ लागते, जेव्हा तुम्ही घाणेकर खऱ्या अर्थाने पचवू लागतात.
मुख्य नायकाच्या भूमिकेतील आणि घाणेकर उर्फ सुबोध भावे.  सुरुवातीला वाटतं, 'हा मेंघळट आहे, याला नाय जमायचं. हा आणि घाणेकर?'
असं म्हणतच सुरुवातीला नकारात्मकता स्वीकारत भावे उत्तमरित्या मोठा होत जातो, आणि जसजसं तो मोठा होतो तसतसे तो कलेला, त्याच्या पॅशनला ज्यापद्धतीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतो, ते इतर सुबोध भावेपेक्षा वेगळं ठरतं. तो आवडत जातो हळूहळू.
बायको सोडून जाण्याआधीच कांचन त्याच्या आयुष्यात येते.
कांचन आणि घाणेकरांची कथा पडद्यावर बघणं सुंदर वाटतं.
कांचन ही ती फिलींग आहे जेव्हा आपल्याला माहिती नसतं आपण कुणालातरी आवडतोय...आणि आपण बेफिकीर वावरत असतो. कांचन हे पात्र असतंच आयुष्यात, नाही?
ती कांचन होती.
आणि काशिनाथ होताच तसा प्रेमात पडण्यासारखा.
कलाकार नाही तरी निदान प्रेक्षक होता आलं पाहिजे, प्रेक्षक कांचन होती.
चित्रपटाच्या मध्यावर मला प्रश्न पडतो की, कांचन हवीच का आयुष्यात?... जी सांगेल तुम्हाला की, 'तुम्ही गर्दीत हरवताय...'
कांचन घाणेकरांच्या आयुष्यात आली.
जेव्हा आपण आपल्या आवडीच्या व्यक्तीच्या जवळ, खुप जवळ जात असतो. आपलं मन हेलावतं, कसलातरी सुखद विचार करुन हा क्षण लांबवावा असा खेद करत मागे जावं वाटतं का? घाणेकर जातोही, धाडसी वाटायला लागतो घाणेकर तिथे, पण त्याच अगतीकतेने वाऱ्यासारखे माघारी वळून तो तिथेच कवेत घेतो कांचनला.
तिथेच घडतं रंगमंचामागचं ते घाणेकरांचं पहिलं चुंबन... तिथे वापरलेेेला कॅमेरा हा खास आवडला.
त्यानंतर घाणेकरांची बायको निघून जाते, कांचन मिळत नसते.
प्रेम मिळत नसतं तोवर माणूस त्यासाठी जीवही द्यायला तयार असतो. घाणेकर तर नाटक सोडायला तयार होणार होते. कांचन बायको नव्हती तोवर ती प्रेयसी होती, प्रतिक्षेनंतर जेव्हा लग्न होतं तेव्हा तिची गृहिणी झाली. त्यांच्या नात्यात पुढे औपचारिकताच उरते.
मनात चालू राहतं,
जो कलाकार  कधीतरी दुसऱ्यावर अवलंबून सुरुवात करतो, तोच हळुहळू घडवतो पुढे कित्येक रोजगार, कित्येक कलाकार, कितीतरी प्रेक्षक पण जेव्हा तो इतरांना घडवायला लागतो, तेव्हा मात्र स्वतःला घडवायचं विसरून जातो...
आतापर्यंत चित्रपटात तसं सगळं गोडीगोडी साजरंसंगीन चालु असतं....
चित्रपटाचं मध्यांतर होतं आणि चित्रपट मनात चालू असतो आणि  कल्पना येतेच की आता खरी घाणेकरांची ( किंवा मग कलाकाराची?) वाताहत सुरू होणार.  'नटसम्राट' ची कुठेतरी घाणेकरांबरोबर तुलना सुरू होते.
पण मी तसं करणं टाळते.
दोन वेगळ्या कलाकारांचा धर्म 'नाटक ' असला तरी आयुष्य आणि तेथील त्यांचं जगणं यांची सरमिसळ करणं हा त्यांच्या मेहनतीचा अपमान ठरला असता. 
चित्रपट पुढे पुढे सरकत जातो.
तेव्हा गर्विष्ठ घाणेकरांतून बाहेर येत घाणेकरांची
वेगवेगळी रूपे समोर येत जातात. त्याच्या भोवताली असणाऱ्या माणसांचं आयुष्य, त्याच्यामुळे बदललेले ते लोक यांची पात्र नवखणाण्यासारखी ठरतात. पंतांपासून, त्यांच्या सेवकापर्यंत. काहीकाही नाजूक ठिकाणी पंत खूप भावतो मनाला. कलेतल्या 'कलाकाराची' कदर करणारे खूप कमी असतात, पंत त्यातले होते, शेवटपर्यंत राहतात. हे बघण्यासारखं वाटतं.
मध्यांतर होतं,
आणि घाणेकर पर्वाच्या अस्ताकडे चित्रपट जातो,
वाटतं जेव्हा कलाकार आपटतो धाडकन, तेव्हा तो नाटकाची पाटी लिहिणारा माणूसही बेदरकार क्षणभरही विचार न करता त्या नाट्यगृहाबाहेरील फलाकावरचं ते प्रसिद्ध नाव खोडतो, त्याच्या त्या फडक्याने. तो आय ओपनर असतो त्या प्रयोगाच्या यशाचा, अपयशाचा आणि त्या कलाकाराचा.
त्यामुळे लोकप्रियतेची नशा चढावी पण भिनु देऊ नये. नाहीतर स्वतःच स्वतःत बेचिराख होणं मान्य करावं लागतच.
.......
एक खरा कलाकार नेहमी एका खऱ्या ' प्रेक्षकाच्या' शोधात असतो, त्याची वाट तो प्रत्येक प्रयोगाला त्याच आतुरतेने पाहत असतो. त्याच्यासाठीच हा काय तो अट्टाहास असतो त्याचा.
जेव्हा कलाकार नाकारला जातो, तेव्हा तो खऱ्या अर्थाने स्वतः कडे बघतो, शोधतो आणि घडतो.
असं झालं नाही तर अपयश त्याला माहित नसतं त्यामुळे तो स्वतःला लोकांसमोर केवळ ' दाखवत '
असतो, शो ऑफ, फक्त बहिरुप्या म्हणून कुणाचातरी!
याशिवाय चित्रपटाचं संगीत:
"दोन वयातील जाई का अशी गंधाळली...." किंवा मग "सभोवती नसे कुणी लाजते मनात मी...." किती सहज, सोप पण खास गायलंय ते. आमचे सर म्हणायचे, सोप्प लिहिणं जास्त अवघड असतं. आणि तितकंच ते गायलाही अवघड पण तितकंच ते चटकन मनाचा ठाव घेणारं वाटलं मला.
कलाकृती घडते तेव्हा;
लेखक लिहितो, शब्द ऐका हां,
"समशेर संभाजीचं शस्त्र नव्हतं स्वभाव होता..."
म्हणजे कित्ती सुंदरपणे नटाला ते समजावून सांगावं, हा संवाद मला खेचून घेतोच. पण 'रायगडाला जाग येते तेव्हा...' हे शीर्षक जेव्हा लेखकाला सापडतं, आनंद तो कुठला हिरा कोळशातून मिळाला यापेक्षा वेगळा नसतो. बास्स एक शब्द आणि आनंद ... केवढी वेगळी संपती आहे ही, आतला आनंद देणारी....सगळा खेळ शब्दाशब्दाने फिरतो इथे. माणसाआधी इथे महत्व येतं, तुम्ही तुमच्या आतील कलेशी किती बांधिलकी ठेवतात याला.
अपयशाच्या वेळी व्यक्ती जेवढे विचार करतो तेवढे तो एका दिवसातही करत नसेल हे घाणेकरांच्या प्रत्येक अपयशावेळी उलगडत जातं.
याच जगातील आणखी एक सत्य म्हणजे
कलाकारासारखा मूडी माणूस जगात कुठेच नाही, कुठ्ठेच नाही...
आणि त्यावर शाप म्हणजे रंगभूमीवर प्रत्येक दिवसाचा ' मॅन आॅफ दि मॅच' बदलणारा. त्यामुळे कलाकाराला रोज नवं काहीतरी द्यावच लागतं. साचलेपण येऊन चालत नाही कला. नाहीतर त्याच्या कलेची डबघाई सुरू होते, मरत जातो तो, भिकार होतो तो याच कौतुकात.
त्यासाठी कलाकाराने जपावं स्वतःला. नाहीतर मध्याननंतर त्यांचा एकतर डॉ. श्रीराम लागू होतो नाहीतर ...आणि घाणेकर. कला म्हटलं की स्पर्धक आले. प्रत्येक कलाकारासाठी त्याचा तो खोचक बिंदू ठरलेला असतो.ज्याचा एक शब्द किंवा एक टिंबही मनाला लागतो. घाणेकरांसाठी ते डॉ. लागू होते. लागूंनी ही कलेची स्पर्धा छान, सुरेख आणि खेळकर ठेवली.
याशिवाय, रंगमंचा'मागे' घडणारं कुठे टिपलं जात नसलं तरी या चित्रपटात मात्र हेच दाखवण्याची धडपड केलेली दिसते.
तसेच लेखक, नटांची भांडणं कायमचीच. प्रयोग कथेमुळे हाऊसफुल झाला की अभिनयामुळे हा लेखक- नटांतला सौदाच जणू!
-----
चित्रपट शेवटावर येतो,
आणि
घाणेकर तिथेच संपतो, जेव्हा ध्वजनिधीसाठी तो खूप जास्त पैसे त्या मुलीच्या हातावर ठेवतो. ती  खुश होते. ती म्हणते, एवढे? ... तो ' ठेव ' म्हणतो. तोही खुश होतो. तेव्हा ती आनंदाने सगळ्यांना बोलावते आणि विचारते नाव काय तुमचं? ...
कलाकाराचा माज, साज, आणि आतापर्यंतचं सगळच एका प्रश्नाने संपतं. पैशाने श्रीमंती दाखवता येते, मनाने श्रीमंत होता येत नाही.
आणि म्हणून वाटतं, प्रेक्षकाच्या हाताखालची कठपुतली असतो कलाकार. प्रेक्षक त्याला विकृतपणे जगवू शकतो आणि मारुही शकतो. त्यामुळे कलाकाराने माज करूनच घ्यावा त्याच्या हक्काचा असतो कारण असही कलाकारासाठी एकच अनादिकाळापर्यंत सत्य उरतं, ते म्हणजे,
--------
कलाकाराची माती होते,
शेवटी फक्त कला उरते.... 

( हा चित्रपट आत्मचरित्रपट असला तरी ' घाणेकर 'मला ठावूक नाहीत म्हणून चित्रपट मला आवडत जातो.)

#बघावाच_असं_काही_नाही_पण_बघावा_असा_आहे

- पूजा Dheringe

...आणि काशीनाथ घाणेकर

by on नोव्हेंबर १७, २०१८
चित्रपट सुरू होतो, बघते तर काय "आताची पिढी नाही हो जास्त थिएटर, नाटकाकडे वळत. आमच्या काळात... " असं म्हणत म्हणत निम्म्याहून...


"तुमच्या अंगातली ती नस काढून टाका बरं, जी तुम्हाला बाई म्हणून काही आव्हान पेलू देत नाही..."
साला हा प्रॉब्लेम तोपर्यंत जाणवत नाही जोपर्यंत एखाद्या रविवार तुम्ही १४ वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर क्रिकेटच्या मैदानावर जात नाही ... किंवा मग देवकुंडच्या धबधब्यावर जातात, जिथे तिथला तो धबधबा असा अंगावर येत असतो पण तुमची आणि तुमच्या अंगावर मनाची वाढ फक्त होत असते कारण त्या अंगावर 'भीती' नावाची कातडी जाडसर थरात चिकटलेली असते ... त्यामुळे त्या एवढ्या प्रकर्षाने अंगावर येणाऱ्या पाण्याला तुम्ही विरोध करत दुरूनच मुलं कशी त्या पाण्यात पोहतात, याचा समजूतदार आनंद लुटतात.... 
आणि दुरूनच त्या जाडसर भीतीच्या थराला समाजाने दिलेलं 'नाजूका' नाव तुम्ही जगू लागतात आणि गर्वाने वाढत राहतात नाजूका म्हणूनच!... आणि असं  मिरवण्यातच समाधान मानणाऱ्या अनेक मुलीच मी पाहिल्याय आजही, दुर्दैवाने.!  
ए मुली, 
नाजूक होणं हा तुझ्यातला सुप्त गुण आहे, त्यात नजाकत अदा आहे. पण  तू त्या गुणाला इतकं तुझ्या शरीरातल्या प्रत्येक अवयवांमध्ये म्हणजे लिटरली हातापासून पायापासून कोपर्‍यापर्यंत, रुजवून भिनवून अंगा खांद्यावर खेळत  ठेवलंय की एक झुरळ दिसलं तरी तू पलंगावरून खाली उड्या मारत राहते, किंचाळते कितीतरी वेळ... मग मला सांग तोच आवाज तू तुझ्या स्वतःच्या हट्टासाठी का बरं नसेल वापरत?
मगग्ग माझा संताप सुरू होतो... मला प्रश्न पडतो याच मूळ नेमकं आहे कुठे? 

'माझ्या भोवतालच्या परिसराने मला मुलगी म्हणून वाढवलं.' या जगातल्या एकमेव कारणामुळे किती गोष्टींना मी मुकले माहिते... ?  
लहानपणी माझं मैदान सुटलं. 
घरच्यांनी हुशारीने माझ्या हातात बॅटऐवजी लाटणं दिलं. आवाज उठवणं मला माहित नव्हतं. अजाणत्या वयात मला जसा आकार दिला मी बनत गेले, घडत गेले. मग आता का निम्म्याहून अधिक पुरुष यावरच अडतात कि बायको मॅच पाहू देत नाही किंवा तिला पाहणं आवडतच नाही.
अरे, जर तुम्ही तिच्या जन्मानंतर धाडकन २५व्या वर्षी मॅच बघायला बसवाल तर तिला घंटा त्यातला फॉर सिक्स सोडून काही कळणारे.? त्यातही ती बसलीच तरी त्या संपूर्ण मॅचमध्ये फोर सिक्स मारले किती जातात कि ती त्याचा आनंद घेऊन तुमच्या सारखं म्हणेल, "अरे यार्र्र्र याने हा बॉल फास्ट टाकण्यापेक्षा स्पिन टाकला असता यार्र्र्र ..... शिट्ट सुटलाssss..." आणि तिथेच ती म्हणते मला क्रिकेट आवडत नाही जसं काहीअंशी पुरुष  म्हणतात आम्हाला टेलिव्हिजनच्या डेली सोप्स, मालिका आवडत नाहीत.  क्रिकेट सर्वमान्य म्हणून त्याचा गर्व, पण याउलट डेली सोप्स ही तिची आवड, ती कितीही टिपिकल असो, तिची आवड असूनही त्यावर जोक्स,  स्टिरिओटिपिकल !
आज मैदानात उतरले मी....
आवड म्हणून सगळा जीव एकवटून किमान 'त्या बॉलरचा बॉल बॅटवरच येईल' हे ध्येय ठेवलं. मग तिथे तर फोरसिक्स बात दूरच होती... मी क्रिकेट खेळतेय, हाच संपूर्ण आनंद माझ्यात होता...
मी सगळीकडे एक नजर टाकली, त्या एवढ्या मोठ्या मैदानात फील होता हा माझ्या खेळण्याचा पण निसर्ग सोडला तर या २१व्या शतकातही 'अरे मुलगी क्रिकेट खेळतेय' म्हणून खिळलेल्या नजरा सुटल्या नव्हत्या.
तितक्यात माझं ध्येय धरून, एक  बॉल बसला ना बॅटवर आणि मी होत्या नव्हत्या ताकदीने फिरवली बॅट आणि अंदाधुंदी माझा फोर गेला, बाबोsssss  माझे मित्र कित्ती खुश झाले माहिते... मी इतक्या इतक्या जोरजोरात ओरडले आमची टीम आनंद सेलिब्रेट करू लागली...
त्यांच्या त्या आनंदात मी माझं लहानपण आता फुलण्याचा आनंद पाहिला, मारलेला तो आनंद त्यांनी त्यांच्या मला चियर करण्यात शोधून दिला, तो आनंद इतका जास्त म्हणजे कसं माहिते का... तुमचं शरीरच नाही तर तुमचं मनही तिथे खेळले असतं... 
नकळत विचार थांबलेले असतात. 
नीट निरीक्षण केलं तर लक्षात येतं, मुलींना वाटून दिलेल्या कामांत उदाहरणार्थ चपात्या करणं असो, कपडे धुणं असो प्रत्येक कामात डोकं मन यांचं युद्ध चालूच असतं...
जेव्हा हे मन, डोकं आणि शरीर एकत्र येऊन खुश होतात तेव्हा खरा आनंद, खरं स्वातंत्र्य असतं. ते माझ्या मते, क्रिकेटमध्ये होतं... आणि मी मनस्वी मुकले या गोष्टीला. माझ्या स्वातंत्र्याला.  
याशिवाय सुटल्या त्या खूप गोष्टी... 
माझा कुणाला विरोध करणं सुटलं. माझं मिरवणुकीत ' गणपती बाप्पाsssss' कुणाच्या आधी म्हणणं सुटलं,  मला निसर्ग एकट्याने अनुभवणं सुटल. माझं रात्रीत एकटं बाहेर फिरणं सुटलं. एखाद्याने 'अरे' केलं तर त्याच्या डोळ्यात डोळे खुपसून तिथेच त्याच्याशी निपटनं सुटलं. गेयरची गाडी हातात घ्यायची नाही , घेतली आणि आक्सिडेंट झाला तर....? बाबोsss , त्या चेहऱ्यावर धपटली तर लग्न कोण करेल तुझ्याशी ? त्यामुळे गपगुमान स्कुटी घ्यायची ते नसेल जमत तर दादा येईल सोडवायला कॉलेजच्या गेटपर्यंत, घ्यायलाही येईल. 
जेणेकरून मुलगी म्हणून तुम्ही दुसऱ्या मुलाकडे डोळे वर करून पाहण्याचे धाडसही करायचे नाही. प्रेम मुलीच्या आयुष्यात नसतं तिने सगळं अरेंज जगावं,  आयुष्यही आणि लग्नही... 
पण हे सुटलं कि सोडवलं... ?
तुम्हाला माहिते जसं एखाद्या व्यक्तीच्या व्यसनाने त्रास होतो, तेव्हा ते सुटलं जात नाही सोडवलं जातं, तेही त्याच्या आप्तस्वकीयांकडून. 
माझं (स्त्रीचं)'लहानपण' ही माझी नशा होती, ती नशा समाजाच्या दृष्टीने, सासरी गेल्यावर माहेरच्या सो कोल्ड 'संस्कारांचा' नाश करणारी होती, त्यामुळे ही नशा आयुष्यात भिनण्याआधी ती सोडणं गरजेचं होतं...   
ही नशा कशी सोडवली माहिते... 
"बाळा, शेवटची चपाती तुला करायला देईल हां ... बघ ही अशी जाळायची नाही गं... कपड्यांना इतकी साबण मी लावते का पुढच्या वेळी हा छोटा कपडा धुवून बघ बर्र्र..." ही अशी गोडीगोडीने समाजवलेली कामं लहानपणीच्या त्या जोशाजोषात मुलीला कुठे माहित असतं कि, आपण आपल्याच हाताने एका बंधिस्त आयुष्याला आवताण देत आहोत. 
काम शिकण्यामध्ये माझा कधीच आक्षेप नाही. पण कामांच्या मागचा उद्देश "लोकाच्या घरी जायचं तुला, तिथले लोक काय म्हणतील हेच शिकवलं का आईने.... ?" यावर आहे. 
हे एक वाक्य सासरकडून ऐकायला मिळू नाही म्हणून मुलीचे पालक स्वतःच्या मुलीच्या आयुष्याला ही पाय आखडून ठेवण्याची तोरणं लावतात, आणि आनंदाने एक आयुष्य सरकवतात मुलगी आहेस तू या नावे...  
त्यावेळी झुरळांना पाहून घाबरणाऱ्या त्या मुलींना बोलावंसं वाटतं,
धडधाकट स्त्रिया तुम्ही,  ह्या अशा बसच्या सीटवर जागा मिळाली नाही किंवा 'नळावरची भांडण' म्हणून प्रसिद्ध होतात, भांडतात... जरा हेच भांडण स्वतःच्या स्वातंत्र्यासाठी, स्वप्नांसाठी करायला शिका ना आतातरी. 
"शिवाजी जन्मावा तो शेजारी तसं, रणरागिणीसारखं आयुष्य जगावं ते शेजारच्या मुलीने, आम्ही बघ्याचं काम करू." असं करणाऱ्या स्त्रियाच आज अधिक वाढत आहेत, हे बदलायला हवं... असं नाही वाटत?
मला आता पडणारे प्रश्न हे आताच्या काळासाठी फेमिनिज्म (नारीवादी) या विषयावर खपणारे असतील, पण ही प्रश्नपत्रिका प्रत्येक मुलीने एकदा स्वतःच्या मनापुढे ठेवावीच, त्याशिवाय हा जन्म एक चालढकल आणि दुसर्याने तुमच्यावर केलेले उपकार असतील. 
तुझा जन्म हा कुणाच्या तरी जन्माच ओझं बनूनच राहील ... 
भांडणारे भांडत राहतात स्त्रीत्व, फेमिनिज्म आणि समलैंगिकत्वासाठी... आणि या भांडणामुळे एखाद्या स्त्रीच्या वाट्याला हा फेमिनिज्म जपणारा नवरा येतोही तेव्हा ही बाई त्यातच धन्यता मानून भावी आयुष्यात तितक्याच मर्यादेत चिवट स्वप्न पाहू लागते... आणि मुख्य म्हणजे ती ही चिवट स्वप्नही कुणाच्या तरी जिवावर पाहते... 
सिम्पथी किंवा दयेच्या कुबड्या घेऊन हे आयुष्य चालवते... तिची सावित्री होत नाही. 
सावित्रीबाईने नवऱ्याकडून मिळालेली शिक्षणाची देण स्वतःपुरतीच ठेवून धन्यता मानली नाही. तिने तिला मिळालेल्या स्वातंत्र्याची उब अशा अनेकींना मिळावी म्हणून धडपडली. 
इथे प्रॉब्लेमच हा आहे, नवरा मनासारखा मिळाला कि काहीअंशी स्त्रिया स्वप्नांनाच पूर्णविराम देतात. 
शेवटचं सांगू, जन्माला घाला ना तो जन्म जो खरंच तुम्हाला जगावासा वाटतोय, त्यासाठी धडपड करा, स्वतःच्या आयुष्याचं देणं पूर्ण होईल. 
दै. प्रभात वृत्तपत्रात छापून आलेला वरील लेख 




"अगरबत्तीचा धूर... जर मी अगरबत्ती पेटवून तिला आयताकृती हवाबंद डबीत कोंडून घेतलं तर ?
निर्जीव ती, श्वास कोंडेल तरी तिचा...?
तिचा श्वास कोंडण्याची मी वाट का पाहावी ?
आपण आपल्या आयुष्याच्या पलीकडे जाऊन का कुणाच्या आयुष्यावर ताबा मिळवायचा प्रयत्न करत असतो?
पण तरीही तिची दमछाक एक सोहळा म्हणून पाहण्यासाठी मी तसं करत जाते... 
तेव्हा, तिची घुसमट, नाकातोंडाचा श्वास संपून, शरीरातला होता नव्हता श्वास संपवत ती शेवटच्या क्षणी श्वास सोडून द्यायला जाते तेव्हा ती विझून जाईल का... ? असा हा निर्दयी आनंद मी या उघड्या डोळ्यांनी पाहू लागते.
मग अशावेळी जर थोड्या माणुसकीच्या लेबलाला जागत मी मरणाच्या दारातून तिला बाहेर काढलं तर नेमकं तिचं काय होईल? या शक्यतांना मी सजवू लागते. 
तिला बाहेर काढल्यावर श्वास एकदाचा मोकळा झाल्याच्या आनंदात (?) भपक्याचा लोटच्या लोट बाहेर पडेल तिथे...  धुराचा...? 
ती राख, चिंगारी आणि अंगारा वाटेल?
आणि तेव्हाच ती कधीही भडका करून पेट घेण्याची शंकाही मी तिच्यावर घेईल.
कारण, जे तिला बाहेर काढल्यानंतर घडेल ते सगळं एका घुसमटलेल्या जीवाचा तळतळाट असेल."
ही घुसमट, हा तळतळाट म्हणजे तांडव आहे. या पुस्तकाच्या नावाप्रमाणेच वास्तविक घटना, ज्यांना पूर्वीपासून रितीरिवाजांची तोरणे लावून सोहळ्यासारखं साजरा केलं जातं, त्या या समाजमान्य रिवाजांच्या अवडंबराचा तांडव म्हणजे हे पुस्तक.

हे पुस्तक अनेकदा अनेकांच्या तोंडून मौखीकरित्या माझ्यापर्यंत पोहोचलं होतं पण त्याच्याशी प्रत्यक्ष भेट ही या रविवारच्या कातरवेळी झाली.
गॅलरीत कपात एक अस्खलित अद्रक घातलेला कडक चहा घेऊन सायंकाळच्या वेळात हे पुस्तक मी हातात घेतलं, बाकी काही नाही चहातील कडकपणा, त्याचा रोजचा तळफळाट, त्याच रोजचं उकळणं आज पहिल्यांदा मला खूप जवळून जाणवलं, कि मग मी पुस्तकाच्या पहिल्या पानावरूनच पूर्वीच्या वास्तवातल्या प्रत्येक गोष्टीला आताच्या वास्तवात रिलेट करू लागले होते? 
माझ्या मनाच्या प्रत्येक विचारांत किंचितसा बदल झालेला जाणवत होता मला.
पुस्तकाची पाने जसजशी पुढे जात होती. माझे डोळे सुसारासारखे मोठे होत, त्या काळातल्या प्रत्येक रिवाजामुळे तापत होते.  
पुस्तकाच्या ४५व्या पानावर मी होते. जिथे सतीप्रथेचं त्या काळातील ते वर्णन अगदी हुबेहूब मांडलं होतं. त्या क्षणापुर्वी मी कधीच सतीप्रथा काय असतं याबद्दल जागरूक नव्हते. फक्त पतीच्या चितेत, जिवंत पत्नीही सती जाते, एवढी या प्रथेची तोंडओळख होती. पण काल जेव्हा या आताच्या जगात मुलगी म्हणून वावरत असताना मी हा सतिप्रसंग या उघड्या डोळ्यांनी, मनाने आणि शरीराने वाचला, तेही कुठल्याच बंधनाविना. तेव्हा मला अभिमान वाटत नव्हताच कि माझी त्यातून सुटका झाली. मला अभागी वाटत होतं त्या सती गेलेल्या कित्येक स्त्रियांसाठी.  
त्यावर बोलण्याआधी ते वर्णन मला आधुनिक पिढीपर्यंत पोहोचवावे वाटते, तो प्रसंग असा होता... 

"सतीचा माळ ( सती जाण्याचं वर्णन पहिल्यांदाच वाचल म्हणून पुस्तकातील वर्णन जसच्या तसं टाईप करून टाकत आहे )
माळावर झाडाखालीच्या हालचालीला वेग आला होता. खणल्याचा धुपधुप आवाजही येत होता. पाद्री आपल्या मांगरातून निघून खाली सतीच्या माळाच्या बाजून चालायाला लागला. तिथं वरच्या बाजूला बरीच गच्च झाडी होती, त्याच्या आडोशाला तो उभा राहीला. तिथं त्यांनी कमरभर खोल एक खड्डा खणला होता. त्या खड्यात लाकडं टाकून चिता रचाली होती. आता ते पाचसहाजण झाडाझाडांच्या बुंध्यांशी बसून वाट पाहत होते. सगळे उगी चिडचीप होते. कुणी कुजबुजत ही नव्हता. इतक्यात अकस्मात ढोल बडवल्याचा, झांज वाजवल्याचा आवाज येऊ लागला. काही वेळान आवाज जवळ आला आणि कानालाच भिडला. पाद्री अत्यंत धिर होऊन आवाजाच्या दिशेने पाहत होता. वाजंत्र वाजवीत, माणसांचा घोळका त्या बाजूनं येत होता. सर्वात पुढे खंद्यावर एक तिरडी होती. तिरडीच्या मागून पांढरी वस्त्र परिधान केलेली, मळवट भरलेली एक स्त्री चालत होती. स्त्री कसली ती, एक पंधरा सोळा वर्षाची मुलगीच होती. ती गोरी कृश बांध्याचीच होती. रडून रडून तिचे डोळे सुजलेले होते. आत्ताही सारखी रडत होती. स्फुंदून स्फुंदून  रडताना मध्येच तिचा श्वास छातीत अडखळत होता. पायही लडबडत होते. गुंगीची औषधं घेतल्यासारखी मधूनच झोकांड्या देत होती.
त्या घोळक्यात काही स्त्रिया ही होत्या. ते सर्व माळवरच्या सीमेवर येताच थबकले. बरोबरच्या स्त्रिया काही वेळ छाती बडवून घेत मोठ्यामोठ्यानं रडल्या. मळवट भरलेल्या स्त्रीला नमस्कार करून त्या निघून गेल्या. ढोलताशे अवसर आल्यासारखे मोठ्यामोठ्यानं वाजतच होते. ढोल तर इतका मोठा होता, वाजवणाऱ्याच्या गळ्यापासून ढोपरापर्यंत लोंबत होता. 
त्यांनी तिरडी आणून 'वाट संपली रे देवा' म्हणत खड्यातल्या चितेजवळ ठेवली. त्या सती स्त्रीला एका दगडावर तिथंच बसवलं. मग तिरडीचे पाश कोयत्यानं कचाकच तोडून प्रेत खाली चितेवर ठेवलं. बरोबर खांद्यावर पेटत्या गोवऱ्या आणि पाण्याच्या लहान मडक्याची कावड घेऊन एक लहान मुलगा आला होता. तो ईं ईं करून सारखा रडत होता. मधूनच तो भिऊनसा एखाद्याला विचारत होता,  "वाहिनीला आणि कशाला आणलंत हो तुम्ही इथं".
तो मेलेल्याचा धाकटा भाऊ प्रेताला अग्नी देणार होता. त्या खांद्यावर जाणत्यांनी पाण्यानं भरलेलं मडकं दिलं. पाठीमागून त्या मडक्याला कोयत्याची चोच मारून भोक पाडलं. ती गळकी धार सांडीत त्यानं त्या स्त्रीसह चितेला तिन प्रदक्षिणा घातल्या, मग मडकं तसंच फोडून टाकलं भूमीवर आपटून. आता परता ढोल, झांज, ताशा रंवरंवत वाजत होते.
सती स्त्रीला आणून त्यांनी खड्याच्या कडेला एका दगडावर आणून उभी केली. एकीकडं ती रडत होती. दुसरीकडं दगडावर तोल सावरून उभं राहायचा प्रयत्न करत होती. परत परत तिचा तोल जात होता. पाद्री सिमाँवला वाटलं, निःसंशय या लोकांनी तिला गुंगीच काही खाऊ घातलं आहे. ती गरीब असाहाय्य स्त्री, ते दांडगे पुरूष, वाजणारी वाजंत्रं यांमुळे तो संभ्रमित होता, भयग्रस्त झाला होता. त्याला काहिच सुचत नव्हतं. पुढं होण्याचं धाडसही होत नव्हतं. तो पुतळ्यासारखा स्तब्ध उभा होता. 
ढोल आभाळापर्यंत वाजत होता. ती स्त्री त्या खड्यातल्या नवऱ्याच्या प्रेताकडं पहायलाही तयार नव्हती. दिवस आता बराच वर आला होता. तरी वराच्या कदंब वृक्षाच्या पानांतून अजून काळोख गळतोय असं वाटतं होतं. चितेवरचं ते प्रेत कधीपासून कुजायला टाकलं आहे, त्याचं पोट फुगलं आहे. त्याला बुट्टाण दुर्गंधी मारतेय असं उगीच वाटतं होतं. तिथं पूर्ण जिती जिवंत होती ती स्त्री. ती व्याकूळ होऊन रडत होती आणि सर्वांगानं थरथरत होती. 
कुणीतरी उंडेलच्या तेलाचा मटका चितेवर रिता केला होता. बरंच सरण तेलानं भिजून गेलं होतं. त्या मुलानं चुडतांची चूड पेटत्या गोवऱ्यांवर पेटवून घेतली आणि चितेला अग्नी दिला. तेलासह सरण पेटू लागलं. शिळेवर उभ्या असलेल्या त्या स्त्रीकडे एक वयस्क माणूस गेला आणि त्यानं ढोलताशांचा आवाज भेदीत मोठ्यामोठ्यानं म्हटलं, "आयाव मरण मेल्यास स्वर्गाचं द्वार तुला उघडं होईल. नवऱ्याच्या चितेत तुझ्या पापाचं जळून भस्म होईल. तुला मुक्ती मिळेल. तुला मोक्ष मिळेल. जन्मोजन्मी तुला हाच नवरा मिळेल.
तू देवीच्या पदवीला पोचशील.
तू अंखड आयाव राहशील.
तू मोठी पतिव्रता होशील.
आता कचरू नकोस. भिऊ नकोस. आनंदानं नवऱ्याच्या चितेच्या अग्नीचा स्वीकार कर".
चितेच्या अग्नीच्या उठलेल्या ज्वाळा एकदम तिच्या अंगावर आल्या. त्या तापानं ती एकदम मागे सरकली. तेव्हाच त्या वयस्क माणसानं आपल्या दोन्ही मुठी पाठीमागून तिच्या कमवरेवर टेकवून तिला आगीत ढकलून दिलं. तेव्हाच वरच्य लोकांनी हरहर महादेवाचा गजर केला. वाजंत्रं उच्छादं मांडल्यासारखी वाजत होती. झांजेचा झ्या झ्या आवाज कानावर झापडं टाकत होता. 
चितेवर पडलेली ती मोठ्यामोठ्यानं किंकाळ्या मारत होती. अकस्मात तिनं चितेतून बाहेर उडी मारली आणि ती खड्याच्या कडेवर आपटली. तिथं एक माणूस हातात लांब दांडा घेऊन उभा होता. त्यानं तिला पुन्हा आगीत ढकलली. तिच्या किंकाळ्या चालूच. 
पाद्रीला ते पाहवलं नाही. तो दुखावला, तिरमिरला, देहभान विसरून चितेकडं धावला. "काय करता तुम्ही हे, दुष्ट पाप्यांनो? देवा नरकात ढकलेल तुम्हांला."
तो त्या स्त्रीला ओढून घेण्यासाठी आगीत हात घालून पाहत होता. पण चारपाच जणांनी त्याला ओढून, बाजूला नेऊन जमिनीवर आपटला. एकानं हातातल्या काठीनं त्या मारलं, "हा परधर्माचि चांडाळ आमचा मरणविधी भ्रष्टवायला आला आहे. आमची क्षत्रियांची वंशपरंपरा आहे ती. चल चालायला लाग इथून."
पाद्री सिमाँव उठला आणि धडपडता चालायला लागला. त्याला आता चितेच्या दिशेला पाहण्याचंही धाडस नव्हतं. पण आता त्या स्त्रीचा आवाज मावळला होता. तिचा आता कोळसा होऊ घातला होता.
पाद्री जड पावलांनी आपल्या मांगराशी परत येत होता. मांगराच्या दाराशी पोचल्यावर त्यानं मागं वळून पाहिलं. वाजंत्रांचा आवाजही आता थंडावला होता. सतीच्या माळावर आता भयान थंड शांतता पसरली होती. तिथं आता आगीचे लोट नव्हते तर चितेतून फक्त काळा धूर उठत होता. जळून गेलेल्या मानवी मांसाचा वासही त्यात मिसळला होता. तो बुरसा धूर झाडाझुडपांतून पसरून होता. त्यानं सूर्याचा उजेडही खाऊन टाकला होता.
- तांडव, महाबळेश्वर सैल." 
-------------------------
हे वाचून होतं... 
मी निशब्द होते.... मला बोलायचं असतं किंवा नाही. माहिती नाही. परंतु, माझा राग अनावर झालेला असतो....
कारण त्यांच्या मानण्याप्रमाणे 'देवी तेव्हा होता येतं जेव्हा जिवंत स्त्री चितेत मारून टाकली जाते.'
कधी जन्मली असेल ना ही सडकी मानसिकता?
तिचा जन्म झाल्याझाल्या त्या माणसाने स्वतःच्या मनाला मारून का टाकलं नाही?
आणि पुढे वाचताना 'तिथे एक क्षत्रिय म्हणतो, आपल्या मरणविधीत हा त्रयस्थ व्यक्ती व्यत्यय आणत आहे? ' 
म्हणजे जिवंत माणसाला जपण्यापेक्षा, या धर्मांधांना हे मरणाचे सोहळे धर्मरक्षक बनवतात ? 
'आजच्या घडीला तरी ही परिस्थिती वेगळी आहे का?' हा सहज प्रश्न मनात येतोच, माझं मन 'फक्त त्याचं स्वरूप बदललं', इतकंच उत्तर देतो.  
यापलीकडे जाऊन माझा संताप तेव्हा होतो जेव्हा हे सगळं घडवून आणण्यासाठी, गावातल्याच बायांना धाय मोकलून रडायला लावलं जातं, ढोल आभाळापर्यंत वाजवायची ऑर्डर दिली जाते, म्हणजे या सगळ्या आवाजाच्या झंझावातात याची खबरदारी घेतली जाते कि, 'सती जाणाऱ्या त्या बाईच्या मरणाचा आवाज तसूभरही बाहेर पडलाच नाही पाहिजे.' 
एक एक ओळ वाचताना माझा अक्षरशः ओळीओळीला संताप वाढत होता, त्या बाईच्या वेदनेने अंगावर काटा येऊन नसानसातून जाणारा श्वास मला अडखळत म्हणतो, 'तू भाग्यवान आहेस, या पिढीत जन्माला आलीस.' 
तेव्हा माझा संताप होतो कारण, "आज म्हणतात खून करणं पाप आहे, पण हा तर समाजमान्य खून होत होता. आणि तेव्हाच्या काळी काय आणि आताच्या पिढीत काय, जसं तेव्हाच्या काळी सती जाणं, हा खून होता. तसं आताच्या काळात मुलीच्या मनाविरुद्ध लग्न लावून देणं हा जिवंतपणी त्या मुलीच्या आयुष्याचा, इच्छेचा, स्वप्नांचा खून आहे."
तीव्रता कमी झाली, पण स्त्रियांना या काय तर प्रत्येक युगात सहनच करावं लागलं आहे. स्त्रियांनाच फक्त... अभ्यासक्रम आणि स्वरूप फक्त वेगळं झालं.  
या पुस्तकांची पन्नासच पाने वाचून झाली आहे. त्यामुळे यात सखोल असं काही लिहणार नाही. फक्त या वास्तवाशी माझ्यासारखी अनेक मुलं फक्त तोंडओळखीने ओळखत असतील तर एकदा याची दीर्घ ओळख करून घेण्यासाठी 'तांडव'ची सुरुवात कराच... 
नावाप्रमाणेच आहे पुस्तक.



मरणाच्या सोहळ्याचा 'तांडव'

by on सप्टेंबर १४, २०१८
"अगरबत्तीचा धूर... जर मी अगरबत्ती पेटवून तिला आयताकृती हवाबंद डबीत कोंडून घेतलं तर ? निर्जीव ती, श्वास कोंडेल तरी तिचा...? ...
घराच्या बाहेर कॉरीडोअरमध्ये पायऱ्यांवर शांत बसायला मी जाते.
शांत म्हणताना हा 'शांत' शब्द सहज म्हणावा तसा का म्हणून जातो आपण? त्या शांsssssssत शब्दात कितीतरी गूढ आहे. आणि त्यापर्यंत अजूनतरी कुठला मनुष्य पोहोचलाच नसणारे. ते न जमणार काम आहे.
मोठं झाल्यावर आपण शांत कधी असतो? मला तरी मी अशी शांत कधी सापडलेच नाही. फारफार तर ही शांतता मला मी खुश असल्यावर मिळते. त्याशिवाय, शांततेच्या नावाखाली फक्त एकांत शोधणं असतं. एकांतातही असंख्य विचारांना मी का बळच आमंत्रित करीत असेल? 
हा एकांत मी 'माझा वेळ' म्हणून काढत असते आणि त्यातसुद्धा कुठलीच मला सुखावणारी गोष्ट नसते.
साधं उदाहरण आहे, बाहेर कॉरीडोअरमध्ये मी आज कितीतरी दिवसांनी बसले आहे, येरझारा घालणारी हवा, समाजातील निरव शांतता आणि रातकिड्यांचा आवाज एवढंच काय ते बॅकग्राऊन्डला आहे. तो आवाजही नको म्हणत कानांना हेडफोन लावून मी काय ऐकते? तर .... 'क्यों मैं जागूssss' हे एकट्याचं, एकांताचं आणि आयुष्याला कंटाळलेलं गाणं... 
म्हणजे अशाप्रकारे मी यशस्वीरीत्या एक घटका घटक्याने माझ्या विचारांची घुटन वाढवणारी बुदली भरत असते. तरीही मनाला माझ्या प्रश्न पडत राहतो, 'नेमकं तुला काय झालं आहे?'
'कुठे शोधू हा एकांत?' म्हणत जेव्हा हा एकांत मला सापडतो, मला स्वतः मुळेच दचकायला, घाबरायला होतं. कारण या शांततेच्यावेळी हा 'स्व' काय निर्णय घेईल मला याचा कुठलाच अंदाज येत नाही. 
अशात कुठेतरी स्वतःच्या स्वप्नांचा विचार करण्याचा मी थोडाफार प्रयत्न  करायला जाते, होतं काय माहिते...? मीच माझा आत्मविश्वास 'बघता येईल, वेळ येईल तेव्हा....' म्हणत त्याला जन्मुच देत नाही. 
शेवटी 'स्वप्न का पाहतो माणूस?' 
विचारते मी स्वतःला कधीतरी तो लहानपणीचा प्रश्न; 'काय व्हायचंय तुला...?'
मोठे झाल्यांनतर विशी पार केल्यानंतर प्रत्येकचजण डॉक्टर, इंजिनियरपेक्षाही 'मला शांत व्हायचंय...' म्हणणारा असतो.
'स्वप्न का पाहतो माणूस?'
जिवंत राहण्यासाठी म्हणणारी मी आहेच. 
पण त्यापुढे जाऊन, माझं बनलेलं एखादं स्वप्न हे माझ्या आवडीमुळे बनतं कि पैशांसाठी ते स्वप्न बनत असतं. ?
मनापासून सांगू तर माझं स्वप्न मला माहित नाही. आजही माहीत नाही. लोकं मला अशामुळे डेडबॉडी समजतील, मला ते मंजूर आहे. 
या आधी प्रत्येकवेळी स्वप्न पाहायला मला कुणीतरी भाग पाडलं आहे. पण तेही माझं चिरकाल स्वप्न नसतंच... 
लोकं म्हणतात, 'खूप मेहनत घे, खूप प्रसिद्ध होशील.!'
माझा प्रश्न असतो, का...? आणि झाले प्रसिद्ध मग... ?
लोकं असतील आजूबाजूला, सगळं जग मला ओळखेल, बेसुमार प्रेम चौफेर कानाकोपऱ्यातून बरसेल. ते तर आजही आहेच. 
ए पण नको, तेव्हा मिळणाऱ्या प्रेमात भेसळ असेल. आत्ताच मला मिळतंय ते प्रेम 'प्रेम' शब्दाला पूर्ण करणारं आहे. 
बरं तरीही वाटतं कधीतरी, 'व्हावं खूप मोठं सगळं जग ओळखेल एवढं' म्हणून खटाटोप घेणारं हे प्रामाणिक मनही असतं.... माणूस आहे ना. 
पण तेच प्रामाणिक मन सांगतं, 
'ते मोठं होणं कशासाठी माहिते का?' 
पैशांसाठी. 
आणि पैसे कशासाठी माहिते?
'हवं ते करण्यासाठी.' 
"मला हवं ते करायचंय..." हे स्वप्न आहे माझं. 
दुर्दैव प्रत्येकाच्या आयुष्याचं हेच असतं. स्वतःला वैयक्तिक हवं ते कधी करता येतच नाही , त्रास कुणालाच द्यायचा नसतो. फक्त स्वतःच्या आयुष्याच्या मानसिक, आंतरिक शांततेसाठी हवं ते करायचं असतं. 
आणि ते न करून आपण आपल्या या सुंदर आयुष्याची हसूनच एक चिरफाड करून टाकणारे आयुष्य एका कॉरीडोअरमध्ये छानपैकी डिजाईन करत असतो...
.
 मीही तेच करणारी एक डेडबॉडी बनत होते... ?  


माझ्या एकांताची कहाणी !

by on सप्टेंबर ०४, २०१८
घराच्या बाहेर कॉरीडोअरमध्ये पायऱ्यांवर शांत बसायला मी जाते. शांत म्हणताना हा 'शांत' शब्द सहज म्हणावा तसा का म्हणून जातो आपण? त्...
आजचा दिवस हा सगळ्या फोटोग्राफर्सच्या जिव्हाळ्याचा दिवस असतो. जीव असलेल्या कॅमेराबद्दल पार जीव ओवाळावा इतकं प्रेम येतं नि एक फोटोग्राफीचा काळ डोळ्यासमोरून जातो....

बदलत्या काळासोबत किती गोष्टी बदलतात. आणि
बदल हा या फोटोग्राफीचा सगळ्यात प्रमुख नियमच जणू !
जसं जसं काळ बदलत गेला, तेव्हा तेव्हा हा काळ कैद करून ठेवलाय तो या कॅमेराने. कॅमेराने काळही स्विकारला नि तोच काळ सतत कैद करण्याचं अमीष फोटोग्राफर्सला सूपूर्दही केलंय. फोटोग्राफीने सामान्यातल्या सामान्याला अमीर बनण्याची मुभा दिली. स्वतःच्या निव्वळ वेगळ्या दृष्टीने, दृष्टीकोणाने स्वातंत्र्य दिलं स्वतःच असं वास्तविक आयुष्य कल्पनेत जगण्याचं.
एकदा हातात कॅमेरा आला की सुरुवात जरी स्ट्रीट फोटोग्राफी, कॅन्डीड फोटोग्राफी,  पोट्रेचर फोटोग्राफी यांचे अगणित प्रयत्न करून होत असली तरी, त्याचा शेवट कुठे नसतो, हे फोटोग्राफीचं गूढ असतं. माणूस रोज नवीनपणे खुश होऊ शकतो ही ताकद तिच्यात असते.
कालपर्यंत घर कॉलेजचा उंबरठा सोडून, दुसरे कुठलेही स्वप्न न जगणारा हाच फोटोग्राफर आपल्याच विश्वात अमीरांचा बादशाह होऊन स्वप्न बघतो ट्रॅव्हलर बनण्याचं, जगभर फिरून ते जग आपल्या कॅमेराने कैद करून स्वत: जगून लोकांपर्यंत ते सुपूर्द करण्याचं... आणि इथेच त्याच्याही नकळत एका गरिबाचं एक व्यक्तीमत्व नकळत पडद्याआड तयार होत असतं. तो एक फोटोग्राफर म्हणून वृद्धिंगत होत असतोच, पण घडवत असतो स्वतःच एक संवेदनशील मन आणि त्याचबरोबर एक भटका ट्रॅव्हलर, ट्रेकर, आणि एक जगाला जगापर्यंत पोहोचवण्याचा दुवा.
वैयक्तिक पातळीवर, तसं माझ्यासाठी फोटोग्राफी ही डीएसएलआरपासून सुरु झाली नाही.  तिची सुरुवात ही टकटक मोबाईलपासून.
तसं मनात ठेवलं नि फोटो काढला, अशा अर्थी मी कधी फोटोग्राफीकडे वळलेच नाही.
हे तंत्रज्ञान असलं तरी माझ्यासाठी हे जादूचं खेळणं होतं, जे मला आनंदी ठेवत होतं.
लहानपणी माझ्यासाठी हे फोटोग्राफीचं जग एका दुरदेशी असलेल्या आणि कधीही आपल्या हाती न लागणारं खेळणं होतं. पण मोठी होत गेले. शिक्षण घेता घेता कॉलेजच्या कॅंपसला कॅमेराचं वरदान मिळालं नि मला ते दिसलं. हातात ते वेव्ह फोनमधून न येणारे, सगळे ब्लर्ड फोटो खचाखच न खचता क्लिक करायला लागले. हळूहळू न दिसणारं स्वप्न माझ्यासमोर येउ लागलं नि नकळत मित्राने उधार म्हणून कॅमेरा माझ्याकडे ठेवायला दिला. त्यातून जन्म झाला एका तोडक्या मोडक्या फोटोग्राफरचा ! आणि वाटायला लागलं 'या क्षणी मी या आयुष्याचे सगळ्यात सुंदर क्षण जगतेय.' जेव्हा मी हातात हा कॅमेरा घ्यायचे. त्यामुळे लिखाणाचं भूत होतंच त्यात कॅमेराने आपलंस केलं नि माझी दृष्टी मोट्ठी होऊ लागली.  हा माझा अनुभव आणि मी घडले, चुकून उधार कॅमेरा हातात आल्यानंतर...
माझ्यासाठी फोटोग्राफीचा सगळ्यात आवडता प्रकार म्हणजे आरशातली फोटोग्राफी...
या प्रकारात ना कुणा  फोटोग्राफरची गरज असते. तिथे असतो फक्त तुम्ही आणि कॅमेरा. त्याला हॅण्डल करून त्यातून स्वतःला कसं सुंदर दिसावायचं ही जोखीम भयंकर मोहक असते. 
ती कशी त्याची ही उदाहरणं ;


तसं लोक म्हणतात, "एक फोटो हजारो शब्द व्यक्त करतो.", पण एक फोटोग्राफ घ्यायला हजारो क्लिक्स काढून बघावे लागतात, हे अव्यक्तच राहते. त्यामागे आवड, छंद जरी असला तरीही तिथे शारिरीक कष्ट अव्यक्त असतात. मन सुखी असतं पण शरीराला सूज येउन जाते. पण फिकर त्याची नसते, हजारोतून एक निवडणं ही दुसरी जोखीम असते.

सध्याच्या परिस्थितीला अल्मोस्ट लोकांसाठी फोटोग्राफी हे एक फॅड झालं आहे. हातात कॅमेरा आला कि ऑटोवर कॅमेरा टाकायचा आणि ते क्लिक बटनची जागा शोधायची आणि एकेक फोटो काढत बसायचं. आक्षेप तिथे माझा नाही, पण हे किती दिवस ? ऑटोच्या पुढे जाऊन मॅन्युएलवरही प्रयत्न करून केव्हा बघणार ? तिथेच खुश राहणारे हे असतात. म्हणजे एखाद्या खेळण्याला मोठ्या आनंदाने विकत घ्यायचं नि त्याला नीट न्यायही द्यायचा नाही? त्याचा लोक करतात तसाच वापर करायचा ? ? नवीन असं काहीच नाही? अशावेळी वाटतं पुढे जावं त्यांनी. त्यात मजा आहे, त्यात नशा आहे. ती समजून घ्यावं त्यांनी. असो ! ही ज्याची त्याची आवड... यापुढे जाऊन काही लोक म्हणतात मला यातील तांत्रिक बाबी समजत नाही. चुकत आहेत तुम्ही. फोकस तुमचा चुकतोय. आयएसओ , अपर्चर, शटरस्पीड, या सगळ्या भंपक कल्पना आहे. जोड याची हवीच,
 पण 'प्रकाश' हा याचा महत्वाचा जोडीदार ठरतो. तो ओळखता यायला हवा आणि तोचतोचपणा फोटोत आणण्यापेक्षा आपल्या दृष्टिकोनाला आव्हान देता यायला हवं, मग 'डीएसएलआर आहे म्हणून फोटो काढतो.' हे टोमणे बंद होतात.

बाय दी वे, 'बीहाईंड दी सिन... ' म्हणजे 'दिसणाऱ्या फोटोच्या मागे काय घडतं? 'हे फोटोग्राफीत सगळ्यात मोठं वरदान किंवा शापही असतो म्हणा....
जर फोटोमागे घडतं ते सगळं आपल्याला हवं तसं असेल तर तो फोटो आपल्याला हवा तसा मिळतच नाही. याशिवाय फोटो ज्याचा क्लिक करणार असतो त्यांच्यात आणि फोटोग्राफरमध्ये अंडरस्टॅन्डिंग आणि मॅच्युरपणा नसेल तर सगळा फोटोशूट फ्लॉप जाऊन मग त्या शूटला नीट करावं लागतं फोटोशॉप किंवा स्नॅपसीडसारख्या एडिटिंग ॲप्समध्ये.
पण या दोनच गोष्टी नसतात फोटोच्या मागे. तिथे असते धम्माल, फेक कॅन्डीड काढण्याचे भयानक भारी प्रयत्न. त्याचबरोबर माझ्या अनुभवावरुन तरी हे फेक कॅन्डीडच फोटोग्राफरला बेस्ट आणि इतरांहूनही वेगळा फोटो, फ्रेम देतात. त्यामुळे हा बीहाइण्ड दी सिन एक अनोखा आणि प्रत्येक शूटला वेगळा माहोल देणारा भाग असतो.

फोटोग्राफीने जसं फोटोग्राफरला विश्व दिलं तसंच, स्वतःच विश्व दिलं या 'नजरेला.' नजरेलाही एक विश्व असतं, तिलाही आपलं मन कुठल्यातरी माध्यमातून व्यक्त करता येतं. या विश्वात माणसाच्या मनातलं नजर व्यक्त करते आणि त्याच नजरेला व्यक्त व्हायचं असतं तेव्हा हा  कॅमेरा तिचं माध्यम बनतं.
या सगळ्याअनुभवांतून एक मोडकीतोडकी फोटोग्राफर झाल्यानंतर एकच घटित कळलं,
"निसर्गापेक्षा सुंदर फोटोग्राफर नाही आणि माणसांच्या डोळ्यांपेक्षा सुंदर लेन्स नाही."
तरीही स्वतःसाठी करत राहू या कॅमेराचे लाड आणि बनू होममेड खुशीचा हकदार!


जग फोटोग्राफरचं !

by on ऑगस्ट १९, २०१८
आजचा दिवस हा सगळ्या फोटोग्राफर्सच्या जिव्हाळ्याचा दिवस असतो. जीव असलेल्या कॅमेराबद्दल पार जीव ओवाळावा इतकं प्रेम येतं नि एक फोटोग्राफीचा ...
दोस्त ....
म्हणे दोस्त...
नीट बघा बरं दोघांना...  दोस्त दिसता का हो ते ?
"त्यातला एक तुम्हाला बाप वाटेल आणि दुसरा त्या बापाने दत्तक घेतलेला मुलगा..."
याव्यतिरिक्त,
तुम्ही लोकं वेडे असतात त्यांना मित्र म्हणतात...
तुमची काही चुक नाहीच म्हणा ते दोघे हरामी, तुम्हाला जे दाखवायचं तेच दाखवता..
बघायची तुम्हाला त्यांची यारीच, तर जा त्या ठिकाणी (ते ही त्यांनी येऊ दिल तर ) जिथे ते दोघे मित्रांशी खोटं बोलून गपचुप कुठेतरी फिरायला जाताय... लोकांसमोर शांततेचे ते पुतळे बसतात, पण नजरेनेच ते एकमेकांचा आनंद बनता .... जा अशा ठिकाणी,  जिथे ते एकमेकांच्या सोबतीने रडतात... आणि जा अशाही ठिकाणी, जिथे ते एकमेकांच्या सोबत नसू या भावनेने रडतात... जा  तिथेही जिथे ते निव्वळ शांत बसलेले असतात स्मशानांतता असते आणि तरीही ते निशब्द बोलतात ...
पण अशावेळी तुम्ही कुठे असता माहिते ? तुम्ही असतात त्यांच्या व्यावहारिक मैत्रीत ...
चांगलंय तेही, त्यांनाही तुम्हाला तिथेच तर ठेवायचं असतं...
'व्यावहारिक मैत्रीच' तर फक्त ते तुम्हाला दाखवू पाहतात...
किंवा फार फारतर तुम्ही असतात, मुलगा मुलगी मित्र नसतातच म्हणजे हे एकत्र सिनेमाला जाता, एकत्र खाता, हातात हात घालून फिरता हे सगळं पाहून समाज बनून या पवित्र बंधनाला तुम्ही दुषणं देता, स्वतःच्या बुद्धीच्याआकाराएवढे!
आणि मग तुम्ही त्यांच्या मैत्रीवर स्वार्थी जळून त्यांच्यात फाटे फोडतात... आणि तिथेच त्यांची मैत्री सिद्ध होऊ लागते...
एक गोष्ट सांगू? ...
"दोस्त कभी सस्ता नहीं होता...
मी गेल्यावर माझी किंमत कळेल, यापेक्षा दोस्त  असतानाची किंमत कैकपटींनी जास्त असते. तेव्हा त्याची किंमत ठेवा." !
फक्त आठवण करून देते, मित्राला गृहीत धरणं,  मोठी चुक असते ...
त्यावरच गोष्ट आहे...
मित्र होतो आम्ही दोघे, तीव्र जिवाला जीव देणारे ... एकमेकांशिवाय कॉलेजचा एक दिवस जगलो नव्हतो.कॉलेज संपलं आणि मैत्री...?
पावसाळ्याचे दिवस चालू होते...
बाहेर धोधो पाऊस कोसळत होता. टेलिव्हिजनवर बातम्या चालू होत्या. आम्ही दोघे आमच्या कॉलेज दिवसातले किस्से रंगवत होतो. दिवस तो 3 ऑगस्ट होता, बर्रोबर मागच्या वर्षी आम्ही लडाखला गेलो होतो...
आज के दिन मौसम , कुदरत सगळं इतकं सुंदर जुळून आलं होतं की मी वाट पाहत होते तो मला म्हणेल 'चले?'
तो अर्ध वाक्य म्हणायला आलाच मी "ऑफ कोर्स एस्स" ... म्हणून पूर्ण केलं.
आणि क्षणही न दवडता आम्ही गाडी, कपडे, पैसे, दोरी, कॅमरा आणि एक हरवलेली मुस्कुराहट घेऊन लग्गेच निघालो ...
वातावरण बाप झालं होतं...
वातावरणात मैत्रीचा गंध पसरला होता... यारी पें हमारे कुछ जादा ही प्यार आ राहा था|
लडाख म्हणजे आमची यारी होती.
जिच्यात प्रचंड ओढ होती आणि प्रत्येकाच्या आयुष्यातलं ते स्वप्न, फक्त माझ्या वाट्याला येऊन पूर्ण होत होतं, तेही प्रत्येक फ्रेंडशिपडेच्या दिवशी..! एकमेकांना नकळत दिलेलं ते प्रोमिसच होतं, "कोणी मरत जरी असेल तरी फ्रेंडशिपडे पुढे ढकलला जाणार नाही. भेटायचं म्हणजे भेटायचंच. फिक्सच!."
ठरल्याप्रमाणे निघालो आम्ही.
आम्ही जुने किस्से पुन्हा आठवत, कॉलेजमधल्या पिंकी चिंकीला आठवत, पहिल्या प्रेमाच्या, पहिल्या ब्रेकअपला शिव्या घालत,  हळूच 'एखादा हॅंडसम मुलगा ओवर्टेक करून गेला की त्याच्यावर मी लाइन मारत आणि सुंदरशी मुलगी गाडी चालवत गेली की त्याला दाखवत' आम्ही आमचे दिवस पुन्हा आणून जगत होतो. हा आनंद एका वर्षभरात मी वेड्यासारखा मिस्स केला होता... आयुष्याच्या गर्तेत हा फुकटचा, होममेड आनंद मी विसरूनच गेले होते. पैसा करीअरच्या घाईत मी माझा आनंदच दावणीला लावलेला होता. आज भेटणं कशापेक्षाही जास्त महत्वाचं होतं नाहीतर पुढे होणार होतं ते कसं झालं असतं?
तसं मध्ये एक वर्षाचा गॅप गेला होता. आमचा एकमेकांशी कॉंटॅक्ट झालेला नव्हता. तरी आज भेटलो होतो आम्ही. आम्ही भेटलो तेव्हा या मधल्या एका वर्षाबद्दल टेलिपथीने ठरवलंच असावं की "मधल्या काळात काय झालं हे गौण आहे कारण आजचा दिवस आपला आहे. ते आपण सगळ नंतर बोलूया. काय भांडायचं नंतर भांडूया..."
या'नंतर'च्या भरवशावर आमच्या प्रवासात एक पूल आला, त्यावर खड्डे जमले होते. बाहेर बेधडक पाऊस कोसळत होता... मागच्यावेळी हेच खड्डे आम्ही "चल डरपोक , हम हम हैं, जायें या नहीं जायें? हम नहीं सोचतें. चल एक जान होके पार करते है।..."
पण यावेळी तो त्याचं तो पुढे गेला, मी माझं...
आणि अर्ध्यात तो पूल एक दोरी निसटून खाली कोसळला...आणि क्षणात काय झालं माझ्या डोळ्यासमोर कळलंच नाही. श्वास लिटरली अडकले होते...
यावेळी वेगवेगळे गेलो म्हणून मी मरणार होते...
'मेरी यारी मुझ में जान भी डालती है।' हे मला त्या क्षणी कळत होतं. माझं भानच गेलं होतं... हे घडणं प्लॅन नव्हतं मग असं कसं घडत होतं, मी घाबरून गेले होते. तितक्यात तो मागून जिवाच्या आकांताने ओरडायला लागला होता, "हर्रामीsssss, कित्ती मिस्स केलंय तुला कल्पना नाहीये भूता आणि त्याचा बदला मला लडाखला पोहोचून घ्यायचाय, तुला वाचायचंय कळतंय का... तु ब्रेव्ह गर्ल आहेस. धीर सोडू नको. नाहीतर मी दुसरा मित्र कुठून शोधू?" ... ते ऐकून जागी होऊन मी गाडी सोडून दिली,
आणि म्हणाले, "शोधूनही मिळेल काळ्या?" मला या परिस्थितीतपण त्याचा राग आला होता. माझी रिप्लेसमेंट मला नकोचे. तो करणारही नाहीये खात्री असून त्याची गच्ची पकडून त्याला जाब विचारायचा म्हणून तरी मला वाचायचं होतं ... एका  हाताने त्या पुलाची सुटलेली दोरी घट्ट पकडली. मोठय़ाने श्वास घेतला पण त्याचं तोंड बघण्यासारखं झालं होतं, ते डोळे सुसरासारखे मोठेठे  झाले होते ... त्याचा जीव अर्ध्यात येऊन पडला होता...
त्याचा तो थरकाप, माझ्याप्रतीचं प्रेम पार डोळ्यातून बाहेर आलं होतं पहिल्यांदा ... त्याच्या डोळ्यात "मला रहायचंय तुझ्याबरोबर आयुष्यभरासाठी, कधीही न सोडण्यासाठी...." दिसत होतं... हे मी त्या चार भिंतीच्या आत कोंदटलेल्या ऑफीसात मिस्स केलं होतं...
तो घाई करत, आहे तसा गाडीवरुन खाली उतरला. मी त्याच्याकडे पाहीलं आणि " यारर्र  सॉरी यारर्र्रsssssss..... का कस माहिती नाही पण तुला गृहीत धरू लागले होते... हे एवढे दिवस तुझ्याविना राहणं म्हणजे माझ्यातली मीच शिल्लक राहिली नव्हते... मला जगायचंय" म्हटलं
..
"एएएएएएssss बाई, नंतर लेक्चर झाड ना... मरायवर आलीयययय इथे... आधी बाहेर निघ इथून फिल्मी कुठली... " तो विव्हळत होता..
आणि आरडाओरडा करून, आरोळ्या देउन लोकांची मदत मागत होता. शेवटी कुणाची वाट न पाहता, एका ठिकाणी खरचटवून का असेना, त्याने मला रस्सीने व्यवस्थित बाहेर काढून एका सुरक्षित जागी ठेवलं होतं, माझ्या हक्काच्या मिठीत...! त्याचा जीव माझ्यात परत आला होता ... मला माझ्यात जीव जाणवायला लागला होता....
तेव्हा मला कळलं होतं जीव जाणं काय असतं आणि आपला जीव जाताना दुसऱ्या कुणाचा जीव जात असतो ते काय असतं.... आणि हाच तो हरामी एका अशाच क्षणी आपला होतो आयुष्यभरासाठी!!!
पण या घटनेमुळे,
तिथे तो माझा बाप झाला होता ...असा बाप जो माझ्यासाठी धडपड करत होता, ज्याला त्याच्या मुलाला जगवायचं होतं,  वाढवायचं होतं. ज्याचे त्याला सगळे लाड पुरवायचे होते. ज्याला माझ्यावर निस्वार्थ प्रेम करायचं होतं, जो माझ्या यशावर न जळणारा एकमेव प्राणी असतो या पृथ्वीवर...
त्यावेळी मला कळलं होतं तो त्याच्यातल्या मला कधी मरू देणार नव्हता मला कळलं होतं.... आणि म्हणून दोस्ती म्हणजे 'एकच व्यक्ती असते जेव्हा शोलेचं ये दोस्ती हम नहीं छोडेंगे, तुम जैसे चुतियोंका सहारा, यारों दोस्ती बडी ही हसीन, मेरी जिंदगी सवारी म्हणत जो गडी कुठल्याही गडबडीशिवाय तुमच्या शेजरी येतो तो हा व्यक्ती असतो .."
स्साला ही दोस्ती नाही, स्वार्थ असतो...
स्साला ही दोस्ती नाही, जीव असतो...
स्साला ही दोस्ती नाही, शरीर असतं...
स्साला ही दोस्ती नाही, श्वास असतो..
स्साला ही दोस्ती नाही, बाप असतो...
म्हणूनच ही दोस्ती कुठल्याच बंधनात न बसता प्रत्येक नात्याची कमी पूर्ण करणारं वरदान असतं ...

दोस्त नहीं, तो बाप असतो ...

by on ऑगस्ट ०५, २०१८
दोस्त .... म्हणे दोस्त... नीट बघा बरं दोघांना...  दोस्त दिसता का हो ते ? "त्यातला एक तुम्हाला बाप वाटेल आणि दुसरा त्या बापाने दत्...


आज खरं सांगू ??? तू एकदा प्रश्न विचारलेलास..."इतकं कसं लिहितेस तू.? तेही माझ्यासारख्या विषयावर...?"
आज त्याचं उत्तर द्यावसं वाटतंय...
             जेव्हा वेगळे झालो आपण... आठवण तुझी इतकी घट्ट यायची की त्या आठवणींची ती मिठी सुटायचीच नाही किंवा कदाचित मला ती सोडावीशीच वाटायची नाही... तुझं इतक्क जीवजाणं व्यसन लागलं होतं की त्याची नशा उतरवावी वाटायची नाही. रात्र-रात्र थरकाप व्हायचा 'तू सोबत नाही' या भावनेने ... तो थरकाप तू तुझ्या हातात घ्यावा त्यासाठी तरी तू सोबत असावा वाटायचास...
          अनेकदा खोटे भास मी स्वतःच्या मनाला खरे करून सांगितले आठवतंय मला कारण माझा विश्वास होता, "एकदा खरं प्रेम केलं की तिथे ब्रेकअपसारखे नसते उपद्व्याप नसतातच..  प्रेमच प्रेम असतं. सुरुवातीलाही आणि शेवटपर्यंतही." वाटलं होतं, अशावेळी तरी तू येऊन माझ्या बोलण्याला खरं करशील.... पण हळूहळू तू त्या प्रत्येक ठिकाणी कुठेच आला नाहीस, तेव्हा मी लपेटून घ्यायला लागले स्वतःला, माझ्या लेखनीच्या आकारात, उकारात, शब्दांत ... त्यांच्या अस्तित्वाने किमान आपल्यातली ती सतत पोखरणारी शांतता मला तोडायची होती म्हणून स्वतःला मी गुरफटवत गेले त्या निळ्या काळ्या शाईच्या गर्तेत ...
         तू त्या कल्पनेतही माझ्या कित्ती जवळ असायचास वेड्या. जसा खरोखर सोबत आहेस__फक्त एका श्वासाच काय ते अंतर... त्या कल्पनेतही स्वतःचाच इतका हेवा वाटायचा आणि त्यामुळे तिथेच अशा खुऊपशा रात्री मी अशाच निवाआआअंत घालवायचे. आणि त्या चार भिंतीत आपलं दोघांमधलं 'लग जा गले' शोधत राहायचे...
         तुला आठवतंय, त्यावेळी मी तुला "माझ्या घरी येऊन मला मिठीत घेऊन दाखव मग मानेल तुझ्या प्रेमाला" म्हटलेलं... त्यावेळी नेमकं घरी कुणी नसल्याचा स्मार्ट डाव तू खेळला होतास शहाण्या ... मी चितपट झाले होते, संपले होते तुझ्या त्या एका प्रेमातल्या कटाक्षाने नि नंतरच्या अघुर्‍या "तू माझीच आहेस फक्त कळलं.?" या भावनेने ...
         सध्या भोवती वास्तवात नाहीयेस तू ... पण या स्वतःला स्वतःच्या लिखाणात लपेटून घेतल्यामुळे तिथे तू नसूनही तू माझा आहेस आणि तू नसल्याचे दुख मला तिथे तू नसतानाही त्यातून बाहेर पडल्यावर खुश करून पाठवत आहे... तुला लपेटण्यापेक्षा या शाईला लपेटून मी तुला 'तू माझा असल्याचा' हक्क तर दाखवूच शकते, जी वास्तवात एक कल्पना आहे...!!!
शेवटच एक सांगू...?
काल शेवटचं ठरलंय...
काल तुझ्या त्या 'एका आठवणीबरोबर' मी कितीतरी वेळ खेळत बसले होते ...
थोड्या गप्पाही झाल्या...
तुझ्या येण्याची आम्ही दोघींनी आतुरतेने वाट पाहिली ...
मी थोड़ी जास्तच नेहमीसारखं!
न राहवून ती म्हणालीच, "बावळट आहेस का गं तू.? तो आला असता तर मी आले असते का.? तू इतकी आंधळेपणाने कशी कुणाची होऊ शकतेस.? ... "
ती आपलं बोलत राहिली, बोलत राहिली नि मी तिच्या त्या बोलण्यातही तुझं 'येणं' शोधत राहिले...
शेवट निघताना तटस्थपणे तीच म्हणाली;
            यापुढे लक्षात ठेव,
आपण तिघे एका ठिकाणी नसूच शकतो ... स्पष्ट नाही...
त्यामुळे स्विकारून टाक त्याचं माझ्यातलं असणं,
तो फक्त माझ्यात असेल यापुढे आता ... आणि यार्र्र आता बस कर हा आठवणींचा पसारा, तोचतोपणा आणि बरोबरची ती जुनी शाई. आऊटडेटेड झाली आता...
विचार मीही तोच करायला लागलेय !
कारण, आठवणींचा समुद्र तुझा अंगावर येतोय आता,
माझ्यासकट माझं पूर्णत्वच घेऊन जातोतू.
सवड दे मला थोडीशी,
घट्ट रुतून बसते किनाऱ्याला.
तीर स्वतःचे बांधायचे आहे,
त्यात राहतील तुझ्या आठवणी, मीही पूर्ण !

शाईतल्या ईकारात 'तू '...

by on ऑगस्ट ०२, २०१८
आज खरं सांगू ??? तू एकदा प्रश्न विचारलेलास... "इतकं कसं लिहितेस तू.? तेही माझ्यासारख्या विषयावर...?" आज त्याचं उत्तर द्यावस...